29/10/2025
जगाचा पोशिंदा असणाऱ्या आपल्या मराठवाड्यातील शेतकरी बांधवावर गेल्या महिन्या अखेरीस ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले. जळगावं मधील माळ पिंप्री ,
देवपिंप्री,नेरी दिगर,नेरी बुद्रुक,करमाड
या गावांमधील काही माहितीतल्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आधाराची गरज आहे अशी माहिती तिथे स्वतः कार्यरत असणाऱ्या डॉ.अशोक पांडव यांच्या माध्यमातून रॉबिन लोपीस यांना समजली. त्याप्रमाणे मग त्यांना कसली गरज आहे याची माहिती घेऊन आरंभ मार्फत मदतीसाठी आवाहन करण्यात आले.
तुमच्या सारख्या सगळ्या संवेदनशील मित्र मैत्रिणींनी सढळ हस्ते केलेल्या सहकार्यामुळे आपण 46 रेशन किट तयार करू शकलो आणि ते रॉबिन लोपीस यांनी स्वतः जाऊन गरजू व्यक्तींपर्यंत दिवाळी अगोदर पोहचवले सुद्धा.
रॉबिन स्वतः गेल्यामुळे तिथे परिस्थिती नक्की काय आहे आणि त्यांना काय हवं आहे त्यांच्याशी बोलून त्याप्रमाणे किट मधे बदल करता आले. आपण दिलेले कपडे आणि रेशन किट योग्य ठिकाणी पोहोचवता आले.
या सगळ्या कामी मोलाचा हातभार लावणारे विनोद राठोड, पल्लवी देशपांडे, प्रवीण भालेराव, नेल्सन डिमेलो, अर्चना पहूरकर, जितेंद्र रंगन, मनीष दळवी, शाम परुळेकर, शैला परेरा, हर्षदा वाघमारे, गणेश दाते, पद्मश्री परुळेकर, आशिष कवळी,वैशाली पडवळ, लक्ष्मण चेल्लिंगी, शशिकांत खांडेकर, अविनाश कुलकर्णी, सुधा कदम, मंगला परब, बोनिता फुटर्डो, फ्रांसिस लोपीस, जेरोल्ड लोबो यांचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद.या कामी फिल्ड वर महत्वपूर्ण भूमिका बजावणारे रॉबिन लोपीस,आचार्य इंटरप्रायसेस चे दिलीप आचार्य, मेलकम परेरा, डॉ.अशोक पांडव,जगन्नाथ झांबरे,सतीश कोलते,अनिकेत पांडव, डॉ.सोपान पाटील,रमेश पाटील,प्रतापनाना पाटील,संजय पाटील, अनिल सूर्यवंशी,एस. बी.सोनावणे यांचे हि मनःपूर्वक धन्यवाद.
तुमच्या सगळ्यांची सुहृदयता आणि सहकार्यामुळेच आपण आपल्या बांधवासाठी आपला खारीचा वाटा पोहोचवू शकलो.
काही वेळेस असे वाटते निसर्ग वेगवेगळ्या रूपात आपण केलेल्या चुकांची शिक्षा देत असतो पण त्यातूनहि माणसातले माणुसपण जिवंत आहे की नाही हे हि तपासत
असतो. शेवटी संकटकाळी एकमेकांच्या पाठी भक्कमपणे उभे राहणे हेच माणूसपणाच पहिलं लक्षण आहे आणि आपल मन अजून संवेदनशील/ जागृत आहे की नाही हे समजण्याची खरी खूण आहे.
🖋️ अमृता पुरंदरे
आरंभ सामाजिक प्रतिष्ठान