28/05/2026
आज विरार नगरीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रभक्ती, वैचारिक जागृती आणि कृतज्ञ अभिवादनाचा अत्यंत प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एक हात मदतीचा चॅरीटेबलं ट्रस्ट आणि वीर सावरकर मित्र मंडळ, विरार यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास सावरकरप्रेमी नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.तसेच एक हात मदतीचा वृद्धाश्रमातील निराधार अपंग वृद्धानी सुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती दिली.विशेष म्हणजे वीर सावरकरांच्या नावाने अपंग असलेल्या वृद्धांमध्ये सुद्धा एक नवीन चैतन्य निर्माण झालं होतं.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले Swapnil Savarkar यांचे प्रभावी मार्गदर्शन. आपल्या भाषणात त्यांनी अत्यंत ठाम शब्दांत प्रतिपादन केले की, *“स्वातंत्र्यवीर सावरकर हे कालखंडाचे धुरंधर पुरुष होते. त्यांनी केवळ परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष केला नाही, तर राष्ट्राभिमान, विज्ञाननिष्ठ विचार, सामाजिक समता आणि स्वाभिमानी हिंदुस्थानाची वैचारिक पायाभरणी केली. त्यांच्या विचारांचे तेज आजही तितकेच प्रखर असून भावी पिढ्यांसाठी ते दीपस्तंभ आहेत.”* त्यांच्या या विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांच्या मनात राष्ट्रनिष्ठेची नवी चेतना जागृत झाली.
या प्रसंगी श्रीमती. नेहा कोठारी (प्रमुख विश्वस्त — एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट), श्री. उमेश गुप्ता (विश्वस्त — एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सचिव — वीर सावरकर मित्र मंडळ) आणि श्री. अविनाश पाटील (अध्यक्ष — वीर सावरकर मित्र मंडळ) यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रकार्यास आणि वैचारिक योगदानास अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान वीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. “भारत माता की जय”, “जय हिंद” आणि “वीर सावरकर अमर राहो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला.
आजचा हा सोहळा केवळ जयंती उत्सव नव्हता, तर राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या एका युगपुरुषाच्या विचारांशी नव्याने नाते दृढ करण्याचा प्रेरणादायी क्षण होता.
*“सावरकर हे इतिहासातील केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून, अखंड राष्ट्रचेतनेचे प्रज्वलित प्रतीक आहेत.”* 🇮🇳