04/06/2026
गत रविवारी अर्थात, दि.१७ मे २०२६ ह्या दिवशी, ‘अभाविप, सृजन संपदा आणि विद्यार्थी निधी न्यासाद्वारे’, डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (प) येथे, *अभाविपचे तत्त्वचिंतक, संघटन शिल्पी प्रा.यशवंतराव केळकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, ‘दृक श्राव्य माध्यमातील अभिवाचन’ व स्वतः त्यांनीच लिहिलेल्या दैनंदिनीचे पुस्तक स्वरूप ‘बिंब बचकेएवढे’ ह्या संग्रह ग्रंथाचे प्रकाशन, अत्यंत कृतज्ञ, भावनिक वातावरणात संपन्न* झाले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात राष्ट्रगीत, ख्यातनाम मुलाखतकार स्व.डॉ.आनंद नाडकर्णींना संवेदना श्रद्धांजली, स्वागत प्रास्ताविक, मुख्य अतिथी परिचय, प्रतिमा पूजन, ‘बिंब बचकेएवढे’ पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती व पुस्तक प्रकाशन, आणि तत्पश्चात दोन्ही मुख्य अतिथी, अभाविप पूर्व राष्ट्रीय महामंत्री, रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री.रवीजी अय्यर, तथा अभाविप पूर्व राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे ह्यांचे संबोधन, व सरतेशेवटी आभार प्रदर्शन’, तर द्वितीय सत्रात, मा.यशवंतरावांच्या स्मृतींचे ‘दृक श्राव्य माध्यमातील अभिवाचन’ असे एकंदर आयोजनाचे स्वरूप होते.
🚩