Think Maharashtra

Think Maharashtra महाराष्‍ट्रातील प्रज्ञा, प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्‍यासपीठ!

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ - महाराष्ट्राचे समग्र चित्र

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजाती

ल सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामतील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.

वेबसाइट हे कोणतीही माहिती तत्क्षणी जगभर पोचवण्याचे साधन आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टि.व्ही. चॅनेल्सच या माध्यमांच्या तुलनत वेबसाईटची माहिती साठवण्याची क्षमता मोठी आहे. त्यास ऑडिओ, व्हिडीओ अशा इतर माध्यमांची जोड देऊन माहिती अधिक परिणामकारतेने सादर करता येते. तसेच त्यात कोणताही मजकूर शोधून मिळवता येतो. तो कधीही सुधारता येतो. म्हणून 'व्हिजन महाराष्ट्रा'ने उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी इंटरनेट हे माध्यम निवडले.

वाढत्या ‘ग्लोबल’ वातावरणात ‘लोकल’ स्वरूप झपाट्याने नष्ट होत असल्याची भावना जगभर, प्रांतोप्रांती व देशोदेशी आहे. आपणास ‘थिंक महाराष्ट्र’मार्फत महाराष्ट्रीय समाजापुरता त्या भावनेचा आदर करून आपल्या प्रदेशाचे व संस्कृतीचे संचित जपण्याचे उपक्रम हाती घेता येऊ शकतील आणि तसे काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचे कार्य समाजासमोर सातत्याने मांडता येईल. ही अभूतपूर्व कल्पना आपल्या काळात निर्माण झाली व विकास पावली याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल! कारण 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' हे मॉडेल ठरू शकेल व त्या धर्तीवर 'थिंक कर्नाटक', 'थिंक पंजाब', 'थिंक बंगाल', एवढेच काय 'थिंक स्वीडन', 'थिंक कोरिया' यांसारखे प्रयत्न त्या त्या समाजात आकार घेऊ लागतील.

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. कारण या प्रकल्पात महाराष्ट्रातील चांगुलपणा आणि प्रज्ञाप्रतिभा यांच्यामध्ये दुवा साधायचा आहे. त्या दृष्टीने वेबपोर्टलवर तीन प्रकारे माहितीचे संकलन केले जाते.

१. मराठी कर्तृत्वाची नोंद - समाजातील सर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांची उपेक्षा होते. दुसरीकडे लता मंगेशकर, शरद पवार, माधुरी दीक्षित-नेने, सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून घेतली जातात. त्या व्यक्तींना आदर्श म्हणून पाहिले जाते. प्रत्यक्षात असे अनेक आदर्श गाव-खेड्यांपासून शहरांपर्यंत विखुरलेले आहेत. त्यांच्यावर प्रसिद्धीचा लाईमलाइट पोचू न शकल्याने ते अज्ञात राहतात. सेलिब्रिटींसोबत मराठी समाजातील सर्व कर्तृत्ववान मंडळींची माहिती संकलित करून ती 'थिंक महाराष्ट्र'वर मांडली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांतील आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाची नोंद तर होईलच, पण सोबत सर्वसामान्यांमध्ये दडलेली ताकद-ऊर्जा व्यक्त होईल. त्यातून महाराष्ट्रीय समाजातील आत्मविश्वास जागा होऊन महाराष्ट्रीय माणसाचा न्यूनगंड नाहीसा होईल असा विश्वास आहे.

२. स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांच्या निरलस कार्याचा आढावा - महाराष्ट्राची ताकद कार्यकर्त्यांत आहे असे गांधीजी म्हणत. कर्नाटकाला सात ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले तर त्या काळात महाराष्ट्राला सात मॅगसेसे अॅवार्ड मिळणे स्वाभाविक ठरले. 2014 मध्येही महाराष्ट्राला दोन मॅगसेसे पुरस्कार लाभले! महाराष्ट्रभर स्वयंसेवी संस्थांचे जाळे आहे. त्यांचे काम, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे अर्थकारण ह्यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडू शकलो व त्या क्षेत्रातील घडामोडी नित्य कळवू शकलो तर ते महत्त्वाचे काम होईल. संस्थांनाही अधिक बळ लाभेल. महाराष्ट्रात स्वयंसेवी पद्धतीने व्यक्तिगत व संस्थात्मक रीत्या बरेच मोठे सामाजिक कार्य होत असते. जर ते काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू शकलो तर भोवतालच्या बजबजपुरी माजलेल्या परिस्थितीत किती चांगल्या आणि विधायक गोष्टी घडत आहेत हे दिसून येईल. यातून लोकांमध्ये आश्वासकता निर्माण होईलच, पण सोबत त्या कार्यातून व्यक्त होणारा सर्वात महत्त्वाचा घटक, चांगुलपणा, तोही लोकांना भावेल. एवढे मोठे सामाजिक काम होत असताना त्याचा समाजावर हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. उलट, कार्यकर्त्यांची उपेक्षा होते. याप्रकारे व्यक्ती व संस्था यांच्या कामाचा आलेख सातत्‍याने समाजासमोर मांडला तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल.

३. मराठी समाज व संस्कृती यांच्या वैभवाचे डॉक्युमेन्टेशन - महाराष्ट्राच्या गावोगावचे सांस्कृतिक वैशिष्ट्यं वेगवेगळे आहे. ते सारे वैभव प्रवाहित होत आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे. उद्या ते टिकेल याची शाश्वती नाही. ते काळाच्या ओघात नामशेष होण्यापूर्वी आपण त्यांचे लिखित, फोटोग्राफी, व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉडींग अशा माध्यमांमध्ये त्यांचे डॉक्युमेन्टेशन केले तर ते उद्याच्या पिढ्यांना उपलब्ध करून देता येईल. याचा फायदा वर्तमान अभ्यासकांना आणि भविष्यातील समाजाला होईल. या उद्देशाने 'थिंक महाराष्ट्र'वर 'वैभव' या विभागात महाराष्ट्रातील गावोगावच्या ग्रामदेवता, यात्रा-जत्रा, येथील कला आणि कलाकार, प्रथा, परंपरा, किल्ले , बाजार, खाद्यसंस्कृती, सण-उत्स,व, गावांची माहिती, वन्यावैभव, प्राणीजीवन अशा विविध त-हेने माहिती संकलित करून मांडली जाते.

'थिंक महाराष्‍ट्र' प्रकल्‍पाबद्दल सविस्‍तर माहिती घ्‍या - https://www.thinkmaharashtra.com/about-think-maharashtra/

‘आपलं  #वडगाव’ नावाचा एक दिवाळी अंक दोन वर्षे (2024 पासून) प्रसिद्ध होत आहे. त्याच्या 2025 सालच्या विशेष अंकाचे प्रकाशन ...
08/11/2025

‘आपलं #वडगाव’ नावाचा एक दिवाळी अंक दोन वर्षे (2024 पासून) प्रसिद्ध होत आहे. त्याच्या 2025 सालच्या विशेष अंकाचे प्रकाशन मुंबईचे चित्रकार व चित्रपट दिग्दर्शक रघुवीर कुल यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात झाले. कुल यांनी कागदी आवरणातून अंक बाहेर काढला व समोरच्या श्रोत्यांसमोर धरला. त्याच वेळी त्यांची स्वत:ची नजरही अंकाच्या मुखपृष्ठावरून गेली. त्यामुळे ते एकाच वेळी चपापले व अतिशय आनंदितही झाले. #मावळ तालुक्यात एक भव्य कलादालन निर्माण केले जावे असा उच्चार समारंभात वेगवेगळ्या वक्त्यांकडून वारंवार होत होता. रघुवीर कुल यांनी त्यांच्या मनोदयास भरभरून पाठिंबा व्यक्त केला...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/heritage-of-maval-taluka-in-special-issue-of-aapala-vadagaon/

राजा  #रविवर्मा हे नाव भारतीय चित्रकलेच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या कलेने भारतीय चित्रसंस्कृतीला जागतिक स्तरावर मा...
08/11/2025

राजा #रविवर्मा हे नाव भारतीय चित्रकलेच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या कलेने भारतीय चित्रसंस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाली. त्यांनी त्यांच्या चित्राच्या माध्यमातून देव, देवता आणि स्त्रीसौंदर्य यांना नव्या स्वरूपात सादर केले. राजा रविवर्मा यांचे #मावळ प्रांताशी घनिष्ट संबंध होते. ते अनेक वर्षे मावळात वास्तव्यास होते. त्यांनी तेथे राहून अनेक उत्तमोत्तम चित्रे रेखाटली. त्यांचे विषयदेखील प्रदेशाशी जोडलले होते. त्यामधून रविवर्मा यांच्यासारख्या जगद्विख्यात चित्रकाराचा मावळ प्रदेशाशी कसा ऋणानुबंध होता हे स्पष्ट होते. ‘दमयंती आणि हंस’ हे चित्र त्या दृष्टीने उद्बोधक आहे...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/raja-ravi-varma-and-maval-bond-of-love/

हमीद सय्यद हे  #अहिल्यानगर जिल्ह्याच्या  #शेवगाव तालुक्यातील भातकुडगावचे. छोट्या गावातून आलेला हा मुसलमान मुलगा वयाची चा...
06/11/2025

हमीद सय्यद हे #अहिल्यानगर जिल्ह्याच्या #शेवगाव तालुक्यातील भातकुडगावचे. छोट्या गावातून आलेला हा मुसलमान मुलगा वयाची चाळिशी ओलांडित असताना राष्ट्रीय भारूडकार होऊन गेला आहे. आकाशवाणी कलावंत तर तो आहेच. तो #वारकरी सांप्रदायिक पारंपरिक #भारुड सादर करून प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच हुकूमत गाजवू शकतो. त्याची ती ताकद हेरून त्याचा अनेकविध प्रचारकार्यात उपयोग मुख्यत: केंद्र व राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांकडून करून घेतला जातो. हमीद सय्यद यांच्या स्वरचित भारूडांमध्ये गायन, नृत्याभिनय व चटपटीत-उद्बोधक संवाद हे वैशिष्ट्य असते...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/hamid-sayyad-muslim-divotee-sings-hiindu-bhajans/

 #महाड हे  #रायगड जिल्ह्याच्या उत्तरेला सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. ते ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व असलेले सु...
03/11/2025

#महाड हे #रायगड जिल्ह्याच्या उत्तरेला सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. ते ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व असलेले सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. गाव सामाजिक भान जागते ठेवणाऱ्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे. महाडचे चवदार तळे, तेथील सत्याग्रह. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या तळ्याची निवड करावी यामागे रोचक इतिहास आहे. महाडच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने 1874 मध्ये वाचनालय सुरू केले होते; ते पहिले #वाचनालय. हे वाचनालय ‘पुस्तक साखळी योजना’ हा खास कार्यक्रम अनेक वर्षे चालवत आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या शाळांना मेंबर करून घेतात...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/mahad-library-aims-to-promote-reading-in-school-children/

रामनाथ थरवळ यांची ओळख ज्येष्ठ लेखक, कुशल संपादक आणि बालनाटककार अशी आहे. त्यांनी त्यांचे जीवन बालमनाच्या संवर्धनासाठी आणि...
31/10/2025

रामनाथ थरवळ यांची ओळख ज्येष्ठ लेखक, कुशल संपादक आणि बालनाटककार अशी आहे. त्यांनी त्यांचे जीवन बालमनाच्या संवर्धनासाठी आणि बालनाट्याच्या समृद्धीसाठी समर्पित केले. त्यांना नाट्यविश्वात ‘महाराष्ट्राच्या बालनाट्याचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाते. रामनाथ यांना बालनाट्याच्या क्षेत्रात पहिली संधी सुलभा देशपांडे यांच्या सहकार्याने मिळाली. त्यांनी ‘कलाघर’ या संस्थेची स्थापना केली आणि तब्बल एकेचाळीस वर्षे त्या संस्थेचे संचालक म्हणून कार्य केले. त्यांचे नाट्यलेखन आत्मीयतेने भरलेले असून बालमनाशी थेट संवाद साधणारे आहे. त्यांना मुलांची भाषा समजते, म्हणूनच त्यांचे लेखन मुलांच्या भावविश्वाला भिडते. त्यांनी पन्नासहून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले असून, अनेक कथा, कविता, नाटिका आणि संशोधनपर लेखनही केले आहे...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/ramnath-tharaval-theatre-activist/

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावाचा गमतीने उल्लेख ‘रतनगडाच्या पायथ्याशी वसले जे गाव ! पाच पाडे मिळून तया...
31/10/2025

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावाचा गमतीने उल्लेख ‘रतनगडाच्या पायथ्याशी वसले जे गाव ! पाच पाडे मिळून तयाला दिधले शहाबाज हे नाव !’ असा करतात. शहाबाज गावाला मंदिरांचे गाव म्हणावे इतकी विविध देवतांची मंदिरे तेथे आहेत. पण गावाचे वैशिष्ट्य आहे ती तेथील प्राथमिक शाळा. त्यामुळे गावाची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होत गेली. त्या गावाला प्राथमिक शिक्षक पुरवणारा गाव अशी प्रसिद्धी लाभली होती. तेथील वाचन चळवळीला चालना देण्याचा विचार गावातील प्रतिष्ठित मंडळींनी केला आणि त्याबरोबर शहाबाज गाव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले‌...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/library-brings-shahabaj-enlightenment/

 #ठाणे नगरी शिलाहार राजवटीतील बिंब राजाने राजधानीसाठी निवडली, तो काळ साधारणतः नवव्या शतकातील होय. त्या काळात विविध पाखाड...
30/10/2025

#ठाणे नगरी शिलाहार राजवटीतील बिंब राजाने राजधानीसाठी निवडली, तो काळ साधारणतः नवव्या शतकातील होय. त्या काळात विविध पाखाड्यांमध्ये शिवमंदिरे; तसेच, स्थानिक ग्रामदेवतांची साठाहून अधिक मंदिरे बांधली गेली आणि मंदिरांच्या परिसरात तितकेच तलाव खणण्यात आले. ठाणे शहराची संस्कृती बहरली नि विसावली ती त्या नितांतसुंदर तलावांच्या कुशीत. त्यामुळे ठाणे नगर हे सुजलाम सुफलाम झाले आणि ठाणे हे नंतरच्या काळात तलावांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले ! मात्र, ठाणे शहराची ती ओळख पुसट होत गेली आहे. ठाणे शिलाहार राजसत्तेची राजधानी तेराव्या शतकापर्यंत होती. शिलाहार काळातील लोक शिवोपासक असल्याने मोठमोठे तलाव आणि त्यांच्या काठावर #शिवमंदिरे असा सिलसिला घडून आला...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/lake-city-thane/

दीपक आपटे यांचे नाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात फारसे परिचित नाही; परंतु ते सागरी जीवशास्त्राच्या क्षेत्रात सन्माना...
21/10/2025

दीपक आपटे यांचे नाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात फारसे परिचित नाही; परंतु ते सागरी जीवशास्त्राच्या क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. त्यांची व्यावसायिक वाटचालही वेगळीच आणि प्रेरणादायी आहे. त्यांचे क्षेत्र निसर्गाचा अभ्यास, पर्यावरणविषयक शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे होय. ते ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मुंबईच्या संस्थेचे संचालक होते. त्यांनी ती संस्था 2021 मध्ये सोडली आणि पर्यावरणीय उपाययोजनेसाठी ‘सृष्टी कंझरव्हेशन फाउंडेशन’ची स्थापना केली. त्याचबरोबर, ते सध्या पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अॅडव्हान्स रिसर्च सेंटरचे संचालक आहेत...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/दीपक-आपटे-सचोटीचा-सागरी-प/

Address

15, Vardhaman Industrial Estate, Old Agra Road
Thane
400601

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 10:45am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Telephone

+919892611767

Alerts

Be the first to know and let us send you an email when Think Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Think Maharashtra:

Share