20/09/2024
Madhukar Bachulkar
*""पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमी व्यक्ती , निसर्ग व पर्यावरण अभ्यासक ,
निसर्ग व पर्यावरण प्रेमी संस्थां , सेवा भावी संस्था यांना जाहीर
आवाहन. """"
दिनांक 31 जुलै 2024 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील ECO SENSITIVE ZONES ,ECO SENSITIVE VILLAGES बाबत नोटिफिकेशन प्रकाशित झाली आहे.. आज अखेर अशा पाच नोटिफिकेशन निघाल्या आहेत. या नोटिफिकेशन बाबत सुचना ,आक्षेप पाठविण्यासाठी 60 दिवसांची मुदत आहे. 27 सप्टेंबर 2024 अखेर आपण सुचना, आक्षेप पाठवू शकतो.
प्रत्येक वेळी पश्चिम घाट परिसरातील सर्व सहा राज्यांनी याबाबत विरोध केला आहे .महाराष्ट्र शासनाने ही विरोध केला आहे. महाराष्ट्र राज्यातील 17,340 चौ.किमी.पश्चिम घाटातील क्षेत्र संवेदनशील असल्याचे नोटिफिकेशन मध्ये नमुद करण्यात आले आहे. पण महाराष्ट्र शासनाने ते मान्य केलेले नाही. सुमारे 2000 चौ.किमी.क्षेत्र व 388 गावे संवेदनशील क्षेत्रातून वगळावीत अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.
कारण या क्षेत्रात राज्य शासनास विविध Developing Projects सुरु करण्याचे आहेत, पंचतारांकित शहरे निर्माण करण्याची आहेत. अशा मुळे पश्चिम घाट, तेथील जैवविविधता ,पर्यावरण उध्वस्त होणार आहे.
यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावेत. हे आत्ता शेवटची संधी आहे यासाठी आपण खालील ईमेल आयडी वर आपल्या सुचना ,तक्रारी, आक्षेप लगेच नोंदवावेत. आणि पश्चिम घाट वाचविण्यासाठी सहकार्य करावे. कळावे.
ईमेल आयडी. [email protected]
Dr. Madhukar Bachulkar. Kolhapur.