11/05/2026
नसरापूर येथील चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण हत्या ही घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला हादरवून टाकणारी आहे.
एका निरागस जीवावर इतक्या क्रूरपणे अत्याचार होणे ही केवळ एक घटना नसून, समाजाच्या संवेदनशीलतेला आणि महिलांच्या सुरक्षेला दिलेले मोठे आव्हान आहे.
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सातारा जिल्हाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीयुक्त निवेदन मा. जिल्हाधिकारी, सातारा यांना सादर करण्यात आले.
या माध्यमातून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देत तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी, तसेच राज्यभर महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी, ही ठाम मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा हा आवाज केवळ एका घटनेविरोधातील संताप नाही, तर समाजात सुरक्षितता, न्याय आणि संवेदनशीलता टिकवून ठेवण्यासाठी उभा राहिलेला निर्धार आहे.
आज प्रत्येक विद्यार