07/04/2022
अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन व एकल महिलांच्या विकासाचे उपक्रम सुरू- शहाजी गडहीरे
भांडवलाअभावी शेती करणे कठीण झाले आहे. शेतमालास भाव नाही, शेती व्यवसायात यांत्रिकी करण सूरू झाल्याने त्याचा खर्च वाढत आहे पर्यायाने छोट्या शेतकऱ्यांना यंत्राचे भाडे परवडत नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. भूमिहीन शेतमजूर तर हतबल झाला आहे हाताला काम नाही, सध्या सांगोल्यातील तालुक्यातील डाळिंब बागा काढून टाकल्या जात आहेत त्याचा परिणाम भूमिहीन शेतमजुरांच्या रोजगारावर झाला आहे एका बाजूला प्रचंड महागाई दुसरीकडे हाताला काम नाही या अडचणीत हा घटक सापडला आहे सध्या त्याच्यापुढे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
अल्पभूधारक शेतकऱ्यानी त्यांच्या शेतीचे नियोजन करावे त्यामध्ये जमीन सुधारणा, वृक्ष लागवड, अन्नधान्य उत्पादन, फळबाग लागवड, भाजीपाला उत्पादन अशा उपक्रमांबरोबर भूमिहीन कुटुंबातील महिला, युवक यांनी शेतीपूरक छोटे छोटे व्यवसाय करावेत.त्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, शिवणकाम इत्यादी व्यवसायाचे प्रशिक्षन पण दिले जाणार असुन त्यातून व्यवसाय सूरू करण्याला प्रोत्साहन मिळणार आहे विवीध शासकीय योजनांची जोड देऊन ग्रामीण व्यवसाय सुरू झाले तर ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे.गेल्या दोन वर्षाच्या काळात छोट्या घटकांच्या जीवनाधाराचे व उदरनिर्वाहाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर अस्तित्व संस्थेच्या वतीने सांगोला, मंगळवेढा तालुक्यांतील अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेत मजूर यांच्या विकासासाठी एक प्रकल्प राबवण्यात येत असुन या प्रकल्पांतर्गत २५० अल्पभूधारक शेतकरी व १०० भूमिहीन शेतमजूर यांना सहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी दिली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी व लाभार्थी निवडीसाठी आयोजीत प्रशिक्षणात शहाजी गडहिरे बोलत होते.
यावेळी विवीध कार्यशाळेस वाणीचिंचाळे, आलेगाव, पारे, मानेगाव, भोसे, चिंचोली, सोनलवाडी, हटकर मंगेवाडी, जुजारपुर, खुपसंगी,
गोणेवाडी गावातील अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेत मजूर उपस्थित होते...
धन्यवाद.....