15/05/2026
लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
समता, बंधुता आणि मानवतेचा विचार आपल्या गीतांमधून जनमानसात पोहोचवणारे वामनदादा कर्डक हे परिवर्तनवादी चळवळीचे प्रभावी आवाज होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावादी विचार आपल्या संपूर्ण आयुष्यभर गीतांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले.
जयहिंद लोकचळवळीलाही वामनदादांच्या विचारांची आणि गीतांची प्रेरणा लाभली आहे. “माणसा तुझे मी इथे गीत गावे...” हे गीत जयहिंद लोकचळवळचे थीम साँग असून, जयहिंदच्या प्रत्येक उपक्रमाची सुरुवात या प्रेरणादायी गीतानेच होते.
समताधिष्ठित आणि मानवतावादी समाज घडवण्याची प्रेरणा देणाऱ्या वामनदादांना विनम्र अभिवादन!