आजच्या आधुनिक जगात आपणाला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे . अशातच नवीन पिढी आपल्या संस्कृतीचा वारसा चालविण्याचा, जपण्याचा विचार करते तेव्हा नवलच ! पुण्यामध्ये असाच एक ' उगम ' नावाने युवा परिवार स्थापन होत आहे.
आधुनिक जीवनशैली बरोबर आधुनिक विचाराने प्रेरित झालेली हि तरुणाई आधुनिकता आणि पारंपारिक संस्कृती यांचा मिलाप साधण्याचा प्रयत्न करत आहे. या परिवारामध्ये उच्यशिक्षित तसेच सर्व वर्गाती
ल युवक-युवतींचा समावेश आहे. या परिवारा तर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ,सण उत्सव साजरे केले जाणार आहेत. तसेच सामाजिक परिवर्त्नामध्ये ही युवा पिढी वाटा उचलणार आहे .आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आपण उघडपणे आणि संवेदनशीलपने पाहायला शिकले पाहिजे, आपली युवा चेतना सतत तेवत ठेवली पाहिजे. अशीच हि तरुणाई उद्याचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत आहे. आपणही या परिवर्तनामध्ये वाटा उचलुयात. चल तर मग आपणही या परिवाराचे साठी बनुयात !.
गीतांजली जाधव ...
मित्रानो आपण या page वरती आपल्या भावना तसेच विचार व्यक्त करू शकता. तसेच आपल्या कल्पना सुधा मांडू शकता. तुम्हाला सुचणाऱ्या नवीन गोष्टी,एखादी माहिती. कविता , विविध ऐतिहासिक ठिकाणे त्यांची माहिती ,निसर्गरम्य ठिकाणे ,नवीन technologies विषयक ...... लिहू शकता.
धन्यवाद
उगम परिवार