15/04/2026
सामाजिक समर्पणाची भावना अंगीकारून चार दशकांहून अधिक काळ अखंड सेवा करणाऱ्या, असंख्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शक आदरणीय गीता ताई गुंडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित “चालविशी हाती” पुस्तकाचे मुंबईत विमोचन संपन्न झाले।
गीता ताईंनी आपले संपूर्ण आयुष्य ध्येयवाद आणि निस्वार्थ भावनेने समाजकार्यास अर्पण केले आहे. हे केवळ एका व्यक्तिमत्त्वाची कथा नसून निःस्वार्थ सेवा, दृढ निश्चय आणि ध्येयपूर्ण जीवनाचे प्रेरणादायी कार्यकथन आहे. समाजनिर्मितीत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न आणि दिलेले मार्गदर्शन खरोखरच अनुकरणीय आणि वंदनीय आहे।
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री सुरेश (भैयाजी) जी जोशी, माजी सरकार्यवाह (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), माननीय वी. शांताकुमारी (शांताक्का), वंदनीय प्रमुख संचालिका (राष्ट्र सेविका समिती), माननीय मीनाक्षीताई पिशवे, अखिल भारतीय संयोजिका (महिला समन्वय), माननीय निर्मलाताई आपटे, संस्थापक अध्यक्षा (भारतीय स्त्री शक्ती), मा. श्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, (महाराष्ट्र शासन), मा. श्री आशिष शेलार, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, सुनील सप्रे, राष्ट्रीय अध्यक्ष (सेवा भारती), डॉ विनय सहस्रबुद्धे पूर्व अध्यक्ष (ICCR)
संजय पाचपोर, राष्ट्रीय संगठनमंत्री (सहकार भारती), श्रीहरि बोरीकर, राष्ट्रीय संगठनमंत्री (अधिवक्ता परिषद), श्री आशीष चौहान, राष्ट्रीय संघटन मंत्री (अभाविप) देवदत्त जोशी राष्ट्रीय सह-संगठनमंत्री (अभाविप), प्रा. मंदार भानुशे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ( अभाविप ) तसेच प्रा. मिलिंद मराठे, विशेष आमंत्रित सदस्य (अभाविप), आशिष शेलार, चंद्रकांत दादा पाटील यांची गरिमामय उपस्थिती लाभली।
गीता ताईंचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून, एक समर्पित जीवनशैलीचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. त्यांच्या कार्याची ऊर्जा आणि आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहतील।