30/10/2024
भाग 1 : धनगर समाज लोकसंख्या: अर्धवट माहिती , फाजील आत्मविश्वास आणि गाफील समाज.
मित्रानो,प्रत्येक 5 वर्षांनी लोकसभा विधानसभा निवडणूक लागले की समाज माध्यमातून 2 नंबरची लोकसंख्या म्हणून धनगर समाजाच्या लोकसंख्येबद्दलची आकडेवारी फिरत असते.यातून प्रत्येक समाज बांधव लोकसंख्येच्या आकडेवारीत न जाता नुसतं मोकळ्या हवेतल्या गप्पा मारतो आणि समाजातील सामान्य लोकांसोबत ,सुशिक्षित पण फक्त वॉट्सप च्या ज्ञानाने जागे झालेले अर्धवटराव त्या आकडेवारीचा बेस धरून ,उंटावरून शेळ्या हाकत असतात.
अनेक जिल्ह्यांच्या ब्रिटिशकालीन गॅझेट वरून धनगर समाज एकवेळ संपत्ती धारणेत पहिल्या 2,3 जातसमूहात येत असला ;तरी लोकसंख्येने कधीही तो सम्पूर्ण महाराष्ट्रात 2ऱ्या क्रमांकाची जात असल्याची आकडेवारी दिसून येत नाही.यामुळे समाजबांधवांपुढे मांडली जाणारी आकडेवारी बऱ्याचदा अवास्तव वाटते. साधारण 6 ते 8 टक्के जरी लोकसंख्या धरली तरी विधानसभेच्या 288 आणि विधानपरिषदेच्या 66 + 12 (राज्यपाल नियुक्त) अश्या एकूण 366 जागांपैकी किमान 22 ते 25 जागांवर समाजाने ,लोकसंख्येच्या प्रमाणांत हक्क सांगायला हरकत नाही.
आपण आपल्या लोकसंख्येच्या बाबतीतच एवढे गाफील आहोत की,आधार नसलेल्या अकड्यांवरून आपण कल्पनेचे इमले बांधतोय पण यातून समाजात आत्मविश्वास तयार होत नाही.कारण 1,2 आमदारांवरून 35 40 आमदारांचे आकडे समाजाला झेपत नाही आणि समाजबांधव हात हलवत बसतो.
उगाच 10 ते 12 टक्के आकडा,ज्याचा काडीचाही बेस नाही, 14 कोटीतील 1.5कोटी धनगर पकडून फसव्या आकड्यांच्या प्रलोभणात न पडता समाजाने निदान 22 ते 25 जागांच्या खाली प्रतिनिधी असतील तर आपण राजकीय दृष्ट्या दळभद्री आहोत असे समजून आपली हक्काची हिस्सेदारी घेण्यासाठी भविष्यात तयार रहावं आणि त्यासाठी कोणताही किंतु परंतु मनात ठेवण्याचं कारण नाही.
साधारण 6ते 8% लोकसंख्या धरली तरी अपेक्षित उमेदवारांची आकडेवारी ही खालीलप्रमाणे असावी,
विधानसभा - 288 पैकी किमान 18 अनिवार्य
विधानपरिषद - 78 पैकी 5
लोकसभा - 48 पैकी किमान 2 ते 3
हा अनुशेष भरून निघाला तरच हे प्रतिनिधी धनगर समाजासोबत इतर समाजाचेही मुद्दे प्रभावीपणे मांडतील आणि राज्यासोबत देशाचाही राज्यकारभार उत्तमपणे हाकतील, नाहीतर 4 ,4 पिढ्यांच्या पालखी चे भोई होऊन तुमचे मणके मोडतील पण तुमच्या अवस्थेत केसाचा फरक पडत नसतो.
राजकीय प्रतिनिधित्वात जातीय समतोल असला तरच राजकारणाचा दोर नीट हाताळला जाइल,आणि हेच अंतिम सत्य आहे . आपल्याला या लेखमालेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा जातीवाद करायचा नाही,आणि तसा प्रयत्न किंवा उद्देश ही नाही. पण आपले प्रतिनिधींत्व असले तरच वेगवेगळे मुद्दे सभागृहात मांडले जातील जे इतराना कधीही शक्य नसेल.
लेखन साभार - #प्रगल्भ_धनगर_राजनेता
उद्याच्या भागात - धनगर आरक्षण,अर्धवट माहिती आणि समाजाचे अल्पज्ञान