समाजात असे अनेक उपेक्षित घटक आहेत, ज्यांना मदतीची प्रतिक्षा आहे. आपल्या मदतीने त्यांचे जीवन बदलू शकते. रस्त्यावरील गरजू चिमुकल्यांपासून ते दुष्काळग्रस्त परिसरात पाणी आणि चा-याच्या प्रतिक्षेत असलेल्या गायींपर्यंत समाजातील अनेक घटक जीवनावश्यक वस्तू आणि प्राथमिक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. एकीकडे हजारो रुपये खर्च करुन ऐशोआरामात जगणारा समाज, तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्याकरीता प्रतिकूल परिस्थितीशी द
ोन हात करणारा समाज, यांच्यामधील दरी भरुन काढण्याचा प्रयत्न पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेकडून केला जात आहे.
समाजातील वंचित आणि गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासोबच तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व, दुष्काळग्रस्त भागातील गायींना आसरा मिळवून देण्याकरीता गोशाळा, पुण्यामध्ये गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलिसांकरीता मिनी हॉस्पिटल यांसह अनाथ मुलांकरीता आंबे खाणे स्पर्धा, दांडिया, आरोग्य शिबीरे आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.
हि सामाजिक कार्यांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी
संस्थेच्या या कार्यामध्ये आपणही सहभाग घेत गरजू व्यक्तिच्या आयुष्यातील आशेचा किरण बनू शकता. त्याकरीता महिन्याला केवळ १००/- रुपयांचे योगदान देऊन या कार्याकरीता हातभार लावणे शक्य आहे. आपल्या मदतीशिवाय गरजू व्यक्तिंची निरंतर सेवा करणे अशक्य आहे.