09/04/2026
मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व !
ज्यांची मातृभाषा कच्ची असते,
त्यांच्या सर्वच भाषा कच्च्या राहतात!
आपण सर्वजण पाहत आहोत, इराणी मिडिया सांगतोय, अमेरिका इराण युद्धबंदी साठी इराणचे मुद्दे पाकिस्तानने चुकीच्या पद्धतीने मांडले आहेत, याचे कारण स्पष्ट आहे, पाकिस्तानकडे असलेले भाषिक दारिद्र्य.
पाकिस्तानमध्ये लहानपणापासून मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवले जाते. ज्यामुळे त्यांना उर्दू जमत नाही, उर्दू न जमल्याने इंग्रजी किंवा इतर भाषांचे आकलनसुद्धा उत्तमरित्या होत नाही.
अजून एक उदा. म्हणजे, क्रिकेटपटू बाबर आझम! बाबर आझम उर्दूमधून सुद्धा धड बोलू शकत नाही आणि असे अनेक पाकिस्तानी खेळाडू आहेत. आपण कायम आपल्या मातृभाषेतून विचार करतो आणि इंग्रजीतून आपले विचार मांडत असतो. मातृभाषेतूनच व्यवस्थित बोलता न आल्यास इंग्रजीची सुद्धा बोंबच असते.
पाकिस्तानचेच उदा. घ्या, वासिम अक्रम, इम्रान खान. हे खेळाडू उत्तम उर्दू, पंजाबी बोलतात आणि इंग्रजीत सुद्धा अतिशय उत्तम व्यक्त होतात.
तुम्हाला परकीय भाषांचे आकलन व्हायचे असेल तर मातृभाषेत निपुण असणे नितांत गरजेचे आहे. असे न केल्यास, कोणत्याच भाषेवर प्रभुत्त्व मिळवता येत नाही, हे आम्ही नाही युनेस्कोने सांगितले आहे.
Admin