स्वामी विवेकानंद यांचे विचार ग्रामीण भागामधील शाळा,महाविद्यालये व गावामधील तरुणांपर्यंत पोहोचावेत व त्यातून राष्ट्रनिर्मिती चे कार्य साध्य व्हावे या उदेषाने आम्ही सर्व मित्र १२ जानेवारी २०१५ राष्ट्रीय युवक़ दिनाच्या दिवशी “स्वामी विवेकानंद विचार मंच (साधना–संघटन–सेवा हेच ब्रीद)“स्थापन करत आहोत.हे कार्य अविरतपणे जमेल तेवढे जमेल त्या वेळामध्ये जमेल त्या प्रमाणात ग्रामीण भागातील घरोघरी प्रत्येक युवक-य
ुवती पर्यंत पोहोचवणे हा आमचा उददेश आहे.आमच्या या कामाला राष्ट्रीय युवक़ दिनाच्या शुभेच्छा म्हणून माझ्या काही पुण्यातील मित्रांनी स्वामिजीची 100 पुस्तके ,6 Mp3 CD(स्वामीजी व्याख्याने), 500 पोस्टर्स आणि स्टिकर्स भेट म्हणून दिली.
गावांमध्ये शाळा मध्ये बालसंस्कार शिबिरे ,समाजप्रबोधनपर उपक्रम ,पारंपारिक खेळ ,क्रीडा स्पर्धा , महाविद्यालया मध्ये करियरमार्गदर्शन कार्यशाळा,व्यक्तिमत्व विकास शिबिरे,नाशमुक्ती संवाद ,गटचर्चा ,व्यायाम संस्कार ,खुले वाचनालय ,वाचन संस्कृती जोपासना ,धार्मिक प्रवचन-कीर्तने ,सामुहिक उत्सव साजरे करणे ,महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी स्मरण ,व स्वामी विवेकानंद महोत्सव आणि युवा प्रेरणा साप्ताह यांचे आयोजन करणे.हे सर्व उपक्रम युवकांच्या सहभागातून व स्वामी विवेकानंद विचार मंच च्या माध्यमातून करण्याचा मनोदय आहे.
साधना–संघटन–सेवे चे व्रत घेऊन आज आम्ही काही मित्र निघालो आहोत .यात आपणही सहभागी व्हाल आणि आपल्या शुभेच्छा द्याल अशी अशा करतो.
आपल्या सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.