Shree Sant Seva Sangha

Shree Sant Seva Sangha Arvindnath maharaj this is our ideal Dnyanparampara-Guruparampara."

Shree Sant Seva Sangha propagates the divine thoughts and ideas of saints among the people in the society with a pure objective of moulding their lives according to the divine principles from Shreemad Bhagwadgeeta and Shree Dnyaneshwari. order to carry the essence of bhartiya culture, Geeta, Dnyaneshwari, shivacharitra, among every individual in society, Shree Sant Seva Sangh implements different

projects like:
----------------------------------------------------------
• Grantharaj Shree Dnyaneshwari Pathyakram (first scholastic activity in Maharashtra)
• Free Residential Enlightenment Camps
• Aatmadnyan (A series of spiritual painting... An innovative medium, attracting the youth)
• Weekly Contemplation Classes (Chintan Varga)
• Grantharaj Shree Dnyaneshwari Aadhyatmik Sadhana Kendra
• Pravachan Seva
• spiritual music Cds/Cassetes
• Sadhana Dindi: Punyabhoomi Bharat Darshan
• Publication of a magazine after every four months
• Free Medical Camps for “Varkaris”
• Savyasachi gurukulam- training centre of indian martial arts
• Vagyadnya kulam- sankrut dnyanpeeth
• Giridhar Goshala
• Shamyapras Gurukul
• Anahat audio recording studio
• Jeevandarshan vyaspeeth
• Bhagavat srushti
The projects are implemented across different areas across of Bharat
--------------------------------------------------------------
"Lord Shree Krishna, Prabhu ShreeRamchandra, Maharshi Ved Vyas, Jagadguru Shreemad Adi Shankaracharya, Vishwaguru Shree Gorakshanath Maharaj , Sant shree Dnyaneshwar Maharaj, Jagadguru shree Tukaram maharaj, Chhatrapati shree Shivaji maharaj, p.poo.

🚩*ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी - शीख बांधवांचे पाचवे गुरु - गुरु अर्जुनदेव यांचा बलिदान दिवस म्हणजेच प्रकाश पर्व*🙏🏻🌹ज्यांनी - द...
18/06/2026

🚩*ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी - शीख बांधवांचे पाचवे गुरु - गुरु अर्जुनदेव यांचा बलिदान दिवस म्हणजेच प्रकाश पर्व*🙏🏻🌹

ज्यांनी - दुष्ट, क्रूर आक्रांता, कट्टरवादी मुघल शासक जहांगीर बादशहाच्या भीती अथवा प्रलोभनाला बळी न पडता शीख गुरूंच्या पवित्र 'गुरबानी ' मध्ये बदल करण्यास नकार दिला...

ज्यांनी धर्मपरिवर्तनाला नकार दिला..
परिणामस्वरूप जहांगिराच्या सैन्याने त्यांना गरम तव्यावर बसवले. वरून गरम रेती टाकून प्रताडीत करत अतिशय हाल हाल केले आणि शेवटी त्यांचा मृतदेह रावी नदीत फेकून दिला - ते ठिकाण आज 'गुरुद्वारा डेरा साहिब' या नावाने ओळखले जाते..

अशी टोकाची, अत्यंत विकृत शिक्षा भोगत केलेले त्यांचे हे बलिदान येणाऱ्या पिढ्यांना निश्चितच प्रेरणा देत राहातील. असे, सदा संयमित आणि शांत, परोपकारी तरीही धर्माभिमानी - गुरु अर्जुनदेवजी.

अशा गुरु अर्जुनदेवजी यांचा जन्म तरणतारण येथील गोइंदवल साहिब येथे वडील गुरु रामदास आणि माता भानीदेवी यांच्या पोटी झाला.

लहानपणापासून त्यांच्यावर बाबा बुधाजी यांचे संस्कार झाले. तर, आजोबा गुरु अमरदास यांच्याकडून त्यांनी 'गुरुमुखी' शिक्षण घेतले. ध्यानाच्या सोबतीने त्यांनी गणित, देवनागरी व संस्कृतचे देखील ज्ञान प्राप्त केले.

गुरु अर्जुनदेवजींचा विवाह माता गंगा यांच्याशी झाला. त्यांच्या पोटी जन्म झाला, तो हरगोबिंदसिंह यांचा, ज्यांनी ही धर्मध्वजा पुढे अत्यंत निष्ठेने वाहिली.

वडील - गुरु रामदासजी यांच्याकडून मिळालेल्या मानवसेवेच्या वारशाचा विस्तार करीत गुरु अर्जुनदेवजींनी अमृतसर येथे हरमंदिर आणि सुवर्णमंदिर बांधले.

'गुरु ग्रंथसाहिब' या पवित्र ग्रंथावर लेखन करून तो संपादित करत, आपल्या अनेक भक्तिपूर्ण रचनांनी अधिक समृद्घ केला. त्यांनीच या 'श्रीगुरु ग्रंथसाहिब' चा प्रकाशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनीच 'सुखमणी साहिब बानीची' देखील रचना केली.

आजही शीख बांधव त्यांच्या बलिदानाच्या आठवणीने दुःखी न होता 'तेरा भाणा मिठा लागै' म्हणत, ईश्वरेच्छा स्वीकारत - 'छबील' म्हणजे गुलाबी दूध सरबत वितरीत करतात आणि 'चड़दी कला' म्हणजेच सर्वांच्या कल्याणाच्या अशा अनंत आशावादाचे' स्मरण करतात.

असे भारतभूमीचे सुपुत्र, तत्त्वज्ञ, कवी व शीख बांधवांचे पाचवे गुरु - गुरु अर्जुनदेवजी यांना, त्यांच्या बलिदान दिनानिमित्त म्हणजेच प्रकाशपर्वानिमित्त कोटी कोटी प्रणाम..!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🚩

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, दक्षिण-पश्चिम मंडळ, नागपूर यांच्या वतीने *माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्...
13/06/2026

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, दक्षिण-पश्चिम मंडळ, नागपूर यांच्या वतीने *माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात विजयदादा खुटवड याचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.*
विजयदादांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण, मावळ्यांची स्वामीनिष्ठा, नरवीर शिवा काशीद यांचे सर्वोच्च बलिदान, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे समर्पण तसेच संघटनात्मक कार्यामध्ये कार्यकर्त्याने कोणत्या भावनेने कार्य केले पाहिजे याचे अत्यंत प्रभावी विवेचन केले. संघटनेचे ध्येय वैयक्तिक हितापेक्षा श्रेष्ठ असते, नेतृत्वावर पूर्ण श्रद्धा आणि समर्पण हीच यशस्वी कार्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी उपस्थित युवकांच्या मनावर प्रभावीपणे बिंबविला.
व्याख्यानाचा उपस्थित युवकांवर अतिशय सकारात्मक परिणाम झाला. कार्यक्रमानंतर अनेक युवकांनी विजयदादांना भेटून आजपासून कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच आगामी शिवजयंतीनिमित्त छत्रपती चौकात भव्य कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी असल्याचेही सांगितले.
या कार्यक्रमास विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी व्याख्यानाचे मनापासून कौतुक करत अशा प्रकारचे विचारप्रबोधन समाजामध्ये सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विशेष म्हणजे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्याधिकारी (OSD) श्री. सुनील मित्रा हे विजयदादांच्या मार्गदर्शनाने विशेष प्रभावित झाले. त्यांनी विजयदादांचे अभिनंदन करत, "कार्यकर्त्याने संघटनेत कोणत्या भावनेने काम करावे, हे आपण अत्यंत प्रभावीपणे मांडले. हा विचार प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आता 'टाईम मॅनेजमेंट' या विषयावरही आपण पुन्हा मार्गदर्शनासाठी यावे," अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाला. उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि युवक उभे राहून "तीर्थ शिवराय प्रतिज्ञा" सामूहिकपणे पाहत व ऐकत सहभागी झाले.
आपल्या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या शिवचरित्र, संतविचार प्रसाराच्या कार्याची माहीती या कार्यक्रमातून सर्वांना मिळाली.

सिंहगडावर भारतीय शिक्षण मंडलाच्या शिबिरार्थींसाठी विजय खुटवड यांचे प्रेरणादायी व्याख्यानभारतीय शिक्षण मंडल आयोजित “अनुभू...
13/06/2026

सिंहगडावर भारतीय शिक्षण मंडलाच्या शिबिरार्थींसाठी विजय खुटवड यांचे प्रेरणादायी व्याख्यान

भारतीय शिक्षण मंडल आयोजित “अनुभूती शिविर 4.0” अंतर्गत दि. ११ जून रोजी शिवतीर्थ किल्ले सिंहगड येथे विशेष बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भारतीय शिक्षण मंडलाचे अखिल भारतीय संगठन मंत्री तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रमुख शिल्पकार आदरणीय मा. बी. आर. शंकरानंदजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

देशभरातून निवडलेल्या १२० शिबिरार्थी विद्यार्थ्यांसमोर श्री संत सेवा संघाचे विजय खुटवड यांनी व्याख्यानसेवा दिली. सिंहगडाच्या ऐतिहासिक व प्रेरणादायी वातावरणात झालेल्या या व्याख्यानात भारतीय संस्कृती, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्यनिर्माण, जीवनमूल्ये तसेच युवकांची समाज व राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आदर्श समोर ठेवत विद्यार्थ्यांना आत्मविकासाबरोबरच राष्ट्रकार्यासाठी समर्पित जीवन जगण्याचा संदेश दिला. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय विचार, संस्कार आणि आजच्या काळातील युवकांची भूमिका याविषयी विविध प्रश्न उपस्थित केले.

यावेळी आदरणीय मा. बी. आर. शंकरानंदजी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भारतीय शिक्षणाची मूलभूत संकल्पना, राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि संस्कारयुक्त शिक्षणाची आवश्यकता यांवर आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या सान्निध्यामुळे या बौद्धिक सत्राला विशेष उंची प्राप्त झाली.

सिंहगडाच्या प्रेरणादायी भूमीवर संपन्न झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती, संस्कार, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ करणारा ठरला. उपस्थित विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाला अत्यंत प्रेरणादायी व जीवनदायी अनुभव असल्याची भावना व्यक्त केली.

🚩*श्रीशिवराज्याभिषेक दिन*निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू । अखंडस्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।परोपकाराचिया राशी...
06/06/2026

🚩*श्रीशिवराज्याभिषेक दिन*

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनासी आधारू । अखंडस्थितीचा निर्धारू ।
श्रीमंत योगी ।।
परोपकाराचिया राशी ।
उदंड घडती जयाशी ।
तयाचे गुण महत्त्वासी ।
तुळणा कैची? ।।
यशवंत कीर्तिवंत ।
सार्मथ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत ।
जाणता राजा ।।
आचारशीळ विचारशीळ ।
दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ ।
सकळा ठाई ।।
या भूमंडळाचे ठायी ।
धर्म रक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हांकरिता ।।
कित्येक दुष्ट संहारिला।
कित्येकास धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला l शिवकल्याण राजा l

- समर्थ रामदास स्वामी

प्रचंड तू, शिवाजी तू, प्रचंड शिवस्वरूप तू l
मान महाराष्ट्र तू, स्वराज्य जाग दिलीस तू ll
कण कण सह्याद्रीचा कणखर त्याचे मन तू l
सजग समर सह्याद्री सिंह नरसिंह तू ll
अजिंक्य तू अभेद्य तू प्रचंड शिवस्वरूप तू l
एक एक मावळ्याचा श्वास श्वास श्वास तू l
तोरण गडी बांधले तोरण महाराष्ट्र तू ll
वार प्रतीवार अतिवार सखोल तू l
धार, तलवार, भवानी एक घाव तू ll
युक्ती नीती बुद्धीचे सामर्थ्य बलाढ्य तू l
प्रचंड तू, शिवाजी तू, प्रचंड शिवस्वरूप तू l

- जीवन धर्माधिकारी

हिंदवी स्वराज्य संस्थापक, शककर्ते, हैंदव धर्मोद्धारक, गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टावधानजागृत, अष्टप्रधानवेष्टित, न्यायलंकारमंडित, शस्त्रशास्त्रपारंगत, राजनीतिधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्रीशिवाजी महाराज की जय...

क्षणभर फक्त विचार करून बघूया की पुण्यश्लोक श्रीशिव छत्रपती महाराज नसते, तर.. आजचा इतिहास काय म्हणून लिहिला गेला असता?

क्षणात कापरं भरून - डोकं भणभण करू लागेल, मस्तक फुटायची वेळ येईल, जागच्या जागीच अंगाला दरदरून घाम फुटेल, कुणी कल्पनेनेच गलितगात्र होईल...

पण भानावर राहून, तर्काच्या कसोटीवर घासून 'ऐतिहासिक सत्याला' यथावत् स्वीकारू शकणाऱ्या आपल्यासारख्या डोळस व्यक्तींचा - आपल्या 'जाणत्या' शिवकल्याण राजाच्या पराक्रमाने ऊर भरून येईल.

असा खरा शिवधर्म पाळणारे लेखक, कवी, नाटककार, शिक्षक, समाजातील आदरणीय, ज्येष्ठ - श्रेष्ठ व्यक्ती, सर्वजण महाराजांचा खरा पराक्रम आणि आदर्श मांडण्यासाठी आपापल्या परीने सरसावतील...

अनेक शतकं उत्तरेतील एकापेक्षा एक क्रूर आक्रमणं पाहून देखील अनेक साम्राज्ये शेवटपर्यंत बेसावध राहिली. क्षात्रतेजविहीन राजे आणि त्यांच्यातील कर्तव्यबोधाचा, शत्रुबोधाचा अभाव यामुळे ती कालौघात नष्ट होत गेली.

८व्या शतकाच्या सुरुवातीला अतिशय क्रूर, बळजबरीने धर्मपरिवर्तन, अगणित संपत्तीची लूट, माता-भगिनींचा शीलभंग करून जनानखान्यात किंवा तोहफा म्हणून, तर मुले - युवक यांना बाजारात विक्रीसाठी गुलाम म्हणून नेले जाणे.. यासाठी केलेली दुष्ट - यावनी आक्रमणांची अखंड मालिका आपल्या मातृभूमीने अनुभवली.
मोहंमद बिन कासिमपासून सुरू झालेली ही टोळधाड पुढे वेगवेगळी महान् ??? नावे घेऊन येतच राहिली.

असाच, तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर देवगिरीच्या यादवांच्या पराभवाबरोबर महाराष्ट्रभूमीवर यावनी टोळधाडीचा अंमल सुरू झाला. आणि तिथून पुढे अनेक शतकं कुठे 'स्वराज्य' हा शब्द उच्चारायची देखील सोय राहिली नाही.

आया - बहिणी - लेकी - बाळी - सुना - लेकरं - गाई - गुरं - शेती - जमीनजुमला - सोनं नाणं, जड जवाहीर, ऐश्वर्य - मानमरातब कशाची कशाची म्हणून शाश्वती राहिली नाही. कोण, कुठून, कधी, कसा येईल, कशाला आणि काय म्हणून ओरबाडून घेऊन जाईल, याची काहीच शाश्वती नव्हती.

खरोखर, महाराजांच्या जन्माच्या वेळेस असलेली अतिशय विपरीत परिस्थिती, त्यात धैर्यवान राजमाता जिजाऊ मांसाहेब यांची दूरदृष्टी, त्यांनी महाराजांची शस्त्रशास्त्रसंपन्नता वाढवली, घडवली.. यातून रायरेश्वर महादेवाच्या साक्षीने - 'स्वराज्य' श्रींचे राज्य निर्माण व्हावे, हा संकल्प आणि वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी सवंगड्यांसह तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं जाणं.. सर्व काही अतर्क्य वाटणारं सत्य!

आदिलशाही, निजामशाही, मुघल, बरीदशाही, इमामशही , कुतुबशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज अशी अनेक गिधाडं आणि जोडीला कुठे पिढ्यान् पिढ्या खचलेले, पिचलेले तर कुठे कर्तव्यशून्य आणि स्वार्थाने लडबडलेले 'स्वकीय' या सर्वांचा विरोध.

प्रस्थापित सर्व कल्पना - मान्यता मोडून काढत, आपल्या अनेक निष्ठावंत मावळ्यांसोबत मोहिमा फत्ते करत, स्वराज्याचा वारू चौफेर दौडवत हा 'रयतेचा राजा - जाणता राजा' झाला, तो दि. ६ जून १९७४ या दिवशी. राज्याभिषेक - धर्ममान्यतेसह छत्र, चामर, तख्त - सिंहासनधारी हिंदूपतपातशहा झाले, छत्रपती श्रीशिवराय!

आत्मविस्मृत, स्वाभिमानशून्य जनतेला आयुष्यभरासाठी अखंड प्रेरणा स्त्रोत झाले, छत्रपती श्रीशिवराय!
पुढच्या येणाऱ्या पिढ्यान् पिढ्यांसाठी नुसतं नाव नाही तर recognition - ओळख, स्थान मिळवून दिलं राजांनी.

यानंतर काही वर्षातच दक्षिण दिग्विजयानंतर वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी महाराजांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला.

महाराज गेले; पण त्यांनी स्वराज्याला दिला 'छावा'. सोबत, मन - मनगटात नव्हे, तर प्रत्येकाच्या रक्तात दिला आपल्या पराक्रमाचा 'अक्षय वारसा'.

म्हणून, ज्यांच्यामुळे आपण सुखाने भोजन करू शकतो आहोत, त्या आपल्या शिवछत्रपतींचे पुढील प्रमाणे स्मरण करूयात, ज्यामुळे हा वारसा जाणीवपूर्वक आणि समर्थपणे पुढच्या पिढी पर्यंत पोहोचेल -

महामंत्र आहे नव्हे शब्द साधा|
जयांच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा||
नुरे देश अवघा जयांचे अभावी|
शिवाजी जपू राष्ट्र मंत्र प्रभावी||६||
( - शिवसूर्यहृदय )

खरोखर, महाराज म्हणजे तीर्थ शिवराय.. देव शिवराय..
भाग्य महाराष्ट्राचे शिवराय....

प्रत्येकाच्या मनामनातील दैवत आहेत छत्रपती श्रीशिवराय. केवळ DJ, lights, गाणी, धांगडधिंगा, जल्लोष, मिरवणुका, पुतळे आणि महाराजांसारखं केवळ बाह्य स्वरूप धारण करण्या इतकीच आपली 'शिवभक्ती' सीमित राहायला नको.

छत्रपती श्रीशिवरायांच्या पराक्रमाच्या कथा, एकन् एक प्रसंग, त्यातील महाराजांचे आणि मावळ्यांचे अनेक गुणविशेष यांचे लहानांपासून थोरांपर्यंत सर्व स्तरात वारंवार चिंतन - अवगाहन, आचरण होणे तितकेच आवश्यक. सोबतीने धर्मकार्यासाठी उपयुक्त असे शरीरसौष्ठव प्राप्त करून राष्ट्रसेवेसाठी - शिवकार्यासाठी सदा समर्पित राहण्याचा संकल्प करणे, हीच पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांच्या चरणी खरी आदरांजली...🙏🏻🙏🏻🌹🌹🚩

05/06/2026
युनिटेक ऑटोमॅशनच्या (शिवणे व शिरवळ प्लँट) स्टाफच्या मुलांसाठी कु. अपूर्वा भुजबळ यांनी आयोजित केलेले श्री संत सेवा संघाचे...
01/06/2026

युनिटेक ऑटोमॅशनच्या (शिवणे व शिरवळ प्लँट) स्टाफच्या मुलांसाठी कु. अपूर्वा भुजबळ यांनी आयोजित केलेले श्री संत सेवा संघाचे ३ दिवसीय ज्ञानप्रबोधन शिबिर अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरले. 🙏

श्री संत सेवा संघाच्या केंद्रावर संपन्न झालेल्या या शिबिरात बालकांना संतांचे जीवनचरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार, भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये आणि उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचे संस्कार मिळाले.

आजच्या पिढीपर्यंत संत आणि शिवरायांचे विचार पोहोचविण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. मुलांच्या मनात संस्कार, आत्मविश्वास, कर्तृत्वाची प्रेरणा आणि राष्ट्राभिमान जागविणारे हे शिबिर निश्चितच त्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारे ठरेल.

या सुंदर उपक्रमासाठी कु. अपूर्वा, युनिटेक ऑटोमॅशनचे व्यवस्थापनाचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 ✨

#ज्ञानप्रबोधनशिबिर #श्रीसंतसेवासंघ #संस्कार #शिवचरित्र #संतविचार #बालसंस्कार #राष्ट्रनिर्माण

🚩 *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती*🙏🏻🌹🌹एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नाशिक जवळील भगूर गावात वडील दामोदरपंत आणि आ...
28/05/2026

🚩 *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती*🙏🏻🌹🌹

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नाशिक जवळील भगूर गावात वडील दामोदरपंत आणि आई राधाबाई यांच्या पोटी जन्म झाला विनायक तथा तात्यारावांचा.

बालपणीच मातृछत्र हरवलेल्या तात्याराव व वडील बंधू गणेश तथा बाबाराव हे बंधुद्वय शिक्षणाच्या निमित्ताने लहान बहीण मैना आणि लहान भाऊ नारायण यांना भगूरला ठेवून नाशिकला आले.

१८९७ साली प्लेगची साथ पसरल्याने सर्वदूर मृत्यूचे थैमान सुरू असताना राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहण सोहळ्याचे आयोजन केल्याने ब्रिटिशांविरुद्ध जनसामन्यांमध्ये अतिशय रोषाचे वातावरण होते. त्यातच प्लेग समितीचा प्रमुख रँड आणि त्याचा सहाय्यक आयस्टर या दोघांनी अत्याचाराचा कळस गाठला होता.

त्याचा निषेध म्हणून पुण्यातील चापेकर बंधूंनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या पराक्रम आणि हौतात्म्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्निकुंड धगधगत ठेवले.

कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे।
कार्या चालवू गिरवूनी तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे॥

अशी त्या क्षणी अप्रतिम फटक्याची - काव्यरचना करत सावरकर बंधूंनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघर्षाची प्रतिज्ञा घेतली आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी 'मित्रमेळा' नावाची किशोर आणि युवकांची एक संघटना सुरू केली.
अतिशय प्रसिद्ध अशी छत्रपति श्रीशिवाजी महाराजांची आरती त्यांनी याच काळात रचली. ते म्हणतात,
जयदेव जयदेव
जय जय शिवराया l
या या अनन्यशरणा
आर्या ताराया ll

वडिलांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे - फर्ग्युसन महाविद्यालय गाठले. इथेच स्थापना झाली - 'अभिनव भारतची'.

बंगालच्या विभाजनाच्या निषेधार्थ अभिनव भारतने चालविलेल्या सामूहिक विदेशी वस्त्रांच्या होळीची लोकमान्य टिळकांनी देखील दखल घेतली.

वरच्या श्रेणीत पदवी प्राप्त झाल्यानंतर पुढच्या अभ्यासासाठी ते लंडनमध्ये - इंग्रजांच्या भूमीत गेले. तिथे, भारतीयांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी इटलीचा क्रांतिकारक 'जोसेफ मॅझिनीचे आत्मचरित्र' अतिशय ओजस्वी भाषेत लिहून काढले.
'शिपायांचे बंड' म्हणून तुच्छतेने हिणवल्या गेलेल्या भारतीय पराक्रमाला - त्यांनी आपल्या लेखणीतून 'अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्यसमर' असे खऱ्या आणि समग्र इतिहासाच्या रूपात मांडले.

बॅरिस्टरीचा अभ्यास करताना लंडनमधील 'अभिनव भारतच्या' चळवळीतील मॅडम भिकाजी कामा, बॅरिस्टर राणा, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मदनलाल धिंग्रा यांनी विदेशात भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पार्श्वभूमी तयार करण्यास सुरुवात केली. यात गुप्तपणे बॉम्ब तयार करण्यास शिकणे आणि नेमबजीचा सराव हेदेखील सामील होते.

स्वा. सावरकर लिखित - १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचे पुस्तक भारतात छापले गेले आणि ते काही दिवसातच ब्रिटिशांच्या हाती लागले. सरकारने तत्काळ या पुस्तकावर बंदी आणली आणि वडील बंधू बाबारावांवर राजद्रोहाचा खटला भरवून त्यांना जन्मठेपेची - काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली.

वहिनीच्या पत्रावरून जेव्हा त्यांना लंडनमध्ये हे समजले, तेव्हा शोकसंतप्त कवीमनाच्या सावरकरांकडून वहिनीस सांत्वनपर उत्तर म्हणून पुढील रचना झाली -

अनेक फुले फुलती ।
फुलोनिया सुकोनी जाती।
कोणी त्यांची महती गणती ।
ठेवली असे ।।
परी जे गजेंद्रशुंडेने उपटिले ।
श्रीहरीसाठी मेले।
कमलफूल ते अमर ठेले ।
मोक्षदायी पावन ॥
त्या पुण्य गजेन्द्रासमची ।
मुमुक्ष स्थिती भारतीची ।
करुणारवे ती याची ।
इंदीवरशामा श्रीराम ॥
स्वोद्यानी तिने यावे ।
आपुल्या फुलांस भुलावे ।
खुडोनिया अर्पण करावे ।
श्रीरामचरणा ll
अमर होय ती वंशलता ।
निर्वंश जिचा देवाकरिता।
दिगंती पसरे सुगंधिता ।
लोकहितपरिमलाची ।l
अनेक पूर्वज ऋषीश्वर ।
अजात वंशजांचे संभार ।
साधु साधु गर्जतील ।
ऐसे वर्तणे या काला ll

यातील शब्दाशब्दात व्यक्त केलेली भावना, दिलेली उदाहरणे याचा मुळातूनच अभ्यास आवश्यक!

बाबाराव सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा केली, म्हणून मदनलाल धिंग्रा यांनी निर्धारपूर्वक जाहीर निवेदन देत इंग्रज अधिकारी कर्झन वायली याला गोळी घातली. त्यानंतर धिंग्रा पकडले गेले. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

स्वा. सावरकर याच काळात बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण झाले; पण इंग्रज अधिकाऱ्याची हत्या आणि राजद्रोह हे आरोप ठेवत इंग्रजांनी त्यांना बंदी करून, कैदी म्हणून त्यांची भारतात रवानगी केली.

कैदी म्हणून मोरिया जहाजातून भारताकडे नेत असताना संडासातील पोर्टहोल मधून बाहेर पडून संपूर्ण शरीराला ठिकठिकाणी खरचटून निघत, रक्तबंबाळ होत, सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेल्स बंदराजवळ समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली.

समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे जखमांची आग होत असतानाही ते समुद्र पोहत फ्रान्सच्या किनारी पोहोचले. इंग्रजांना फ्रान्सच्या भूमीत त्यांना पकडण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी कंठशोष करून सांगण्याचा प्रयत्न केला; पण ते पुन्हा ताब्यात घेतले गेले.

भारतात आणल्यावर, 'क्रांतीद्वारा ब्रिटिश राज्यसत्ता उलथून टाकण्यासाठी व इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करण्यासाठी लोकांना भडकविले,' अशा आरोपांखाली त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा देण्यात आल्या.

विपरीत परिस्थिती असतानादेखील मातृभूमीला परदास्यातून मुक्ततेसाठी प्रत्येक क्षणी नवनवीन कल्पनांनी एखादी व्यक्ती देशभक्तांना प्रेरणा कशी देऊ शकते? स्वा. सावरकर म्हणतात -

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे l
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे l

देह प्रचंड आणि टोकाच्या सश्रम कारावासात असताना, त्यांची मन - बुद्धी उत्तम प्रतिभेच्या आविष्कारासह कशी काय प्रकट होऊ शकली? २-२ काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखी, कोलू ओढणे, काथ्या कुटणे, खडी बेडी अशा भयंकर देहदंडाची बंधने त्यांच्या बौद्धिक, साहित्यिक क्षेत्रातील भरारीला कालजयी काव्यनिर्मितीपासून कशी काय रोखू शकली नाहीत?

ते कसे काय म्हणू शकले -
की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने
जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरले करी हे सतीचे

आयुष्यातील अनपेक्षित आणि कसोटीच्या प्रत्येक क्षणी आपल्या समवेत असलेल्या प्रत्येक सहकाऱ्याला आपल्या इतकेच धैर्यवान्, ऊर्जावान्, धाडसी कसे करू शकले?

सागराशी संवाद साधत ते म्हणतात -
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला..

या मातृभूचा त्यांना नक्की कोणता आणि काय विलक्षण साक्षात्कार झाला होता की, ते प्रचंड कर्तव्यकठोरतेबरोबरच बंधू - बांधवांसाठी तितकेच हळवे आणि संवेदनशील राहू शकले?

कमला, गोमंतक, महासागर अशा दीर्घ आणि खंड काव्यांची निर्मिती या महाकवीने कारागृहात केलेली आहे, याची आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही.

या सर्वांच्या पुढे - साक्षात् मृत्यूचे दुसरे नाव असलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या वेळेस शारीरिक श्रम, स्थळ - काळाची कुठलीच भीती त्यांना वाटली नाही.
ते म्हणतात -
अनादि मी अनंत मी
अवध्य मी भला..
मारिल रिपु जगति
असा कवण जन्मला..

'उपयुक्ततावाद' आणि त्यातून काळया पाण्याच्या शिक्षेतून सशर्त मुक्ती, नंतर रत्नागिरीला स्थानबद्धता. तिथूनच अस्पृश्यता निवारण व सकल समाज संघटनाच्या दृष्टीने रत्नागिरीला *पतित पावन विठ्ठल मंदिर* निर्मिती, त्याचे शंकराचार्यांच्या हस्ते उद्घाटन व त्यानंतर सहभोजन हे त्यांचे द्रष्टेपण दर्शविते.

सावरकरांनी भाषाशुद्धीसाठी केलेले प्रयत्न व त्यांनी मराठी भाषेला दिलेले नवीन शब्द, त्यांचे अनेक निबंध, 'हिंदूराष्ट्राच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने' या ऐतिहासिक ग्रंथाची रचना - हे सर्व विशेष आणि वैयक्तिक अभ्यासाचे विषय आहेत.

त्यांचे संपूर्ण चरित्र, खरेतर त्यातील अनेक छोट्या मोठ्या बारकाव्यांसह अभ्यासले तर त्यांना दिलेली विशेषणे किती यथार्थ आहेत, हे आपल्याला समजू शकते.

भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणी अनुभवलेले मृत्युंजय सावरकर. आपल्या उत्तर आयुष्यात हिंदू महासभेच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करीत कृतार्थ झालेल्या स्वा.अबक्ष सावरकरांनी जीवनाच्या अंतिम काळात अन्नत्याग करून प्रयोपवेशनाने आजच्याच दिवशी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

भारतभूमीच्या या द्रष्ट्या सुपुत्राच्या संपूर्ण चरित्रपटातील कुठलाही भाग आजच्या काळात प्रत्येकाला अचाट, अतर्क्य वाटल्याखेरीज राहात नाही.

महान् क्रांतिकारी व प्रखर राष्ट्रवादी तत्त्वचिंतक..
ज्यांची प्रत्येक कृती राष्ट्रहितैषी..
ज्यांची भाकिते आजच्या काळातही अत्यंत प्रासंगिक आणि त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देणारी..
ज्यांचे विचार तरुणांना *चारित्र्यवान् कर्तृत्वाची* नित्य प्रेरणा देणारे..

ज्या शिक्षेचे केवळ नाव उच्चारले तरी तेथील कल्पनेनेच अनेकजण मृत्युला कवटाळत असत, त्या मरणप्राय यातनांनी युक्त अशा *काळ्या पाण्याची शिक्षा* प्रत्यक्ष भोगणारे..
ती शिक्षा भोगत असताना अपरिमित कष्ट आणि इंग्रजांचे अनन्वित अत्याचार सहन करून देखील मातृभूमीच्या प्रेमात तसूभरही न्यून येऊ न देता, तशा अवस्थेत देखील विलक्षण प्रेरक, उद्बोधक काव्यरचना निर्माण करणारे..
सज्जनशक्तीच्या *सद्गुण विकृतीचे* तीव्र विरोधक..
आयुष्यभर मातृभूमीच्या सेवेच्या व्रताचे दृढतेने वहन करणारे..
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड द्रष्टेपण यांचे धनी असलेले..
महान् क्रांतिकारी व प्रखर राष्ट्रवादी तत्त्वचिंतक, भारतमातेचे थोर सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम...!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

वारकरी संप्रदायाचे भूषण, ज्येष्ठ टाळवादक आणि पुण्यभूषण ह.भ.प. माऊली टाकळकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. शंभर ...
18/05/2026

वारकरी संप्रदायाचे भूषण, ज्येष्ठ टाळवादक आणि पुण्यभूषण ह.भ.प. माऊली टाकळकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. शंभर वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी वारकरी परंपरेची सेवा अखंडपणे केली.

त्यांच्या टाळाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने असंख्य भाविकांना विठ्ठलभक्तीची प्रेरणा दिली. वारकरी चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘पुण्यभूषण’ या सन्मानाने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेची मोठी हानी झाली आहे.

आदरणीय माऊली टाकळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ॐ शांति!

PVG COLLEGE OF ENGINEERING ... CCC - Co-Curricular Course या अभ्यसक्रमांतर्गत - Self & Life Skill Management - ह्या विषय...
18/05/2026

PVG COLLEGE OF ENGINEERING ...

CCC - Co-Curricular Course या अभ्यसक्रमांतर्गत - Self & Life Skill Management - ह्या विषयावरील १२ वर्ग घेण्याची संधी श्री संत सेवा संघाला कॅालेजच्या व्यवस्थापनाकडून मिळाली होती. प्रथम वर्षाच्या सर्व ब्रॅंचेस मधून एकूण ६० विद्यार्य्यानी प्रवेश नोंदवला होता. या १२ सेशन्स मधून भारतीय संस्कृती व परंपरा, स्व म्हणजे काय ? मन, इन्द्रिये, आत्मसुख व विषयसुख, धर्म, अर्जुनाची मनःस्थिती व गीतेचा जन्म, सद्गुरूंची आवश्यकता व लक्षणे, रामायणातील आक्षेप व त्यांचे खण्डन अशा विविध गोष्टींद्वारे मनुष्य जीवनाचे ध्येय - संतत्व - कसे साधता येईल,या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. दि ०९ मे २०२६ रोजी १ दिवसीय शिबिर सुद्धा संपन्न झाले, त्यात प. पू. श्रीसंजयगुरूजींचे मार्गदर्शन मुलांना लाभले.
मुलांनी दिलेल्या Assignments, गटचर्चा, व आपली मते उत्स्फूर्तपणे मांडली. पुढे सुद्धा संपर्कात राहुन विविध उपक्रमाचे आयोजन करायचे ठरले. १२ चिंतनवर्गामुळे कसा नवा दृष्टिकोण मिळाला व ज्ञानात भर पडली अशा प्रतिक्रीया दिल्या. समारोप झाल्यावरही मुले आपल्या शंका जिज्ञासेने विचारत होती. शिक्षकांनी सुद्धा पूर्ण सहकार्य करत स्वतः सुद्धा आवडीने चिंतनवर्ग ऐकले. विद्यार्थीदशेमध्ये संतविचाराची गरज रुजवण्यासाठी हवे ते प्रयत्न करण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली.
चिंतनवर्ग निरंतर व सुव्यवस्थित पार पाडण्यात श्री संत सेवा संघाचे समर्पित साधक कार्यकर्ते इंजिनिअर आनंददादा माहूरे , व्यावसायिक चेतनदादा भोसले, संध्याताई भोसले, इंजिनिअर राधिकाताई पांडे, इंजिनिअर स्वप्नीलदादा व इंजिनिअर
शुभांगी डफळ, इंजिनिअर
रिता जोशी यांनी मोलाचे योगदान दिले.

Address

Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Sant Seva Sangha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shree Sant Seva Sangha:

Share