08/12/2025
दीत एक म्हण आहे, "भूखें पेट भजन न होए गोपाला !" अर्थात भुकेल्या पोटी भजन होत नाही गोपाळा ! ही म्हण एक साधे सत्य सांगते ,भुकेले लोक अध्यात्मिक बाबींवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. जेव्हा मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा उच्च साधना अशक्य होतात.तथागत गोतम बुद्ध घराचा, कुटुंबाचा, नगराचा त्याग करून दु:खावर उपाय शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी एकानंतर एक अशा योगयागादी सर्व प्रचलित मार्गांचा अवलंब केला. तो करत असताना त्याकाळचा त्या त्या क्षेत्रातला जो सर्वश्रेष्ठ गुरु गणला जाई त्याच्याकडे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. आता यापेक्षा जास्त माझ्याकडे काही नाही असं त्या गुरूने सांगितलं की मग ते पुढच्या गुरूकडे जात. शेवटची पायरी तप ही होती. गोतम बुद्धांनी इतकं कडक तप केलं की त्यांच्या अंगावर फक्त हाडंच शिल्लक राहिली. त्यावेळी एक साधी नदी (एका नाल्यासम अशी ती नदी होती असा उल्लेख आहे.) त्यांना ओलांडता आली नाही,एका झाडाच्या मुळाला धरून राहिले. तसंच पोट इतकं खपाटीला गेलं की पोटाला हात लावावा तर पाठ हाताला लागावी आणि पाठीला हात लावावा तर पोट हाताला लागावं. पण इतकं करून ते फक्त मृत्यूपंथाला लागले. ज्ञान काही मिळालं नाही. मग त्यांनी उपोषण सोडलं. जवळच्या गावातून काही अन्न मागून आणलं. ते बोधीवृक्षाखाली बसले. आणि सलग पस्तीस दिवस त्यांनी चिंतन केलं. त्या चिंतनातून त्यांना मार्ग सापडला. सत्य गवसलं. मग त्यांनी ते लोकांना सांगायला सुरुवात केली. तसंच आपल्याकडे म्हण आहे "भुकेल्या पोटी ज्ञान" या म्हणीचा अर्थ असा आहे की जेव्हा पोट रिकामे असते आणि भूक लागलेली असते, तेव्हा कोणत्याही प्रकारचे ज्ञान किंवा तत्त्वज्ञान समजत नाही किंवा त्यावर विचार करणे कठीण जाते. जेव्हा पोट भरलेले असते, तेव्हाच माणूस ज्ञान, विचार आणि शिकवणुकीबद्दल विचार करू शकतो. तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, *अन्न जरी न मिळे तयासी देणें |आगंतुक पात्र उचित दान |l* ज्याला अन्न मिळत नाहीं, म्हणजे जो उपाशी आहे त्याला अन्न देणं हे उचित दान आहे.अशा माणसाला अन्नदान देणं म्हणजे प्राणदान देणंच होय. तसेच तुकोबाराय आणखीन एका अभंगात म्हणतात *भुकेलिया आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ।।* भुकेने पिडलेल्या माणसाला कोणीतरी अन्न देण्याचं आश्वासन दिलं तरी त्या आशेवर तो जगतो.माणूस भूक लागल्यावर अन्न शोधायला बाहेर पडत नाही तर त्याचं पोट भरलेलं असतांनाच तो नंतर भूक लागल्यावर लागणाऱ्या अन्नाची तरतूद करू ठेवतो. तहान लागल्यावर तो पाणी शोधायला बाहेर पडत नाही, तर तहान लागल्यावर हाताशी पाणी असेल याची व्यवस्था तो करून ठेवतो. *आपल्या मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा आहे. एक वेळ चांगली वस्त्र किंवा राहिला जागा नसेल तरी चालेल पण अन्नावाचून माणूस जगणार तर किती दिवस ?* यावर तुकोबाराय म्हणतात,
*हे चि थोर अवघड आहे l अन्न देखोनी भूक राहे ? ll*
नुसतं अन्न पाहूनच कुणाचं पोट भरत नाही, अन्न पाहून पोटभरन ही गोष्ट अवघडच आहे.
- जय जगद्गुरु तुकोबाराय