Shubhra adhar foundation

Shubhra adhar foundation " निराधारला आधार " अनाथ, निराधार मुला म?

तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, *अन्न जरी न मिळे तयासी देणें |आगंतुक पात्र उचित दान |l* ज्याला अन्न मिळत नाहीं, म्हणजे जो ...
14/12/2025

तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, *अन्न जरी न मिळे तयासी देणें |आगंतुक पात्र उचित दान |l* ज्याला अन्न मिळत नाहीं, म्हणजे जो उपाशी आहे त्याला अन्न देणं हे उचित दान आहे.अशा माणसाला अन्नदान देणं म्हणजे प्राणदान देणंच होय. तसेच तुकोबाराय आणखीन एका अभंगात म्हणतात *भुकेलिया आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ।।* भुकेने पिडलेल्या माणसाला कोणीतरी अन्न देण्याचं आश्वासन दिलं तरी त्या आशेवर तो जगतो.माणूस भूक लागल्यावर अन्न शोधायला बाहेर पडत नाही तर त्याचं पोट भरलेलं असतांनाच तो नंतर भूक लागल्यावर लागणाऱ्या अन्नाची तरतूद करू ठेवतो. तहान लागल्यावर तो पाणी शोधायला बाहेर पडत नाही, तर तहान लागल्यावर हाताशी पाणी असेल याची व्यवस्था तो करून ठेवतो. *आपल्या मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा आहे. एक वेळ चांगली वस्त्र किंवा राहिला जागा नसेल तरी चालेल पण अन्नावाचून माणूस जगणार तर किती दिवस ?* यावर तुकोबाराय म्हणतात,
*हे चि थोर अवघड आहे l अन्न देखोनी भूक राहे ? ll*

नुसतं अन्न पाहूनच कुणाचं पोट भरत नाही, अन्न पाहून पोटभरन ही गोष्ट अवघडच आहे.
- जय जगद्गुरु तुकोबाराय

""""""अनमोल विचार धन"""""""_*अन्नदानाचे महत्व-*_*१). अन्नदान करणाऱ्या व्यक्तींच्या २१ पिढ्यांचा नक्कीच उद्धार होतो.*__*२...
14/12/2025

""""""अनमोल विचार धन"""""""_

*अन्नदानाचे महत्व-*

_*१). अन्नदान करणाऱ्या व्यक्तींच्या २१ पिढ्यांचा नक्कीच उद्धार होतो.*_

_*२). अन्नदान हे सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली आहे.*_

-* अन्नदाना इतकेच महत्त्व पैशाला पण आहे जर एखादा मनुष्य अन्नधान्य खरेदी करून दान करतो किंवा एखादा माणूस पैसे दान करतो त्याला अन्नदान पुण्य केल्या इतके पुण्य मिळते.*

_*३). ज्या व्यक्ती अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते अशी गोष्ट आहे.*_

_*४). अन्नदान करणारा व्यक्ती शिवलोकात जातो म्हणून तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही.*_

_*५). अन्नदान करणारा वास्तविक जीवनात प्राणदान करणारा अनमोल व्यक्ती असतो.*_

_*६). अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता - भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. पंरतु सर्व दानाचे फळ हे अप्रत्यक्ष असते.*_

_*७). जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान या जगात नाही.*_

_*८). लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल, हे सांगता येणार नाही म्हणून दान हे मनोभावे तात्काळ करावे. आणि यथाशक्ती, यथासामर्थ्य अन्न दान देत राहावे.*_

_*९). जीवनात अन्नदानासाठी दिले जाणारे धन कधीच कमी होत नाही तर ते नित्य नेहमी वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने नवीन पाण्यामुळे ते पाणी अधिक स्वछ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.*_

_*१०). आयुष्य रूपी संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. म्हणून अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपणा सर्वांचे आणि आपले प्राण टिकून राहतात हे त्रिकालाबाधित सत्य आहेच*_

*म्हणून आयुष्यात जसे पावलांना ठसे असतात, तसे काही आठवणींना ही भावना असतात.*
*फरक इतकाच की, पायांचे ठसे वाळूत उमटतात आणि... आठवणींचे ठसे मनात उमटतात..*
_मित्रांनो महाभारतात कर्ण एक महान परोपकारी होता, परंतु तो दुष्ट व्यक्तीच्या संगतीमुळे त्याला आदर दिला जात नव्हता.... म्हणून आयुष्य रूपी जीवनाच्या मार्गावर, आपण चांगल्या लोकांचा सहवास, संगत, संघटना आणि आधार ठेवला पाहिजे_
_*लक्षात ठेवा :-*_

_*आयुष्य रूपी संगतीत कोण आहे, या पेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे कायम लक्षात ठेवा*_

‼️ _अन्नदान हेच सर्व श्रेष्ठ दान आहे_ ‼️

( फाउंडर मेंबर )
शुभ्रा आधार फॉउंडेशन संचालित, जीवन अंकुर बाल आश्रम (आधुनिक काळाची आई)
सौ, पार्वती महादेव मुंडे

दीत एक म्हण आहे, "भूखें पेट भजन न होए गोपाला !" अर्थात भुकेल्या पोटी भजन होत नाही गोपाळा ! ही म्हण एक साधे सत्य सांगते ,...
08/12/2025

दीत एक म्हण आहे, "भूखें पेट भजन न होए गोपाला !" अर्थात भुकेल्या पोटी भजन होत नाही गोपाळा ! ही म्हण एक साधे सत्य सांगते ,भुकेले लोक अध्यात्मिक बाबींवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. जेव्हा मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा उच्च साधना अशक्य होतात.तथागत गोतम बुद्ध घराचा, कुटुंबाचा, नगराचा त्याग करून दु:खावर उपाय शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी एकानंतर एक अशा योगयागादी सर्व प्रचलित मार्गांचा अवलंब केला. तो करत असताना त्याकाळचा त्या त्या क्षेत्रातला जो सर्वश्रेष्ठ गुरु गणला जाई त्याच्याकडे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. आता यापेक्षा जास्त माझ्याकडे काही नाही असं त्या गुरूने सांगितलं की मग ते पुढच्या गुरूकडे जात. शेवटची पायरी तप ही होती. गोतम बुद्धांनी इतकं कडक तप केलं की त्यांच्या अंगावर फक्त हाडंच शिल्लक राहिली. त्यावेळी एक साधी नदी (एका नाल्यासम अशी ती नदी होती असा उल्लेख आहे.) त्यांना ओलांडता आली नाही,एका झाडाच्या मुळाला धरून राहिले. तसंच पोट इतकं खपाटीला गेलं की पोटाला हात लावावा तर पाठ हाताला लागावी आणि पाठीला हात लावावा तर पोट हाताला लागावं. पण इतकं करून ते फक्त मृत्यूपंथाला लागले. ज्ञान काही मिळालं नाही. मग त्यांनी उपोषण सोडलं. जवळच्या गावातून काही अन्न मागून आणलं. ते बोधीवृक्षाखाली बसले. आणि सलग पस्तीस दिवस त्यांनी चिंतन केलं. त्या चिंतनातून त्यांना मार्ग सापडला. सत्य गवसलं. मग त्यांनी ते लोकांना सांगायला सुरुवात केली. तसंच आपल्याकडे म्हण आहे "भुकेल्या पोटी ज्ञान" या म्हणीचा अर्थ असा आहे की जेव्हा पोट रिकामे असते आणि भूक लागलेली असते, तेव्हा कोणत्याही प्रकारचे ज्ञान किंवा तत्त्वज्ञान समजत नाही किंवा त्यावर विचार करणे कठीण जाते. जेव्हा पोट भरलेले असते, तेव्हाच माणूस ज्ञान, विचार आणि शिकवणुकीबद्दल विचार करू शकतो. तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, *अन्न जरी न मिळे तयासी देणें |आगंतुक पात्र उचित दान |l* ज्याला अन्न मिळत नाहीं, म्हणजे जो उपाशी आहे त्याला अन्न देणं हे उचित दान आहे.अशा माणसाला अन्नदान देणं म्हणजे प्राणदान देणंच होय. तसेच तुकोबाराय आणखीन एका अभंगात म्हणतात *भुकेलिया आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ।।* भुकेने पिडलेल्या माणसाला कोणीतरी अन्न देण्याचं आश्वासन दिलं तरी त्या आशेवर तो जगतो.माणूस भूक लागल्यावर अन्न शोधायला बाहेर पडत नाही तर त्याचं पोट भरलेलं असतांनाच तो नंतर भूक लागल्यावर लागणाऱ्या अन्नाची तरतूद करू ठेवतो. तहान लागल्यावर तो पाणी शोधायला बाहेर पडत नाही, तर तहान लागल्यावर हाताशी पाणी असेल याची व्यवस्था तो करून ठेवतो. *आपल्या मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा आहे. एक वेळ चांगली वस्त्र किंवा राहिला जागा नसेल तरी चालेल पण अन्नावाचून माणूस जगणार तर किती दिवस ?* यावर तुकोबाराय म्हणतात,
*हे चि थोर अवघड आहे l अन्न देखोनी भूक राहे ? ll*
नुसतं अन्न पाहूनच कुणाचं पोट भरत नाही, अन्न पाहून पोटभरन ही गोष्ट अवघडच आहे.
- जय जगद्गुरु तुकोबाराय

शुभ्रा आधार फाउंडेशन संचलित जीवन अंकुर बाल आश्रम परिवार
05/11/2025

शुभ्रा आधार फाउंडेशन संचलित जीवन अंकुर बाल आश्रम परिवार

जीवन अंकुर आश्रमाची पावसाळ्यातील छोटीशी सहल...
05/11/2025

जीवन अंकुर आश्रमाची पावसाळ्यातील छोटीशी सहल...

05/11/2025
शुभ्रा आधार फॉउंडेशन (निराधारला आधार देणारी संस्था )" संस्थेमध्ये नव्या प्रवेशांची संधी! 📢अनाथ, निराधार निरश्रित भिक्षे ...
24/05/2025

शुभ्रा आधार फॉउंडेशन (निराधारला आधार देणारी संस्था )" संस्थेमध्ये नव्या प्रवेशांची संधी! 📢
अनाथ, निराधार निरश्रित भिक्षे करू , ऊसतोड मजूर, विटभटी कामगार आदिवासी कुटुंबातील,गरजू, मुलांसाठी मोफत शिक्षण व निवास

🔹 "शुभ्रा आधार फॉउंडेशन by जीवन अंकुर बाल आश्रम " (साळूंब्रे मावळ , पुणे) ही संस्था 0 ते 10 वी पर्यंतच्या अनाथ, एक पालक असलेल्या, निराधार व ऊसतोड मजूर कुटुंबातील वरील सर्व मुलांसाठी कार्यरत आहे.
🔹 सध्या इयत्ता 0 ते 10 वी या वर्गांसाठी नवीन प्रवेश सुरू आहेत!

🎓 शिक्षण पूर्णपणे मोफत
🏠 राहण्याची, जेवणाची व संपूर्ण देखभाल मोफत

🙏 आपल्या ओळखीत अशी मुले असतील ज्यांना आधाराची गरज आहे, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

📞 संपर्क: 9881989569 / 9552597519
📧 ई-मेल: [email protected]

👤 संस्थापक / अध्यक्ष: सौ, पार्वती महादेव मुंडे
(आधुनिक काळाची आई )
✨ एक पाऊल पुढे... एका चिमुकल्याचं आयुष्य उजळवण्यासाठी!

Address

At Salumbre, Godumbre Phata Somatne Kasarsai Road
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubhra adhar foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shubhra adhar foundation:

Share