20/04/2026
💦*"जलजागृती "*💦
0️⃣7️⃣ **वा दिवस**
नमस्कार मित्रांनो,
आपण गेल्या चार-पाच दिवसापासून वरील लेखमाला चालू केली आहे. दोन- तीन दिवसांमध्ये जलजागृती या संकल्पनेविषयी ओळख, विविध उपक्रम, वैयक्तिक करायच्या कृती या विषयावर चर्चा केली आहे.
आज आपण जलजागृती च्या माध्यमातून करावयाची सामूहिक कृती, सवयी, समाजभान या विषयावर चर्चा करणार आहे.
मी आपणास विनंती करतो की, लेखनामध्ये माझ्या काही मराठी मध्ये व्याकरणाच्या व इतर स्वरूपाच्या चुका होऊ शकतात कृपया सुधारून वाचावे.
समाजभान म्हणजे काय हो..? तर समाजभान म्हणजे वैयक्तिक लाभासाठी नसलेली एखादी कृती किंवा काम. ज्या कामाचे समाजाला सामूहिकरित्या काहीतरी दिशा मिळू शकते किंवा सामूहिक स्वरूपाचा फायदा होऊ शकतो अशा कामाकडे संवेदनशील दृष्टीने पाहणे. असामलाअर्थ अपेक्षित आहे .
मागील तीन ते चार वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या गावामध्ये “वॉटर” नावाच्या संस्थेने मुंगूसवाडे गावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वे केला होता. सदरील सर्वेचा संपूर्ण रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे तर काय होती ही योजना? नगर जिल्ह्यातील काही सिलेक्टिव्ह गावांना या योजनेअंतर्गत आराखडा तयार करून काही जलसंधारणाची कामे करायची होती. त्याप्रमाणे गावातील लोकप्रतिनिधींकडून गावाचा संपूर्ण सर्वे करून त्यांनी एक रिपोर्ट तयार केला आहे. तो मी आपणाला सादर करतो या रिपोर्ट मध्ये संपूर्ण बेसिक माहिती भरून प्रत्यक्ष हा कामाला सुरुवात झाली होती. लोकप्रतिनिधींचे व प्रशासकीय व्यक्तींचे असे म्हणणे आहे की, हे काम करताना काही स्थानिक अडचणी आल्यामुळे बंद /स्थगित झाले आहे.
चांगली संकल्पना आपल्याकडे आल्यानंतर चे इम्प्लिमेंटेशन करताना कुणाचा वैयक्तिक विरोध का होतो. जर फायदा सामूहिक स्वरूपाचा असेल तर त्या कामाला चुकीच्या पद्धतीने विरोध होणे हे अतिशय चुकीचे कृत्य आहे. म्हणून मला असे सांगावेसे वाटते की योजना कितीही चांगली असली तरी 100% टक्के यशस्वी करण्यासाठी ग्राऊंडवरील लोकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो . लोकप्रतिनिधींनी त्यांचे काम व्यवस्थित पूर्ण केलेले दिसते परंतु लोकांनी त्याचा योग्य अर्थ समजावून नघेतल्यामुळे वरील योजना चार वर्षापासून बंद आहे.
तुम्ही पाणलोटाचा उपचार केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. आपल्या मोहिमेतील हा मुद्दा सगळ्यात शेवटचा आहे. परंतु तरीसुद्धा मी आपणास इथे असे सांगू इच्छितो की सगळ्याच गोष्टी ह्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर 100% यशस्वी होतात किंवा पूर्णत्वाला जातात असे अजिबात नाही. किमान 40% लोक सहभाग हा लागतोच.
शासकीय अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी या पायाभूत सुविधांचा फायदा घेण्यासाठी येत नाहीत. जो फायदा होतो तो तुम्ही-आम्ही म्हणजे शेवटचे वापरकर्ते घेतात. फायदाही आपलाच आहे… आपलाच फायदा आहे तर मग चांगल्या उपक्रमांना विरोध करणं हे सत-सतविवेकी लोकांचे काम मला वाटत नाही.
वरील विधानास किंवा वरील उताऱ्यामध्ये या कामाशी संबंधित कोणी व्यक्ती हा लेख वाचत असेल तर तुमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती या व्यासपीठावर पुढे येऊन सादर करायची आहे.
सार्वजनिक रित्या करायच्या कृतीमध्ये आम्ही जाहीर केलेल्या जल जागृती योजनेमध्ये हा तिसरा टप्पा सांगितलेला आहे. तिसरा टप्पा हा संपूर्ण आठ ते दहा वर्ष कालखंडाचा तिथे नमूद केलेला आहे. तर शासनाच्या आणि बिगर शासनाच्या योजना ज्या माध्यमातून आणि लोकांच्या सहभागातून काही मोहिमा पार पाडल्या जातात परंतु त्याला लोक सहभाग हा अतिशय महत्त्वाचा गाभा समजला जातो . लोकसहभाग जर 40% पर्यंत पोहोचला तर कदाचित सामूहिक स्वरूपाची कामे होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये वॉटर शेड उपचार प्रक्रिया. रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण प्रक्रिया, बोअर पुनर्भरण प्रक्रिया इत्यादी सामूहिक कामांची सुरुवात केल्यास आपणाला 75% पाणीटंचाईवर मात करता येऊ शकते ही अनेक ठिकाणी सिद्ध झाले आहे.
कोणी असे म्हणेल की, एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा एक शेत तलाव खोदा शासकीय अनुदान मिळते त्यातून प्लॅस्टिक वगैरे टाका आणि मग तुम्हाला याचा लगेच फायदा होईल. अशा प्रकारचे विधान करणारे मी अनेक लोक पाहिले आहेत. तर मी आपणाला सांगू इच्छितो की जर शेत तलावाचे पाणी जलजागृतीच्या योग्य प्रकारे वापरलं गेलं नाही तर संपूर्ण योजनाही अतिशय भयानक परिणाम दाखवूशकते निरीक्षणाअंती लक्षात आलेली आहे.
मी आपणाला काही प्रत्यक्ष पुरावे देतो. जर शेततलाव सरकारी 100% योजनेच्या नियमाप्रमाणे केल्यानंतर त्याची अंमलबजावणी नियमाप्रमाणे न केल्यास अनेक गावांना अनेक वस्त्यांना येणाऱ्या दहा वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्या वाचून बोंबलायची वेळ येणार आहे. काम शासन नियमाप्रमाणे करत असतील तर काहीप्रमाणात फायदा होऊ शकतो. बहुसंख्य लोक असे काम करत नाही त्यांच्यासाठी हे विधान आहे.
शेत तलावाची भरती पाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असताना तलाव भरत गेला तर त्या संबंधित परिसरातील पाण्याचा टक्का घसरतो. तो घसरलेला टक्का हा इतर लोकांच्या पाण्यावर गदा आणतो. कारण अशाप्रकारे पाणी विपुल प्रमाणात साठवल्यानंतर त्याच्या पृष्ठभागावरून जवळपास बारा ते १७ टक्के पाणी बाष्पीभवनाने उडून जाते. पूर्वी हे पाणी विहिरीमध्ये साठले असल्यामुळे या पाण्याची बाष्पीभवन कमी होते. शेततलाव मात्र हा उथळ पृष्ठभाग असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी बाष्पीभवन, किरकोळ स्वरूपाचे लिकेज, स्टोर आहे म्हणून शेतकरी आपले ओलीत क्षेत्र वाढवतजातात किंवा बारमाही ओलिताखाली आणतात त्यामुळे पाण्याची मागणी वाढते . शेत तलाव सुद्धा अपुरा पडायला लागतो असं त्यांच्या लक्षात आल्यावर तेव्हा मात्र हे लोक त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विहिरी,बोरमधून पाणी उपसा करून हा शेत तलावामध्ये 24 तास टाकायला सुरुवात करतात. असे सर्व शेतकरी नाही पण बहुतेक. जमिनीखाली 300 फुटाच्या खाली सुरक्षित असलेले पाणी सुद्धा असुरक्षित ठिकाणी आल्यानंतर बाष्पीभवन झाले आणि तसेच विहिरीमधील पाणी हे पन्नास Ft लेव्हलपर्यंतचे रात्रंदिवस ओढल्यामुळे त्या परिसरातील ज्या ज्या ठिकाणावरून पाण्याचा सोर्स येतो त्या ठिकाणचा Area Dry होण्यास सुरुवात होतगेला परिणामतः संपूर्ण परिसर हा जलस्तर जास्तीत जास्त खाली जाण्याला कारणीभूत ठरला.
अनेकांच्या यशोगाथा ऐकताना आपण जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा संबंधित शेतकऱ्याच्या व्हिडिओच्या पाठीमागील भाग अतिशय वाळवंट ग्रस्त झालेला दिसतो याचा अर्थ असा होतो की शेत तलावांनी संपूर्ण लोकांचे कल्याण होऊ शकत नाही. तो फक्त बोटावर मोजण्या इतपत लोकांचा फायदा होऊ शकतो ते सुद्धा त्यांनी जल व्यवस्थापन आणि जलजागृती कार्यक्रमांतर्गत आम्ही सांगितलेल्या गोष्टीची तंतोतंत पालन केले तरच.
ही योजना महाभयंकर ठरू शकते पाण्याचा स्टोरेज उपलब्ध असल्यामुळे जास्तीत जास्त वापर होतो आणि वापर झाल्यामुळे जे पाणी सर्वांना मिळणार होते ते एकाच शेतकऱ्याला मिळते आणि त्याचे परिणाम दूरगामी होतात आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या जमिनीतील वॉटर लेवलवर होतो आता Water Lavel ज्या ज्या गावांमध्ये तीनशे फुटा पेक्षा जास्त खोल गेलेली आहे असे पाणी भरायला वर्षानुवर्षे लागतील. आपण बोरमधून पाणी तर घेतो परंतु ते जमिनीतून त्या जागेपर्यंत पाणी जाण्यासाठी या प्रक्रियेला किमान दहा वर्ष लागतात 1 पावसाळ्यामध्ये हे पाणी भरत नाही. एका पावसाळ्यामध्ये भरणारे पाणी हे फक्त आणि फक्त 50 - 100 फुटापर्यंतच्या जलपातळीमध्ये असते म्हणून सामूहिकरीत्या करायच्या कामापैकी हे एक महत्त्वाचे काम आहे.
की ज्यांच्याकडे शेत तलाव असतील त्यांनी पाणी असलेल्या लोकांपेक्षा जास्त काटकसरीने पाणी वापरले पाहिजे एवढाच या ठिकाणी म्हणण्याचा उद्देश आहे.
म्हणूनच जलसमृद्ध होण्याआधी जलसाक्षर व्हा...!!
धन्यवाद..
आजच्या लेखामध्ये आपण सामूहिक सवयी विषयी विश्लेषण केले.
उद्या आपण पीक पद्धती आणि सिंचित व्यवस्था विषयी चर्चा करणार आहोत.*
राजेंद्र खेडकर
लेख क्रमांक : 4
19 एप्रिल 2026
क्रमशः
📞: 9923309753