10/01/2026
जिथे कमी, तिथे आम्ही !!!
The Aadharwad Foundation is a charitable organization (NGO) established to help poor farmer families. Founder & President: Shyam Wadhekar
Partur
431501
Be the first to know and let us send you an email when Aadharwad Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to Aadharwad Foundation:
'आधारवड फाउंडेशन' म्हणजे समाजाप्रती आपल्या 'कर्तव्य' ची जाण असलेल्या स्वयंसेवी युवकांची शासकीय नोंदणीकृत समाजसेवी संस्था (NGO). 'आधारवड' अनाथांचा, गोरगरिबांचा...आधारवड संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांचा ! 'आधारवड फाउंडेशन' ची स्थापना 'कर्तव्य फाउंडेशन' चे अध्यक्ष श्री श्याम वाढेकर (ता. परतूर जिल्हा जालना) यांनी केलेली आहे. वर्ष २००७ पासून दरवर्षी 'कर्तव्य फाउंडेशन' मराठवाड्यातील २०० पेक्षा अधिक अनाथ, अपंग, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत आहे. परंतु ग्रामीण भागातील लोकांच्या, विशेषतः शेतकरी बांधवांच्या शिक्षणाशिवाय इतरही बर्याच अडचणी आहेत. शिक्षणाव्यतरीक्त त्या सर्व अडचणींवर मदत कार्य करण्यासाठी 'आधारवड फाउंडेशन'ची स्थापना करण्यात आली आहे.
# संस्थेचे ध्येय आणि उद्देश : 'आधारवड फाउंडेशन' मराठवाड्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोर-गरीब लोकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असते. परंतु विशेष करून आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी, त्यांच्या विधवा पत्नी व मुलांना मानसिक तथा आर्थिक आधार देण्यासाठी ही संस्था प्रामाणिक पणे काम करत आहे. दरवर्षी काही निवडक आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेतीसाठी मोफत नांगराणी, बी-बियाणे, खत, किटनाशक औषधी ई. मोफत पुरवले जातात. शेतकरी बांधवांच्या पत्नीला पती च्या मृत्यू नंतर येणार्या पहिल्या शेती हंगामासाठी पैसे व्याजाने अथवा उधार न आणता पीक लागवड करता यावी आणि त्यातून आलेल्या उत्पन्नातुन घर गाडा पुन्हा सुरळीत करता यावा यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न केल्या जातो. सर्व सामान्य शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून 'कृषि मार्गदर्शन शिबीर' व 'शेती विषयक चर्चा सत्र' चे नियमीत आयोजन करण्यात येते.
ग्रामीण भागातील गोर-गरीब कुटुंबांना (विशेषतः वृध व अनाथ, निराधार व्यक्ती) त्यांच्या दीर्घ-आजार, शस्त्रक्रिया, अपघात / दुर्घटना तसेच नैसर्गिक / अनैसर्गिक आपत्ती (उदा. घर जळने, कोसळने) ई. वेळी शक्य होईल तेवढी तातडीची आर्थिक मदत देण्यात येते. संस्थेची ओळख आणि संपर्क वापरुन गोरगरिबांना हॉस्पिटल कडून जमेल तेवढी कमी खर्चात उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागात 'मोफत आरोग्य शिबीर' आयोजन करून विविध शासकीय योजनांमधून उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
रस्त्यावर जीवन व्यतित करणारे अनाथ-बेघर मुले, भिकारी, मती-मंद अश्या लोकांना देखील निदान एक वेळचे अन्न मिळावे म्हणून प्रयत्न केला जातो. तसेच त्यांच्यातील जमेल तेवढ्या लोकांना काही सोपे/लहान काम (उदा. बूट-पोलिश, रेल्वे मधे खाद्य पदार्थ किंवा इतर साहित्य विकणे) उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. दिवाळी सारख्या प्रमुख सणासुदी दरम्यान त्यांना मिठाई, नवीन कपडे वाटप करून त्यांच्या समवेत हसून खेळून त्यांच्या जीवनात जमेल तेवढा आनंद भरून देण्याचा प्रयत्न संस्थेकडून केल्या जातो.