Rashtra Seva Dal, Palghar

Rashtra Seva Dal, Palghar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rashtra Seva Dal, Palghar, Nonprofit Organization, Palghar.

https://youtu.be/qWwxwVXhoao?si=_KxxpZJH1xsa_1Vy     ''गांधी म्हणाले होते, 'मला मारून कोणाला काय मिळणार आहे ते समजत नाही...
05/02/2026

https://youtu.be/qWwxwVXhoao?si=_KxxpZJH1xsa_1Vy

''गांधी म्हणाले होते, 'मला मारून कोणाला काय मिळणार आहे ते समजत नाही. पण, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी काही मरणार नाही. मी किमान १२५ वर्षे जगणार आहे.' आणि अखेर हे शब्द खरेच झाले. १५० वर्षे झाली तरी गांधी आहेतच. ते मरत नाहीत.''*
पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो, तरी गांधी मरत नाही. हे काय प्रकरण आहे?
पूर्वी 'गांधी जिथे असतील तिथे' अशा पत्त्यावर पत्रं जायची आणि गांधींना ती मिळायची. अवघा देश पिंजून काढणारा हा माणूस आजही अजून देशभर फिरतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत असतात, प्रत्येक ठिकाणी सोबत ते याच गांधींना घेऊन जातात. कधी गांधी बसलेल्या ट्रेनमध्ये ते बसतात. कधी गांधींच्या म्युझियमला भेट देतात. कधी गांधींचं एखादं पेंटिंग त्यांना कोणी भेट देतं. गांधींच्या देशातनं आलोय, असं ते जगभर सांगत असतात आणि गांधीही मिश्कील हसत मोदींबरोबर जग फिरत असतात. ऐन तारुण्यात फासावर गेलेला नथुराम नाहक मारला जातो आणि इथे हा वयोवृद्ध माणूस तर आणखी वयोवृद्ध होत जगभर भटकताना दिसतो.

तेव्हाचा देश, जिथे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार हे सारे एकत्र होते, अशा महाकाय देशाचा सर्वोच्च नेता होणं ही सोपी गोष्ट थोडीच आहे! अशा कालखंडात की जेव्हा दळणवळणाची साधनं नाहीत. संवादाची माध्यमं नाहीत. व्हाट्स अप,मोबाईल नाहीत आजच्यासारखं ना इमेज मेकिंग आहे ना कोणतं व्यवस्थापन! अशा काळात गांधी देशाचे नेते झाले. फक्त नेते नाही झाले, त्यांनी अवघा देश स्वतःसोबत उभा केला. देशासोबत स्वतःला उभं केलं. लोकांच्या शहाणपणावर विश्वास ठेवत गांधी घडत गेले आणि गांधींसोबत देश घडत गेला. गांधी हा या देशाचा चेहरा झाला.

गांधी हा काही 'थोर' वगैरे माणूस नव्हता. तो कोणताही ईश्वरी अवतार वा प्रेषित नव्हता. त्याचं असामान्यत्व हेच की तो निखळ, निरागस, प्रामाणिक असा सामान्य माणूस होता.

गांधी मजबूरी का नहीं, मजबूती का नाम है, एवढा तो बुलंद होत गेला. त्याला कोणापेक्षा मोठं व्हायचं नव्हतं. त्याला सतत स्वतःला मोठं करायचं होतं. उंच व्हायचं होतं. मातीत रुतलेले पाय आणि तरीही आकाशाकडे फैलावलेले हात, असा हा माणूस वाढत राहिला. या लहान चणीच्या माणसानं त्यातून असं विलक्षण तेज मिळवलं की नौआखालीत पेटलेल्या दंगलीत तो एकटा उतरला आणि अवतीभवतीच्या ज्वालांची पर्वा न करता निघाला. लॉर्ड माउंटबॅटननं तेव्हा गांधींना पत्र लिहिलं होतं. माउंटबॅटन म्हणतो, 'प्रिय गांधी, पंजाबात आमच्याकडे ५५ हजार सैनिक आहेत आणि तरीही दंगल आटोक्यात येत नाहीये. बंगालमध्ये आमच्या सैन्यात एकच माणूस आहे आणि तिथं मात्र दंगल पूर्णपणे शमलेली आहे. या 'वन मॅन बाउंड्री फोर्स'बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू शकतो का?'
अशा एका विलक्षण,असामान्य माणसाचं,ज्याच्याबद्दल जगभरातल्या बुद्धिवंतांनाही कौतुक वाटतं त्याचं पुनरमूल्यांकन होणं गरजेचे आहे. त्यासाठीच डॉ विवेक कोरडेंचे हे व्याख्यान शेअर करतोय.

स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृतिव्याख्यानाचे पाचवे पुष्प गांधी विचारांचे अभ्यासक डॉ विवेक कोरडे या.....

https://youtu.be/jX7qhG3oVhk "मानस शास्त्र आणि आपण" - अंजली चिपलकट्टी. स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्...
14/12/2025

https://youtu.be/jX7qhG3oVhk

"मानस शास्त्र आणि आपण" - अंजली चिपलकट्टी.

स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्यानमालेतील ११ वे व्याख्यान देण्यासाठी यावर्षी सुप्रसिद्ध साहित्यिका श्रीमती अंजली चिपलकट्टी आल्या होत्या. "माणूस असा का वागतो?" हे त्यांचे पुस्तक सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठी वाचकांमध्ये खूप गाजते आहे. विषय वेगळा असल्यामुळे यावर्षीच्या व्याख्यानाला भुवनेश कीर्तने विद्यालयाच्या माजी विद्यार्थी सभागृहामध्ये भरपूर गर्दी झाली होती. नेहमीच्या श्रोत्यांशिवाय यावर्षी तरुणांची आणि स्त्रियांची संख्या अधिक होती.
श्रीमती अंजली चिपलकट्टी यांनी आपल्या सहज, सोप्या, साध्या शैलीमध्ये माणसाच्या अनेक प्रकारच्या वर्तणुकीचे विविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडून दाखविले. मानवी वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने कसा विचार करता येतो याची सांगोपांग चर्चा त्यांनी आपल्या व्याख्यानातून केली. आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा वापर करून त्यांनी माणसाचे अनेक गुंतागुंतींचे वर्तन-प्रकार सहजपणे प्रेक्षकांना समजावून सांगितले. वैयक्तिक वर्तनाबरोबरच सामूहिक वर्तनामागील अनेक पूर्वग्रह आणि अतार्किक आधार यांचा त्यांनी आढावा घेतला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभर झालेले संशोधन त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले.
एकूण १०५ मिनिटांच्या व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रातही श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची श्रीमती अंजली चिपलकट्टी यांनी सविस्तर उत्तरे दिली.

हे व्याख्यान म्हणजे मानसशास्त्राचे वैज्ञानिक विश्लेषण आहे ते सर्वांसाठी युट्युब वर खुले करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

"मानस शास्त्र आणि आपण" - अंजली चिपलकट्टी.स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्यानमालेतील ११ वे व्याख...

माणूस असा का वागतो ह्याचा शास्त्रीय विचार जाणून घेण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या मनाचा थांग शोधण्यासाठी या कार्यक्रमाला ज...
06/12/2025

माणूस असा का वागतो ह्याचा शास्त्रीय विचार जाणून घेण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या मनाचा थांग शोधण्यासाठी या कार्यक्रमाला जरूर या

"स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्यानमाला"       --वर्ष ११ वे--                      साधारण ६५ हजार वर्ष...
26/11/2025

"स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्यानमाला"
--वर्ष ११ वे--

साधारण ६५ हजार वर्षांपूर्वी आपला थिंकिंग ब्रेन चालू झाला असं मानलं जातं. हे विचारमन जेव्हा हळू हळू आकाराला आलं तेव्हा एका अर्थाने माणसाला मी पणाची जाण आणि मी पणाचं भान गवसलं.
तेव्हापासून आजपर्यंत माणूस असा का वागतो किंवा माणसं अशी का वागतात ? हे प्रश्न आपल्या मनात अनेकदा निर्माण झाले, अजूनही निर्माण होत आहेत. परंतु यामागे मेंदूत निर्माण होणाऱ्या लहरींचं एक शास्त्र असतं अशी मांडणी सर्वप्रथम १८५६साली जन्मलेल्या सिगमंड फ्रॉईड यांनी केली. आज त्यात काही उणीवा जाणवत असल्या तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. माणसाचं वागणं हे क्रोध, राग, दया, भीती, संशय, चिंता अशा विविध भावनांवर अवलंबून असतं. या सर्वांपैकी भीती ही फक्त मानवामध्येच नाही तर संपूर्ण प्राणी जगतातील सर्वात महत्त्वाची अशी प्राथमिक भावना आहे. भीती ही प्रत्येक प्राण्याची एक संरक्षक व्यवस्था आहे.भीती शिवाय माणूस सर्वाईव्हच होऊ शकत नाही. माणसाला वाटणाऱ्या भीतींचे चार मुख्य प्रकार आहेत. अज्ञानाची भीती, अपयशाची भीती, बहिष्कृत होण्याची(एकटे पडण्याची)भीती, आणि मृत्यूची भीती. ही भीती आणि त्यातून निर्माण होणारी चिंता माणसाचे स्वभाव गुण ठरवते. भीती, चिंता, मोह आणि लोभ या चार गोष्टींवर माणूस असा का वागतो हे ठरतं.
स्त्रीचं कुटुंबातलं स्थान काय आहे? ती अगतिक का होते? शरण का जाते? किंवा आक्रमक का वागते? या सर्वांचा मानसशास्त्रीय दृष्टीने आज विचार चालू आहे तो समजून घेणं गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक मनस्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य यात काय फरक असतो? समुहाचे मानसशास्त्र म्हणजे काय? कोणत्या गोष्टींवर ते अवलंबून असतं हे जाणून घेतलं पाहिजे. आपले आजार आणि मनाचे आरोग्य यांचा संबंध काय?प्लासीबो इफेक्ट्स म्हणजे काय ? तसेच
धर्म, जात, वंश, धार्मिकता व धर्मांधता माणसाच्या मेंदूचा कसा ताबा घेतात, "आपण" आणि "ते" अशी भावना कशी निर्माण केली जाते, समाजकारण व राजकारण यावर त्याचा कसा परिणाम होतो हे तपासून पाहिले पाहिजे.
सोशल मीडियाचा मनावर काय परिणाम होतो मुलांच्या दृष्टीने त्यातील धोके काय तसेच मुलांचे व विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र कसे बिघडवले जात आहे याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे झाले आहे.
वर उल्लेख केलेल्या अशा अनेक विषयांचा ज्यांचा गाढा अभ्यास आहे आणि "माणूस असा का वागतो" हे सद्या गाजत असलेले पुस्तक ज्यांनी लिहिले आहे त्या श्रीमती अंजली चिपलकट्टी, यावर्षीच्या स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्यानासाठी पुण्याहून येणार आहेत.
प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्यात कोणताही दोष नाही मी जे वागतो ते नेहमीच बरोबर असतं. परंतु हे खरं आहे का? हे कधीतरी तपासून पाहण्याची गरज आहे. प्रत्येक स्रीने आपले स्वतःचे कुटुंबातील, समाजातील स्थान आणि भूमिका याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. तशी संधी श्रीम. अंजली चिपलकट्टी यांच्या या व्याख्यानातून प्रत्येकालाच मिळणार आहे. प्रत्येक स्त्री-पुरुष, पालक, विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच हे व्याख्यान उपयुक्त ठरणार आहे. भीतीने ग्रासलेल्या ज्येष्ठांसाठी आणि कुटुंबात व समाजात घुसमट होणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी हे व्याख्यान नक्कीच उद्बोधक ठरणार आहे.
लक्षात असू द्या!

स्वातंत्र्य सैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्यान.
रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५.

"उत्सव सावित्रीचा 2025" निबंध व वक्तृत्व आंतर शालेय स्पर्धा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे उत्साहात साजरादिनांक...
05/01/2025

"उत्सव सावित्रीचा 2025" निबंध व वक्तृत्व आंतर शालेय स्पर्धा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे उत्साहात साजरा

दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात "उत्सव सावित्रीचा" हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पालघरमधील १३ विविध शाळांमधील ४४ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन राष्ट्र सेवा दल, महा अंधश्रद्धा निर्मूलन समिती,ब्लॉसम चिल्ड्रेन सेंटर, योगक्षेम कंसल्टंसी सर्विसेस, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राजक्ता, प्रज्ञा, श्वेताली, नाजुका आणि शितल यांनी सादर केलेल्या "सावित्रीची ओवी" ने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल मेहेर यांनी केले. तर परिक्षकांची ओळख प्रज्ञा गावड यांनी केले.

२२ विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने श्रोत्यांना आणि परीक्षकांना प्रभावित केले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी निर्भय पाटील, विद्या पाटील आणि ऋचा घरत यांनी परीक्षण करून विद्यार्थ्यांचे गुणांकन केले.
निबंध स्पर्धेच्या 22 निबंधांचे परीक्षण स्मिता पाटील, मुळीक सर आणि अण्णा कडलासकर यांच्या परीक्षक मंडळाने केले.

निर्भय पाटील, मुळीक सर यांनी स्पर्धकांच्या मूल्यांकना बाबत सविस्तर विवेचन केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.
दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र, पुस्तक आणि रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रत्येक गटात पहिल्या तीन विजेत्यांसह एक प्रोत्साहनपर पारितोषिकही देण्यात आले. विशेष म्हणजे वकिल राहुल ठाकरे यांनी सर्व आठ विजेत्यांना संविधानाची पुस्तके भेट देऊन शिक्षण व संविधान जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.समारोपाचे भाषण अण्णा कडलासकर यांनी केले. विजेत्यांची नावे

निबंध :

1. स्वराज कदम - एच. एम. पंडित विद्यालय, सफाळे

2. दुर्वा गडग - आनंद आश्रम कॉन्व्हेंट स्कूल, पालघर

3. तनया राऊत - भुवनेश किर्तने विद्यालय, पालघर माहिम

4. दुर्वा पाटील - आनंद आश्रम कॉन्व्हेंट स्कूल, पालघर

वक्तृत्व स्पर्धा:

1. विजय राजसिंह राठोड - एच. एम. पी. हायस्कूल, डहाणू

2. परी चुरी - भुवनेश किर्तने विद्यालय, पालघर माहिम

3. श्राव्या मोहिते - आनंद आश्रम कॉन्व्हेंट स्कूल, पालघर

4. काजल चौधरी - के. एल. पोंदा विद्यालय, डहाणू

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी म्हात्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शितल मेहेर यांनी केले.

"उत्सव सावित्रीचा" या कार्यक्रमाने सावित्रीबाई फुले यांच्या अफाट कार्याच्या स्मृती जागविण्यात आल्या आणि पालघरमधील तरुण पिढीमध्ये शिक्षण, समानता, अभिव्यक्ती आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला गेला.

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) आयोजित वेबिनार : लडाखची हाकवक्ते : आशिश कोठारी (पर्यावरण अभ्यासक, कल्पवृक्ष, विकल्प...
18/04/2024

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) आयोजित वेबिनार : लडाखची हाक
वक्ते : आशिश कोठारी (पर्यावरण अभ्यासक, कल्पवृक्ष, विकल्प संगम)
सुनिती सु. र. (राष्ट्रीय समन्वयक, NAPM)
गुरुवार १८ एप्रिल २०२४
वेळ : रात्रौ ८.३० वाजता
‘केंद्राच्या अफाट आणि अचाट विकास प्रकल्पांमुळे आजवर हिमाचल, सिक्कीम आदी हिमालयीन प्रदेशांचे जसे वाटोळे झाले, तसेच आमचे होणार का?’’, असा प्रश्न विचारत लडाखच्या रहिवाशांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला देशभरातून साथ मिळत आहे. काय आहे ही लडाखची हाक आणि देशभरातून साथ मिळालेले हे आंदोलन प्रत्यक्ष कसे चालू आहे याची आँखो देखी आपण NAPM आयोजित वेबिनारमध्ये ऐकणार आहोत प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन जनआंदोलनांचा पाठिंबा देणाऱ्या NAPM च्या राष्ट्रीय समन्वयक सुनिती सु. र. व पर्यावरण अभ्यासक आशिश कोठारी यांच्या कडून!
Topic: लडाखची हाक
Time: Apr 18, 2024 08:30 PM India

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89948753034?pwd=h0T42aXN6QbM7GdB101emiHXdOiFdt.1

Meeting ID: 899 4875 3034
Passcode: napm2024

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय महाराष्ट्र आयोजित वेबिनार विषय: उत्खनन: ऱ्हास पर्यावरणाचा !                        विनाश उ...
05/02/2024

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय महाराष्ट्र आयोजित वेबिनार

विषय: उत्खनन: ऱ्हास पर्यावरणाचा !
विनाश उपजीविकेचा !!
प्रश्न जगण्या- मरण्याचा !!!

वक्ते:- डॉ सतिश गोगुलवार आणि महेश लाडे
सोहले ग्रामसभा व झेंडेपार गावचे सहकारी

दिनांक:- ०८ फेब्रूवारी २०२४
वेळ:- रात्री ०८:३० वाजता.

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/87574830301?pwd=Y8HWRF8Khm4QYRyBUDwCsST40V0Xpe.1

Meeting ID: 875 7483 0301
Passcode: NAPM2024

Address

Palghar
401402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtra Seva Dal, Palghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rashtra Seva Dal, Palghar:

Share