28/04/2026
मुरुड तालुक्यातील तारा बंदर (कोलमांडला) येथील पारंपरिक मच्छीमारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे वनमंत्री श्री.गणेशजी नाईक यांची कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांनी
तारा बंदर ग्रामस्थ मंडळाच्या शिष्टमंडळासह भेट घेण्यात आली. यावेळी स्थानिक मच्छीमारांवर होत असलेल्या अन्यायाची सविस्तर माहिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळाने मौजे कोलमांडला येथील समुद्रकिनारी प्रस्तावित खाजगी जेट्टी प्रकल्पासाठी गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर कांदळवनाची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकल्पाचा विपरीत परिणाम स्थानिक कोळी बांधवांच्या व्यवसायावर होत असून त्यांच्या उपजीविकेचा व अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेऊन मंत्री महोदयांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
#मुरुड #तारा_बंदर #कोलमांडला #मच्छीमार_समस्या #कांदळवन_रक्षण #पर्यावरण_रक्षण
Ganesh Naik BJP Maharashtra Rameshdada Patil Chetan Ramesh Patil