SFI - Nanded

SFI - Nanded लाल सलाम

SFI - अभ्यास व संघर्ष...!

स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ही भारतातील सर्वात मोठी संघटना असून देशातील सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे, मोफत, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण मिळाले पाहिजे.शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, व्यापारीकरण बंद झाले पाहिजे.या मागणीसाठी SFI अविरत संघर्षरत आहे.

एसएफआय : अभ्यास, संघर्ष व त्यागाची ५० वर्षे

स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या क्रांतिकारी विद

्यार्थी संघटनेची स्थापना ३० डिसेंबर १९७० रोजी तिरूअनंतपुरम (केरळ) येथे संघटनेच्या पहिल्या अखिल भारतीय अधिवेशनात झाली.

'एसएफआय' च्या क्रांतिकारी व प्रेरणादायी संघर्षाचा इतिहास :

३० डिसेंबर,१९७० रोजी एसएफआय ची स्थापना झाली होती.'एआयएसएफ' या विद्यार्थी संघटनेत १९६५ नंतर शैक्षणिक बदल घडविण्यासाठीच्या आंदोलनात्मक भूमिकेवरून वैचारिक संघर्ष निर्माण झाला.त्यानंतर विविध राज्यात वेगवेगळ्या स्टुडंट्‌स फेडरेशन या नावाने संघटना काम करू लागल्या.काही काळानंतर पं.बंगाल,केरळ,आंध्रप्रदेश,पंजाब इत्यादी राज्यातील विद्यार्थी नेत्यांनी एकत्र येण्याचे ठरविले. १९७० च्या उन्हाळ्यात डमडम (कोलकाता) येथे त्यांची एक बैठक झाली.आणि विचारांती त्यांनी 'एआयएसएफ' पासुन वेगळी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचे ठरविले.या बैठकीने २७ ते ३० डिसेंबर,१९७० मध्ये केरळ राज्यात तिरूअनंतपुरम येथे पहिले अखिल भारतीय अधिवेशन घेतले आणि 'एसएफआय' ची स्थापना झाली.या अधिवेशनाने सी.भास्करन (केरळ), बिमान बसू (पं.बंगाल), यांची 'एसएफआय' चे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष व सरचिटणीस म्हणून निवड करण्यात केली.या अधिवेशनाला महाराष्ट्रातून प्रा.डॉ.विठ्ठल मोरे, विप्लव मेश्राम, मदन भगत, आर.बी.पाटील, अशोक निकम हे पाच जण उपस्थित होते.

'एसएफआय' राज्यभरात नेण्यासाठी ११ ते १२ जानेवारी,१९७५ रोजी कळंब जि.उस्मानाबाद येथे संघटनेचे पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न झाले.
विठ्ठल मोरे व सोनवणे यांची राज्य अध्यक्ष व सरचिटणीस म्हणून निवड झाली.

पर्यायी शिक्षण व्यवस्थेसाठी लढा :

'एसएफआय' ने आपल्या स्थापनेपासून प्रचलित शिक्षण व्यवस्थेतील दोष व दुर्दशा लक्षात घेऊन पर्यायी शिक्षण व्यवस्थेसाठी लढा सुरू केला आहे.
स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद हे ब्रीदवाक्य व राष्ट्रीय,एकात्मता, धर्मनिरपेक्षता, विज्ञान, शांतता, भातृभाव, समता ही मुल्ये आणि अभ्यास व संघर्ष हा लढ्याचा मार्ग 'एसएफआय' ने स्वीकारला.
सर्वांना शिक्षण - सर्वांना काम या घोषणे अंतर्गत शिक्षण व कामाचा हक्क घटनेत मूलभूत हक्क म्हणुन समाविष्ट करावा.सार्वत्रिक सक्तीचे व मोफत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण द्यावे, मुलींना पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण द्यावे, व्यावसायिक, तांत्रिक आणि उच्च शिक्षणाच्या सोयी वाढवाव्यात,अभ्यासक्रम शास्त्रशुद्ध बदल करावेत, एकशिक्षकी शाळा बहुशिक्षकी कराव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इ.बी.सी.सवलतीची उत्पन्न मर्यादा वाढवावी, प्रवास सवलत ७५ टक्के द्यावी, शिक्षणातून विनाअनुदानित तत्व रद्द करावेत, शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय गूंतवणूक मानून केंद्र सरकारने एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के तर राज्य सरकारने आपल्या उत्पन्नाच्या ३० टक्के खर्च हा शिक्षणावर करावा, शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, व्यापारीकरण व धर्मांधीकरणाला विरोध, शिक्षण क्षेत्रातील फी वाढ व कंत्राठीकरणाला आळा घालावा.वस्तिगृहे, ग्रंथालये, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना सोई उपलब्ध करुन द्याव्यात,या व इतर अनेक प्रश्न व मागण्यांचा त्यात समावेश होता.

एसएफआय एक दिपस्तंभ :

वरील प्रश्न व मागण्यांसाठी 'एसएफआय' ने देशभर असे असंख्य लढे लढवले आहेत.त्यातून अनेक मागण्या मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक प्रश्नांबरोबरच देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, समाजवाद, सामाजिक न्याय, इत्यादी मूल्यांच्या संरक्षणाचीही लढाई तितक्याच जोमदारपणे लढवली आहे.तसेच धर्मांध व फूटीर शक्तीचा सर्वसामर्थ्यानिशी मुकाबला केला आहे.त्यासाठी 'एसएफआय' व तिचा भातृभावी संघटना 'डीवायएफआय' या संघटनांच्या हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचे मोल दिले आहे.
राष्ट्रीय मूल्यांच्या जपवणुकीसाठी शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी एवढा मोठा त्याग देशातील कोणत्याही विद्यार्थी संघटनेनी स्वातंत्र्योत्तर काळात केलेला नाही.म्हणुनच 'एसएफआय' ही भारतीय विद्यार्थी आंदोलनातील एक दिपस्तंभ ठरली.

यासोबतच शैक्षणिक प्रश्नांवर लढत असताना शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, या क्रांतिकारकांना प्रेरणास्थानी ठेवून आपले आदर्श मानते.शिक्षण सुधारणेच्या लढाईतील महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांची स्वतःला वारसदार मानते.सर्व पुरोगामी, लोकशाहीवादी, समाजवादी महापुरुषांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपुर्ण कामगिरी बजावली.त्यांच्या या कार्याचा व विचारांचा वारसा 'एसएफआय' पुढे नेण्यास कायम कटिबद्ध आहे.

- एसएफआय नांदेड.

सर्वांना शिक्षण - सर्वांना काम मिळालेच पाहिजे!

शहीद भगतसिंगांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी युवकांनी पुढे यावे : कॉ. विनोद गोविंदवार.एसएफआय संघटनेच्यावतीने शहीदांना ...
24/03/2026

शहीद भगतसिंगांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी युवकांनी पुढे यावे : कॉ. विनोद गोविंदवार.

एसएफआय संघटनेच्यावतीने शहीदांना अभिवादन.

​नांदेड : "शहीद भगतसिंग हे साम्राज्यवादविरोधी प्रखर समाजवादी क्रांतिकारक होते. आजच्या काळात साम्राज्यवाद आणिसांप्रदायिकतेविरुद्धचा लढा युवकांनी आपल्या खांद्यावर घेणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन कॉ. विनोद गोविंदवार यांनी केले.​शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहादत दिनानिमित्त २३ मार्च रोजी सायन्स महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेच्या वतीने 'शहीद भगतसिंग आणि आजचा युवक' या विषयावर व्याख्यान व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिन्ही महान क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसएफआयचे जिल्हाध्यक्ष कॉ. विजय लोहबंदे होते. प्रमुख वक्ते म्हणून एसएफआयचे माजी राज्य सचिव कॉ. विनोद गोविंदवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून सायन्स महाविद्यालयातील प्रा. राजेश आचेगावे,तेजपालसिंग खेड यांची उपस्थिती होती.

​पुढे बोलताना काॅ. गोविंदवार म्हणाले की, "आज देशात धर्म आणि जातीच्या आधारावर पडलेली फूट पाहता, भगतसिंगांच्या स्वप्नातील समाजसत्तावादी समाजाची स्थापना करणे अधिक आव्हानात्मक बनले आहे. अशा पार्श्वभूमीवर युवकांनी समाजवादी भारत निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून देणे हीच शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल.असे आवाहन केले.यावेळी दिप उद्रेक, प्रथम भारती यांच्या क्रांतिकारी रॅपने या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

​या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष कॉ. प्रफुल कऊडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव कॉ. मीना आरसे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा सहसचिव कॉ. पवन जगडमवार यांनी मानले. यावेळी सुखविंदरसिंग संधू, प्रा.विनोंद चव्हाण, प्रा.दोर्णाचार्य, काॅ.भगवान नाईक,काॅ.जय गायकवाड, काॅ.चंद्रकांत लोखंडे,युनिट अध्यक्ष राजू हळदे,सचिव सतिश देवक्ते,उपाध्यक्ष तेजस पवार,अभिजित कांबळे,सहसचिव वैष्णव रोडे,हरीओम फुलमनते यांच्यासह एसएफआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज दि. २२ मार्च रोजी सायन्स कॉलेजच्या मुलांच्या हॉस्टेल येथे SFI (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया) ची युनिट बांधणी उत्साहपूर...
22/03/2026

आज दि. २२ मार्च रोजी सायन्स कॉलेजच्या मुलांच्या हॉस्टेल येथे SFI (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया) ची युनिट बांधणी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असून संघटनेच्या कार्याला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने ही युनिट स्थापन करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या विविध पदांवर निवड करण्यात आली. सतीश देवकते यांची अध्यक्षपदी, तर राजू हळदे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून तेजस पवार आणि अभिजीत कांबळे यांची निवड करण्यात आली. तसेच सहसचिव पदासाठी वैष्णव रोडे आणि हरिओम फुलमनते यांची निवड करण्यात आली.
या नव्या युनिटमध्ये एकूण १८ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून सर्वांनी संघटनेच्या उद्दिष्टांप्रती निष्ठा ठेवून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विविध समस्यांवर संघटित पद्धतीने लढा उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या युनिटच्या स्थापनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी SFI नांदेड जिल्हा सचिव कॉ. मीना आरसे व SFI नांदेड जिल्हा उपाध्यक्ष कॉ. प्रफुल कउडकर उपस्थित होते.

मुखेड येथील सर्वच महाविद्यालयात इयत्ता 10 वी व 12 वीच्या अंतिम परीक्षा लवकरच सुरू होणार असून परीक्षा केंद्रात प्रवेश घेण...
30/01/2026

मुखेड येथील सर्वच महाविद्यालयात इयत्ता 10 वी व 12 वीच्या अंतिम परीक्षा लवकरच सुरू होणार असून परीक्षा केंद्रात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट आवश्यक आहे. मात्र काही महाविद्यालयांकडून हॉलतिकीट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकाराविरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा शुल्क आधीच भरलेले असताना पुन्हा अतिरिक्त शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे SFI ने नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय व विनामूल्य हॉलतिकीट देण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा SFI कडून देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांवरील आर्थिक बोजा कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यावेळी उपस्थित SFI चे जिल्हा अध्यक्ष कॉ. विजय लोहबंदे, कॉ. साहेबराव सोनसळे,कॉ. सोनु घोगरे, कॉ. किशोर दंडलवाड, कॉ. साईनाथ मरकटवाड,कॉ. साईनाथ मोरे आदी उपस्थित होते.

क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठातील वसतिगृह रिकामे करण्याचा "तुघलकी" निर्णया विरोधात विद्यार्थी संघटनांच्या  वतीने स्वामी ...
21/11/2025

क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठातील वसतिगृह रिकामे करण्याचा "तुघलकी" निर्णया विरोधात विद्यार्थी संघटनांच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन.

आज दि.१९/११/२०२५ रोजी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठा मध्ये एसएफआय(SFI),राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एन एस यू आय(NSUI) च्या संयुक्त विद्यार्थी कृती समिती च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

क्रिडा महोत्सवासाठी वसतिगृह रिकामे करण्याचा "तुघलकी" निर्णय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला असून ह्या विरोधात आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,एन एस यु आय विद्यार्थी काँग्रेस ,एस एफ आय यांच्या वतीने विद्यापीठा समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
ह्यावेळी एस एफ आय (SFI)नांदेड जिल्हा सचिव मीना आरसे व एस एफ आय (SFI) नांदेड जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल कउडकर व सर्व विद्यार्थी संघटनांचे पद अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
#नांदेड

ओला दुष्काळ जाहीर करून राज्यातील  विद्यार्थ्यांचे सरसकट शुल्क माफ करा- SFI माहूर.आज दि. 03/10/2025 रोजी माहूर तहसीलदार ह...
03/10/2025

ओला दुष्काळ जाहीर करून राज्यातील विद्यार्थ्यांचे सरसकट शुल्क माफ करा- SFI माहूर.
आज दि. 03/10/2025 रोजी माहूर तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले.
मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषता ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे शेतमजूर कष्टकरी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतातील पीक हाताबाहेर गेल्याने राज्यातील मराठवाडा विभागातील जनतेने दुष्काळाचा भयंकर तडाखा बसला आहे. यापूर्वी सुद्धा मराठवाड्यातील दुष्काळामुळे विद्यार्थी शैक्षणिक समस्यांना सामोरे जात होते.आणि आता भिषण पुरपरिस्थितीमुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळित झाले असुन हजारो कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे . या आपत्तीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. तो त्या भागांतील गरीब व मध्मवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि हि परिस्थिती विद्यार्थ्यांचा शैक्षणीक भविष्यावर गदा आणणारी आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ नये.याकरिता शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयांना आदेश देण्यात यावा की पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून कुठलेही शैक्षणिक शुल्क वसुली केल्या जाणार नाही. सदर परिस्थितीमध्ये शासनाने विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून राज्यातील शालेय व पारंपरिक व तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सरसकट शुल्क माफीसाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन एस एफ आय SFI च्या वतीने करण्यात येत आहे. जर कुठल्याही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्काकरिता सक्ती किंवा विद्यार्थ्यांवर दबाव टाकून वसुली करणे असे प्रकार घडल्यास SFI आक्रमक पाऊल उचलेल.
ह्या वेळी SFI माहूर तालुका निमंत्रक श्रेजल देवपूलवार, गोपाल पवार,अजिंक्य पोटगंटवार,आनंद केंद्रे उपस्तित होते.

प्रति, मा.कुलगुरू साहेब,स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ नांदेड.मोदी सरकारच्या कारकिर्दीत देशभरातील कॅंपसमध्ये शोषण आणि अन्...
19/07/2025

प्रति,
मा.कुलगुरू साहेब,
स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ
नांदेड.

मोदी सरकारच्या कारकिर्दीत देशभरातील कॅंपसमध्ये शोषण आणि अन्याय सामान्य बाब बनली आहे. ओडिशामधील फकीर मोहन कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची अलीकडील घटना कॅंपस सुरक्षेविषयी गंभीर चिंता निर्माण करते. पश्चिम बंगालमधील साउथ कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर युनियन ऑफिसमध्ये बलात्कार झाल्याची घटना देखील धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील ठाण्यामधील एका शाळेत मुलींना त्यांच्या संमतीशिवाय बोटांचे ठसे घेऊन मासिक पाळीची तपासणी करण्यासाठी कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले.

या सर्व घटनांनंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केलेली नाही. फकीर मोहन कॉलेजमध्ये तक्रार दाखल असूनही आरोपीला वाचवले गेले, जिथे पीडितेचे प्राण संकटात होते. पश्चिम बंगालमध्ये, तृणमूल काँग्रेसने कॅंपसमध्ये तयार केलेली युनियन ऑफिसे विद्यार्थ्यांना छळण्यासाठी वापरली जात आहेत.

भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या शिक्षण संस्थांच्या मॉडेलमध्ये सुरक्षिततेचा आणि सुरक्षा यंत्रणेचा अभाव आहे, जिथे पीडित आणि बचावलेले विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, तर गुन्हेगारांना वाचवले जाते. **एसएफआय** अशा घटनांचा तीव्र निषेध करतो, या घटना मनुस्मृतीच्या विचारांवर आधारलेल्या आहेत. आम्ही गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करतो.

**आम्ही सर्व लोकशाहीप्रेमी विद्यार्थी समुदायाला आवाहन करतो** की त्यांनी लैंगिक समानतेच्या आधारावर एक सुरक्षित आणि समजूतदार कॅंपससाठी या आंदोलनात सामील व्हावे व आपला आवाज बुलंद करावा.

आमच्या मागण्या:

* पितृसत्तेचा नायनाट करा
* कॅंपसमध्ये GS-CASH (लैंगिक छळविरोधी समित्या) अनिवार्य करा
* शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी संघटना सुनिश्चित करा
* संबंधित घटनांतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या

संघर्षाशिवाय बदल नाही! ✊

*एसएफआयचे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न*नांदेड (ता. २८) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे २५वे नांदे...
28/05/2025

*एसएफआयचे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न*

नांदेड (ता. २८) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन आज बुधवार दिनांक २८ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात संपन्न झाले. अधिवेशनाची सुरुवात शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून झाली.

अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते आणि डीवायएफआयचे अंकुश माचेवाड यांनी केले. अधिवेशनास एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले तर शेतमजूर युनियनचे नेते कॉ. विनोद गोविंदवार यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. अधिवेशन उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विजय लोहबंदे होते तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल कऊडकर यांनी केले.

अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. त्याआधी शोक ठराव घेऊन आदरांजली वाहण्यात आली. अधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्द करा, सर्व विद्यार्थ्यांना बस प्रवास निशुल्क करा, शासकीय आयटीआयचे खाजगीकरण थांबवा, जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी लढा तीव्र करा, विद्यार्थिनी व महिला अत्याचार विरोधी लढा तीव्र करा, यासहित विविध ठराव एकमताने या अधिवेशनात पारित करण्यात आले.

या अधिवेशनाने एसएफआयची १८ सदस्यांची नवीन जिल्हा कमिटीची निवड केली. यामध्ये एसएफआयचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून विजय लोहबंदे आणि जिल्हा सचिव म्हणून मीना आरसे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी प्रफुल्ल कऊडकर व स्वप्नील बुक्तरे तसेच जिल्हा सहसचिवपदी पवन जगडमवार व विकास गायकवाड यांची निवड करण्यात आली. जिल्हा कमिटी सदस्य म्हणून अक्षय सागरे, साहेबराव सोनसाळे, नितीन सोनकांबळे, अमोल गायकवाड, सोनल पाईकराव, नेहा कऊडकर, भारत पवार, शरद खंदारे, भीमराव सोनकांबळे यांची निवड करण्यात आली आहे. ३ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

अधिवेशनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातून ८६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा सचिव आणि अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. 'हम होंगे कामयाब' या गीताने अधिवेशनाचा समारोप झाला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुक्यातील एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
•••

30/01/2025

"भारताचे संविधान" हे कोणत्या धर्माचे नसून ते प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे आहे,
मग धर्माचे वेगळं संविधान कशाला?
"भारताचे संविधान जिंदाबाद"

पुणे विद्यापीठात एसएफआयच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणार्‍या अभाविपच्या गुंडांना अटक कराएसएफआय संघटनेचे महात्मा फुले पुतळ...
04/11/2023

पुणे विद्यापीठात एसएफआयच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणार्‍या अभाविपच्या गुंडांना अटक करा

एसएफआय संघटनेचे महात्मा फुले पुतळ्यासमोर निदर्शने की

शैक्षणिक वातावरण बिघडवणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघटनेवर शैक्षणिक कँम्पसमध्ये तात्काळ बंदी घालून पुणे विद्यापीठात एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर जीव घेणा हल्ला करणार्‍या अभाविपच्या गुंडाना तात्काळ अटक करवी, यामागणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी शहरातील आयटीआय चौकतील महात्मा फुले पुतळा परिसरात एसएफआय संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. पुणे विद्यापीठात झालेल्या मारहाणीचे पडसाद आता नांदेड मध्ये सुद्धा पहावयाला मिळत आहेत. शुक्रवरी निदर्शने करून जिल्हाधिकार्‍या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.

एसएफआय ही एक क्रांतीकारी विद्यार्थी संघटना आहे. शाळा बाह्य होणार्‍या दिनदलित, आदिवासी, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघना आहे, परंतू १ नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआयची) सभासद नोंदणी सुरू असताना यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या जातीवादी गुंडांनी अचानक येवून एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात एसएफआयचे राज्य अध्यक्ष आणि केंद्रीय कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे, गणेश जानकर या कार्यकर्त्यांनवर जीव घेणा हल्ला करण्यात आला. मुलींना देखील मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात इतरही एसएफआयचे कार्यकर्ते जख्मी झाले आहेत. या हल्ल्याचा नांदेड एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कायम असे हिंसक कृत्य करत आली आहे. त्यांनी त्यांच्या गुंड संस्कृतीची पुनरावृत्ती केली आहे. काहीही कारण नसताना, शांततेत एसएफआयची सभासद नोंदणी सुरु असताना हा हल्ला केला गेला. अचानक एसएफआयच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. हे एकदा नाही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. प्रत्येक कँम्पसमध्ये विद्यापीठात यांची गुंडागर्दी सुरू झाली आहे. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनावर जीव घेणा भ्याड हल्ला करणार्‍या गुंडांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही दिला आहे. या आंदोलनात एसएफआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.विजय लोहबंदे, कॉ.स्वप्नील बुकत्तरे, कॉ.मीना आरसे, कॉ. प्रफुल कऊडकर, शेतमजूर युनियनचे कॉ.विनोंद गोविंदवार, कॉ.मंजूश्री कबाडे, रोहित त्रिभवन, प्रथम तारू, शैलेज जाधव, प्रतिक्षा भीसे, प्रतिक्षा कंधारे, अनिकेत धुतराज, जयराज जाधव, विनित नरवाडे यांच्यासह असंख्ये विद्यार्थी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

एलएलबी अभ्यासक्रमासाठी पुर्वीप्रमाणे तीन विषयाला एटीकेटी देण्यात यावी या मागणीला घेवून एस एफ आय SFI विद्यार्थी संघटनेच्य...
11/08/2023

एलएलबी अभ्यासक्रमासाठी पुर्वीप्रमाणे तीन विषयाला एटीकेटी देण्यात यावी या मागणीला घेवून एस एफ आय SFI विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.✊✊

Address

Nanded Airport Area
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when SFI - Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SFI - Nanded:

Share