12/03/2024
महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ झाली. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कर्जे दिली होती. परंतु काहीजणांना त्या कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नव्हते. अशांपैकी काहींनी एस. एम. जोशी यांना विनंती केली की, कर्जाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम माफ करण्याची विनंती त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना करावी. एस. एम. जोशी यांनी ती गोष्ट यशवंतरावांच्या कानावर घातली तेव्हा यशवंतराव म्हणाले, 'असे कशाला, आपण सर्वच कर्जे माफ करून टाकू.'
सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते, याचा वस्तुपाठच यशवंतरावांनी घालून दिला.
आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन 🙏🏻
#यशवंतरावचव्हाण
साभार Vijay Chormaresir