lalkaryouthgroup

lalkaryouthgroup अत्त दीप भव:
Be educated, be organised and be agitated..�
जिंदाबाद साथी! जय भारत! जय संविधान

10/06/2026

ललकार युथ ग्रूप भीम जयंती setup 2026 💙✨
Posted lately



#आम्ही

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे सामाजिक परिवर्तनाला दिशा व चाल...
01/08/2025

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे सामाजिक परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीत आणि सामाजिक क्रांतीत त्यांच्या साहित्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आजही अनेक विद्यार्थी आणि अभ्यासक त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करत आहेत.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीला लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. ना. गव्हाणकर यांनी केले. लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि सीमाभागातील अनेक गावांमध्ये कार्यक्रम सादर करून जनजागृती घडवून आणली.

स्वातंत्र्यानंतरही जेव्हा भारतात सामाजिक विषमता आणि वर्गभेद कायम होते, तेव्हा अण्णा भाऊ साठे यांनी त्या विरोधात आवाज उठवला. १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईत त्यांनी वीस हजार लोकांचा मोर्चा काढला. त्या मोर्च्यातील घोषणा होती –
"ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है!"

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत अण्णा भाऊ साठे दलित चळवळीशी जोडले गेले. त्यांनी दलित व श्रमिक वर्गाच्या दुःखद अनुभवांना आपल्या कथांमधून प्रभावीपणे मांडले. १९५८ मध्ये मुंबईत आयोजित पहिल्या दलित साहित्य संमेलनात उद्घाटन करताना त्यांनी ठामपणे सांगितले –
"ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही, तर दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे!"

अण्णा भाऊ साठे हे साहित्यिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध होते. त्यांनी मराठीत तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये **फकिरा** (१९५९) ही विशेष उल्लेखनीय कादंबरी असून तिला इ.स. १९६१ मध्ये राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला.
त्यांच्या १५ लघुकथा संग्रह, नाटके, रशियातील प्रवासवृत्तांत, १२ पटकथा, तसेच पोवाडा शैलीतील १० क्रांतीकारी गीते हे त्यांच्या बहुआयामी साहित्यिक योगदानाचे साक्षीदार आहेत.

अशा या थोर साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आम्ही ललकार साथी ~
जिंदाबाद ✊🏻

उत्तरप्रदेश इटावा के इलाके के दान्दरपुर गांव में भागवत कथा के दौरान कथावाचक और उनके सहायकों की जाति पूछने पर पीडीए की एक...
27/06/2025

उत्तरप्रदेश इटावा के इलाके के दान्दरपुर गांव में भागवत कथा के दौरान कथावाचक और उनके सहायकों की जाति पूछने पर पीडीए की एक जाति बताने पर, कुछ वर्चस्ववादी और प्रभुत्ववादी लोगों ने कथावाचाक के साथ अभद्र व्यवहार करते हुए उनके बाल कटवाए, नाक रगड़वाई और इलाके की शुद्धि कराई.. उनको मारा पिटा गया ...
यह घटना धार्मिक स्वतंत्रता का हनन हे..
जो हमें संविधान के अनुच्छेद 25 से 28 में दिया गया है
जो इन अनुच्छेद का उल्लंघन है...
हमारा संविधान जातिगत भेदभाव की अनुमति नहीं देता है, ये व्यक्ति की गरिमा और प्रतिष्ठा से जीवन जीने के मौलिक अधिकार के विरुध्द किया गया अपराध है.......!

जय भारत / जय संविधान
🇨🇮 #आम्ही संविधानवादी
✊😡जिंदाबाद ललकार साथी ...🙏

मागील दोन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच...
10/05/2025

मागील दोन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला . भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला.
पण मात्र आता आम्हा भारतीयांसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात एक भारतीय जवान शहिद झाला आहे. मुरली नाईक असं शहिद झालेल्या जवानाचं नाव आहे. ते जम्मूमध्ये तैनात होते. आज सकाळी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात मुरली यांना वीरमरण आलं आहे. मुरली नाईक हे मुंबईच्या घाटकोपर परिसरातील कामराजनगरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते.
मुरली मुळचे आंध्रप्रदेशचे रहिवासी आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून ते संपूर्ण कुटुंबीयांसह घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात वास्तव्याला होते. पण अलीकडेच ते राहत असलेली इमारत पुनर्विकास प्रकल्पात केली. त्यामुळे मुरली नाईक यांचं कुटुंब काही दिवसांसाठी आंध्रप्रदेशात राहायला गेलं होतं. इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा घाटकोपरला येणार होते.

💙🤍WE ARE BECAUSE HE WAS          #भीमजयंती
15/04/2025

💙🤍
WE ARE BECAUSE HE WAS





#भीमजयंती

दोस्ती जिंदाबाद..✊🏻💙
09/03/2025

दोस्ती जिंदाबाद..✊🏻💙

"जिजाऊंच्या स्वप्नांची आस,सावित्रीच्या शिक्षणाची ज्योत,फातिमाची मशाल, रमाईचा त्याग,लढतो आम्ही हा वारसा घेऊन,स्त्रीमुक्ती...
09/03/2025

"जिजाऊंच्या स्वप्नांची आस,
सावित्रीच्या शिक्षणाची ज्योत,
फातिमाची मशाल, रमाईचा त्याग,
लढतो आम्ही हा वारसा घेऊन,
स्त्रीमुक्तीचा संकल्प करून!"

स्त्री-मुक्तीचा जयघोष करत… ललकार युथ ग्रुपने ८ मार्च रोजी क्रांतिनगर मधील महिलांसोबत जागतिक महिला दिन साजरा केला.
या प्रेरणादायी कार्यक्रमात बाल आणि युथ साथीनींनी नृत्याविष्कार सादर करत महिलांना शुभेच्छा दिल्या. महिलांनीही आत्मविश्वासाने सहभाग घेतला आणि हा सोहळा अधिक उत्साही केला.
सोबत रमाई सांस्कृतिक कला मंच, दामू नगर आणि निर्मिक सांस्कृतिक केंद्र यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात जिजाऊंच्या दूरदृष्टीचा, ज्योतिबा-सावित्रीमाई ह्यांच्या शिक्षणक्रांतीचा संघर्षाचा, बाबासाहेबांच्या स्त्री चळवळीचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा अनेक गाण्यातून नृत्यातून घेण्यात आली.

#स्त्रीशक्ती #स्त्रीमुक्ती #समानतेचीलढाई #जिजाऊ #सावित्रीबाई #फातिमाशेख #रमाई

लोकसत्ताक, संविधान अमंलबजावणी दिनजय संविधान जय भारत
29/01/2025

लोकसत्ताक, संविधान अमंलबजावणी दिन
जय संविधान जय भारत

✊जिंदाबादआद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतिकारी ...
04/01/2025

✊जिंदाबाद
आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतिकारी आहे. सावित्रीबाईंच्या निस्सीम त्यागामुळे आजच्या महिलांना समाजात मानाचे स्थान मिळाले आहे. सावित्रीमाईंच्या प्रगतिशील व शिक्षित समाजाच्या स्वप्नाला पुढे नेणे हीच आजची गरज आहे.
आम्ही ललकार ने काल कांदिवलीत त्यांच्या विचारांचे, महत्त्वाचे आणि संघर्षाचे लोकांसमोर मांडले. आम्ही मी सावित्री हे नाटक फिल्मस्क्रीनिंगद्वारे दाखवून त्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
तसेच काही ललकार साथीनी गाण्यांच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांचे विचार पोहोचवले आणि सावित्रीमाईने लावलेले ज्ञानाचे रोपटे मोठे करू अशी आशा लोकांमध्ये जागवली. अशाप्रकारे जयंती खूप उत्साहात साजरी करण्यात आली.
महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला...!

जिंदाबाद ✊
आम्ही लेकर साऊची
आम्ही ललकार साथी
आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी
आम्ही संविधानवादी

जिंदाबाद ✊२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक मनुस्मृती दहन केले. या ऐतिहासिक घटनेच्या स्म...
26/12/2024

जिंदाबाद ✊

२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक मनुस्मृती दहन केले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ, दरवर्षी २५ डिसेंबरला देशभरात विविध ठिकाणी मनुस्मृती दहनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

काल, आम्ही ललकार संघटनेच्या वतीने बुद्ध विहार ते रमाई चौक या मार्गावर मनुस्मृती दहन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात संविधान आणि मनुस्मृतीतील फरक गाण्यांच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

मनुस्मृती दहनाचा दिवस महिला मुक्ती दिवस म्हणूनही ओळखला जातो. या दिवसाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक स्त्रीने मनुस्मृतीतील चुकीच्या गोष्टी सर्वांसमोर वाचून त्या दहन केल्या.

जिंदाबाद!
आम्ही ललकार साथी
जय भारत! जय संविधान!
आम्ही संविधानवादी
आम्ही फुले-शाहू-आंबेडकरवादी

Address

Kandivali East
Mumbai
400101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when lalkaryouthgroup posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share