अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती

  • Home
  • India
  • Mumbai
  • अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती Damodar tandel, president, Akhil Maharashtra Machimar Kruti Samiti

नवी मुंबई विमानतळाला स्व."दिबा पाटील " यांचेचं नाव देण्यात यावं..भूमिपुत्र खासदार "सुरेश म्हात्रे"(बाळ्या मामा) यांनी सु...
12/09/2025

नवी मुंबई विमानतळाला स्व."दिबा पाटील " यांचेचं नाव देण्यात यावं..भूमिपुत्र खासदार "सुरेश म्हात्रे"(बाळ्या मामा) यांनी सुरु केलेल्या लढ्यात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे समर्थन..!

#लढा
#भूमिपुत्र
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre

*🔴लालबागच्या राजाचे ग्रहण कालावधीत विसर्जन केल्याने भाविक संतप्त; मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मच्छीमार संघटनेची...
09/09/2025

*🔴लालबागच्या राजाचे ग्रहण कालावधीत विसर्जन केल्याने भाविक संतप्त; मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मच्छीमार संघटनेची मागणी!*

*मुंबई :* गिरगाव चौपाटीवर रविवारी लालबागच्या राज्याचे विसर्जन प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई झाली. विसर्जनातील घोळामुळे गणपतीचे विसर्जन चंद्र ग्रहणात करावे लागले. त्यामुळे लाखो भाविक संतप्त झाले आहेत. तसेच, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा छळ झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. तसेच, विसर्जनातील खोळंबा व भक्तांचा करण्यात आलेला छळ याप्रकरणी मंडळातील कार्यकारी समितीतील सदस्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.

लालबागच्या राजाच्या लांबलेल्या मिरवणुकीमुळे विसर्जनाला विलंब झाला. तब्बल ३३ तासांनंतर रविवारी रात्री ९.१० च्या सुमारास विसर्जन पार पडले. मात्र, त्यावेळी चंद्र ग्रहण लागले होते. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा दावा मच्छीमार संघटनेने केला आहे. वर्षानुवर्षे विसर्जन सोहळा हा मुंबईतला कोळी बांधव करत आलेला आहे. यावर्षी पहिल्यांदाच कोळी बांधवांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विसर्जन घडवून आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.

विसर्जन चंद्र ग्रहणात करणे हा केवळ गणपतीचा अपमान नसून तो सर्व गणेशभक्तांचा अपमान असल्याची भावना अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे विसर्जन प्रक्रियेची चौकशी करून मंडळाच्या कार्यकारी मंडळातील व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

कोळी समाजातील मासे विक्रेत्या महिलांनी १९३४ साली लालबागच्या राजाची स्थापना केली. लालबागच्या राजाची लोकप्रियता वाढल्यानंतर संबंधित मंडळातील कार्यकारिणीतील सदस्यांनी उत्सवाचे बाजारीकरण सुरू केल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केला. ज्या सामान्य भाविकांमुळे या मंडळाला प्रसिद्धी आणि अफाट पैसा मिळू लागला, त्याच भाविकांची अवहेलना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. गणपती कोणाच्या मालकीचा नाही, अशीही खोचक टीका त्यांनी केली.

दरम्यान, लालबागच्या राज्याच्या दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करून व्हीआयपी संस्कृती बंद करावी. चेंगराचेंगरीचा प्रकार घडू नये, यासाठी देखाव्याचे पंडाल बंधिस्त न ठेवता मोकळ्या जागेत तयार करावे. गणपतीची स्थापना करणाऱ्या कोळी समुदायाला दरवर्षी लालबागच्या राज्याच्या विसर्जनाचा मान मिळावा. तसेच, दर्शनाचा एक दिवस आगरी-कोळी बांधवांसाठी राखीव ठेवावा, आदी मागण्याही मच्छीमार समितीनेकडून करण्यात आल्या आहेत.

https://youtu.be/ZuttrUbkGzY?si=90RY5HDL0pj3e5Orसमाजबांधवनो,आपले नवीन गाणं नारळी पौर्णिमा करिता आता तुमच्या भेटीला आले  ...
02/08/2025

https://youtu.be/ZuttrUbkGzY?si=90RY5HDL0pj3e5Or
समाजबांधवनो,आपले नवीन गाणं नारळी पौर्णिमा करिता आता तुमच्या भेटीला आले सादर केले आहे तरीही आपले स्नेह दर्शवावे ❤️ आणि Like Share Comment Subscirbe करून आम्हाला प्रोत्साहित करावे..धन्यवाद 🙏 ~ धिरज विलास तांडेल { 4VChar Productions }

🌊 एक हाय सण आमचा [ Video Song out now] – नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सादर करत आहोत एक उत्साही कोळी लोकगीतेचा जल्लोष, आपल्या स...

*करेंगे या मरेंगे, अपना हक्क लेके रहेंगे**क्रॉफर्ड मार्केट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईला स्थलांतरापासून ...
20/07/2025

*करेंगे या मरेंगे, अपना हक्क लेके रहेंगे*

*क्रॉफर्ड मार्केट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईला स्थलांतरापासून वाचविण्याकरिता मच्छिमार जन-आक्रोश मोर्चाची मोहीम धाकटी डहाणू गावातून मच्छिमारांनी केली नव्या जोमाने सुरुवात.*

पालघर :- मासळी व्यवसायाचा आर्थिक केंद्र बिंदू असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईचे अस्तित्व पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच अकार्यक्षम अभियंताच्या मस्तकात चढलेल्या माज मुळे धोक्यात आल्याने राज्यभरातील मच्छिमार एकवटले असून २२ जुलै रोजी पुकारलेल्या मच्छिमार जन-आक्रोश मोर्चा जरी तूर्तास स्थगित करण्यात आला असला तरी सरकार आणि पालिकेबरोबर येत्या १५ दिवसांत होणाऱ्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर मच्छिमार आंदोलनावर ठाम राहणार आहेत. तसेच मच्छिमारांच्या आक्रोशाची धार कमी न होण्याकरिता मोर्चाची मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, दी मुंबई फ्रेश फिश डीलर्स असोसिएशन, मुंबई जिल्हा कोळी महिला कार्यकारी सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, ठाणे जिल्हा मच्छिमार संघ ह्यांनी घेतला असून रविवार दिनांक २०/०७/२०२५ रोजी धाकटी डहाणू येथील राम मंदिरातून मोर्चाचे शंखनाद वाजविण्यात आले आहे.

आक्रोश मोर्चाची तयारी जोमाने करण्याकरिता तसेच जास्तीच्या संख्येने मच्छिमार बांधवांची मोर्च्यात सहभाग होण्याकरिता धाकटी डहाणू पासून नव्या जोमाने मोर्चाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात ही मोहीम पालघर, ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, उत्तन, गोराई, मनोरी, मार्वे, मालवणी, वसई, अर्नाळा, वर्सोवा, कुलाबा, कफपरेड, खार दांडा, जुहू गावात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

धाकटी डहाणू येथे झालेल्या सभेत उपस्थित मच्छिमारांनी एकमताने "करेंगे या मरेंगे" चा नारा देत श्री. छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईचे स्थलांतरित होऊ न देण्याचा निर्णय घेतला असून आगामी काळात होणाऱ्या मच्छिमार जन-आक्रोश मोर्च्यात डहाणूवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा निर्धार घेण्यात आला आहे.

सदर सभेत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. देवेंद्र दामोदर तांडेल, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. विनोद पाटील, पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष मर्दे आणि पालघर जिल्हा सरचिटणीस श्री. कुंदन दवणे आदींनी सभेचे मार्गदर्शन केले.

आपला आक्रोश शांत झाला नसून जो पर्यंत कोळी बांधवांचे हक्क शाबुत होत नाही तो पर्यंत संपूर्ण कोळी समाज आंदोलनात्मक भूमिका मांडत राहणार असल्याचा निर्धार सदर सभेतून व्यक्त करण्यात आला.

*आपला नम्र*
*श्री. बर्नार्ड डिमेलो*
*(कार्याध्यक्ष)*
*अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती*

14/07/2025

मुंबई महानगरपालिकेच्या भूमिगत मासळी मंडई प्रकल्पाच्या विरोधात आणि पारंपरिक मासळी व्यवसायाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोळी जनआक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा क्रॉफर्ड मार्केट येथून महापालिका मुख्यालयापर्यंत निघणार आहे.

आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, सरचिटणीस संजय कोळी, महिला अध्यक्षा नयना पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तांडेल म्हणाले की, सन १९७१ पासून कार्यरत असलेल्या पलटण रोड येथील मासळी मंडईला महापालिकेच्या धोरणांमुळे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यातून दररोज १५ हजार पेक्षा जास्त मासळी विक्रेते, व्यापारी, महिला आणि वाहतूकदार या मंडईत व्यवसाय करतात. येथे ८७ घाऊक व्यापारी व १५७ कोळी महिला विक्रेते आणि अन्य घटक कार्यरत आहेत.

पालिकेने या भूखंडाचे आरक्षण रद्द करून तो भूखंड अवा डेव्हलपर्स या खाजगी व्यावसायिकाला केवळ ३६९ कोटी रुपयांमध्ये ३० वर्षांच्या भाडेकरारावर दिला. पुढील ३० वर्षांसाठी केवळ १ रुपया ते १००१ रुपयांच्या दरात भाडे घेतले जाणार असल्याने हा व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले मंडईत जागा देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र, ती जागा बेसमेंटमध्ये असून, अद्याप ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. तरीही तातडीने स्थलांतरासाठी पालिका दबाव टाकत असल्याचा आरोप झाला. मंडईसमोरील फुटपाथवर तात्पुरत्या शेडमध्ये व्यवसाय करा, अशा नोटिसा मासळी विक्रेत्यांना देण्यात येत आहेत.

मुंबई फ्रेश फिश असोसिएशन चे बळवंतराव पवार यांनी सांगितले की, हा भूखंड कोळी समाजाला ४०० कोटी रुपयांना द्यावा अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल.
ताडदेव परिसरातील कोळी महिलांच्या रोजगारावरही ब्रिज बांधकामाचा परिणाम झाल्याने त्यांना नवीन परवाने देण्याची मागणी केली जात आहे.

19/05/2025

I just referring ipetition wrote by *Megha Agarwal.....* who is the one of the petitioner.....

*Some of the part mentioned by her......*
👇🏻
What’s Happening?

A fish market has recently been established in the Municipal Building at Tulsiwadi, Tardeo. While markets are vital for communities, this particular location is entirely unsuitable for such an operation due to the following serious concerns:

*Public Health & Hygiene at Risk:*
*Violation of Religious Sensitivities:*
*Traffic Chaos and Safety Hazards:*
*Possible Legal Violations:*

इथे कुणाच्या धार्मिक भावना दुखवून व्यवसाय केला जातो असं म्हणणे म्हणजे मुर्खपणाचे आहे..... जर एखाद्या धर्मात मांसाहार निषद्ध असेलच, म्हणून त्यास धार्मिक भावानेतून विरोध असेलच तर त्यास धार्मिक किंवा पंथीय कट्टरतावाद आहे, असचं म्हणायला हवं..जर मांसाहार करण्यार्या मला शाकाहारी लोंकाच वागणचं आवडत नाही म्हणत त्यास विरोध करणे सुद्धा विचित्रता किंवा *जैन धर्मात सन्याशी कपड्याशिवाय वावरतात त्याला सुद्धा कुणी विरोध केला तर....* त्यामुळे ह्या मुद्दावार न्यायालयात कश्याप्रकारे मांडल जातं असा विषय आहे......

त्यात तेथील व्यवसाय हा छोट्याशा गल्लीत, त्याने *Public Health & Hygiene at risk* म्हणत असालचं तर ठीक आहे.... पण कुणी भाजी मार्केट किंवा इत्तर व्यवसाय बाबत न्यायालयात तक्रार केली, तर न्यायालयं काय विचार करेल....*त्यातून सरसकट व्यवसाय बंद करणे म्हणजे सुद्धा सामाजिक अत्याचार आणि शोषण त्यातून मार्ग म्हणजे बाजार येथून स्थलांतरित असा जोर दिला जाईल....* म्हणून त्यावर उत्तर शोधणे जरुरी आहे... त्यावर मच्छर वै. त्रास म्हणजे मासळी व्यवसायं थांबला तर सर्वच त्रास थांबणार असं PIL करणारे निश्चित सांगू शकणार काय?

त्यामुळे पालिकाने ह्या सर्व गोष्टीची काळजी घेत, तेथेच व्यवसाय करण्याची व्यवस्था करणे आणि त्यातून होणारा त्रास कमी करण्याची व्यवस्था केली तर छानच.

*त्यात Fish market recently established by BMC ह्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील ताडदेव ब्रिज येथील मासाळी मार्केट विषय संबंधित असेलच तर..... तरी जर तेथे मासळी व्यवसाय करणाऱ्यासाठी पालिकाने व्यवस्था केली तर त्रास होण्याचा संबंधचं नाही.....*

असो पण उडदया आम्ही कांदा, लसूण खात नाही म्हणूण आमच्या क्षेत्रात ते विकूच नका असं म्हणणे म्हणजे सुद्धा अयोग्यचं..... तअसं बरंच शेवटी PIL पालिके विरुद्ध.... त्यातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे *"धार्मिक भावना दुःखावल्या जातात असं पालिका किंवा एखादया समाजाबद्दल बोलणे म्हणजे आंतकवाद.... "* असा गंभीर आरोप याचिकाकर्त्यावर करायला हवा..... PIL काय, कश्याप्रकारे न्यायिक व्यवस्थेसमोर मांडली जाते असं असताना, शेवटी सर्वसमावेशक ह्यावर उत्तर शोधणे हाच उपाय.... *त्यातील सर्वात मुद्दा की कोळी समाज अनेक शतकापासून मासळी व्यवसाय करतोय.... त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना घेउन येथे आलात तेंव्हा हा सर्व विचार करायला हवा होता.....*

*Lets trying to get main PIL... If get the number then easy to find.... शेवटी हेच कितोही सोसायट्या किंवा कोळीवाडे किंवा मासळी बाजार असू दया.... सर्वांचे एका छत्राखाली येणे जरुरी आहे......*

*मत्स्यवयवसाय मंत्री मा. ना. श्री. नितेशजी राणे साहेबांच्या पुढाकाराने ताडदेव येथील मासळी विक्रेत्यांचा कोळी महिलांचा  प...
15/02/2025

*मत्स्यवयवसाय मंत्री मा. ना. श्री. नितेशजी राणे साहेबांच्या पुढाकाराने ताडदेव येथील मासळी विक्रेत्यांचा कोळी महिलांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. पालिका आयुक्त श्री.भूषण गगराणी साहेबांनी महिलांचे पुनर्वसन ताडदेव येथेच करणार असल्याचे दिले आश्वासन.*

मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. श्री. नितेशजी राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४/०२/२०२५ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत बेलासीस ब्रीज बांधकामामुळे बाधित झालेल्या २६ मासे विक्रेत्या कोळी महिलांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

ताडदेव येथील मासळी विक्रेत्या कोळी महिलांनी सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत मंत्रीमहोदयांनी पालिका आयुक्त श्री. भूषण गागराणी साहेब ह्यांच्या बरोबर शुक्रवारी तातडीने मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली असता पालिका आयुक्तांनी महिलांचा पुनर्वसनाचा विषय मार्गी लावत मुंबईतील सर्व मासळी विक्रेत्या महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून परवान्यासंदर्भातील मुद्दा मच्छिमारांच्या संयुक्त रित्या सोडविण्यासाठी मच्छिमार समितीने पुढाकार घ्यावा असे सभेत सुचविले असून समितीने ह्या विषयावर पुढाकार घेत महिलांचे परवान्याचे विषयासंदर्भातील मोहीम घेण्याचा आश्वासन उपस्थितांना दिले.

कोळी महिलांचा पुनर्वसनाचा विषय मार्गी लागला असल्याकारणाने सोमवारचे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले असून मंत्रीमहोदयांनी घेतलेल्या पुढाकाराने मच्छिमार समाजाकडून कौतुक करण्यात येत असून त्यांचा जाहीर सत्कार लवकरच मच्छिमार समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.

मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. श्री. नितेशजी राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी साहेब, मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. किशोर तावडे साहेब तसेच मच्छिमारांच्या वतीने समितीचे अध्यक्ष श्री. देवेंद्र दामोदर तांडेल साहेब, महिला अध्यक्षा श्रीमती नयनाताई पाटील मॅडम, युवा अध्यक्षा श्री. मिल्टन सोदिया साहेब, मासे विक्रेता महिला श्रीमती मेघा चुनेकर ताई आदी उपस्थित होते.

जयेश जनार्दन तांडेल
सचिव :- अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती

गुरुवार दिनांक ०२/०१/२०२५ रोजी नवनिर्वाचित मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. श्री. रितेशजी राणेसाहेब ह्यांची अखिल महाराष्ट्र ...
03/01/2025

गुरुवार दिनांक ०२/०१/२०२५ रोजी नवनिर्वाचित मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. श्री. रितेशजी राणेसाहेब ह्यांची अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आणि ताडदेव येथील बेलासिस बांधकामामुळे प्रकल्प बाधित मासळी विक्रेत्या कोळी महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मच्छिमार समाजाच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.

साहेबांनी ताडदेव येथील मासळी विक्रेत्या कोळी महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच अवैध मासेमारी, अवैध पर्ससीन नेट मासेमारी, LED मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अवैध मासेमारीला आळा घालण्याचे आश्वासन मच्छिमार शिष्टमंडळाला दिले.

पुढील आठवड्यापासून मच्छीमारांच्या सर्व विषयांना मार्गी लावण्याच्या हेतूने काम केले जाणार असल्याचे मंत्री महोदयांनी उपस्थित मच्छिमारांना आश्वासन दिले.

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती तर्फे अध्यक्ष श्री. देवेंद्र दामोदर तांडेल, महिला अध्यक्षा श्रीमती नयनाताई पाटील, मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भोईर, सचिव श्री. जयेश तांडेल तसेच मच्छिमार नेते श्री. रवींद्र पांचाळ साहेब आदी उपस्थित होते.

*विशेष आवाहन* *मंगळवार दिनांक १०/१२/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता मच्छिमार जन-आक्रोश मोर्चा**ताडदेव बेलेसिस ब्रीज (मुंबई से...
08/12/2024

*विशेष आवाहन*

*मंगळवार दिनांक १०/१२/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता मच्छिमार जन-आक्रोश मोर्चा*

*ताडदेव बेलेसिस ब्रीज (मुंबई सेंट्रल) ते मनपाच्या डी-वार्ड कार्यालयावर (ग्रँट रोड) धडक मोर्चा*

ताडदेव येथील बेलेसिस ब्रीजच्या नुतनीकरणामुळे शेकडो वर्षापूर्वी पासून मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांवर बृहन्मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांकडून होऊ घातलेल्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी मंगळवार दिनांक १०/१२/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने ताडदेव बेलेसिस ब्रीज ते मनपाच्या डी-वार्ड कार्यालयावर मच्छिमार जन-आक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे.

१३३ वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या ताडदेव आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा बेलासिस ब्रीज आहे आणि ह्याच ब्रीजला लागून आपल्या कोळी भगिनी शकेडो वर्षांपासून मासे विक्री करण्याचा पिढीजात व्यवसाय करीत आले आहेत.

ब्रीज जुना झाला असल्याकारणाने ह्या ब्रिजचे नूतनीकरण करण्याचे नियोजीले आहे. मासे विक्री गाळ्याबरोबर या ब्रीज वर इतर दुकाने सुद्धा होती. महानगर पालिकेने इतर दुकानदारांचे पुनर्वसन करून त्यांची दुकाने तोडली परंतु आपल्या कोळी भगिनींना कसलेच लेखी स्वरुपात पुनर्वसन अथवा नोटीस न देता गाळे तोडण्याची धमकी आणि महिलांचे सौचालाय तोडण्याची अयोग्य आणि अमानवी कारवाई BMC मधील गुजराती परवाना अधिकाऱ्यांने केली आहे.

ह्याच मासळी गाळ्यांच्या मागील बाजूस एक भली मोठी इमारत उभी झाली आहे आणि ह्या इमारतीच्या बिल्डरने BMC च्या जागेत अतिक्रमण करून तिथे गार्डन उभे केले आहे. ह्या अनधिकृत गार्डन च्या विरोधात BMC 'ब्र' सुद्धा काढत नाहीत, ही मराठी माणसांसाठी मोठी शोकांतिका आहे. ह्या गार्डनच्या ताबा BMC ने घेऊन, ह्या जागेत आपल्या भगिनींचे पुनर्वसन करावे.

खालील मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि मच्छिमारांच्या एकीची शक्ती दाखवून देण्यासाठी सर्व मच्छिमार संघटना, सर्व मच्छिमार कोळी बांधव आणि भगिनींना ह्या मच्छिमार जन-आक्रोश मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची नम्र विनंती करण्यात येत आहे.

*मागणी १* :- बेलाईस ब्रीज लगत मासळी विक्री करणाऱ्या कोळी महिलांचे पुनर्वसन ताडदेव परिसरात करण्यात यावे.
*मागणी २* :- जो पर्यंत महीलांचे पुनर्वसन होत नाही तो पर्यंत महिलांचे गाळे शाबूत ठेवण्यात यावेत.
*मागणी ३* :- महिलांचे सौचालय तोडणाऱ्या परवाना अधिकारी श्री. राजेश परमार ह्यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
*मागणी ४* :- तोडलेले सौचल्याच्या ठिकाणी पोर्टेबल सौचालाय गाडीची व्यवस्था करण्यात यावी.
*मागणी ५* :- बेलाईसीस ब्रीज च्या बाजूला बांधण्यात आलेली 'द ग्रेट इस्टेट रॉयल' गृह निर्माण संस्थेने महानगर पालिकेच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करून तिथे उभे केलेले बेकायदेशीर गार्डन तोडून ती जागा ताब्यात घेण्यात यावी.

*आपला नम्र*
*संजय कोळी*
*सरचिटणीस :- अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती*

*महायुती सरकारकडून आर्थिक आधार देण्याकरिता "लाडकी बहीण" योजना राबविण्यात आली आहे परंतु ज्या महिला पाच दशकांपासून आपला उद...
29/11/2024

*महायुती सरकारकडून आर्थिक आधार देण्याकरिता "लाडकी बहीण" योजना राबविण्यात आली आहे परंतु ज्या महिला पाच दशकांपासून आपला उदरनिर्वाह सक्षम पद्धतीने राबवित आले आहेत त्यांना प्रशासनाकडून "सावत्र बहीण" म्हणून दुजाभाव मिळत असून*

*सदर मंडई मधील इतर दुकानदारांना महानगर पालिकेकडून नोटीस बजाविण्यात आल्या आहेत तसेच त्यांचे पुनर्वसन करण्याचे लेखी पत्र सुद्धा देण्यात आले आहेत परंतु दुर्दैवाने कोळी भगिनींना कुठल्याच नोटीस अथवा पुनर्वसन संदर्भातील लेखी पत्र दिले नाही त्यामुळे ह्या कोळी महिलांचे भविष्य अंधारात आले असल्याची माहिती अखिल महारष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल साहेब ह्यांनी दिली.*

Address

Machhimar Bhavan
Mumbai
400005

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती:

Share