04/01/2025
आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था सेंट्रल विभाग आयोजित जय स्तंभ अभिवादन मोहीम यशस्वी झाली, विभागातील अनेक संघटक ह्यांनी ह्यात सहभाग दर्शविला आणि स्वाभिमानाची ज्योत अभिमानाने तेवत ठेवण्यासाठी नवीन वर्षाची सर्वात अभिवादन करून केली, मुंबई ते कोरेगाव - भीमा येथे अभिवादन, पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि विर गोविंद महार ह्यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी वढू - बुद्रुक आणि त्यानंतर ऐतिहासिक बुद्धविहार धम्मभुमी - देहूरोड ह्या ठिकाणी भेट देत पुन्हा मुंबई असा प्रवास आगी नियोजनबध्द पद्धतीने करून आम्ही माघारी आलो,
पेशव्यांनी सर्वाधिक छळ ब्राह्मण महिलांचा केला, त्या छळाचे या ठिकाणी वर्णन करणे देखील उचित ठरणार नाही. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, महिलांचा सन्मान करणाऱ्या शासन व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम पेशव्यांनी केले, त्यामुळेच ५०० शूरवीर मावळ्यांनी २८ हजार पेशव्यांचा कोरेगाव भीमा येथे पराभव केला. कोरेगाव - भीमा हा विजयस्तंभ जुलमी पेशवाईचा केलेल्या पराभवाचे आणि शूरवीर मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. हा विजयस्तंभ म्हणजे जुलमी पेशवाई विरोधात मारलेली पाचर आहे. त्या स्तंभाचा आदर,सन्मान व रक्षण करणे ही सर्व मावळ्यांची नैतिक जबाबदारी आहे.
एवढे मात्र नक्की की शिवरायांच्या मावळ्यांचे ५०० वंशज जुलमी पेशवाईविरुद्ध खांद्याला खांदा लावून १ जानेवारी १८१८ रोजी लढले व शिवस्वराज्याची वाताहात लावणाऱ्या पेशव्यांना धडा शिकवला, हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे शौर्य आहे,
जयभीम.....