शिवअस्मिता सामाजिक संस्था

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिवअस्मिता सामाजिक संस्था

शिवअस्मिता सामाजिक संस्था ❝।। मराठा तितुका मेळवावा।महाराष्ट्रधर्म वाढवावा ।।❞

शिवरायांचा राज्याभिषेक हा केवळ एखाद्या दिनाचा उत्सव नाही...ही एक प्रेरणा आहे!🙏🏼🚩दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या काही म...
09/06/2025

शिवरायांचा राज्याभिषेक हा केवळ एखाद्या दिनाचा उत्सव नाही...
ही एक प्रेरणा आहे!🙏🏼🚩

दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या काही माणसांसोबत राजमाचीवर जाऊन साजरा केलेला...

शिवअस्मिता सामाजिक संस्था आयोजित,
"श्री शिवराज्याभिषेक सोहळा २०२५" 🙏🏼🚩

Address

शिवअस्मिता सामाजिक संस्था
Mumbai
401203

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवअस्मिता सामाजिक संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवअस्मिता सामाजिक संस्था:

Share

शिवअस्मिता सामाजिक संस्था

।। मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्रधर्म वाढवावा ।।

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत, रानावनांत भक्कम असे वाढलेले एक कल्पवृक्ष ; ज्याच्या पोलादी मुळांनी अवघ्या दिल्लीच्या तख्तालाही हादरा दिला, ज्या कल्पवृक्षाने आपल्या भव्यदिव्य कार्याने महाराष्ट्रभूमी पावन केली, लाखो स्वकीयांचे उध्वस्त झालेले संसार या कल्पवृक्षाच्या छायेने बहरून आले. परकियांच्या जाचाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद या 'लोककल्याणी' राजाने आपल्या रयतेला दिली. "आपली रयत हेच आपले दैवत" हे तत्व अखंड मनाशी बाळगून श्री शिवप्रभूंनी एका 'लोककल्याणी स्वराज्याचा' पायंडा घातला.

शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्मले व आभाळाएवढे कार्य करून या पवित्र मातीतच काळाच्या पडद्याआड गेले. याचा तुम्हा-आम्हाला सार्थ अभिमान आहे. गेली ४०० वर्षे या राजाविषयी अनेक शिवप्रेमींनी विपुल कार्य केले आहे. तरीही हा विषय अजूनही अनेकांना स्फूर्ती देतच आहे. श्री शिवछत्रपती हे लाखो-करोडो स्वकीयांचे श्रद्धास्थान आहेत. या श्रद्धेविषयी बोलायचे झाले तर असे की मनुष्य हा स्वभावत:च श्रद्धावान असतो. कशावर तरी, कुणावर तरी त्याची भक्ती, श्रद्धा असतेच. अगदी नास्तिक माणूसही एखाद्या नास्तिक पंथाच्या तत्वज्ञानावर अगदी आस्तिक माणसाच्या देवावरच्या श्रद्धे इतकीच श्रद्धा ठेवतो.

महाराष्ट्रातील लोकांची शिवरायांविषयीची श्रद्धा हे महाराष्ट्राचे एक बलस्थान आहे. परंतु या बलस्थानाचा चुकीच्या मार्गाने वापर होऊ नये, शिवरायांच्या ऐतिहासिक वारशाला तडा जाऊ नये तसेच शिवरायांचे महाराष्ट्रातील पावित्र्य व त्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या करोडो स्वकीयांच्या मनाच्या आदरार्थ "शिवअस्मिता सामाजिक संस्थेची" संकल्पना अंमलात आणली गेली.