15/10/2024
वाचन प्रेरणा दिन
१५ आँक्टोबर
*वाचनप्रेरणा दिन*
डाँ एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतीदिन,
वाचाल तर वाचाल,
पुस्तकांसारखा गुरु नाही.
पुस्तकांसारखा मित्र नाही.
असे वाचनासंबधी कितीतरी सुविचार आपण वाचतो आणि सोडून देतो.
"वाचन" हि आपल्या माणुसपणाची खुण आहे. आपल्या संवेदनशीलतेची खुण आहे.
शालेय पाठ्यपुस्तकातलं वाचन तर होतचं, खुपवेळा ते सक्तीचही असतं, त्यापलीकडे जावूनही वाचन व्हायला हवं, तेच वाचन दिशादर्शक ठरतं.
आज सोशल मिडियामुळे माणसाचं वाचन वाढलयं, फेसबुक, ट्विटर, व्हाटसअप या माध्यमातून खुप लोक खुप काही वाचत आहेत असं एक आभासी चित्र निर्माण होत आहे. हा काळाचा महिमा असला तरी सोशल मिडियावरच वाचन हे जंकफुड सारखं आहे. भुक भागल्यासारखी वाटते, पण सकसपणा नसतोच.
त्यासाठी छापील,पुस्तकांना पर्याय नाही.
मी मुंबईला आलो त्या काळात ट्रेनमधून माझ्या डब्यात एखादा सहप्रवासी वाचताना दिसायचा. आता अशी दृष्य दुर्मिळ होत चाललेत. कधी कधी सकाळच्या ट्रेनमध्ये एखादा धार्मिक पोथीची, मिनी आवृती किंवा अभ्यासाचं काही वाचताना दिसतो. तेवढचं.
असं म्हटलं जातं कि,
पुस्तक नसलेलं घर म्हणजे
खिडकी नसलेलं घर, अशी खिडकी नसलेली घरे वाढलेत. आणि तसं असण्याचं कोणाला काही वाटेनासं झालयं.
अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पण सोशल मिडियावरील शेंडाबुडखा नसलेल्या पोस्टवरनं आपली मत बनवणाऱ्यांनी पुस्तकं वाचून आपली मतं बदलल्याची उदाहरणे विरळा झालीत.
आज गांधी/नेहरुबद्दल विखारी प्रचाराला बळी पडणारे, प्रत्यक्ष नेहरु-गांधी म्हणालेत हे समजून घेत नाहीत.
"मी नथुराम गोडसे बोलतोय" नावाच्या एकाकी अनैताहासिक प्रचाराला बळी पडलेले "नथुरामायण" नावाचं यातला फोलपणा उघड करणारं पुस्तक आहे हेही माहिती नसती.
पूर्वी लोकांचे आवडते लेखक, आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे असायचे. त्याव्यतिरीक्त विविधता बघणार कोण?
वपु काळे, वि स खांडेकर, गदिमाडगुळकर,
व्यकटेश माडगुळकर
शंकर पाटील
श्री ना पेंडसे
राजन खान
राजन गवस
अनिल अवचट
रत्नाकर मतकरी
शिरीष कणेकर
अच्युत गोडबोले
हि यादी वाढत जाईल,
पण आज अगदी सोशल मिडियावरही काही लोक खुप छान लिहतात,
तेही वाचल जायला हवच ना.
वाचन हि केवळ टाईमपास म्हणून उरकण्याची गोष्ट नाही.
जसं सहल, जेवण, पार्टी यासाठी आपण खास वेळ काढतो, तसा वेळ काढून वाचनाला भेटून बघा,
वाचन तुम्हाला अजूनच समृद्ध करेल.
अन्न, वस्र, निवारा या जगण्यासाठीच्या मुलभुत गरजा आहेत,
पण माणुस म्हणुन
सभ्यपणाकडे, माणुसपणाकडे, विवेकशील बनण्यासाठी,
जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी "वाचन" आवश्यक गोष्ट आहे.
वाचनाची सुरवात करायला कोणतं वय, किंवा शैक्षणिक पात्रता असण्याची गरज नाही, तुम्ही सुरवात तर करा,
आजच्या दिवसासारखा चांगला दिवस असू शकत नाही.
वाचनालय, पुस्तकांची दुकाने, खुप सारी पुस्तकं तुमची वाट पाहतायत, गरज आहे तुम्ही थोडा वेळ काढून त्यांना भेटण्याची,
पुस्तकांबरोबरचा माझा वेळ मला कधीच कंटाळवाणा झालेला नाही, उलट काहीतरी नवीन अनुभवच देणारा ठरला आहे.
हा वाचनानंद आपणा सर्वांना मिळो,
या वाचनप्रेरणा दिनानिमित्त मनपूर्वक सदिच्छा !
💐💐💐
✍ संदेश शंकर बालगुडे
१५/१०/२०१९