11/03/2026
सोलापूर येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत हजारो हिंदूंचा श्रीराम राज्यासाठी कटीबद्ध होण्याचा निर्धार !_*
हिंदूंनो, धर्मरक्षणार्थ कृती करण्याचा निर्धार करा ! - लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा
सोलापूर - आयुष्यात कितीही पुण्यकर्म केले; परंतु अधर्माचा प्रतिकार केला नाही, तर पुण्याचा क्षय होतो. अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचे माध्यम आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत हेच मार्गदर्शन अर्जुनाला केले होते आणि कलियुगातही भगवंताचे हेच मार्गदर्शन हिंदूंसाठी मार्गदर्शक आहे. आताच्या काळातही हिंदूंसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. जागतिक पातळीपासून आता सर्वत्र युद्धजन्य स्थिती आहे. त्यामुळे हिंदूंनी धर्मरक्षणार्थ कृती करणे हाच उपाय आहे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा यांनी केले. ते सोलापूर येथे ११ मार्च या दिवशी जयभवानी प्रशालेच्या मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.
स्वत:चे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! - सद्गुरु स्वाती खाडये
रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना इस्रालय-पॅलेस्टाईन, इराण-अमेरिका यांच्यातील भयानक संघर्ष चालू झाला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातही सतत सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे. या सर्वांचे चटके गॅस सिलेंडर दरवाढ, तसेच अन्य मार्गांनी आपल्यापर्यंत पोचले आहेत. येणारा काळ तिसर्या महायुद्धाकडे जाणारा आहे. त्यामुळे पुढील काळात आपल्याला कोणतेही तंत्रज्ञान नाही, तर साधनेचे बळच उपयोगी पडणार आहे. त्यामुळ स्वत:चे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.