Aabha Parivartanvadi Sanstha

Aabha Parivartanvadi Sanstha आभा ही परिवर्तनवादी विचार करणाऱ्या संवेदनशील तरुणांची संस्था आहे.

आभा परिवर्तनवादी संस्था ही परिवर्तनवादी विचार करणाऱ्या संवेदनशील तरुणांची संस्था आहे. 2013 पासुन आजतागायत संस्थेने विविध क्षेत्रात सामाजिक योगदान दिले आहे. जस जसे वर्ष सरत गेली तस तसे आभाने कार्यक्षेत्र अधिक निश्चित करण्यास सुरुवात केली.

सध्या संस्था 5 महत्वाचे उपक्रम राबवितेते खलील प्रमाणे आहेत.
1. खारीचा वाटा : या उपक्रमाच्या माध्यमातून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पोलादपूर, खेड आणि महाड ता

लुक्यातील शाळांमधील गरजु आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. सोबत वर्षभर विविध विषयांवर मार्गदर्शन सत्र आयोजित केले जातात. मागील 2017,18,19, 21 आणि 22 या वर्षांत 2455 विद्यार्थ्यांना मदत पोहचवण्यात संस्था यशस्वी झाली आहे.

2. जागर संविधानाचा : या उपक्रमांत मागील 7 वर्षांपासून ते आजतागायत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त शाळांमधुन स्पर्धांच्या माध्यमातून संविधानाचा प्रचार प्रसार आणि जागृती करण्याचे काम केले जाते. आता पर्यंत 7500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे.

3. Project Lantern : या उपक्रमाच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे पेपर लिहिण्यासाठी लेखक (scribe) पुरवण्याचे काम संस्था करीत आहे. मागील मार्च 2019 पासून आतापर्यंत 483 पेक्षा जास्त अंध विद्यार्थीना याचा लाभ झाला आहे.

4. संकल्प अवयवदानाचा : आपल्या देशातील अवयवदानाची गरज लक्षात घेता; यावर प्रबोधन होणे गरजेचे आहे. तरी संस्था शासनाच्या ROTTO आणि SOTTO या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदाना बद्दल मार्गदर्शन करीत असते सोबत नोंदणीचे फॉर्म भरून घेत असते. आतापर्यंत 112 जागरूक नागरिकांनी संस्थेमार्फत यासाठी नोंदणी केली आहे.

5. Covid-19 Pandemic : कोविड महामारीच्या काळात सर्व समाजघटकांना नानाप्रकारच्या समस्यांना सामोरेजावे लागले; यात हातावरचे पोट असणाऱ्यालोकांचे प्रचंड हाल झाले. या भयंकर काळात आभा शक्य तितक्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आभाच्या माध्यमातून या कालखंडात २५० पेक्षा जास्त कुटुंबांना आणि १०० तृतीयपंथींना महिना - दोन महिने पुरतील अश्या जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करून दिले. पहिल्या lockdown च्या काळात वस्तूंचा प्रचंड तुटवडा झाला होता. त्या काळात १००० पेक्षा जास्त सॅनिटरी पॅड्सचे वाटप वरळी परिसरात करण्यात आले. वरळी प्रभादेवी दादर या परिसरातील फुटपाथ वर राहणाऱ्या लोकांना सलग ५१ दिवस दुपारचे पोटभर जेवण उपलब्ध करून दिले. या उपक्रमात ९८५० लोकांना दुपारचे जेवण उपलब्ध करून देण्यात आले. (या उपक्रमाचे जेवण खाना चाहिये या संस्थेच्या माध्यमातून मिळत होते.)

6. पर्यावरण गणपती : हा उपक्रम पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यास लोकांना प्रोत्साहित करीत असतो. या उपक्रमांतर्गत 150 जास्त भाविकांनी पर्यावरण पूरक गणपतीचा पुरस्कार केला आहे.

सोबतच संस्था कालानुरूप येणारी कामे नेहमीच करीत असते.जसे की कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांना मदत, दर आठवड्याला बीच क्लीन अप ची मोहीम, कोविडमुळे झालेल्या lockdown मध्ये गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप अशी महत्वाची आणि गरजेची कामे सातत्याने चालु असतात.

आगामी काळात ग्रामीण भागातील कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. ज्यात शैक्षणिक सोबत विविध स्वयंरोजगाराचे इत्यंभूत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाईल. सोबत जगार संविधानाचा आणि संकल्प अवयावदानाचा या उपक्रमांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, ऑनलाईन माध्यमातून प्रबोधन सोबत कार्यक्रम आयोजित करण्यावर भर असेल. पुढील काळात Project Lantern या उपक्रमाचा आवाका वाढविण्यावर भर असेल. सोबत कालानुरूप येणारी इतर कामे सुद्धा संस्था करीत राहील.

20/04/2026

पाच सहा किलोमीटरचा काट्याकुट्यांनी भरलेला रस्ता तुडवत, रखरखत्या उन्हातून, मुसळधार पावसातून वाट काढीत. शाळेपर्यंत पोहोचणारी ही लेकरं. खडतर परिस्थिती साठी शारीरिक दृष्ट्या स्वतःला तयार करतात. पण जेव्हा आर्थिक अडचणी येतात तेव्हा शिक्षणाची गोळाबेरीच चुकते. या रानफुलांच्या धडपडीला आणि जिद्दीदा आभा परिवर्तनवादी संस्था मागील 9 वर्षापासून साथ देत आहे.

अभ्यासासोबत कलेत, खेळात, वक्तृत्वात अशा अनेक गोष्टींमध्ये निपुण असणारे विद्यार्थी. यांना पाठीवर दप्तर हवय; जे त्यांच्या स्वप्नांना बळ देईल. एक समान संधी हवी आहे; ज्याने त्याचं भविष्य घडेल.

तुम्ही सुद्धा यात तुमचं योगदान देऊ शकता. आपली एक छोटीशी मदत एक विद्यार्थ्यांचे वर्षाचे शिक्षण पूर्ण करू शकते.

तुम्हाला जमेल तसं योगदान द्या. आपण शिक्षणाचा खर्च उचलूयात पोटाचा प्रश्न आपोआप सुटेल. 3000 विद्यार्थी तुमच्या मदतीची वाट पाहत आहेत.

AABHA PARIVARTANVADI SANSTHA
Account number: 10193511226
IFSC: IDFB0040154
Bank name: IDFC FIRST
Branch: PRABHADEVI-CNERGY BRANCH

10/04/2026

"Our greatest glory is not in never falling, but in rising every time we fall."

Since 2017, Kharicha Vata has been a bridge between kindness and education.With your support, we are lighting the path o...
09/04/2026

Since 2017, Kharicha Vata has been a bridge between kindness and education.
With your support, we are lighting the path of learning for rural and underprivileged children.

📚 What We Do
We provide complete school kits to students who need them the most.

✨ Our Impact So Far
🎒 5000+ Students Supported
🏫 19+ Schools Covered
📍 4 Districts Reached

🎯 Our Goal for This Year
👉 Support 3000+ Students
💰 Cost of 1 School Kit: ₹700

Your one contribution = One child’s educational support for the year.
❤️ Be Someone’s Reason to Learn
Even a small step from you can become a giant leap for a child.

📜 Tax Benefit Available
Donations are eligible under 80G
👉 Donate Now & Become a Part of Change

05/04/2026

नक्की या!!! 🙏🏼😊
आभा परिवर्तनवादी संस्था, आयोजित कौतुक सोहळा.
स्थळ: तिसरा मजला, पु. ल. देशपांडे कलादालन, प्रभादेवी.
रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता.

03/04/2026

कौतुक सोहळा 2026

02/04/2026

LATE POST
मराठी भाषेची अभिवृद्धी करण्यासाठी आता सर्व मराठी भाषिकांना कृतीशील कार्यक्रम राबवणे निकडीचे झाले आहे. यासाठी मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे, लोकांमध्ये वाचनाची आवड समृद्ध होणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे भाषा वृद्धीवर आपण जास्तीत जास्त लक्ष दिला पाहिजे. मराठी शब्दकोशात जास्तीत जास्त भर कशी पडेल. इतर भाषांतील शब्दांना पर्यायी मराठी शब्द आपण सचुवले पाहिजे. सर्व कट्टरवाद्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि भाषा मेली तर विचार मरतील म्हणून भाषेला जगवा....

01/04/2026

LATE POST
आज मराठी भाषा दिनावरून महाराष्ट्रात फार मोठे राजकारण चालू आहे. याची कल्पना आपण सर्वांनाच आहे. कुसुमाग्रजांच्या ऐवजी अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व योग्य आहे. अशी विचारधारा एका बाजूला आणि कुसुमाग्रज कसे श्रेष्ठ आहेत हा सांगणारा वर्ग दुसऱ्या बाजूला. स्वभाषेतीत स्वभाषीकांचा हा शीतयुद्धाचा प्रकार नंदनीय आहे. या दोघांही विरोध नाही. दोघेही स्वत:च्या जागेवर श्रेष्ठ आहेत. दोघांचा लिहिण्याचा रंग ढंग वेगळा होता त्यामुळे तूलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या दोघांचेलेखन कौशल्य पाहून, प्रेरित होऊन हजारो जणांनी हातात लेखणी घेतली आहे पण मग मराठी भाषा दिनाचे निकष कोण व कसे ठरवणार ? ते ठरवताना किंवा एखादा नाव विचारात घेताना सध्याच्या राजकारण्यांना आद्यकवी मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ अथवा संत तुकाराम यांचा विसर पडावा हे लज्जास्पद वाटते. मराठी भाषेचा विकास हा फक्त २० व्या शतकात झाला नाही. त्याला जवळपास बाराशे वर्षांची परं

07/03/2026

संतांपासून ते हल्लीच्या कवींनी मराठी भाषा जपली आणि ती वाढवली...
तुकोबारायांच्या ओव्या इंद्रायणीत विसर्जित केल्यानंतर मौखिक स्वरूपात त्या समस्त मराठी जणांच्या वाणीत रेंगाळत होत्या. त्यानंतर त्या संग्रहित केल्या गेल्या असाव्यात. कवी, तत्वज्ञ, भाषाकार अशा विविध पैलुंतून आपल्याला संत तुकाराम पाहायला मिळतात. त्यांनी मराठी भाषा वाढवली. ति जनसामान्यांपर्यंत पोहचवली. मराठी जणांसाठी पर्यायाने बहुजनांसाठी केलीली बंडखोरी ही मराठी भाषेच्या माध्यमातनू केली. अशा किती संतांचे दाखले आपण द्यायचे? ज्यांनी साधनांचे दुर्भिक्ष असताना सुद्धा मराठी भाषेचा विकास साधला.
हल्लीच्या आधुनिक महाराष्ट्रातील कवींचा आपण अभ्यास केला तरी आपली मान ताठ होईल. वि.स. खांडेकर, विंदा. करंदीकर, कुसुमाग्रज आणि भालचंद्र नेमाड्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन शासनाने मराठी भाषेची दखल घेतली. सोबतच बहिणाबाई चौधरी, गोविंदाग्रज, मर्ढेकर, बालकवी, सुरेश भट, ग. दि. माडगळुकर, शांता शेळके, केशव कुमार ते अगदी दि. पु. चित्रे, मंगेश पाडगावकर, संदीप खरे, गरुु ठाकूर पर्यंत या सर्वांनी मराठी भाषेचा गोडवा सर्वदूर पसरवला, भाषेची अभिवृद्धी केली. अण्णा भाऊ साठे, नामदेव ढसाळ यांसारख्या बंडखोर लेखक-कवींनी देखील यामध्ये मोलाचे योगदान दिले. अण्णा भाऊसाठेंनी अतिशय खडतर परिस्थितीत जीवन कंठीत स्वत:ला चळवळीत झोकून दिले आणण स्वत:च्या लेखणीला चळवळीच्या तलवारीची कानस बनवली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात मराठी साहित्याचा किंबहुना मराठी भाषेचा सिंहाचा वाटा होता.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aabha Parivartanvadi Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share