Dhadak Kamgar Union - INDIA

Dhadak Kamgar Union - INDIA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhadak Kamgar Union - INDIA, Non-Governmental Organization (NGO), Abhijeet Rane’s Office Add-Aarey Milk Colony, Unit No. 2, godown 03, Bhandar Karyalay, Near Sankraman Studio, Opp Maharashtra Krushi Udyog Bhavan, Near Western Express Highway, Goregaon (E), Mumbai Te, Mumbai.
(2)

13/06/2026

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची ऑफर दिल्यानंतर तृणमूलमध्ये गोंधळ...
13/06/2026

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची ऑफर दिल्यानंतर तृणमूलमध्ये गोंधळ वाढला आहे. सकाळी बातमी आली की विलीनीकरणाऐवजी निवडणुका एकत्र लढवण्यावर सहमती होऊ शकते. पण खासदार कल्याण बॅनर्जींनी ममता बाईंना अभिषेक वा स्वतः यांच्यात निवड करण्याचा पेच टाकला, ज्यामुळे आमदार-खासदार फुटण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच राज्यसभेतील खासदार कोयल मल्लिक यांनी राजीनामा दिला. या घटनांमुळे पुन्हा विलीनीकरणाच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसलाही अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. पुढची विकेट शिवसेना असू शकते. या सगळ्या हालचालींमुळे राज्यस्तरीय पक्षांचे अस्तित्व कमी होत जाऊन अखेरीस दोनच प्रबळ राष्ट्रीय पक्ष उरणार ही थिअरी आता वास्तवात उतरत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अभिजीत दीपके ने त्याच्या कॉक्रोच जन्ता पार्टीचे एक आंदोलन आज सावित्रीबाई फुले विश्व विद्यालय,पुणे येथे संध्याकाळी चार वाजता आयोजित केले होते.कारण पुणेकर 1 ते 4 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम असला तरीही दुपारची झोप सोडून जात नाहीत हे त्याला माहिती होते. या आंदोलनाला जंतरमंतर,दिल्ली येथे झालेल्या आंदोलनापेक्षा मोठा प्रतिसाद मिळेल असे त्याने एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. प्रत्यक्षात आज चार वाजल्यापासून आता रात्री दहा वाजले तरी कुठेही या आंदोलना विषयी अवाक्षर सुद्धा निदान मी तरी ऐकले, वाचले, पाहिले नाही.म्हणजे त्याचे आंदोलन साफच बोंबललेले दिसते.पुणेकरांनी साफ चिरडूनच टाकलेले दिसते,दीपकेच्या झुरळाला.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
ठाण्यातील घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणूसच असुरक्षित आहे. वयोवृद्ध काकांना फक्त “इथे घाण करू नको” म्हटल्यावर यूपीच्या ड्रायव्हरने मारहाण केली, आणि व्हिडिओ करणारे लोक मदतीला धावले नाहीत. पुणे-ठाण्यात बाहेरून आलेल्या लोकांची संख्या वाढल्याने गेटेड सोसायटीत मराठी विरुद्ध हिंदी असे गट पडू लागले आहेत. मराठी सणांना विरोध करून हिंदी पद्धतीने साजरे करण्याचा हट्ट केला जातो, पण मराठी बांधवांनी स्वतःचे पैसे काढून शिवजयंती साजरी करून प्रत्युत्तर दिलं. मनसे-शिवसेना स्थानिकांचा आवाज उठवतात, आणि ठाण्यातील घटनेतही राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल झाला. मराठी माणूस बाहेर गेला तर तिथली भाषा शिकतो, पण महाराष्ट्रात हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो. यापुढे प्रत्येक मराठीने हा दबाव हाणून पाडला पाहिजे.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
पुरंदर विमानतळाचा विरोध हा सरकारने भरघोस मोबदला दिल्यावर मावळला. शक्तीपीठ महामार्गाचे सुद्धा हेच होणार आहे .ज्या दिवशी सरकार जमिनीचे योग्य भाव घोषीत करेल त्यादिवशी शेतकरी दणादण सह्या करतील. समृद्धी महामार्ग बनवतानाही असाच विरोध झाला होता त्यानंतर रांगा लावून शेतकऱ्यांनी सह्या केल्या आणि २४ तासांत बँक खात्यात पैसे आले. शेतकऱ्यांचा विरोध हा जमिनीच्या योग्य दरासाठी असतो जेणेकरून तो दुसरीकडे शेती घेऊ शकेल.किंवा त्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळेल. तसेच काही अपवादात्मक केसेसही असतात ज्यांना या महामार्गामुळे संकटांचा सामना करावा लागू शकतो. पण त्यामुळे मराठवाड्याची भाग्यरेषा बदलणारा मार्ग जो इथल्या शेतकऱ्यांना गोव्यापर्यंत बाजारपेठ मिळवून देणार आहे तो रद्दच करू नये.या महामार्गामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे. छोटी मोठी जवळपास सगळीच पर्यटनस्थळे यामुळे जोडली जाणार आहेत. याआधीच कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या महामार्गाची अलाईनमेंट बदलण्यात आली आहे.आता पुन्हा बदलून या प्रकल्पाची किंमत वाढवली जाऊ नये.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
आपण समाजातील काही विशिष्ट जात समूहांना वाईट वागणूक मिळाली होती हे सर्वमान्य करून घेतले आहे. पण असं काहीतरी घडलं होतं आणि आता ते परत होऊ नये म्हणून आपण १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर ज्या काही सामाजिक व सरकारी स्तरावर वेगवेगळ्या गोष्टी करतो आहोत त्या सगळ्यांचा उद्देश अशा मागे राहिलेल्यांचे सामाजिक उत्थान हे आहे. यावर मात्र कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून कुप्रसिद्ध पावलेल्या सेजल पवार नावाच्या मुंबईच्या केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर बद्दल बाहेर आलेल्या माहितीनुसार असे कळते आहे की ती सरकारदृष्ट्या अनुसूचित जमाती गटात मोडते. आता मला सांगा मुंबईच्या 'उच्चभ्रू' वर्गातील लोक जात असलेल्या कार्यक्रमात अगदी पहिल्या रांगेत बसण्याचे ज्या व्यक्तीला जमते त्याला सामाजिक उत्थानासाठी सरकारी मदतीची गरज आहे का? अशा पहिल्याच रांगेत बसणाऱ्या व्यक्तीकडे जर सामाजिक भान नसेल तर यांना मिळणाऱ्या सवलतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे संयुक्तिक नव्हे का?
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽

















https://livemumbaimitra.com/?p=85946📰 *MUMBAI MITRA EXPOSE*-------◆ *रॉयल पाम्समध्ये भीषण पाणीसंकट*◆ ३० हजारांहून अधिक र...
13/06/2026

https://livemumbaimitra.com/?p=85946
📰 *MUMBAI MITRA EXPOSE*
-------
◆ *रॉयल पाम्समध्ये भीषण पाणीसंकट*
◆ ३० हजारांहून अधिक रहिवासी त्रस्त
◆ बीएमसी जलजोडणीअभावी ४० हून अधिक सोसायट्यांतील नागरिकांवर पाण्यासाठी संघर्षाची वेळ
◆ ४० हून अधिक सोसायट्यांतील सुमारे ३० हजार रहिवासी प्रभावित
◆ बोअरवेल कोरड्या पडल्याने पाणीपुरवठ्याचे संकट अधिक गडद
--------
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गोरेगाव पूर्व येथील आरे परिसरातील रॉयल पाम्स इस्टेटमध्ये पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, 40 हून अधिक गृहनिर्माण संस्थांमधील सुमारे 30 हजार रहिवाशांना मूलभूत गरजांसाठीही पाण्याची वणवण करावी लागत आहे.
अनेक वर्षांपासून बीएमसीच्या नियमित जलजोडणीपासून वंचित असलेल्या या परिसरातील नागरिकांना आता भीषण पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे.
रॉयल पाम्समधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेले पर्यायी स्रोतही अपुरे पडत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक बोअरवेल कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याच्या कॅनवर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. मात्र वाढत्या मागणीमुळे या कॅनची उपलब्धताही मर्यादित झाली आहे.
परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की अनेक कुटुंबांनी पाण्याचा वापर अत्यंत मर्यादित केला आहे. कपडे धुणे, वाहन स्वच्छता, घरगुती साफसफाई यांसारखी कामे पुढे ढकलली जात असून स्वयंपाक आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून घेणे हेच मोठे आव्हान ठरत आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी उन्हाळ्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. जलजोडणीसाठी
अनेक वेळा पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पाणीटंचाईमुळे अनेक कुटुंबांच्या मासिक खर्चात मोठी वाढ झाली असून पिण्याचे पाणी आणि इतर गरजांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. काही कुटुंबांनी मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तात्पुरते नातेवाईकांकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, या प्रश्नाकडे शासन आणि महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन रॉयल पाम्स परिसराला नियमित व कायमस्वरूपी जलपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. इतक्या मोठ्या लोकवस्तीला आजही मूलभूत पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत असल्याने हा प्रश्न केवळ स्थानिक समस्या नसून नागरी सुविधांच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे.

विकासपुरुष केंद्रीय वाणिज्य मंत्री, खासदार-उत्तर मुंबई  मा. श्री. पियुषजी गोयल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा-अभिजी...
13/06/2026

विकासपुरुष केंद्रीय वाणिज्य मंत्री, खासदार-उत्तर मुंबई मा. श्री. पियुषजी गोयल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
-अभिजीत राणे
मुंबई अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन

🖋️ *From The Desk of Abhijeet Rane*The Verul teacher assault case is a shocking example of police negligence. Video evid...
13/06/2026

🖋️ *From The Desk of Abhijeet Rane*
The Verul teacher assault case is a shocking example of police negligence. Video evidence clearly shows a girl pointing out the attacker as “number one,” a man already accused in a murder case. Yet, disturbingly, another police officer is seen feeding sweets to this same criminal. When culprits are present before police, their records known, and even visuals available, how can the FIR still list them as “unknown”? This exposes blatant collusion and failure of duty. Such manipulation not only shields criminals but also erodes public trust in law enforcement. Justice demands that cases be filed with names, not excuses. Citizens will not tolerate police pampering goons while victims suffer. Immediate, transparent action is essential—or the people will hold the system accountable themselves.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane*
Rohit Pawar’s drama over loan waiver is like claiming credit for sunrise. The government had already announced that the waiver would take effect after the code of conduct ends on June 25. Yet Pawar staged a hunger strike to say it happened “because of him.” That’s no different from fasting at dawn and then declaring you caused the sun to rise. Such theatrics only expose political opportunism rather than genuine concern for farmers. Loan waiver is a policy decision, not a personal favor. Farmers deserve relief without being dragged into self-promotion stunts. True leadership lies in solving issues, not in claiming credit for inevitable events. Pawar’s act highlights how politics often turns into spectacle, while real change depends on governance, not drama.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane*
Suvendu Adhikari’s move to link madrasa grants with singing the national anthem and song has stirred sharp reactions. The irony is clear—while “Vande Mataram” is avoided, even “Jana Gana Mana” faces resistance, with teachers standing aloof and children learning indifference. This reflects a deeper challenge: when national symbols themselves become contested, governance turns into a tough balancing act. Running a diverse country like India is indeed “a crooked pudding,” as the saying goes. Respect for the anthem and song should unite, not divide, but the reluctance seen in madrasas raises questions about integration and shared identity. Adhikari’s step highlights the tension between cultural assertion and political resistance, reminding us that national unity demands more than rules—it requires genuine acceptance across communities.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane*
The Bopdev Ghat r**e case shows how justice collapses when police fail. The accused were acquitted not because the law is weak, but because the evidence presented was incomplete and unconvincing. Courts can only act on proper proof, and when police investigations lack statements, documentation, or credible material, the law cannot deliver punishment. This exposes the responsibility of the police administration and, ultimately, the Home Ministry. Law is strong and committed to justice, but without solid groundwork it becomes powerless. Such lapses not only deny victims justice but also embolden criminals. Accountability must be fixed at the investigative level, because justice depends on the quality of evidence. A system that fails to protect victims through negligence is itself guilty of betrayal.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane*
Shikha Singh’s story from Delhi shows how unchecked emotions can destroy families. Married in 2020, she fought with her husband and filed a dowry case. Her father spent heavily on the case, fell into poverty, and suffered a heart attack. In that crisis, her husband Saurabh rushed him from a government hospital to Medanta, where he recovered. At court, Shikha tore up divorce papers and embraced her husband. The lesson is clear: control over words and emotions prevents lifelong regret. Respect and patience keep relationships alive, not ego. Saurabh’s humanity and restraint turned bitterness into reconciliation. True victory lies in admitting mistakes and choosing compassion. Relationships survive only when both sides nurture them with understanding, forgiveness, and mutual respect.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामु...
13/06/2026

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे आता तस्तरी वाजणार हे निश्चित आहे. यूपी पोलिसांची तयारी पाहता, या आंदोलनकर्त्यांना कठोर स्वागत मिळणार हे स्पष्ट आहे. चुकीची जागा निवडल्याने त्यांचा सामना उत्तरप्रदेश पोलिसांच्या शिस्तबद्ध आणि कठोर कारवाईशी होणार आहे. योगी सरकारने कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे, त्यामुळे कोणत्याही गोंधळाला येथे जागा नाही. आंदोलनाचा अधिकार लोकशाहीत आहे, पण तो हिंसाचार किंवा अराजकतेत बदलला तर राज्ययंत्रणा कठोरपणे हस्तक्षेप करणारच. यूपी पोलिस २४ तास सज्ज आहेत आणि योगी बाबा स्पष्ट संदेश देत आहेत—राज्याच्या शांततेशी खेळ करणाऱ्यांना येथे मोकळीक नाही. हे आंदोलन आता त्यांच्या स्वतःच्या चुकांची किंमत ठरू शकते.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
एफडीए अधिकाऱ्यांच्या कारवाया केवळ कागदपत्र तपासणीपुरत्या मर्यादित नसतात; त्यांना बनावट औषधांचे कारखाने, ड्रग्ज रॅकेट्स आणि संघटित गुन्हेगारीशी थेट सामना करावा लागतो. अशा वेळी धमक्या, हिंसक प्रतिकार किंवा पुरावे नष्ट करण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र विशेष पोलिस पथकाची साथ असणे ही काळाची गरज आहे. यामुळे अधिकाऱ्यांचे जीवित सुरक्षित राहील, गुन्हेगारांविरुद्ध कारवाई प्रभावी होईल, आरोपी पळून जाण्याची शक्यता कमी होईल आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या माफियांना कठोर आळा बसेल. बनावट औषधे हा केवळ आर्थिक गुन्हा नसून लाखो लोकांच्या जीवाशी खेळणारा गंभीर अपराध आहे. म्हणूनच शासनाने एफडीए अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला तितक्याच ताकदीने प्राधान्य द्यायला हवे.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
केरळातील बेलोरियन ईस्टर्न चर्चवरून तब्बल ७ हजार कोटींचा काळा पैसा जप्त झाला, आणि तो चर्च बिशप जोहाना वाग्यारा यांच्या नावावर चालत होता ही धक्कादायक बाब आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरचा घोटाळा उघडकीस आला तरीही तथाकथित सेक्युलर सोशल मीडियावर शांतता आहे. जर हेच एखाद्या हिंदू मंदिरात घडले असते तर देशभरात गदारोळ झाला असता, चौकशा, आंदोलनं, आणि हिंदू समाजाला दोष देणारे लेख झळकले असते. पण चर्चविषयी मात्र मौन पाळले जाते, ही दुहेरी भूमिका उघड आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा कोणत्याही धर्मसंस्थेत असो, त्यावर समान निकषाने कारवाई व्हायला हवी. अन्यथा न्यायव्यवस्था आणि माध्यमांची विश्वासार्हता प्रश्नांकित ठरेल. समाजाला खरी पारदर्शकता हवी आहे, निवडक संताप नव्हे.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
सध्या भाजपबद्दल थोडं समाधान वाटतंय कारण एफडीआय खात्याने भेसळ रोखण्यासाठी कारवाई सुरू केली आहे, जी आधी कधी झाली नव्हती. हे स्वागतार्ह पाऊल आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये योगी, शर्मा आणि देवेंद्र हे तीन नेते ठोस कामगिरी करत आहेत, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा मजबूत होतेय. मात्र हिंदू प्रश्न आणि शेतकरी समस्यांवर अजून स्पष्ट उत्तर आलेलं नाही, ही खंत आहे. तरीही लवकरच ठोस उपाययोजना जाहीर होतील अशी आशा आहे. शासनाने लोकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिलं तरच विश्वास टिकेल. भाजपने आतापर्यंत दाखवलेली कारवाई योग्य दिशेने आहे, पण पुढील पावलं निर्णायक ठरतील. जनतेला केवळ आश्वासनं नव्हे तर प्रत्यक्ष बदल हवा आहे, आणि तोच पक्षाच्या भविष्यासाठी कसोटी ठरेल.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
नेहरूंच्या तुरुंगवासाबद्दल काँग्रेस आज पोस्ट्स टाकतेय, पण वास्तव वेगळं होतं. अहमदनगर किल्ल्यातील त्यांचा ‘कैद’ हा आरामशीर होता—मोठी कोठडी, स्नानगृह-शौचालय, पलंग-गादी, टेबल-खुर्ची, पंखा, लेखनसाहित्य, रोज आवडीचा नाश्ता-भोजन, स्वतंत्र कूक व नोकर, व्यायामासाठी बॅडमिंटन कोर्ट, पसंतीची वर्तमानपत्रे-नियतकालिके, आणि नातेवाईक-मित्रांना भेटण्याची मुभा. आज अनेकांच्या घरातही या सुविधा नाहीत, मग अशा वास्तव्याला तुरुंगवास म्हणायचा का? इंग्रज सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्या नेहरूंना इंग्रजांनी इतक्या सोयी का दिल्या, हा प्रश्न भारतीयांना पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनांना नाटकाचा रंग होता असा संशय चुकीचा नाही. ब्रिटीशांनी त्यांना राजकीय कैदी म्हणून या सगळ्या सुविधा दिल्या असे समजायचे असेल तर अश्या पद्धतीच्या सुविधा गांधीजी आणि नेहरू वगळता अन्य कुणालाही मिळाल्या नाहीत हे पण विसरून चालणार नाही.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽

12/06/2026









Address

Abhijeet Rane’s Office Add-Aarey Milk Colony, Unit No. 2, Godown 03, Bhandar Karyalay, Near Sankraman Studio, Opp Maharashtra Krushi Udyog Bhavan, Near Western Express Highway, Goregaon (E), Mumbai Te
Mumbai
400065

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhadak Kamgar Union - INDIA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhadak Kamgar Union - INDIA:

Share