Humanity For Future Foundation

Humanity For Future Foundation We are working for future India. we work for Child education

कपाळावर भगवी पट्टी बांधलेला अशोक परमार आणि हात जोडून जीवाची भीक मागणारा कुतूबुध्दीन अंसारी. दोघेही २००२ च्या गुजरात दंगल...
23/02/2026

कपाळावर भगवी पट्टी बांधलेला अशोक परमार आणि हात जोडून जीवाची भीक मागणारा कुतूबुध्दीन अंसारी. दोघेही २००२ च्या गुजरात दंगलीतून जगासमोर आलेले चेहरे..

काळ कितीही कठीण असो, वेळ पुढे सरकतच राहतो. एवढ्या वर्षांनंतर जेव्हा हे दोघे मागे वळून पाहतात, तेव्हा राग नाही, सूड नाही, तर दोघांच्या डोळ्यांत फक्त पाणी दिसतं. दोघंही भेटले की एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडतात.

जीवनाची गोष्ट बघा किती मोठी..
कुतूबुद्दीनने पुस्तक प्रकाशन केले, तर अशोकला मानाने बोलावलं. अशोकने चप्पलचे दुकान टाकलं, तर उद्घाटनाला कुतूबुध्दीनला हक्काने उभं केलं. जखमा खोल होत्या, पण त्यांनी द्वेषाला नाही, तर माणुसकीला धरलं. वाईट आठवणी मागे सोडून, नव्या आयुष्याला कवटाळलं.

आपण मात्र काय शिकतो?

द्वेषाच्या आगीत जळून निघतात ते नेते नाहीत.. भाजून निघतात ते सामान्य लोक. घरं उद्ध्वस्त होतात ती आपली. डोळे पाणावतात ते आपल्या आई-वडिलांचे. नेत्यांची लेकरं परदेशात शिकून सुखात राहतात, आणि आपल्याला मिळतो फक्त राग, भांडणं, आणि तुटलेली नाती.
म्हणून तरुणांनो, एक गोष्ट मनात कोरून ठेवा. धर्म, जात, राजकारण यापेक्षा मोठी असते माणुसकी. द्वेष पेरणाऱ्यांच्या मागे धावत बसू नका. प्रेम, शांतता, आणि समजूत यांची वाट धरा. कारण शेवटी जिंकतं ते राजकारण नाही…
जिंकते ती माणसांची मने. 🙏

Copy paste .... ब्रिटीश फोटो जर्नालिस्ट हॅझेल थॉमसन 2002 मध्ये मुंबईच्या रेड लाईट एरियात आली होती तेव्हा कित्येक रात्री ...
29/05/2025

Copy paste ....
ब्रिटीश फोटो जर्नालिस्ट हॅझेल थॉमसन 2002 मध्ये मुंबईच्या रेड लाईट एरियात आली होती तेव्हा कित्येक रात्री ती झोपू शकली नाही. 2013 मध्ये ती परत तिथेच आली. दरम्यानच्या 11 वर्षात अगदी किंचित फरक झाल्याचे तिला जाणवले. योगायोगाने ती कामाठीपुऱ्याच्या ज्या चौदाव्या लेनमध्ये आली होती तिथल्या एका बिल्डिंगमध्ये ती गेली. त्या कुंटणखाण्याची मालकीण हॅझेलला पुन्हा तिथे आलेली पाहून तडक आतल्या खोलीत निघून गेली. ती संधी साधत आठ फूट उंचीच्या त्या खोलीतील पोटमाळयाकडे गेली. पोटमाळ्याच्या अर्धवट उघड्या दिसणाऱ्या फळीलगत लाकडी तुकडयांची शिडी उभी करुन ठेवली होती. हॅझेलने शिताफीने शिडी त्या माळ्याला लावली. झपाझपा पायऱ्या चढत ती वर गेली. आणि तिला पहिल्यांदा बॉक्स केज (कपाटवजा भिंतीमध्ये बंदिस्त केलेली जागा) दिसली. तिने केजची झडप उघडली तर आत एक तेरा चौदा वर्षाची मुलगी होती. हॅझेलने तिथे येताना भारतीय वेष परिधान करून त्यातल्या ओढणीत कॅमेरा लपवला होता. त्या कॅमेऱ्यानेच तिने त्या मुलीची छबी टिपली. नंतर तिने जेव्हा कधीही हा फोटो पाहिला तेव्हा तिचा जीव कासावीस झाला, कारण फोटोतल्या कुमारीकेचे आर्त, करुण, भावविभोर डोळे! असे वाटते की आता निमिषार्धात त्यातून अश्रू वाहू लागतील...

पूर्वी केवळ दिल्लीच्या जीबी रोडवर, मुंबईच्या कामाठीपुऱ्यात आणि कोलकत्याच्या सोनागाछीत आढळणारे बॉक्स केजेस आता सर्वत्र कॉमन झालेत. काही दिवसापूर्वी आपल्या औरंगाबादमध्ये खबरी मित्रांच्या निरोपाच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या रेडमध्ये देखील या छळपेट्या आढळल्या होत्या. सोनागाछीत तर मुली दिवसा वर कोंडल्या की भिंतीला लाकडी खिळे मारून प्लायवूड पक्के केले जाते, ते अंधार पडल्यावरच खोलले जाते. हा अंधारच त्यांना मोकळा श्वास घेऊन येतो. इतर सर्व वेश्या अंधाराला कंटाळून गेलेल्या असतात आणि या कोवळ्या मुली अंधाराची वाट बघत घुस्मटत जगत असतात. एनजीओंची ताकद नखाएव्हढी आणि समस्या डोंगराएव्हढी असा सगळा कारभार आहे. पोलीस आणि स्कीन करन्सीचे दलाल यांचे इतके मोठे रॅकेट देशभर आहे की त्याला धक्का लागणे देखील कठीण झालेय. मोबाईलने त्यात भर घातलीय. या मुलींची दुःखे आणि त्यांचं जगणं यावर लिहवत नाही. असो ...

त्या मुलीचे फोटो काढून हॅझेल जेव्हा इंग्लंडला परत गेली तेव्हा तिला डिप्रेशन आल्यासारखे झाले होते. जर फोटो काढणारा कासावीस होतो, पाहणाराही त्यांच्या दुःखासाठी व्याकुळ होतो मग त्या तलम पंख छाटलेल्या कोवळ्या फुलपाखरांची काय अवस्था होत असेल ?... फोटोतल्या मुलीशी हॅझेलला बोलता आले नाही ही बाब तिला अस्वस्थ करत होती.

ती तिसऱ्यांदा पुन्हा तिथे गेली. तिने त्या मुलीच्या मालकिणीचे हात ओले केले अन् त्या मुलीशी दुभाषाच्या मदतीने संवाद साधला. नंतर तिची सुटकाही केली. पुढे जाऊन आपल्या अनुभवावर पुस्तक लिहिले. (तिच्या ईबुकची लिंक कमेंटमध्ये आहे.) ....अगतिकता, निराशा, वैफल्य, थकवा, भूक, उदासीनता, परात्मभाव, दुःखवेदनांचे अनेक कढ, हे सगळं या फोटोतल्या मुलीच्या डोळ्यात तरळतंय. तिचं कुस्करलेलं बालपण आणि विदीर्ण झालेलं भविष्य यांची विमनस्कता तिच्या चेहऱ्यावर साफ दिसते... तिला प्रतीक्षा आहे अंधाराची...खोल खोल काळ्या कुट्ट अंधाराची....

म्हणूनच सांजेला घरी असलो की कधी कधी अंधार लवकर व्हावा म्हणून मी प्रार्थना करतो... उजेड असतानाच तुळशीपाशी दिवा लावायचा आग्रह बायकोजवळ धरतो.. ती दिवा लावते तेव्हा अशा मुलींचे डोळे त्या ज्योतीत तरळतात आणि माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावतात....

( हॅझेल थॉमसनने काढलेला 'तो'च फोटो पोस्टसोबत दिला आहे.. या विषयावर लेखन करताना मी आजवरचे फोटो ब्लर्ड करून वा स्त्रियांचे/ मुलींचे चेहरे न दिसतील अशा पद्धतीने दिलेले आहेत पण हा फोटो मलादेखील खूप अस्वस्थ करून गेला आणि विथ परमिशन इथे शेअर केला. कारण, नुसतं सांगून हे अनेकांना तंतोतंत पटलं नसतं. आता या मुलीने संसार थाटलाय, हॅझेलने तिला नवी ओळख दिलीय, स्वावलंबी केलेय आणि स्वाभिमान मिळवून दिलाय. ही पोस्ट आठ वर्षांपूर्वीची आहे, मात्र या व्यवसायातली स्थिती आणि स्वरूप सारेच नव्या रंगात पण जसेच्या तसे आहे)

02/02/2025

२००४ साली गुरुदीक्षा घेऊन सत्संगात जायला सुरवात केली. आम्ही अध्यात्मात नवखे होतो , तसा आमचा गुरूसुद्धा नवखाच होता. म्हणजे हा "गुरु बिजनेस" सुरु करून त्याला चार पाच वर्षेच झाली होती. पण तो नवखा असूनही खूप "चालु" होता. चलाख होता. मॉब सायकोलॉजी कशी मॅनिप्युलेट करायची, ब्रेनवॉश कसा करायचा ह्याचं त्याला उत्तम ज्ञान होतं . अर्थातच ते असल्याशिवाय तुम्हाला कल्ट लीडर होताच येत नाही.

त्याचा "स्टार्टअप" नवानवा असल्याने त्याच्यापाशी जास्त फंड नव्हता. अल्पशा भांडवलातून (तेही देणगीच्या पैश्यातून ) त्याने पुण्याच्या रहाटणीत एक दोनेक एकरच्या प्लॉटमध्ये आपला आश्रम थाटला होता. आश्रमही अगदी मिनिमलिस्ट सुविधायुक्त होता. फक्त एक सत्संग-हॉल अन एक भोजनकक्ष एवढंच. तिथे मुक्काम करण्याची सोय नव्हती. म्हणून मग बाहेरगावाहून आलेल्या साधकांची राहण्याची सोय तिथल्या स्थानिक साधकांच्या घरी किंवा पुण्यात त्यांच्याच संस्थेच्या विविध सेंटर्सवर केली जायची. पण ती सोय अगदीच जेमतेम असायची. फार तोटक्या सुविधांमध्ये अड्जस्ट करावं लागायचं. पण हे सगळं तुम्हाला विनातक्रार स्वीकार करायचं आहे अशी गुरुआज्ञा होती. म्हणजे तुम्ही ज्ञानप्राप्तीसाठी तयार आहात कि नाही हि तुमची परीक्षा आहे असं फ्रेम करून नीट पटवून दिलं जायचं. मग आता तुम्हाला कसंही खायला दिलं , कुठंही झोपायला दिलं , आंघोळीला पाणी गरम असो थंड असो , तुम्ही ते विनातक्रार "स्विकार" करणे अनिवार्य आहे. तुम्ही तक्रार केली म्हणजे तुम्ही कच्चे शिष्य / साधक आहात . मी कच्चा नाही पक्का साधक आहे हे सिद्ध करण्यासाठी मग तुम्ही गु खायलाही तयार होता.

तप , समर्पण , सहिष्णुता , स्वीकारभाव , सहनशीलता ह्या गुणांना धर्मक्षेत्रात आतोनात महत्व दिल्या जातं .

ह्या क्वालिटीज अंगी असतील तर तुम्ही ज्ञानप्राप्तीसाठी तितके अधिक पात्र आहात असा अर्थ होतो. ज्ञानप्राप्तीसाठी तुमची योग्यता आहे कि नाही हे उपरोक्त निकषांच्या आधारावर ठरवलं जातं . एकंदरीत , तुम्ही तुमच्या कंफर्टझोन मधून बाहेर पडायला तयार आहात का हीच तुमची खरी परीक्षा असते. ह्या क्वालिटीजमध्ये तुम्ही कमी पडलात तर तुमच्यात अहंकार भरला आहे असा अर्थ काढला जातो. आणि ज्ञानप्राप्तीत सर्वात मोठी बाधा म्हणजे "अहंकार". ह्या अहंकाराचेही ठळक आणि सूक्ष्म असे प्रकार असतात. वरवर स्पष्ट दिसून येणारा अहंकार स्थूल .. आणि म्हणून ओळखायला सोपा .

सूक्ष्म अहंकार अधिक चॅलेंजिंग मानला जातो. अनेक साधक वरवर अध्यात्मिक ढोंग पांघरून घेतात. वेशभूषा , वर्तन , बोलणं हसणं सात्विकतेने सजवून घेतात . पण सूक्ष्म अहंकार त्यांना लपवता येत नाही. हा सूक्ष्म अहंकार सर्वांना पकडताही येत नाही. तो पकडण्यासाठी खोल अभ्यास असायला हवा.

कोणाची किती अध्यात्मिक प्रगती झाली आहे हे तो किती अहंकाररहित झाला आहे ह्यावरून ठरवलं जातं .

पण गमतीशीर गोष्ट काय आहे माहित्ये का ? मी अहंकारशून्य झालो आहे हे इतरांना दाखवण्याची एक वेगळीच धडपड , एक वेगळीच भूक ह्या साधकांच्या वागण्यात झळकायला लागते. हे त्यांच्या लक्षात येतच नाही.

अर्थातच सगळेच साधक धूर्त अन पाखंडी नसतात. अगदी बोटावर मोजता येईल असे अपवाद असतात जे खरोखरच निरागसतेने प्रामाणिक वाटचाल करीत असतात. भाबडे असतात.

"मी अहंकाररहित होणार" हि इच्छाच मुळात अहंकारातून जन्म घेत असते. हि इच्छाच एक मोठा अहंकार आहे.

आणि ह्यावरच सगळं ढोंग उभं आहे.

वेळोवेळी तुमच्या अहंकाराच्या चाचण्या घेतल्या जातात. ह्या चाचण्या म्हणजे तुमची लिटमस टेस्ट असते.

तुम्ही किती आज्ञाकारी झाला आहात हे चेक केल्या जातं . आज्ञाकारी व्यक्तीकडून काहीही करवून घेता येऊ शकतं . म्हणून आज्ञाकारी व्यक्ती गुरुजनांना प्रिय असतात.

तुम्ही किती आज्ञाकारी आहात अर्थात किती "बैल" आहात ह्यावरून तुमचे अध्यात्मिक मूल्य ठरत असते. आपले मूल्य वाढीव ठरवण्यासाठी तुम्ही "अल्ट्रा प्रो मॅक्स बैल" होता. तुम्हाला वाटते असे होऊन तुम्ही गुरूंच्या.. पर्यायाने देवाच्या गुडबुक्स मध्ये स्थान पटकवाल आणि रिवॉर्ड म्हणून तुम्हाला मोबदल्यात ज्ञान मिळेल मोक्ष मिळेल. निव्वळ सौदेबाजी !

ह्या सौदेबाजीमुळेच माणूस गटारात डुबक्या मारायला तयार होतो. लिंग छाटून घ्यायला तयार होतो. जन्नत मध्ये जागा मिळेल म्हणून आतंकवादी व्हायला तयार होतो. कसाब सारखा मरायला तयार होतो. शेण खायला तयार होतो. स्मशानातले मुडदे उकरून खायला तयार होतो. स्वतःची द्यायलाही तयार होतो.

(आता त्या गुरूंचं पुण्यात 25 एकरात भव्य दिव्य आलिशान आश्रम आहे. ही आहे बैलत्वाची ताकत 😀)

✍️ DrVijay Randive

25/12/2024
08/12/2024
यामुळे दक्षिण भारतातील अभिनेते तेथील लोकांचा जिव की प्राण असतात.  #साउथमोवी
14/11/2024

यामुळे दक्षिण भारतातील अभिनेते तेथील लोकांचा जिव की प्राण असतात.
#साउथमोवी

Address

Mumbai
400076

Telephone

+919766663556

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Humanity For Future Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share