02/04/2026
दिवस आठवा - निरोपाच्या क्षणी
जिथे स्वतःपण, आपुलकी आणि आपली माणसं सापडतात,
तिथून निघणं खरंच कठीण असतं… नाही का?
आज ४१ व्या शिबिराचा अखेरचा दिवस.आजचा सूर्योदय जरा संथच वाटत होता…वातावरणात एक अनामिक हुरहूर दरवळत होती.अनुभवांनी समृद्ध झालेल्या मनाला कळत होतं...आज इथून निघायचं आहे.
सकाळचा काढा, प्रार्थना… सगळं रोजच्यासारखंच, पण आज प्रत्येक क्षण जपून जगण्याची एक वेगळीच ओढ होती.
जणू मनच सांगत होतं..हे शेवटचे काही तास आहेत… मनसोक्त जगून घे.
सालईबनही जणू बोलत होतं…“तुम्ही इथे आलात, आणि आम्ही धन्य झालो.”
या आठवणींच क्षण साठवण्यासाठी प्रज्ञामंच्याकडे फोटो सेशन करण्यात आल, ज्यात चेहऱ्यावरचं हसू कैद झालं,
पण डोळ्यांतील भावना मात्र अजूनही बोलत होत्या. आणि इकडे समता सदनकडे सेवाधारी यांनी एक शेवटची अँक्टिव्हिटी ठेवली होती. हातात हात गुंफून तयार झालेली साखळी फक्त एक रांग नव्हती ती होती जोडलेली प्रेम , विश्वास , आणि नात्यांची काळजी...
त्यानंतर शिबिर बोलू लागते या अॅक्टिविटी मार्फत सर्वानी शिबिराचा प्रवास आणि वाटचाल ऐकली . गांधीजींची मूल्यं आत्मसात करत, एकमेकांच्या गळ्यात गांधी घालत आणि पहिल्या दिवशी घेतलेल मोबाइल सोबत सर्वाना शिबिराचे प्रमाणपत्र देण्यात आले.
हा फक्त कागद नाही, हा आपण जगलेला प्रवास आहे.
आणि मग… निघायची वेळ आली. मिठ्या घट्ट झाल्या. शब्द हरवले. आतापर्यंत रोखून ठेवलेला भावनांचा बांध तुटला…
अश्रू आले...दुःखाचे नव्हते, ते होते नात्यांचे, माणसांचे, आपुलकीचे.
आज वारकरी म्हणून आलेले शिबिरार्थी, तरुणाईकर म्हणून परत जात आहेत.
मनभरून काहीतरी मिळालं आहे. माणसं, नाती, अनुभव आणि माणुसकी...हीच खरी संपन्नता.
शिबिर संपलं… पण वारी नाही.
ती आता प्रत्येकाच्या आयुष्यत नव्याने सुरू झाली आहे…
आणि अशा प्रकारे या वारीचा “सुखिया झाला…”
[Teamtarunaai, Camp, Buldhana, Maharashtra]
#निरोप