01/07/2024
धाडस नको रे बाबानो
भलतं धाडस करणं एका कुटुंबाच्या अंगाशी आलं आहे.
लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात 5 जण बुडाले. तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध अद्यापही सुरू आहे. आग्राहून आलेलं हे कुटुंब भुशी डॅमच्या मागच्या बाजूला असलेल्या धबधब्यात पोहोचलं गुडगाभर पाण्यानी रुद्र रुप धारण करुन कुटुंबावर घाला घातला..
हे सर्व 27 तारखेला आग्रा इथून ते एका लग्नासाठी आले होते. लग्नसोहळा पार पडला. 30 जूनला रिसेप्शन होतं ते देखील पार पडलं आणि त्यांनी लोणावळा फिरयाचा प्लॅन केला होता, 1 जुलैला ते मुंबईला जाणार होते. सकाळी सगळे निघाले, येता येता छोट्या धबधब्यावर थांबायचं होतं मात्र तिथे पार्किंग मिळालं नाही व ते पुढे आले. लोकांच्या मागून त्यांनी ही अडनिड्या धबधब्याची जागा शोधली.
भुशी डॅमऐवजी ते इथे लोकांच्या मागून धबधब्यावर जाण्यासाठी आले. तेथे ५०-६० लोक होते ते धबधब्याच्या ठिकाणी गेले आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाच जण वाहून गेले. आग्राहून आलेल्यांपैकी पती-पत्नी आणि त्यांची मेहुणी आणि चार वर्षांचं बाळ वाहून गेलं. अन्सारी कुटुंबातील चार जण वाहून गेलं आहे .
त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून कोणत्याही धबधब्यावर जाऊ नका, कुठल्याही अडचणीच्या जागी जाऊ नका. खास करुन कुटुंबाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ नका,पावसाळ्यात पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून कुठेही जाऊ नका असं आवाहन साळुंके रेस्कु टिम कडुन वारंवार केलं जाते…अनेक म्रुतदेह आम्ही शोधुन काढतो ..काय कुटुंबाची परीस्थिती होते ते आम्हाला माहीते..या सोबत प्रशासकीय यंत्रणा सुध्दा आपण कामाला लावतो… म्हणुन सांगतो पाण्याशी खेळ करु नका आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकु नका…🙏🙏🙏🙏
✍️प्रशांत साळुंके..अध्यक्ष साळुंके रेस्कु टिम. महाराष्ट्र@highlight