22/06/2026
आपण खूप जण संभाजीराव भिडे गुरुजी या व्यक्तीला ब्राह्मण आहे म्हणून शिव्या देत आहात पण त्या व्यक्तीने काय काय केले आहे ते तुम्हाला समजून घ्यायला हवं.
1986 ते 1990 या पाच वर्षात केलेले उपक्रम हे महाराष्ट्र राज्यात 40 वर्ष झालं सुरू आहेत.
1 ) श्री दुर्गामाता दौड. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी असते, रोज सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये एकत्रितपणे भगवा झेंडा घेऊन प्रत्येक गावपातळीपासून जिल्हापर्यंत तरुण आपापल्या भागात दुर्गा माता दौड काढतात उद्या भागातून दौड जात असते तेथील महिला त्या ध्वजाची पूजा करतात.
2) धर्मवीर बलिदान मास. संभाजी महाराजांचा बलिदान मास म्हणजे काय कशासाठी आहे तो का करावा कशासाठी पाळायचा ही भिडे गुरुजींनी तरुणांच्या मध्ये रुजवले. हा महिना दुःखाचा सूतकाचा पाळायचा म्हणजे या महिन्यांमध्ये कोणीही सुखाचा क्षण साजरा करत नाही प्रत्येकाला स्वतःच्या आवडीची वस्तू सोडण्यासाठी भाग पाडले. जसे की कोणी एक वेळचा चहा सोडते, कोणी गोड सोडते, कोणी अंथरुणावर झोपायचे सोडते, कोणी चप्पल सोडते, तर कोण मुंडन करते, ही भिडे गुरुजींनी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सांगितले. आपल्या महाराजांना एक महिना हाल हाल करून मारले ते तरुणांच्या बिंबवण्यासाठी गुरुजींनीही जागरूकता निर्माण केली. प्रत्येक गल्लीमध्ये चौकामध्ये संभाजी महाराजांचा फोटो लावून ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हटला जातो. आणि शेवट दिवशी अमावस्येला संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणून मूकपद यात्रा काढली जाते.
3) शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा. सांगली पासून सुरुवात केली. आज महाराष्ट्रामध्ये कर्नाटकचा काही भाग यामध्ये जिथे जिथे संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या त्या भागात रोजच्या रोज पूजाही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या धारकऱ्यांमार्फत केली जाते. नाहीतर बाकीची पण आपापल्या गावात महापुरुषांची पुतळे आहेत तेथे नगरपालिकेची कर्मचारी पगारावर पूजेचं काम करतात.
4) गडकोट मोहीम. 40 वर्ष झाले गडकोट मोहीम ही सुरू केलेली आहे. एका गडावरून सुरुवात करून दुसऱ्या गडावर चालत जायचे. शिवाजी महाराज कसे जगले कसे लढले, याचा अनुभव घेण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी, ज्या किल्ल्यांवर आपले मावळे गतप्राण झाले, ती माती कपाळा वर लावून आशीर्वाद घेण्यासाठी गडकोट मोहीम असते. यामध्ये चार दिवस हे बाहेरचे काही खायचे नसते. घरचेच जेवण हे बांधून घेतले जाते, दिवसभर चालायचे सायंकाळ झाली की थांबायचे आणि महाराष्ट्रातील थोर व्याख्याते शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान सांगतात. चार दिवस मोकळ्या पटांगणातच झोपायचे असते.
5) शिवराज्याभिषेक दिन. आपण आपल्या घरी सर्व कार्यक्रम हे तिथीनुसारच करत असतो. जसे की दसरा दिवाळी, बुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, मयत झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध. घरी लग्नकार्य असेल तर आपण मुहूर्तावरच करतो. लहान मुलांचे बारसे, डोहाळ जेवण मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसारच करावा गेली 40 वर्ष गुरुजींनी सुरू केलेला आहे.
6) शिवाजी महाराजांचे समाधीची पूजा. गेली 40 वर्ष सांगली वरून हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये सांगली वरूनच हार जात असतो रायगडच्या पूजेसाठी. अखंडपणे चाललेली महाराजांची सेवा ही गुरुजींनीच सुरू केली त्याचे टिप्पण गुरुजींकडे असते ज्याला कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी माहिती घ्या एका वर्षाचं नियोजन गुरुजींकडे असतं कार्यकर्त्यांची यादी त्याचा फोन नंबर तो गेलाय का नाही हे बघण्यासाठी रायगड वर असलेल्या माणसांपर्यंत विचारपूस पूर्ण नियोजन हे गुरुजीच करतात...
हे सर्व उपक्रम भिडे गुरुजींनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले नाहीत. 88 ज्या माणसाचं वय आहे, तो माणूस आपली वयाची संपूर्ण आयुष्य हे शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे कसे जगले कसे लढले कसे हे तरुणांमध्ये रुजवण्याचे काम गुरुजींनी केले. तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये आणि व्यसना मधून बाहेर खूप तरुणांना काढायच काम गुरुजींनी केलेला आहे. त्यांच्या जागी जर दुसरा कोणी माणूस असता लग्न करून मुलं काढून निवांत राहू शकला असता. तुम्ही सर्वांनी विचार करावा की ह्या व्यक्तीला काय पडला आहे धर्मा साठी संपूर्ण स्वतःचे जीवन समर्पित करण्यासाठी. आपण पूर्ण माहिती घेत नाही ,म्हणून शिव्या देता, कसेही बोलता. निदान बोलताना वयाचा विचार करून बोलावा. आपल्या घरी सुद्धा वयोवृद्ध आई-वडील असतील आपण असेच बोलता का..
भिडे गुरुजींचा रोजचा नित्यक्रम.. दररोज सकाळी चार वाजता उठणे उठल्यावर चार ते सहा वाजेपर्यंत 50 ते 55 विभाग प्रमुखांना फोन करणे व्यायामासाठी ते विभाग प्रमुख उठून त्यांच्या गटप्रमुखांना खाली फोन लावतात व एकत्रितपणे सकाळी सहा ते साडेसात वाजेपर्यंत सूर्यनमस्कार बैठका जोर हा व्यायाम होतो घाटावर. ते या वयात सुद्धा 100 च्या वर सूर्यनमस्कार घालतात. बैठका 80, जोर 50 हा दररोजचा व्यायाम असतो. नंतर सर्व ते दैनंदिन बैठकीसाठी बाहेर पडतात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता. खोलीवर येतात दुपारचे जेवण हे कार्यकर्त्यांच्या घरी असतं परत सायंकाळी पाच वाजता बाहेर पडले कि रात्री अकरा बारा वाजता येतात बैठका साठी परगावी जातात. यामध्ये गुरुजी महिन्यातील चार सोमवार उपवास करतात, चार गुरुवार करतात, चार शनिवार करतात, अमावस्या चा उपवास करतात कारण संभाजी महाराज गेले म्हणून असतो. एक पौर्णिमेचा उपवास असतो कारण शिवाजी महाराज पौर्णिमेला गेले म्हणून, एक एकादशी करतात, एक प्रदोष करतात, एक शिवरात्री करतात. असे महिन्यातील 17 दिवस उपास असतो व सकाळी एक वेळेला जेवण करतात...
#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान