12/07/2025
छत्रपती शिवरायांच्या ज्वाजल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले, महाराष्ट्राच्या पराक्रमी परंपरेच्या पाऊलखुणा अभिमानाने अंगावर बाळगून उभे असलेले गडकोट जागतिक वारसा स्थळांच्या यादीत यावेत, यासाठी #युवराज_संभाजीराजेंनी गेली अनेक वर्षे अथक परिश्रम घेतले.
या परिश्रमांना अखेर यश लाभले आणि महाराष्ट्रातील राजगड, रायगड, पन्हाळगड, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, विजयदुर्ग, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी आणि साल्हेर हे किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले.
याबद्दल सर्वप्रथम युवराज संभाजीराजेंचे मन:पूर्वक अभिनंदन!
महाराष्ट्राचा, युगपुरुष छत्रपती शिवरायांचा इतिहास जागतिक पटलावर यावा, जगभरातील अभ्यासक व संशोधक या गडकोटांचा अभ्यास करावा, यासाठी खरे, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न जर कोणी केले असतील, तर ते संभाजीराजेंनीच!
२०१६ पासून त्यांनी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केला.
२०१७ साली युनेस्कोचे प्रतिनिधी भारतात आले असता, त्यांनी स्वतः पन्हाळगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि इतर किल्ल्यांवर त्यांना नेले.
त्या ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व, त्यांची शौर्यगाथा, युद्धशास्त्रीय दृष्टिकोन आणि सांस्कृतिक मूल्य यांची सविस्तर माहिती दिली.
खासदार असताना संसदेत त्यांनी हा विषय मांडून केंद्र व राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधले.
त्यामुळेच आज हे ऐतिहासिक पाऊल शक्य झाले.
आज अनेकजण या ऐतिहासिक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी सरसावत आहेत, पन्हाळगडावर जाऊन साखर वाटत आहेत — आनंदाची गोष्ट आहे.
पण, यातील एकालाही हे सुचले नाही की, "ज्यांनी हे सर्व घडवून आणले, त्या संभाजीराजेंचं नाव तरी घ्यावं!"
हा करंटेपणा कोठून आला?
ही कोल्हापूरची संस्कृती नव्हे!
असो!
राजे, आपण केलेले प्रयत्न, सातत्य, आणि कष्ट आम्हा शिवभक्तांना ज्ञात आहेत.
गडकोटांवर निवडणूक जिंकता येत नाही, मतं मिळवताही येत नाही — म्हणूनच अनेक दशके राज्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.
पण, त्यांनी आता तरी जागं व्हावं आणि हा आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न करावेत.
राजे, आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना तुळजाभवानी असेच यश देवो!
शिवभक्त सदैव आपल्या पाठीशी राहतील...!