Bandh Foundation / बंध फाउंडेशन

Bandh Foundation / बंध फाउंडेशन Bandh (बंध) means a Bond, a Commitment. 𝐀𝐁𝐎𝐔𝐓 𝐔𝐒
जन सेवा हेच आमचे ब्रीद
Bandh Foundation is a Non-Profit Organization based in Kolhapur, Maharashtra.

Bandh Foundation is led by Shri Arun Patil (Retd Govt Officer of Forest Dept) to support community development through various initiatives in Education, Healthcare, Environment, Employability and Upskilling It is registered under section 29 of the Bombay Public Trust Act 1950. The foundation works for the society through various philanthropic initiatives in key focus areas of Education, Health, En

vironment. Some other initiatives include Rural Development, Disaster Response, Skills Development, Afforestation, Biodiversity, Development of Ecosystem, Climate change awareness etc.

𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍
Bandh Foundation’s mission is to empower the marginalized and vulnerable communities with resources and opportunities by providing access to quality education, basic healthcare facilities and clean environment.

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍
Bandh Foundation’s vision is to create an equitable, inclusive, self-reliant, and sustainable society where people can lead a healthy and quality life with dignity.

आज दिनांक १९ जुलै २०२६ रोजी कोगनोळी , तालुका निपाणी , जि.बेळगांव, येथील “देवांश मनुष्य समाज सेवा अनाथ आश्रम”यास भेट दिली...
19/07/2026

आज दिनांक १९ जुलै २०२६ रोजी कोगनोळी , तालुका निपाणी , जि.बेळगांव, येथील “देवांश मनुष्य समाज सेवा अनाथ आश्रम”यास भेट दिली.
तेथील अनाथांची माहिती घेतली व अनाथ आश्रमास मदत म्हणून ३० किलो गहू,३० किलो तांदूळ, गोडेतेल १५ किलो डबा तसेच पोहे, रवा, साखर, इत्यादी वस्तू “बंध फाउंडेशन “ मार्फत दिल्या.
या कार्यक्रमास देवांश मनुष्य समाज सेवा अनाथ आश्रमांचे संस्थापक श्री अमर पोवार, बंध फाउंडेशनचे संस्थापक श्री अरुण पाटील, सदस्य श्री ओंकार पाटील, व स्वयंसेवक , सेवानिवृत्त वनाधिकारी , श्री संजय पाटील,तसेच सुमारे ४० अनाथ महिला व पुरुष होते.
श्री अमर पोवार व त्यांच्या पत्नी यांचे निराधारांच्या सेवेचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यास “बंध फाउंडेशन च्या हार्दिक शुभेच्छा 👍💐

आज दि. 11/07/2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, हासुर दुमाला (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे शाळेचे अध्यक्ष ...
11/07/2026

आज दि. 11/07/2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, हासुर दुमाला (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे शाळेचे अध्यक्ष श्री भाऊसो बंडू झांजगे यांच्या विशेष प्रयत्नातून “बंध फाउंडेशन” चे संस्थापक श्री अरुण पाटील यांच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, बंध फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण पाटील, सदस्य ओंकार पाटील, स्वयंसेवक कु.श्रावणी माळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मनापासून अभ्यास करण्याचे आवाहन केले.
शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल बंध फाउंडेशनचे संस्थापक श्री अरुण पाटील यांचे तसेच या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न करणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भाऊसो बंडू झांजगे यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
"शिक्षणासाठी समाजाचा सहभाग हीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची गुरुकिल्ली आहे," असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

distribution foundation

आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी , विद्यामंदिर शांतीनगर , पाचगाव, ता . करवीर जि. कोल्हापूर या शाळेतील मुला मुलींना वह्या व पेन...
03/07/2026

आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी , विद्यामंदिर शांतीनगर , पाचगाव, ता . करवीर जि. कोल्हापूर या शाळेतील मुला मुलींना वह्या व पेन्सिलचे वाटप “बंध फाउंडेशन” मार्फत केले.
या कार्यक्रमास , बंध फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अरुण पाटील, सदस्य श्री ओंकार पाटील,स्वयंसेविका कु. श्रावणी माळी, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच...
26/06/2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते.
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला.
शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले.
२ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
१८९६ च्या दुष्काळात,दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटे.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले . आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.
शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
अशा या लोककल्याणकारी राजांचे जयंती निमित्त “बंध फाउंडेशन “कोल्हापूर चे शत: शत: प्रणाम 🙏🙏

आज दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी , राजेंद्र ...
21/06/2026

आज दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी , राजेंद्र नगर , कोल्हापूर येथे दुपारी ५.३० वाजता ,महिला बचत गटाचे शिबीर “बंध फाउंडेशन मार्फत आयोजित केले . 

“बंध फाउंडेशन “ चे महिला स्वयंसेवक कु.श्रावणी माळी ,तनिष्का पटणी , प्रमिती पाटील , यांनी  महिलांना मार्गदर्शन करून , त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व आरोग्यविषयक भेटवस्तू  म्हणून सॅनिटरी पॅड चे वाटप केले.

    “बंध फाउंडेशन “ मार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले व कार्यान्वयन वरीलप्रमाणे महिला स्वयंसेवकानी केले.

दिनांक १९ जून २०२६ रोजी तामिळनाडू येथील उदयावार थिरुवादी ट्रस्टचे सदस्यांनी बंध फाउंडेशनच्या कार्यालयास भेट दिली.फाउंडेश...
21/06/2026

दिनांक १९ जून २०२६ रोजी तामिळनाडू येथील उदयावार थिरुवादी ट्रस्टचे सदस्यांनी बंध फाउंडेशनच्या कार्यालयास भेट दिली.फाउंडेशनच्या कामांची माहिती घेतली व फाउंडेशन च्या काही उपक्रमांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
बंध फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अरुण पाटील यांनी त्यांचे स्वागत करून फाउंडेशन मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

आज दिनांक १८जून २०२६ रोजी “बंध फाउंडेशन “ कोल्हापूर मार्फत “प्रबुद्ध भारत हायस्कूल “ लक्ष तीर्थ वसाहत , कोल्हापूर येथील ...
18/06/2026

आज दिनांक १८जून २०२६ रोजी “बंध फाउंडेशन “ कोल्हापूर मार्फत “प्रबुद्ध भारत हायस्कूल “ लक्ष तीर्थ वसाहत , कोल्हापूर येथील गरीब शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन , या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोल्हे, शाळेचे कर्मचारी, “बंध फाउंडेशन “कोल्हापूर कडे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी , तनिष्का पटनी ,
“बंध फाउंडेशन” कोल्हापूर चे अध्यक्ष श्री अरूण पाटील,सदस्य श्री ओंकार पाटील,स्वयंसेवक कु. प्रमिती पाटील व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

आज दिनांक ९ जून २०२६ रोजी “बंध फाउंडेशन “ कोल्हापूर कडे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी कु तनिष्का पटनी हिने (एनएम...
09/06/2026

आज दिनांक ९ जून २०२६ रोजी “बंध फाउंडेशन “ कोल्हापूर कडे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी कु तनिष्का पटनी हिने (एनएमआयएमएस (NMIMS) अभिमत विद्यापीठ, मुंबईचे अर्थशास्त्र विभागातील प्रथम वर्ष विद्यार्थीनी), “बंध फाउंडेशन “ कडे उपलब्ध असलेल्या , उपयोगी तयार कपड्याचे वाटप , राजेंद्र नगर, कोल्हापूर येथील गरीब व गरजू महिला व मुलांना केले.
या कार्यक्रमासाठी “बंध फाउंडेशन” कोल्हापूर चे अध्यक्ष श्री अरूण पाटील,सदस्य श्री ओंकार पाटील,स्वयंसेवक श्री अक्षय देशमुख उपस्थित होते.

05/06/2026
आज एनएमआयएमएस (NMIMS) अभिमत विद्यापीठ, मुंबईचे अर्थशास्त्र विभागातील प्रथम वर्ष विद्यार्थीनी,कु तनिष्का पटनी हिने “बंध फ...
05/06/2026

आज एनएमआयएमएस (NMIMS) अभिमत विद्यापीठ, मुंबईचे 

अर्थशास्त्र विभागातील प्रथम वर्ष विद्यार्थीनी,कु तनिष्का पटनी 

हिने “बंध फाउंडेशन” कोल्हापूर मार्फत रेणुका चौक, सुभाष रोड, मंगळवार पेठ कोल्हापूर येथे सुरु असलेल्या “पाणपोई “ मध्ये पाणी भरले. 

     नंतर (५ जून) जागतिक पर्यावरण दिना निमित्त , पाचगाव तालुका करवीर येथील” राजर्षी छत्रपती शाहू प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळे च्या परिसरात “बंध फाउंडेशन” कोल्हापूर मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यापूर्वी “बंध फाउंडेशन” कोल्हापूर मार्फत केलेल्या वृक्ष लागवडीतील गवत काढून रोपाना पाणी देण्याचे काम “बंध फाउंडेशन” कडील प्रशिक्षणार्थी कु. तनिष्का पटनी, साहिल ढेकळे यांनी केले.

     या कार्यक्रमास “बंध फाउंडेशन” कोल्हापूर चे अध्यक्ष श्री अरूण पाटील,सदस्य श्री ओंकार पाटील, शाळेतील शिक्षक, कर्मचारी “बंध फाउंडेशन” कडील प्रशिक्षणार्थी कु. तनिष्का पटणी, साहिल ढेकळे उपस्थित होते.

तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र करवीर कडील वनरक्षक कु. गिरिजा सावंत उपस्थित होत्या. त्यांनीही जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण केले.

Address

328 E Ward, Shop No. A-6 Royal Plaza, Dabholkar Chowk, Shahupuri
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bandh Foundation / बंध फाउंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bandh Foundation / बंध फाउंडेशन:

Shortcuts

Share