Kolhapur Earth Warriors

Kolhapur Earth Warriors Sustainable Development will be the core of our work.
(1)

It is a group of people working for Environment by developing Environmental friendly lifestyle, avoid the things those are harmful to the Environment, Create Awareness, get Participation of people.

आज मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांची गोलमेज परिषद शिवाज...
06/05/2026

आज मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांची गोलमेज परिषद शिवाजी विद्यापीठ येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. कोल्हापूर अर्थ वॉरियर्स ,शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात आली. या परिषदेला साधारणपणे 26 संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या परिषदेत विद्यापीठ विकास मंच आणि शिवाजी विद्यापीठाचे कौन्सिल मेंबर स्वागत परुळेकर, सकाळचे निखिल पंडितराव सर तसेच सिनेट मेंबर उषा पवार, पर्यावरण विभागाच्या प्रमुख असावरी जाधव मॅडम आणि कोल्हापूर अर्थ वॉरिअरचे सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोल्हापूर अर्थ वॉरियसने दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीने केले, उद्घाटनाच्या वेळी निखिल पंडितराव सर तसेच कोल्हापूर अर्थ वॉरियर्स चे आशिष कोंगळेकर आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आसावरी जाधव मॅडमनी झाडाला पाणी घालून केले तसेच उपस्थित सर्व संस्थांना प्रमुखांना गावरान कुळीथाच्या बिया दिल्या. आपले देशी पारंपारिक बियाणे संवर्धन केले पाहिजे याची प्रतिक रूपाने नोंद सर्वांनी घ्यावी आणि हे बियाणे घरी रुजवावे अशा उद्देशाने हे बियाणे दिले. तसेच गोमाता संवर्धन गोवंश टिकला पाहिजे, त्याचे महत्त्व समजण्यासाठी गाईच्या शेणापासून तयार केलेले अतिशय उत्तम प्रतीचे द्रवरुप खत म्हणजे जीवामृत, हे प्रत्येकी 200 एम एल रियूज्ड बाटली मधून सर्वांना घरच्या बागेसाठी भेट देण्यात आले. हे जीवामृत प्रतिक गुळवणी यांनी या परिषदेसाठी खास तयार करून दिले होते.
कोल्हापुरातील पर्यावरणीय समस्या आणि त्यावरील आपापल्या परीने काढलेले उपाय यावर सर्व संस्थांचे चर्चासत्र अभिजीत कुलकर्णी यांनी घेतले. यानंतर कोल्हापूर अर्थ वॉरिअरच्या सदस्या संगीता कोकीतकर यांनी नदी प्रदूषण तसेच जमीन प्रदूषण रोखण्यासाठी कशा पद्धतीने आपण बायो एन्झाईम केले पाहिजे याचे महत्त्व सांगत बायो एंझाईमची कार्यशाळा घेतली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव श्री व्ही एन शिंदे सर यांनी या परिषदेस उपस्थिताना मार्गदर्शक भाषणाने समारोप केला. संपूर्ण कार्यक्रमाचे तृप्ती देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

19/04/2026

भारतीय सण-उत्सवांच्या मुळाशी शोध घेतल्यास असे लक्षात येते की, बहुतांश सण हे निसर्गचक्र आणि मानवी गरजांशी जोडलेले आहेत. अक्षय तृतीयेचा इतिहास हा पौराणिक कथांच्या पलिकडे जाऊन पाहिल्यास 'स्थित्यंतराचा इतिहास' वाटतो.

*१. ऐतिहासिक उगम: कृषी अर्थव्यवस्थेचा पाया*
अक्षय तृतीयेचा नेमका उगम काळ सांगणे कठीण असले तरी, याचे धागेदोरे प्राचीन 'नवान्न' परंपरेशी जोडलेले आहेत. प्राचीन भारतात जेव्हा स्थिर शेतीला सुरुवात झाली, तेव्हा वैशाख महिना हा रब्बी हंगामाच्या समाप्तीचा आणि नवीन पेरणीच्या पूर्वतयारीचा काळ होता.
ऐतिहासिक दृष्टिकोनातून, हा काळ 'उदकदान' (पाणी दान) परंपरेचा होता. प्राचीन शिलालेखांमध्ये आणि स्मृतीग्रंथांमध्ये या दिवशी पाणपोई सुरू करण्याचे उल्लेख आढळतात. हा निव्वळ धार्मिक विधी नसून, वाढत्या उन्हाळ्यात वाटसरूंची तहान भागवण्याची एक 'सामाजिक गरज' होती, ज्याला नंतर सणाचे स्वरूप प्राप्त झाले.

*२. मध्ययुगीन कालखंडातील बदल*
मध्ययुगात हा सण केवळ दानापुरता मर्यादित न राहता तो 'साठवणुकीशी' जोडला गेला. या काळात शेतीतील धान्य घरात आलेले असायचे. 'अक्षय' म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे. त्यामुळे, या दिवशी धान्याचे पूजन करून नवीन वर्षाच्या अन्नाची सुरक्षितता सुनिश्चित केली जात असे.
मराठा कालखंडात आणि त्याआधीच्या प्रादेशिक राजवटींमध्ये अक्षय तृतीया हा 'राजकीय आणि लष्करी' दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जाई. नवीन मोहिमांची आखणी किंवा नवीन बांधकामांचे शुभारंभ या मुहूर्तावर केले जात असल्याचे अनेक ऐतिहासिक दस्तऐवज सांगतात.

*३. बदलती प्रतीके: मातीचा माठ ते सोने*
अक्षय तृतीयेच्या स्वरूपात कालानुरूप मोठे बदल झाले आहेत:

प्राचीन काळ:
मातीचा माठ, वाळा, पाणी आणि धान्य यांचे दान हे मुख्य स्वरूप होते. हा काळ पर्यावरणाशी नातं सांगणारा होता.

मध्य काळ:
हा सण हळूहळू पितृपूजनाशी जोडला गेला. पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दान करण्याची पद्धत रूढ झाली.

आधुनिक काळ (१९९० नंतर):
जागतिकीकरण आणि बाजारपेठेच्या विस्तारानंतर या सणाचे पूर्णपणे 'व्यापारीकरण' झाले. अक्षय म्हणजे कधीही न संपणारी संपत्ती, या कल्पनेचा आधार घेत 'सोने खरेदी' ही एक आधुनिक परंपरा बनवली गेली. ऐतिहासिकदृष्ट्या या दिवशी सोने खरेदीचे कोणतेही ठोस पुरावे प्राचीन ग्रंथांत आढळत नाहीत; हे पूर्णतः आर्थिक उलाढालीवर आधारित आधुनिक बदल आहेत.

*४. आजच्या काळातील सणाचे महत्त्व आणि वास्तव*
आजच्या काळात अक्षय तृतीया हा सण दोन स्तरांवर विभागला गेला आहे. ग्रामीण भागात आजही या दिवशी 'आखाजी' साजरी केली जाते, जिथे शेतीची अवजारे पूजली जातात आणि पेरणीचे नियोजन केले जाते. याउलट, शहरी भागात हा सण 'गुंतवणुकीचा दिवस' म्हणून ओळखला जातो.

अक्षय तृतीया हा सण मानवाच्या 'शाश्वततेच्या' (Sustainability) इच्छेचे प्रतीक आहे जो आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो:

१. निसर्गातील बदलांशी (ऋतू बदल) जुळवून घेणे.
२. सामाजिक बांधिलकी म्हणून पाण्याचे आणि अन्नाचे दान करणे.

आजच्या आधुनिक काळात केवळ भौतिक संपत्तीच्या मागे न धावता, आपल्या संस्कृतीतील हा 'लोकसंग्रहाचा' आणि 'निसर्ग संवर्धनाचा' वारसा जपणे हीच खरी अक्षय तृतीया ठरेल.

19/02/2026
18/02/2026
30/01/2026

My small terrace kitchen garden

आज त्रिदेव एकत्र आले म्हणजे समाजातील तीन शक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी एक चांगला पायंडा सुरू केला. तो म्हणजे वृक्षारोपणा...
01/07/2023

आज त्रिदेव एकत्र आले म्हणजे समाजातील तीन शक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी एक चांगला पायंडा सुरू केला. तो म्हणजे वृक्षारोपणाचा. एका ग्रुपने ( Teaching and Learning Community) झाडांचे तसेच खड्डे काढण्याचे खर्चाची बाजू उचलली, एका ग्रुपने कामाची अंमलबजावणी (ex*****on, Kolhapur Earth warriors) केली आणि एका ग्रुपने लावलेली झाडे जगवण्याची जबाबदारी ( Sunil Wankar and family) घेतली. अशाप्रकारे तीन शक्ती एकत्र येऊन आज कोल्हापुरातील पुईखडी या भागामध्ये 80 झाडे लावली गेली.

Address

Morewadi
Kolhapur
416013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur Earth Warriors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kolhapur Earth Warriors:

Share