गर्व आहे मला आगरी असल्याचा

  • Home
  • India
  • Kalyan
  • गर्व आहे मला आगरी असल्याचा

गर्व आहे मला आगरी असल्याचा परतेक बनशीला ना परतेक भावासला आगरी आसल्याचा गर्व व्हल आशी जमल तवरी मायती तुमच्यापरन झेवून येव.

13/03/2026

#आगरी कोळी संगीतातील एक अजरामर गायक
नाव सांगता येईल का???
#आगरी
#कोळी
#गायक
#संगीत

08/03/2026

#आम्ही आगरी कोळी बोलताव.
#आगरी
#कोळी
#आगरी कोळी
#गाववाले

जय एकविरा🙏🏻🌺सालाबाद प्रमाणे याही वर्षीही संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत व जागृत देवस्थान असलेल्या वेहेरगाव,कार्ला,लोण...
02/03/2026

जय एकविरा🙏🏻🌺
सालाबाद प्रमाणे याही वर्षीही संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत व जागृत देवस्थान असलेल्या वेहेरगाव,कार्ला,लोणावळा येथील श्री आई एकविरा देवी यात्रा व मानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व आनंदाने संपन्न होणार आहे.आपल्या सारख्या भाविकांच्या सहकार्याने देवीच्या गडावर भाविकांसाठी विविध सोई तसेच सेवा करण्याची संधी विश्वस्त मंडळास मिळाली आहे.
भाविकांच्या सहकार्याने व श्री आई एकविरा देवीच्या आशिर्वादाने गडावर पावित्र्य व मांगल्या राखून भाविकांना सुलभतेने व सहजतेने श्री आई एकविरा देवीचे दर्शन व्हावे,तसेच भक्तगणांना सुखसोई प्राप्त करून देण्याचे विश्वस्त मंडळाचा मनोदय आहे.आपल्या सहकार्या बद्दल विश्वस्त मंडळ आपले सदैव ऋणी आहे.

18/02/2026

#आईएकविरा
#आईमाऊलीचाउदोउदो
#आई

आगरी समाजा बद्दल अपशब्द वापरणारी माजी महापौर यांचा बद्दल सर्व समाजाने निषेध व्यक्त केला अनेक तक्रारी दाखल झाल्या आणि आज ...
21/01/2026

आगरी समाजा बद्दल अपशब्द वापरणारी माजी महापौर यांचा बद्दल सर्व समाजाने निषेध व्यक्त केला अनेक तक्रारी दाखल झाल्या आणि आज आपल्या समाजाची काही स्वतःला नेते समजणारी मंडळी त्याना भेटून सत्कार करतात ही समाजासाठी शरमेची बाब आहे

आगरी समाजाबद्दल अपमानास्पद वायरल क्लीप नंतरही आगरी समाजातील भाई सुजीत (तात्या) पाटील आणि माजी महापौर मिनीक्षी शिंदे यांच...
14/01/2026

आगरी समाजाबद्दल अपमानास्पद वायरल क्लीप नंतरही आगरी समाजातील भाई सुजीत (तात्या) पाटील आणि माजी महापौर मिनीक्षी शिंदे यांची भेट,फोटो वायरल
तात्याला यातुन काय संदेश द्यायचाय????

कष्टकऱ्यांचा बा : दिबादिनकर बाळू पाटील (जन्म: १३ जानेवारी १९२६)पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष,महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभ...
12/01/2026

कष्टकऱ्यांचा बा : दिबा
दिनकर बाळू पाटील (जन्म: १३ जानेवारी १९२६)

पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष,
महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार,
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि
रायगडचे दोन वेळा खासदार.

आजच्या काळात गल्लीतल्या पुढाऱ्यापासून ते दिल्लीतले पुढारी सुद्धा अब्जाधीश आहेत. परंतु ४०-५० वर्ष दिबांच्या हातात आमदार-खासदाररुपी राजकीय सत्ता असून सुद्धा त्यांनी त्याचा व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच फायदा घेतला नाही. एवढेच कशाला, आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिबांना त्यांच्या उभ्या आयुष्यात स्वत:चे राहते घर सुद्धा बांधता कधीच आले नाही. आज दिबांचे ‘संग्राम’ हे जे निवासस्थान आहे, ते सुद्धा दिबांच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून त्यांना बांधून दिलेले आहे. कारण दिबांनी आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आपल्या कार्यकर्त्यांचे प्रेम कमावले आहे, पैसे नाही. असे प्रेम लाभलेला दुसरा कोणतही नेता आज सापडेल का?

दिबांनी राजकारणात संपूर्ण हयात घालवली. प्रत्येक राजकीय पक्षात बहुतेक पुढारी हे राजकीय स्वार्थापोटी आपला ‘वारस’ तयार करतात. परंतु दिबांनी आपल्या चार अपत्यांपैकी एकालाही वारसदार बनविण्याचा प्रयत्नही केला नाही. असा निस्वार्थपणा असलेला एक तरी नेता आजच्या घडीला आपल्या सापडेल का?

नवी मुंबई शहर उभारण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीत घेण्याचा त्यावेळच्या प्रस्थापित राजकारणी आणि अधिकारी वर्गाचा डाव होता. परंतु ह्याविरोधात दिबांनी आवाज उचलला, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले, अनेकजण ह्या लढ्यात जखमी झाले, पाच शेतकरी हुतात्मा झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा निडरपणे सामना करत हा लढा शेतकऱ्यांनी जिंकला. तेव्हापासून देशात १२.५% टक्केचा कायदा अस्तिवात आला.

नवी मुंबईच्या भूमिपुत्रांसाठी दिबांचे जे कार्य आहे ते आजच्या तरुण पिढीला कळायला हवे. आजच्या DSLR घेऊन फोटो काढणाऱ्या, स्पोर्ट्स बाईक घेऊन मिरवणाऱ्या तरुण पिढीला कदाचित ठाऊक नसेल दिबा कोण होते परंतु त्यांच्या ह्या लढ्यामुळे इथे भूमिपुत्र टिकला आणि नुसता टिकला नाही तर आज जे काही सुगीचे दिवस येथील प्रकल्पग्रस्त पाहत आहे ते फक्त आणि फक्त दिबांच्या मुळेच आहे ह्याची जाण प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.

शेवटी एकच सांगावेसे वाटते कि "झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच"

दिबांच्या जयंती निम्मित त्यांना विनम्र अभिवादन 🙏🏻

28/03/2025
08/02/2025

नमस्कार जय एकविरा आई
अवघ्या दोन महिन्यांवर आईचे पालखी सोहळ्याची तयारी येऊन ठेपली आहे त्या दृष्टीने प्रशासनाची उपाययोजना कितपत सक्षम आहे हे तपासायला हवे.

08/02/2025

आपल्या समाजामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याकडून एकादशीचे माहात्म्य जाणून घेणे व एकादशीचे पालन करणे हे संबंध समाजाच्या हिताचे असून जास्तीत जास्त समाज बांधवांनी भगिनींनी एकादशीचे व्रत आचरणात आणले पाहिजे जेणेकरून श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी जी यांच्या कृपा आपणावर सदैव असो.

Address

Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गर्व आहे मला आगरी असल्याचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share