Yung Foundation

Yung Foundation Youth unity for national glory .works for youth empowerment.

🌿 निसर्गाशी, स्वतःशी आणि समाजाशी साधलेला एक अनोखा संवाद! 🏕️स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही वीज, रस्ते, पाणी आणि मोबाईल न...
16/03/2026

🌿 निसर्गाशी, स्वतःशी आणि समाजाशी साधलेला एक अनोखा संवाद! 🏕️

स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही वीज, रस्ते, पाणी आणि मोबाईल नेटवर्क यांसारख्या मूलभूत सुविधांपासून आजही वंचित असलेल्या सातपुड्यातील नर्मदेच्या खोऱ्यातल ' वास्तव तुम्हाला माहिती आहे का? ⛰️

कोणत्याही जाती-धर्माच्या कृत्रिम बंधनात न अडकता निसर्गालाच देव मानणारा आणि अत्यंत कमी साधनांत (Minimalism) समाधानाने जगणारा इथला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने खूप काही शिकवून जातो! 🍃✨

'यंग फाउंडेशन' च्या माध्यमातून १०-१२ पाड्यांवरील तब्बल ४५० शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं अत्यंत प्रेरणादायी काम इथे सुरू आहे. 📚🙌

खऱ्या विकासाची परिभाषा सांगणाऱ्या या शिबिराचा आणि नितळ नर्मदेच्या कुशीतील हा अविस्मरणीय अनुभव माझ्या (संकेत )नवीन ब्लॉगमध्ये नक्की वाचा! 👇

यंग फाउंडेशन आयोजित ‘युवा संवाद शिबीर’च्या निमित्ताने सातपुडा-नर्मदा परिसरातील ‘उडद्या पाडा’ येथे निसर्गाशी, स...

सातपुड्यातलं युवा संवाद शिबीर...जल जंगल जमिनीशी तादात्म्य पावलेल्या  लोकांशी संवाद...सातपुड्यात नर्मदा नदीच्या काठावर , ...
08/03/2026

सातपुड्यातलं युवा संवाद शिबीर...
जल जंगल जमिनीशी तादात्म्य पावलेल्या लोकांशी संवाद...
सातपुड्यात नर्मदा नदीच्या काठावर , धडगाव तालुक्यातील अति दुर्गम असलेल्या उडद्या पाड्यात यंग फॉउंडेशन च्या माध्यमातून युवा संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले....
शिबिर म्हटले की ,बौध्दिक विषय ,तज्ज्ञ वक्ते ,मिनीट टू मिनीट वेळेचे नियोजन ,वेळेनुसार सर्व बाबी करणे असे बरेच काही ठरलेले असते . सातपुड्यात मात्र यंग फाऊंडेशनच्या शिबिरात या सर्व गोष्टींना फाटा दिला जातो . आम्ही कोणत्याही वक्त्याला बोलवत नाही ,एखाद्या वक्त्याला बोलवलच तर त्याला शिबिरातील युंवाचे म्हणणे ऐकण्यासाठी बोलवतो . शिबिराचे वेळापत्रक नसते , कडक नियम नसतात . स्थानिक लोकच साधन व्यक्ती म्हणून शिबिरार्थींशी संवाद साधायला येतात. आदिवासी भागातील दुर्गम पाड्यावर पायी चालत भेट देणं , पाड्यातील लोकांशी संवाद साधत तेथील संस्कृती ,समस्या ,त्यांचे जगणे असे बरेच काही अनुभवत ,निरिक्षण करत व सर्वांनी आपले अनुभव मांडत चर्चा करत ,सर्व समजुन घेतले जाते. शिबिरात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील युवा आलेले असतात त्यांना ऐकमेकांशी बोलायला पाड्यात, जंगलात फिरताना वेळही मिळतो. शिबिरात कोणालाही काही सांगायची वेळ येत नाही आपापली कामे आटोपून सर्वजण अनुभवकथन करायला एकत्र येतात.महाराष्ट्रभरातील 25जणांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.
सातपुड्याच्या दुर्गम भागात ,मध्यप्रदेश सिमेवरील नर्मदा नदीच्या काठावर उदड्या पाड्यात,अत्यंत तुटपुंजे संसाधने ,पुरेशा सोईसुविधा नसलेल्या या भागात नेटवर्क व वीज नसतांना शिबिरार्थींनी पाच दिवस एक वेगळाच अनुभव घेतला .रस्ते ,वीज , नेटवर्क , पुरेसे पाणी नसलेल्या खापरमाळ, उडद्या,सादरी या पाडयांना शिबिरार्थींनी चार कि.मी .पायी चालत भेट दिली . अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मुलभुत सोईसुविधा नसतांनाही ,कसेबसे जगणारे आदिवासी बघून , दुर्गम भागातील दाहक परिस्थिती अनुभवली .निसर्गपुजक असलेल्या आदिवासींचा कोणताही धर्म नाही ,ते जल- जंगल - जमिनीची पुजा करतात , निसर्ग देवतेला छताची गरज नसते , जंगलातील प्राणी ,झाडे, दगड ,डोंगर आदिंची पुजा करुन पारंपारीक सण उत्सव साजरा केले जातात , लग्न पध्दती ,पारंपारीक शेती , वनऔषधी असे बरेच काही उडद्या पाड्यातील आदिवासी बांधवानी गप्पागोष्टी करत सांगीतले. उडद्या ते नर्मदा नदी काठावरील सादरी पाड्यात पायी चालत व पौर्णिमेच्या रात्री नदीतून बोटीने प्रवास करत , जल जंगल जमीनीची माहीती घेत सातपुड्याचा कणखर पणाही शिबिरार्थींनी अनुभवला. नर्मदेत डुबकी मारत सर्व सीमारेशांना तिलांजली देत निर्मळपणे वाहणाऱ्या नदीची ऊर्जा सर्वच जणांनी अनुभवली.
आदिवासींचे प्रश्न ,समस्या या सोबतच त्यांची संस्कृती समजुन घेण्यासाठी चार दिवसांचे शिबिर पुरेसे ठरत नाही , म्हणून सातपुड्यात शिबिर संपल्यानंतरही अनेक जण येत राहतात. जे शिबिरात येऊ शकले नाहीत पण ज्यांना सातपुड्यात यायचे असेल ते कधीही येऊ शकतात . आपले स्वागतच असेल . शहरी शिक्षित वर्गाने जल- जंगल - जमिनीशी तादात्म पावलेल्या आदिवासींशी संवाद साधत ,त्यांच्याकडून खूप काही शिकून घेत ,सर्व सीमा रेषांना तिलांजली देत नितळपणे वाहणाऱ्या नदीकडून ऊर्जा घेत जगणं समृद्ध करावं इतकच !!सातपुड्यात जरुर या!- - संदिप देवरे

*महाराष्ट्रभरातील युवांसाठी, यंग फाउंडेशन  आयोजित " युवा संवाद शिबिर " 2026*आदिवासी संस्कृती समजून घेऊया...!       निसर्...
11/02/2026

*महाराष्ट्रभरातील युवांसाठी, यंग फाउंडेशन आयोजित " युवा संवाद शिबिर " 2026*
आदिवासी संस्कृती समजून घेऊया...!
निसर्गपुजक ,जल - जंगल - जमिनीशी तादात्म पावलेल्या आदिवासी बांधवांचे लोकजीवन व निसर्गसंवर्धन करणारी आदिवासी संस्कृती समजून घेण्यासाठी युवांनी आदिवासी भागातील लोकांशी संंवाद साधावा. हा उद्देश समोर ठेवत सातपुड्यात नर्मदा नदीच्या निसर्गरम्य परीसरात युवा संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत परीसरातील दुर्गम भागात कार्यरत ,यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील युवांसाठी सहावे ' युवा संवाद शिबिर ' दि. 27 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 दरम्यान ,सातपुड्याच्या दुर्गम उडद्या पाड्यांत (ता.धडगाव जि.नंदुरबार) आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणेः-
*वयोमर्यादा* - 19 ते 40 वर्षे
*शिबिर शुल्क* - 2000/- (येच्छीक)
शिबिरात फक्त 30 युवक युवतींसाठी प्रवेश मर्यादित.
नाव नोंदणीची अंतिम मुदत - 25 फेब्रुवारी 2026
ठिकाण - उडद्या पाडा ( सातपुडा - नर्मदा नदी परीसर ) ता.धडगाव जि.नंदुरबार
सामाजिक कामाची आवड असलेल्या व आदिवासी संस्कृती समजून घेण्यास ईच्छुक युवांना प्राधान्य .
*शिबिराचे वैशिष्ट्ये*
• सातपुडा पर्वतरांगेत नर्मदा नदीच्या निसर्गरम्य परीसरात शिबिराचे आयोजन.
• सातपुड्यातील आदिवासीं बांधवांसोबत थेट संवाद.
• वीज ,रस्ते, मोबाईल नेटवर्क नसलेल्या दुर्गम पाड्यांवर भेटी.
• डोंगर दरीत व नर्मदा नदीच्या परिसरात भटकंती
• स्वभानाबरोबर समाजभानाची जाणिव निर्माण व्हावी यासाठी गटचर्चा.
• आदिवासी भागातील सर्वात मोठा, होळी उत्सव अनुभवण्याची संधी.
• भोजन व निवासाची व्यवस्था संस्थेकडून येईल
• शिबिरार्थिंनी स्वखर्चाने प्रवास करून शिबिरस्थळी पोहचावे.
• डोंगर दरी असलेल्या दुर्गम भागात व पुरेशा सोई सुविधा नसलेल्या ठिकाणी थांबण्याची तयारी असावी.
*शिबिराविषयी अधिक माहीती व नाव नोंदणीसाठी* 7588001508,9552135860,9823235945

सातपुड्यातल्या  धडगाव तालुक्यातील कढईपाणी पाड्यात, निसर्ग संवाद शाळेची सुरवात झाली. शाळेचे उदघाटन विद्यार्थ्यांना नेहमीच...
10/02/2026

सातपुड्यातल्या धडगाव तालुक्यातील कढईपाणी पाड्यात, निसर्ग संवाद शाळेची सुरवात झाली. शाळेचे उदघाटन विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करणारे रूपक गरुड व त्रिलोक दादा यांनी केले.

सातपुड्यातल्या दुर्गम भागातलं हे दाहक वास्तव आहे. सरकारी यंत्रणा केवळ नावालाच. दुर्गम भाग असल्याने सामाजिक संस्था देखील ...
08/12/2025

सातपुड्यातल्या दुर्गम भागातलं हे दाहक वास्तव आहे. सरकारी यंत्रणा केवळ नावालाच. दुर्गम भाग असल्याने सामाजिक संस्था देखील या भागात येत नाहीत.अशा प्रकारच्या अनेक घटना या भागात काम करताना बघितल्या आहेत. माध्यमाना सांगूनही कोणी बातमी, स्टोरी करायला या भागात येत नाहीत. रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क,शिक्षण, पाणी इतर कोणत्याही मूलभूत सोई नसलेल्या या भागात आदीवासी बांधव अत्यंत हालखीचे जीवन जगतात.
दैनिक दिव्य मराठीने दुर्गम भागात येऊन या घटनेची दाखल घेतली तसं इतर प्रसार माध्यमानी देखील या भागात यायला हवं. तथाकथित महासत्ता, विश्वगुरू व बिलीयन ट्रिलीयन च्या गप्पा करणार्यांना ही वास्तवदर्शी परिस्तिथी दाखवायला हवी.सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी या आदिवासी बांधवांपर्यंत अजूनही मूलभूत सोईसुविधा पोहचलेल्या नाहीत. हे वास्तव अनुभवण्यासाठी व मदतीसाठी सातपुड्यात जरूर या...
- संदीप देवरे

24/11/2025

सातपुड्याच्या दुर्गम भागात नर्मदेच्या काठावर असलेल्या पाड्यात, शाळेत मुलांना आणण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो.
यंग फॉउंडेशनच्या हाद्री येथील निसर्ग संवाद शाळेतील विद्यार्थी...
या मुलांशी संवाद साधायला सातपुड्यात जरूर या ✍️

स्वातंत्र्यानंतर आदिवासी पाड्यात  पहिल्यांदाच तिरंगा झेंडा फडकला...    सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ते वीज मोबाईल नेटवर...
17/08/2025

स्वातंत्र्यानंतर आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच तिरंगा झेंडा फडकला...
सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ते वीज मोबाईल नेटवर्क शाळा नसलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिवस सर्व लोकांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या उडद्या, पाटपाडा, खापरमाळ परिसरात काही पाड्यात अजून पर्यंत स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक ध्वजारोहण झालेले नव्हते, यंग फाउंडेशन व डीजेड फाउंडेशनच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांसाठी सुरू असलेल्या निसर्ग संवाद शिकवणी वर्गात शिकणाऱ्या मुलांनी पहिल्यांदाच प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या.
खरंतर या भागात अलीकडे ग्रामपंचायती झालेल्या आहेत ग्रामसेवक व सरकारी यंत्रणांनी इकडे स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक ध्वजारोहण करणे गरजेचे होते मात्र कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने इकडे येऊन स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची तसदी घेतली नाही.या भागात अद्याप विकास पोहचलेला नाही अन स्वातंत्र्य दिनही कधी साजरा झालेला नाही. किमान संविधानाचे महत्त्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे राष्ट्रीय सण उत्साहात साजरे करणे गरजेचे आहे. आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांनी व बच्चे मंडळींनी स्वातंत्र्य दिनाच्या या पहिल्या वहिल्या कार्यक्रमात अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला ही गोष्ट आमच्यासाठी खूप आनंददायी ठरली.
नर्मदेच्या खोऱ्यातील या पाड्यात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी मंदार कर्वे Trilok Khairnar,Ashish Agashe डाँ.कविता, वेळ काढून सातपुड्यात आले. Thanks Roopak Garud!

सततच्या पाऊस व जोरदार हवेमुळे, जमीन खचून, गुऱ्हाळपाणीत टेकडीवर पाच वर्षांपूर्वी उभारलेली बांबूशाळा काल कोसळली. जीवितहानी...
13/07/2025

सततच्या पाऊस व जोरदार हवेमुळे, जमीन खचून, गुऱ्हाळपाणीत टेकडीवर पाच वर्षांपूर्वी उभारलेली बांबूशाळा काल कोसळली. जीवितहानी झाली नाही मात्र शाळा पूर्णपणे उध्वस्त झालीय. आता पुन्हा नव्याने बांबूशाळा उभी करावी लागेल... आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे ✍️

धन्यवाद दैनिक दिव्य मराठी....
01/07/2025

धन्यवाद दैनिक दिव्य मराठी....

जे .पी.नाईक शिक्षणमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला....              वैनाकाठ फाउंडेशन  या  भंडारा येथिल साहीत्य सांस्कृत...
11/05/2025

जे .पी.नाईक शिक्षणमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला....
वैनाकाठ फाउंडेशन या भंडारा येथिल साहीत्य सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत संस्थेने सातपुड्यातल्या कामाची दखल घेत ,(कोणत्याही औपचारिक प्रवेशिका न मागवता ) , पुरस्कारासाठी निवड केली. भंडारा येथे जेष्ठ कवी ,विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते , जे.पी.नाईक शिक्षणमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला .
यावेळी साहीत्य क्षेत्रातीलही काही पुरस्कारही प्रदान करण्यात आले तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे यांनाही समाजमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला . संस्थेचे अध्यक्ष लखनसिंह कटरे ,उपाध्यक्ष अमृत बन्सोड व सचिव विवेक कापगते यांनी अतियशय दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केले . या कार्यक्रमासाठी प्रमोदकुमार अणेराव यांनी विशेष परीश्रम घेतले. धन्यवाद वैनाकाठ फाउंडेशन व समस्त स्नेहीजनहो !!!

धुळ्याचा सांस्कृतिक  नकाशा प्रगल्भ होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे - प्रा.डॉ. शरद बाविस्कर " पट्यारा " पुस्तकाच्या  प्रका...
06/04/2025

धुळ्याचा सांस्कृतिक नकाशा प्रगल्भ होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे - प्रा.डॉ. शरद बाविस्कर
" पट्यारा " पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा....
धुळे येथिल संतोष शिंदे लिखित व मनोविकास प्रकाशीत पट्यारा या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला . यंग फाऊंडेशन आयोजित या प्रकाशन सोहळ्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्ली येथील फ्रेंच तत्वज्ञानाचे प्रा डॉ .शरद बाविस्कर म्हणाले की , कुठल्याही भागाचा भौगोलिक नकाशा हा त्याचा किमान आधार असतो. साहित्यिक आणि वैचारिक नकाशांमुळे मात्र आपल्याला खरी ओळख प्राप्त होते. स्वभान निर्माण होतं. सांस्कृतिक आत्मविश्वास निर्माण होतो. मात्र धुळ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर धुळ्याला भौगोलिक नकाशा आहे असं ठामपणे सांगता येतं. कारण येथे शैक्षणिक, वैचारिक, सांस्कृतिक कार्यक्रम किती घडतात? हा मोठा प्रश्न आहे. ज्या शहराला सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक ओळख नसते ते शहर न्यूनगंडात जगतो. त्यामुळे इतरांच्या ओंजळीने पाणी पिणं आणि राजकीय दृष्टीने दुर्लक्षित राहणं क्रमप्राप्त ठरतं.
म्हणून धुळ्यासारख्या भागात अगदी प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा वैचारिक आणि नैतिक जिवंतपणा टिकवणं सोपी गोष्ट नाही! अशा वातावरणात तग धरत संतोष शिंदे यांनी धुळ्याला आपल्या परीने साहित्यिक नकाशावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमात उपस्थित जेष्ठ लेखक बालाजी सुतार आपल्म्हया मनोगतात म्हणाले ,कोणत्याही लेखकाला घडविण्यात आईचे योगदान खूप मोठे असते . प्रतिकुल परिस्थितीत जगण्याचं बळ आईशिवाय शक्य नसतं .संतोष शिंदे यांच्या पुस्तकात फक्त त्यांचा जगण्याचा संघर्ष व यशोगाथा नाहीये तर जगण्याकडे चिकित्सकपणे बघत वैचारिक वाटचालही मांडलेली आहे ,म्हणून हे पुस्तक महत्वपुर्ण आहे .मुंबईहुन आलेल्या जेष्ठ पत्रकार अलका धुपकर ,पुस्तकातील लिखाणावर भाष्य करतांना म्हणाल्या की , स्वतःच्या व्यथा वेदनांची चिकित्सकपणे मांडणी करतांना लेखकाने आजुबाजूला घडणाऱ्या सामाजिक - राजकीय घडामोडींचीही दखल घेतली आहे ,म्हणून जाती- धर्मांच्या पलीकडच्या माणूसपण लेखकाला अधिक महत्वाचे वाटते . दारुचे व्यसन व कर्जबाजारीपणा यावर आपल्याकडे अजूनही काही ठोस काम होत नाही ,यामुळे कीतीतरी मुलांना मध्येच शिक्षण सोडून कामासाठी देशोधडीला लागावे लागते
पट्यारा चे लेखक संतोष शिंदे म्हणाले की , अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अगदी लहानपणापासून मिळेल ते काम करत आलो ,मात्र अशाही परिस्थितीत पुस्तकांचे वाचन मी करीत राहीलो ,यामुळेच स्वभानासोबत सामाजिक भानही जागृत झाले . महात्मा गांधीच्या विचारांनी संघर्षमय जगण्याला बळ मिळत गेले व वैचारिक जडण- घडणही होत गेली . म्हणून सर्वांनीच वाचन करणे फार महत्वाचे आहे .
यावेळी पुणे येथिल मनोविकास प्रकाशनाचे आशिष पाटकर यांनीही आपले मनोगत मांडले तर यंग फाऊंडेशनचे संदीप देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.कवी वृषभ अहीरे व चैताली गायकवाड यांनी सुत्रसंचलन केले, रविंद्र शिंदे यांनी आभार मानले . कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रकाश पाटील ,सुजय भालेराव ,प्रेम गवांदे ,अविनाश औताडे, मानव शिंदे इत्यादींनी परीश्रम घेतले

Address

Yung Foundation , Near Siddesh Computer Centre Vadibhokar Naka, Deopur , Dhule. Dist Dhule
Dhule
424002

Telephone

+917588001508

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yung Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yung Foundation:

Share