I Love Deolali

I Love Deolali माझे गाव माझा अभिमान..!

📌 राहुरी मध्ये मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन.!राहुरी दि. २० मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आप्पास...
20/03/2026

📌 राहुरी मध्ये मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन.!

राहुरी दि. २० मार्च
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आप्पासाहेब ढूस मित्र मंडळ, साऊ एकल महिला समिती., राहुरी तालुका वात्सल्य समिती.., एसबीआय फाउंडेशन मुंबई.., डॉ. माने मेडिकल फाउंडेशन, राहुरी.., युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान राहुरी.., सहारा फाउंडेशन देवळाली प्रवरा.. यांच्या संयुक्त विद्यमाने
शुक्रवार दि. २० मार्च- २०२६ रोजी संत गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी येथे सकाळी १० ते दुपारी ०२ वाजे पर्यंत राहुरी पंचक्रोशीतील एकल तसेच गरजू महिलांसाठी मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राहुरी येथील ओम शांती केंद्राच्या नंदा दीदी यांचे हस्ते फीत कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
राहुरी येथील महिलांनी व मुलींनी मोठ्या संख्येने या शिबिरात उपस्थित राहून सहभाग नोंदविला..
दिनांक २२ मार्च रोजी राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कूल येथेही याच पद्धतीने महिलांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात येत असून.. या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन साऊ एकल महिला समिती व आप्पासाहेब ढूस मित्रमंडळाचे वतीने करण्यात येत आहे.
राहुरी येथील शिबिराचे उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, श्री व सौ. विद्याताई करपे, सौ वर्षा पाटील, राहुरी येथील ओम शांती केंद्राच्या प्रमुख नंदा दीदी, प्रहार चे देवळाली प्रवरा शहर संघटक गणेश भालके, डॉ माने मेडिकल फाउंडेशन चे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे, श्री रोग तज्ञ डॉ वैशाली बल्लाळ, डॉ. ऐश्वर्या आरंगळे, डॉ हर्षदा पवार, स्टाफ नर्स अश्विनी शिंदे, प्राची चौधरी, खुशी साळवे, पोपट आघाव, लॅब टेक्निशन दिपाली वाघमारे, शोभा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते...

गोष्ट.. "एका" लग्नाची..!      आमचे मार्गदर्शक तथा साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक.. मा. श्री. हेरंब कुलकर्णी सर.. य...
15/03/2026

गोष्ट.. "एका" लग्नाची..!
आमचे मार्गदर्शक तथा साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक.. मा. श्री. हेरंब कुलकर्णी सर.. यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे.. शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी अडीच वर्षांची मुलगी असलेल्या एकल भगिनीचा संसार पुन्हा उभा राहताना पाहून आज विशेष आनंद होत आहे..
मुलगा नितिन.. बिगर लग्नाचा.. आणि, मुलगी मोनिका.. एकल.. त्यातही तिला अडीच वर्षांची एक मुलगी.. त्यामुळे.. हा योग जुळून येणे तसे खूपच कठीण होते.. परंतु.., नितीनच्या मनाच्या मोठेपणामुळे मोनिकासह त्या लहान चिमुकलीला त्याने स्वीकारलेमुळे जिवन जगण्यासाठी त्या दोघींना कायमचा आधार मिळाला.. या नितीनचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या तरुणाईने राज्यातील तमाम एकल महिलांसाठी समोर येणे गरजेचे आहे.
हेरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली एकल महिलांसाठी राहुरी तालुक्यात काम करत असताना आमच्या कार्यकाळातील हा तिसरा विवाह योग जुळवून आणण्यात आज यश आले.
एकल भगिनी मोनिका.. आणि, नितीन.. दोघेही एकाच समाजातील.. दोघांचेही आई वडील राहुरी तालुक्यातीलच शेतीनिष्ठ शेतकरी.. या विवाहासाठी मुलीच्या वडिलांचे ते शब्द माझ्यासाठी फारच महत्त्वाचे होते.. ते म्हणाले की, आप्पासाहेब तुमचे बद्दल मी नेहमी वाचत व ऐकत आलो आहे.. तुम्हाला भेटण्याची खूप दिवसांपासून माझी इच्छा होती.. आज ती पूर्ण झाली.. अश्याच आणखी एका कामासाठी मी आपणास निवांत भेटायला येणार आहे.. त्यांच्या या बोलण्याने आम्ही करत असलेल्या कार्याची नोंद जनतेकडून ठेवली जाते ही त्याची पावतीच म्हणावी लागेल.. असो..
दोनही घरचे एकवेळ येणे जाणे झाले.. ओळख निघाली.. विचार जुळले.. लग्न ठरले .. आणि अखेर माझे दृष्टीने तो ऐतिहासिक लग्न सोहळ्याचा क्षण आला.. तालुक्यातीलच एका मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेड वजा सभा मंडपात साध्या पद्धतीने दि. १४ मार्च २०२६ रोजी लग्न ठरले.. सकाळी हळद.. व दुपारी लग्न.. असा एकाच दिवशी सर्व कार्यक्रमाची लगबग.. दोनही बाजूने अगदी बोटावर मोजण्या इतके मोजके पाहुणे.. दुपारचे दोन वाजत आले होते.. मुला मुलीच्या मेकअप मुळे लग्नाला उशीर होत होता.. सायंकाळी आम्हाला एक साखरपुडा कार्यक्रम असल्याने आवरते घेण्यासाठी वधू वराला व जवळच्यां नातेवाईकांना विनंती करत मी लग्न समारंभाच्या परिसरात फिरत असताना.. एक अडीच वर्षांची लहान मुलगी मला समोर दिसली.. अंगात लाल रंगाचा सुंदर फ्रॉक.. हातात खूप साऱ्या सुंदर बांगड्या.. सुंदर मेकअप.. आणि अशा अवस्थेत तिला एकटीच दूर अंतरावर अगदी एकाग्र चित्ताने मातीत खेळताना पाहून मी माझ्या मोबाईल मधे तिचा फोटो टिपला.. आणि, सहजच तिच्या समोर जाऊन दोन पायावर खाली बसलो.. व, काय करतेस बेटा.! असे विचारले.. अर्थात., त्या मुलीला मी लांबूनच ओळखले होते. ती मुलगी.. दुसरी तिसरी कुणी नसून.. या विवाहातील एकल वधूची ती एकुलती एक मुलगी होती.. त्यामुळे माझी पावले आपोआप तिच्यापुढे थबकली.. खाली बसलो.. आणि., पुन्हा विचारले.. काय करतेस बेटा.! यावर तिच्या उत्तराने मीही अचंबित झालो.. वय वर्ष फक्त अडीच वर्ष.. या वयात मुले बोलायला शिकतात.. त्या वयात ती मला तिच्या मातीने भरलेले हात दाखवून बोबड्या शब्दात म्हणते की, "घर बांधते.!" मी पुन्हा विचारले.. कशाला बांधते.. तर, ती म्हणाली.. "मम्माला..!"
तिचे हे शब्द माझ्या हृदयाचा ठोका चुकवणारे होते.. पुढे काय बोलावे मलाच सुचेना.. मी पटकन तिचे मातीचे हात झटकले.. आणि तिला उचलून घेतले.. हे पाहून एक महिला तिला घेण्यासाठी जवळ आली.. मला तर काय बोलावे सुचेना.. मी फक्त म्हटले की.., खूपच बोलते ही.. त्यावर त्या महिलेनेही ही मुलगी खूप लवकर बोलू लागली आहे असे सांगितले.. नंतर थोड्याच वेळात हा विवाह हिंदू धर्म प्रथा परंपरेनुसार सर्व सोपस्कारासह पार पडला.. पण त्या मुलीचे ते दोन शब्द मात्र.. आजही दुसऱ्या दिवशी डोक्यात घर करून बसल्याने ही लग्नाची गोष्ट लिहावी वाटली..
सांगण्याचे तात्पर्य.. आपल्या आईला घर हवे.. हे.., या चिमुकलीला समजले.. पण आपल्याला का समजत नाही.. आजही आपण आपला समाज जुन्या रूढी आणि परंपरेत अडकला आहे.. एकल (विधवा) विवाह म्हंटले की, आजही समाज वेगळ्या नजरेने पाहतो.. अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी या चिमुकलीचे ते दोन शब्द पुरेसे आहेत.
या निमित्ताने एकच विनंती आहे की.., आता.. समाजाने एकल विवाहासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जसा आज नितीन पुढे आला.. तसे तरुणांनी समोर येणे गरजेचे आहे.
चि. सौ.का. मोनिका आणि चि. नितिन यांच्या विवाहाचा जो फोटो येथे देत आहे त्यामध्ये नवरीचा आणि नवरदेवाचा तसेच त्यांच्या चिमुकलीचा चेहरा आम्ही ब्लर (पुसट) केला आहे.. त्यास कारणही तसे मोठे आहे.. यापूर्वी कोविड नंतर राज्यातील पहिला एकल विवाह आम्ही देवळाली प्रवरा गावामध्ये लावला.. त्या विवाहाची माहिती मिळाल्यानंतर... एका वधू वर सूचक मंडळाच्या कार्यकर्त्यांने या जोडप्याचे अभिनंदन करायचे आहे असे सांगून त्या जोडप्या सोबत फोटो काढला.. व आम्हीच हा विवाह लावला अशी वृत्तपत्रात खोटी माहिती देऊन स्वतःच्या वधू वर सूचक मंडळाच्या प्रसिद्धीसाठी त्या फोटोचा वापर केला.. आणि विवाह नोंदणीच्या नावाखाली भरपूर पैसा छापला.. ती बाब या जोडप्याला मान्य नाही.. त्यामुळे आम्हाला प्रसिद्धी नको असल्याने कृपया आमची सविस्तर माहिती कुणालाही देऊ नये असे या जोडप्याने मला स्पष्ट सांगितल्याने त्यांचा चेहरा पुसट करून हा लेख लिहिताना या जोडप्याची संपूर्ण माहिती येथे लपविली आहे.
त्यामुळे हेरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पार पडत असलेल्या विवाहाचे फोटो कोणत्याही वधू वर सूचक मंडळाने परस्पर वापरू नये.. विवाहाचा बाजार मांडणाऱ्या अशा काही संस्थांमुळे सुद्धा.. समाज असे विवाह करायला समोर येत नाहीत.. हेही तितकेच खरे आहे.. विवाह लावण्यासाठी अगोदर यांना पैसे मोजावे लागतात.. विवाह जमला तर आम्ही केला.. आणि नाही जमला तर तुमच्या नशिबानेच घडले नाही.. असे यांचे उत्तर असते.. यांच्याकडे भरलेला पैसा मात्र परत मिळत नाही.. हेही तितकेच खरे.. असो..
या विवाहाला.. कुटुंबातील सदस्य.. तसेच., प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला लाभले.. प्रसंगी.. हेरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात एकल महिलांच्या पुनर्विवाहाची जी चळवळ आम्ही सुरू केली आहे.. तिला या विवाहामुळे मूर्त स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे.. समाज गोष्टी स्वीकारू लागला आहे त्याचा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही.
त्यामुळे.. ही गोष्ट.. "एका" लग्नाची नव्हे.. तर, गोष्ट "एकल" लग्नाची असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नितिन आणि मोनिका या वधू-वरांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.. त्यांच्या हातून आई वडिलांची, सासू सासऱ्यांची आणि देशाची सेवा घडो.. हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.. या शुभाशीर्वादासह दोघांचेही हार्दिक अभिनंदन व पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
शब्दांकन..
आप्पासाहेब भिमराज ढूस,
आंतरराष्ट्रीय खेळाडू.. तथा..
सदस्य - मिशन वात्सल्य समिती, राहुरी.
तालुका निमंत्रक - साऊ एकल महिला समिती, राहुरी.
रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी
मो. ९८२३०३५९३६
゚ #विधवा_आरक्षण #एकल #विधवा #लग्न

10/03/2026
06/03/2026

अवास्तव पाणीपट्टी वाढीच्या विरोधात देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या विरोधात सर्वपक्षीय भव्य आंदोलन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस..
#पाणीप्रश्न #पाणी #मोर्चा ゚ Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य Deolali Pravara Municipal Council Bacchu Kadu Vaibhav Dhus Appasaheb Dhus Devendra Fadnavis

01/03/2026

📌 देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वाढीव पाणीपट्टी मागील गौडबंगाल..! भाग ०२
काही वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ बरेच काही सांगून जातो..
अवश्य पहा ..
#पाणीप्रश्न #पाणी ゚ Appasaheb Dhus Deolali Pravara l Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Deolali Pravara Municipal Council Bacchu Kadu #पाणी ゚

28/02/2026

📌 देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वाढीव पाणीपट्टी मागील गौडबंगाल..!

काही वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ बरेच काही सांगून जातो..
अवश्य पहा ..👇
゚ #पाणी Deolali Pravara Municipal Council Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Appasaheb Dhus प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र

27/02/2026

🔥 देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे पाणी तापले.!

📌 आम्ही सांगितलेले उपाय केले तर.. पाणी पट्टी जैसे थे.. नव्हे.., आणखी कमी करता येणे शक्य..!
आप्पासाहेब ढूस

#पाणी ゚

📌पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा धरणे आंदोलन..!नगरसेविका पल्लवी वैभव ढूस देवळाली प्रवरा - २५ मार्च देवळाली ...
26/02/2026

📌पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा धरणे आंदोलन..!
नगरसेविका पल्लवी वैभव ढूस
देवळाली प्रवरा - २५ मार्च
देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांना विश्वासात न घेता १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपये पाणीपट्टी वाढविण्याचा देवळाली प्रवरा नगरपरिषदेने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करा अन्यथा ०६ मार्च २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक व श्रामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी ओगले यांना २५ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
पल्लवी ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना आकारण्यात येणारी पाणीपट्टी ही त्यांच्या आर्थिक क्षमतेशी सुसंगत्व व्यवहार्य असणे आवश्यक आहे. तथापि, देवळाली प्रवरा नगरपरिषदेने बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक २० अन्वये नागरिकांना विश्वासात न घेता व विरोधी गटातील सदस्यांचा विरोध डावलून १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपये वाढविलेली पाणीपट्टी ही सद्यस्थितीत अवास्तव व जास्त असल्याबाबत नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांकडून त्यास कडाडून विरोध केला जात आहे. तसेच, या निर्णयाविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
सदर पाणीपट्टीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक विशेषतः मध्यम व अल्प उत्पन्न गटावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून नगर परिषदेच्या पाणीपट्टी वसुलीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक नागरिकांकडून पाणीपट्टी भरण्यात अडचणी येणार असल्याने नगर परिषदेची थकबाकी वाढण्याचा धोका त्यामुळे संभवतो.
राज्य शासनाच्या नियमानुसार पाणीपुरवठा योजना नो लॉस.. नो प्रॉफिट.. तत्त्वावर चालविण्यासाठी व नागरिकांवर पडणारा पाणीपट्टीचा भार कमी करण्यासाठी (१) नगरपरिषदेने प्रथम पाणीपुरवठा योजनेवर होणारे कोट्यावधी रुपयांची वीज बिल कमी करावे. त्यासाठी सौर वीज निर्मिती योजना कार्यान्वित करावी. तसेच (२) मुळा धरण ते देवळाली प्रवरा या मुख्य पाईप लाईनवर गेल्या दहा वर्षांपासून बारा ठिकाणी सुरू असलेले एक इंची २४ तास मोफत पाणी वाटपास जबाबदार असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन पाटबंधारे विभागाकडून मीटर द्वारे नगरपरिषद विकत घेत असलेल्या पाण्याच्या नासाडीची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करून या दहा वर्षात वाया गेलेल्या व सध्या वाया जात असलेल्या कोट्यावधी लिटर पाण्याची नुकसान भरपाई करून घ्यावी व ती नगरपरिषद पाणीपट्टीच्या थकबाकी मध्ये भरण्यात यावी. तसेच (३) पाणी पुरवठ्यावरील आस्थापना खर्च कमी करणेसाठी ठेका पद्धत बंद करावी व शासनाकडे नगरपरिषदेच्या आकृतीबंधात सुधारणा करून घेऊन पाणीपुरवठा विभागासाठी स्वतंत्र पदनिर्मिती करून कर्मचारी भरती करावी. आणि, ते शक्य नसेल तर नगरपरिषदेने पाणीपुरवठा वितरणाचे ऑटोमाईजेशन करावे. तसेच (५) पाणीपट्टीतून उभा राहिलेला लाखो रुपयांचा कर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा थकबाकी खात्यामध्ये भरण्याऐवजी अन्यत्र खर्च करणाऱ्या नगरपरिषदेच्या अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून वसूल करण्यात येऊन ती रक्कम पाणीपट्टी थकबाकी खात्यावर भरणा करून नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच (५) पाणी पुरवठ्याच्या मुख्य पाईप लाईनवर दिलेले सर्व नळ कनेक्शन शोधून ते सब लाईनवर टाकण्यात येऊन पाण्याची बचत करण्यात यावी. अशा उपाययोजना करणे ऐवजी प्रशासक कालावधीत पाणीपट्टी वाढविण्याचा ठराव झाल्याचे दाखवून नगरपरिषदेने नागरिकांची व नगरसेवकांची दिशाभूल केली आहे. व नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अवास्तव पाणीपट्टी वाढविण्याचा ठराव केला आहे. तो आम्हाला व नागरिकांना मान्य नाही.
सबब नगरपरिषेकडून पाणीपुरवठा सेवा ही मूलभूत गरज असल्याने ती नागरिकांना किफायतशीर व न्याय्यदरात उपलब्ध करून देणे नगरपरिषदेचे आद्य कर्तव्य आहे. याकरिता सदर ठरावामध्ये पुनर्विचार करून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने पाणीपट्टी दरात १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपयांची केलेली अवाजवी वाढ रद्द करण्यात यावी.
अन्यथा.., आम्ही दि.०६ मार्च २०२६ रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यालय येथे धरणे आंदोलन करणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. असे निवेदनाचे शेवटी पल्लवी ढूस यांनी म्हंटले आहे.
゚ #पाणी

25/02/2026
📌 आप्पासाहेब ढूस यांची महाराष्ट्र शासनाच्या मिशन वास्तल्य समितीवर अशासकीय सदस्य पदी निवड.!राहुरी - दि.२४ फेब्रुवारी २०२६...
24/02/2026

📌 आप्पासाहेब ढूस यांची महाराष्ट्र शासनाच्या मिशन वास्तल्य समितीवर अशासकीय सदस्य पदी निवड.!
राहुरी - दि.२४ फेब्रुवारी २०२६
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा साऊ एकल महिला समितीचे तालुका समन्वयक आप्पासाहेब भिमराज ढूस यांची महाराष्ट्र शासनाच्या तालुका मिशन वास्तल्य समितीवर अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार राहुरी यांनी ढूस यांना निवडीचे पत्र दिले आहे.
राज्यातील विधवा परित्यक्ता व एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी ढूस यांच्या निवडीची शिफारस केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे वतीने राज्यातील विधवा, परित्यक्ता एकल महिलांना मिशन वास्तल्य योजने अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका स्तरावर मिशन वात्सल्य समितीचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आलेली असून गटविकास अधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी, तालुका विधि सेवा प्राधिकरण, मुख्याधिकारी नगरपरिषद, तालुक्याचे पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका विस्ताराधिकारी समाज कल्याण पंचायत समिती, तालुका कृषी/ पशुसंवर्धन अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी, एकल /विधवा महिला व अनाथ बालकांचे पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचा प्रतिनिधी (अध्यक्षांद्वारे नामनिर्देशीत) आदी या समितीचे सदस्य आहेत तर तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
महाराष्ट्र शासनाने कोविड-१९ मुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी 'मिशन वात्सल्य' योजना (शासन निर्णय दिनांक २७ ऑगस्ट २०२१) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनाथ बालकांना व एकल महिलांना घरपोच विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, अर्थसहाय्य करणे आणि बाल संरक्षण व पुनर्वसन करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
गाव/शहरी स्तरावरील समितीमार्फत माहिती गोळा करून एकल महिलांना या समितीमार्फत शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो.
या योजनेचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाद्वारे जारी करण्यात आला असून, त्यात गरजू कुटुंबांना 'शासन आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत मदत देण्याचे निश्चित केले आहे.
मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत तालुक्यातील एकल/ विधवा महिला आणि अनाथ बालके यांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या तालुकास्तरीय समितीचे आहे. त्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन योजना, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, LIC किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, बँक खाते, आधार कार्ड, जन्म मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावण बाळ योजना, बालसंगोपन योजना, अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व फी, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, शुभमंगल सामूहिक योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना, वरील योजना व्यतिरिक्त राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आदीं योजनांचा यात समावेश आहे.
या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी सर तसेच राहुरीचे तहसीलदार साहेब यांचे ढूस यांनी आभार व्यक्त केले. प्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, हेरंब कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही पदावर नसताना यापूर्वी आम्ही तालुक्यातील जवळपास ३५० मुलांना बालसंगोपन योजना लागू करू शकलो, त्याचबरोबर तालुक्यातील कित्येक एकल भगिनींना शिलाई मशीन व हातगाडीचे वितरण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच तालुक्यातील बहुतेक अनाथ बालकांच्या नावे करून दिलेली डिपॉझिट रक्कम ही आणि अशी इतर कामे करताना आम्हाला मर्यादा येत होती. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने या महिलांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजनांचा तर त्यांना लाभ मिळणारच आहे. तथापि या सर्व नियमांच्या पलीकडे जाऊन तालुक्यातील सर्व एकल-भगिनींची गणना करून त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे ढूस यांनी सांगितले.
Bacchu Kadu Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Deolali Pravara Municipal Council Appasaheb Dhus Vaibhav Dhus ゚ #एकल #विधवा #विधवा_आरक्षण

विधवा भगिनींना स्वतंत्र आरक्षण असावे.!महाराष्ट्र राज्यात ..जातीनिहाय आरक्षण आहे.!दिव्यांगांना आरक्षण आहे.!भूमिहीनांसाठी ...
22/02/2026

विधवा भगिनींना स्वतंत्र आरक्षण असावे.!
महाराष्ट्र राज्यात ..
जातीनिहाय आरक्षण आहे.!
दिव्यांगांना आरक्षण आहे.!
भूमिहीनांसाठी आरक्षण आहे.!
प्रकल्प ग्रस्तांसाठी आरक्षण आहे.!
अंशकालीन आरक्षण आहे.!
भूकंप ग्रस्तांसाठी आरक्षण आहे.!
धरण ग्रस्तांसाठी आरक्षण आहे.!
माजी सैनिकांसाठी आरक्षण आहे.!
महिलांसाठी आरक्षण आहे.!
अनुकंपा आरक्षण आहे.!
आर्थिक दुर्बल घटक आरक्षण आहे.!
अनाथांसाठी आरक्षण आहे.!
खेळाडूंसाठी आरक्षण आहे.!
इतकेच नव्हे.. तर,
आमदार खासदारांना सुधा पेंशन आहे..!
मग..,
आमच्या विधवा भगिनींसाठीच आरक्षण का नको.?
त्यांचा तर..
नवरा गेला की त्यांचेवर आभाळच कोसळते..!,
आणि.., त्या फाटलेल्या संसारात त्यांना मुलांची आणि राहिलेल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची असते.. ती तारेवरची कसरत किती अवघड आहे हे फक्त एक विधवाच सांगू शकते..
म्हणतातना.. की, जावे त्याच्या वंशा.. तेव्हा कळे.
मग ती विधवा.. कोणत्याही जातीची असो..
जबाबदारी सर्वत्र सारखीच असते.. शासनाने विधवांसाठी जरी संजय गांधी निराधार योजने सारख्या योजना आखल्या असल्या तरी ती मदत संसाराचा गाडा हाकायला अत्यंत तुटपुंजी आहे. दिड हजारात तिने घर चालवायचे की, मुलांचे शिक्षण करायचे. दवाखाना व इतर कौटुंबिक गरजा तर बाजूलाच राहतात..
असो..
कोविड मध्ये आम्हा सर्वांना याची प्रकर्षाने जाणीव झालीच आहे..
त्यामुळे.. चला तर..,
राज्यातील विधवांसाठी स्वतंत्र आरक्षणाची एकमुखी मागणी करूया..!
विधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे.! या मागणीसाठी स्वतंत्र लढा उभा रहावा..
त्यासाठी सर्वांनी पुढे यावे ही नम्र विनंती. 🙏
आप्पासाहेब भिमराज ढूस,
देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर.
मो. ९८२३०३५९३६
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Bacchu Kadu ゚ #विधवा #एकल #आरक्षण #विधवा_आरक्षण

Address

Deolali Pravara
Devlali Pravra
413716

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I Love Deolali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to I Love Deolali:

Share