I Love Deolali

I Love Deolali माझे गाव माझा अभिमान..!

"देणाऱ्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी..! : देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा सवाल _शब्दांकन: आप्पासाहे...
20/07/2026

"देणाऱ्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी..!
: देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा सवाल
_शब्दांकन: आप्पासाहेब भिमराज ढूस, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर_

१९५४ मध्ये ग.दि. माडगूळकरांनी 'सीमा' चित्रपटासाठी लिहिलेल्या गीतातील ओळ आहे:
"पोटापुरता पसा पाहिजे.. नको पिकाया पोळी.. देणाऱ्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी."
देणारा मोठा आहे, पण घेणारा मात्र हतबल आहे, हेच या ओळींचे मर्म. गेल्या काही दिवसांत देवळाली प्रवरा नगरपरिषदेत घडणाऱ्या घटनांनंतर हीच ओळ वारंवार आठवते.

महाविकास आघाडीच्या वतीने नुकतेच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात "विकासासाठी भीक मांगो आंदोलन" करण्यात आले. या आंदोलनात मांडण्यात आलेल्या मुद्द्यांमुळे शहरातील मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

१. आषाढी वारीच्या वेळी पाणीटंचाई आणि प्रशासनाचे मौन..
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लहान-मोठ्या नऊ दिंड्या राहुरी फॅक्टरी परिसरात मुक्कामी होत्या. शनिवारचा दिवस म्हणजे गावचा आठवडे बाजार आणि महावितरणचा लोडशेडिंगचा दिवस. नेमके त्याच दिवशी नगरपरिषदेने "कोरडा दिवस" पाळला.

परिणाम: घरातील लोकांसाठी पाणी नव्हते, वारकऱ्यांसाठी पाणी नव्हते, शौचालयासाठीही पाणी शिल्लक राहिले नाही. नागरिकांसह आम्ही तातडीने मुख्याधिकाऱ्यांना आणि नगराध्यक्षांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर एक तास वाट पाहून परिस्थितीचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले.

याची दखल घेऊन राहुरी नगरपरिषदेने अर्ध्या तासात टँकर पाठवून दोन दिवस पाणीपुरवठा केला. मात्र याबद्दल आभार मानण्या ऐवजी देवळाली प्रवरा नगराध्यक्षांनी तब्बल आठ दिवसांनी सोशल मीडियावर "आम्ही पारनेर पर्यंत पाणी देतो" असे स्पष्टीकरण दिले. "टँकर बुक होते, दिंड्यांनी स्वतःचे टँकर ठेवायला हवेत" असेही त्यांनी म्हटले.

प्रश्न असा आहे: पाणीपट्टी १८०० रुपयांवरून ३००० रुपये केली असताना पूर्ण वेळ, पूर्ण दाबाने पाणी देण्याची जबाबदारी कुणाची?

२. विकासकामांना ब्रेक: क्रीडा संकुलाचा प्रस्ताव फेटाळला..
राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्याची मागणी श्रद्धांजली सभेत आम्ही केली. ग्राम सुधारणा मंडळाने जागा द्यावी.. आणि, नगरपरिषदेने उभारणी करावी, निधीसाठी धावपळ आम्ही करू, असे लेखी आश्वासनही देण्यात आले. नागरिकांनी एकमुखी पाठिंबाही दिला.

प्रस्ताव होता: कारवाडी जवळील पिण्याच्या पाण्याचा नगरपरिषदेचा बंद पडलेला तलाव, जी गावची जागा ग्राम सुधारणा मंडळाच्या ताब्यात आहे, तिथे क्रीडा संकुल. त्यासाठी नगरपरिषदेच्या डिपी प्लॅन मधील "पाण्याचे टॅंक" आरक्षण "क्रीडा संकुल" मध्ये बदलण्याची विनंती नगराध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे दादांच्या नावाने केलेल्या प्रेमाबद्दलच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

३. मूलभूत सुविधा रखडल्या..
रस्ते आणि चिखल: नुकत्याच झालेल्या पावसामुळे प्रसादनगर भागात रस्त्यावर पाणी आणि चिखल साचला. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना याबत कळवूनही "आर्थिक परिस्थिती बेताची आहे" असे उत्तर मिळाले. "आम्ही मुरूम आणतो, तुम्ही फक्त जेसीबी आणि ट्रॅक्टर द्या" हा आमचा पर्यायही अध्यक्षांकडून नाकारला गेला.

सार्वजनिक शौचालय: प्रसादनगर मधील सार्वजनिक शौचालयासाठी जानेवारीत आमचे आंदोलन झाले. निधी उपलब्ध झाला, लेखी आश्वासनही मिळाले. तरीही निविदा वारंवार नामंजूर करून गेल्या सहा महिन्यांपासून शौचालय बंद आहे. एकीकडे शौचालय बंद आणि दुसरीकडे उघड्यावर बसण्यास मनाई. नागरिकांनी जायचे कुठे?

स्मारक आणि जागा: प्रसादनगर येथील एकर दगडखान जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आम्ही लेखी मागणी करूनही कोणतीही प्रतिक्रिया नाही.

४. निधी असूनही कामे अडवणूक?
1. सोलर लाईट: आमदार हेमंत ओगले यांनी प्रभाग २, ४ आणि ७ साठी दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे एक कोटींचा निधी दिला. मात्र निविदा वारंवार पुढे ढकलून अद्याप लाईट बसवण्यात आलेल्या नाहीत.
2. रस्ता मजबुतीकरण: विधान परिषद सदस्य प्राजक्ता तनपुरे यांच्या निधीतून नगर-मनमाड महामार्ग ते साई मंदिर ते दळे-वरखडे वस्ती रस्त्यासाठी निधी मागितला आहे.
3. ८ एकर जागा: माजी मंत्री आमदार बच्चू कडू अक्षय कर्डिले, हेमंत ओगले, आणि नगरसेविका पल्लवी ढूस यांच्या पुढाकाराने आम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे ६०-७० वर्षांपासून बंद असलेली प्रसादनगर मधील ८ एकर दगडखान जागा क्रीडा संकुल, घरकुल, गार्डन आदी लोकोपयोगी कामासाठी मागितली आहे. ती लवकरच नगरपरिषदेला मिळणार आहे.

या सर्व संधी असूनही नगराध्यक्ष सहकार्याची भूमिका घेतील का, हा प्रश्न आहे.

निष्कर्ष: झोळी दुबळी की इच्छाशक्ती?..
"आम्ही पाण्याचे राजकारण करतो" असा आरोप नगराध्यक्षांनी आधीच केला होता. आता ३००० रुपयांचे बिल हातात आल्यावर नागरिकांना त्याचा अर्थ कळू लागला आहे.

एकीकडे हिंदू धर्माचा पुरस्कार आणि दुसरीकडे वारीतील वारकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणे, ही विसंगती आहे. आम्ही मीटर द्वारे विकत घेत असलेले पाणी मुळा धरण ते देवळाली पर्यंतच्या पाईप लाईन मधून बाहेर गावांसाठी लाखो लिटर पाणी वाया जाते, ते चालते. पण गावातील लोकांनी कोरडा दिवस पाळावा, हा हट्ट कितपत योग्य आहे?

निधी आहे, जागा आहे, लोकांचा पाठिंबा आहे. फक्त निर्णय घेण्याची इच्छाशक्ती हवी. अन्यथा "देणाऱ्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी" ही म्हण देवळाली प्रवरा शहराच्या कारभाराला तंतोतंत लागू पडेल.

नगराध्यक्षांनी विरोधकांसोबत संवाद ठेवावा व रखडलेली कामे मार्गी लावून शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.
धन्यवाद.!
---
Deolali Pravara Municipal Council Appasaheb Dhus Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Bacchu Kadu Vaibhav Dhus Shivaji Ghadge Devendra Fadnavis Prasad Dhus Pratik Phulpagar प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य Mosin Rafik Shaikh Raja Ram Kheware Maharashtra Live Hemant Ogale Adv Sachin P Kolsepatil Ravi Shete Patil Vishwas Patil #दिंडी #पाणी

📌 शिक्षणासाठी अनाथ मुलीला मदतीचा हात.📌 5 मिनिटांत उभी राहिली 15 हजारांची फी.देवळाली प्रवरा - दि.१५ जुलै २०२६आई-वडील दोघे...
15/07/2026

📌 शिक्षणासाठी अनाथ मुलीला मदतीचा हात.
📌 5 मिनिटांत उभी राहिली 15 हजारांची फी.

देवळाली प्रवरा - दि.१५ जुलै २०२६
आई-वडील दोघेही नसताना केवळ पैशांअभावी शिक्षण थांबणार या भीतीने सैरभैर झालेल्या राहुरीच्या कु. आरती (नाव बदलले आहे) या अनाथ मुलीच्या बीएससीच्या प्रवेशासाठी समाजाने एकत्र येत अवघ्या 5 मिनिटांत मदतीचा हात पुढे केला. सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांच्या आवाहनानंतर दानशूरांच्या मदतीने आरतीचे राजर्षी शाहू महाविद्यालयात आज दि.१५ जुलै रोजी बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश निश्चित झाला आहे.

दुःखाचा डोंगर, पण जिद्द कायम..
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आरतीचे वडील.. ती अवघी 4 वर्षांची असतानाच वारले. आईने दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून तिला दहावीपर्यंत शिकवले. दहावी ते बारावीच्या दरम्यान आई आजारी पडली. आजोबांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बारावीच्या परीक्षेपूर्वीच आईचे निधन झाले. या दुःखद प्रसंगातही आरतीने बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. मात्र घरात प्रचंड दारिद्र्य असल्याने पुढील शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला.

एक दिवसाची मुदत, आणि धावपळ..
आरतीच्या आईचे माहेर देवळाली प्रवरा येथे असल्याने तिची आजी तान्हूबाई या शेटे वाडी येथे मोलमजुरी साठी आल्या असताना त्यांनी आपली व्यथा देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन सोपान शेटे यांचे चिरंजीव नगरसेवक सचिन शेटे यांना सांगितली. त्याच दिवशी शाहू महाविद्यालयात बीएससीच्या प्रवेशाचा शेवटचा दिवस आणि 22,475 रुपये फी भरणे आवश्यक होते.

वेळ न दवडता सचिन शेटे यांनी राहुरी तालुका वात्सल्य समितीचे सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस यांच्याशी संपर्क साधला. शासकीय मदतीची वाट न पाहता ढूस यांनी काही व्हॉट्सअँप ग्रुपवर आरतीची व्यथा मांडून तातडीने मदतीचे आवाहन केले.

5 मिनिटांत प्रतिसाद, समाज उभा राहिला..
ढूस यांच्या आवाहनाला अवघ्या 5 मिनिटांत प्रतिसाद मिळाला. देवळाली प्रवरा येथील ओम शांती केंद्राच्या विजया दीदींनी मदतीचे आश्वासन दिले. मुंबईतील एका संस्थेनेही दरवर्षी 95% फी भरण्याची तयारी दर्शवली. मात्र तातडीने या वर्षाची फी भरणे गरजेचे असल्याने ढूस यांनी पुढाकार घेतला.

आप्पासाहेब ढूस यांच्या फोन-पे वर खालील दानशूरांनी लगेच मदत जमा केली:
1. शिवाजीराव कपाळे - साई आदर्श मल्टिस्टेट चेअरमन - 4,000 रु.
2. तुकाराम (दासू) पठारे - देवळाली नगरपरिषद काँग्रेस गटनेते - 2,000 रु.
3. वैभव आप्पासाहेब ढूस - अंतः अस्ति प्रारंभ - लेखक - 2,000 रु.
4. प्रशांत रामभाऊ काळे - राहुरी अर्बन पतसंस्था चेअरमन - 2,000 रु.
5. प्रदीप लक्ष्मण येवले - साई सेवा पतसंस्था चेअरमन - 1,000 रु.
6. जयश्री सतीश तनपुरे - शुभकिर्ती ग्रुप / ओम शांती केंद्र - 2,000 रु.
7. सोनल अक्षय घोरपडे - इंजिनिअर /ओम शांती केंद्र - 1,000 रु.
8. चंद्रकला सुदामराव मुसमाडे - गृहिणी/ ओम शांती केंद्र 1,000 रु.
9. हर्षदा बापूसाहेब पुजारी - शिक्षिका /ओम शांती केंद्र - 1,000 रु.
10. योजना सोमनाथ लोखंडे - योग प्रशिक्षक /ओम शांती केंद्र - 500 रु.

प्राचार्यांनीही दिली सवलत..
एकूण 15,725 रुपये जमा झाल्यानंतर आरतीसह सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस, नगरसेवक सचिन शेटे आणि सामाजिक कार्यकर्ते शरद खांदे यांनी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्वाती हापसे मॅडम यांची भेट घेतली. मॅडमने 22,475 रुपये फी मधील उर्वरित रक्कम माफ करून सहकार्य केले. अखेर ढूस यांनी आरती 15,725 रुपये फी भरून तिचा बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश निश्चित केला.

"आणखी एक मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये"..
यावेळी बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले, "मागील वर्षी फीअभावी एका मुलीने आत्महत्या केल्याची बातमी वाचली होती. त्यामुळे कोणतीही अनाथ मुलगी केवळ पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, याच भावनेतून हे आवाहन केले. तातडीने मदत करणाऱ्या सर्व दानशूरांचे मनापासून आभार."

आरतीने सर्व मदतकर्त्यांचे आभार मानले असून, आईचे स्वप्न पूर्ण करून मोठे होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे..
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Bacchu Kadu Appasaheb Dhus Vaibhav Dhus #मदत #अनाथ #शिक्षण

चहा पेक्षा किटली गरम..!"चहा पेक्षा किटली गरम" ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो. पण शनिवार दि. ११ जुलै २०२६ रोजी देवळाली ...
14/07/2026

चहा पेक्षा किटली गरम..!

"चहा पेक्षा किटली गरम" ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो. पण शनिवार दि. ११ जुलै २०२६ रोजी देवळाली प्रवरा येथे ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली... जेव्हा गावात पाणीटंचाईची इमर्जन्सी होती.., वारकरी मुक्कामी होते.., आणि, लोक मदतीसाठी हाका मारत होते.., तेव्हा जबाबदार यंत्रणा मात्र गायब होती. आणि, मधल्या फळीतील "पीए" मात्र मालकापेक्षा जास्त अधिकार गाजवत होता.

शनिवारचा दिवस देवळाली प्रवरा साठी कसोटीचा ठरला.
1. नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद ठेवला होता..
2. त्याच दिवशी महावितरणचा शटडाऊन..
3. गावचा आठवडे बाजार.. आणि, पंढरपूरला जाणाऱ्या ९ दिंड्या राहुरी फॅक्टरी परिसरात मुक्कामी..

घरोघरी १०-२० वारकरी वाढले होते. नगर-मनमाड महामार्ग दिंड्यांनी भरून गेला होता. सकाळी ९ वाजेपर्यंत घरातील शेवटचा ग्लास पाणीही संपले.. जारवाल्यांचे जारही रिकामे झाले.. अंघोळ आणि शौचालयासाठीही पाणी नाही.. अशी अवस्था झाली. नागरिकांचे फोन येऊ लागले. "काहीतरी करा" अशी आर्त हाक कानावर पडत होती..

त्यावेळी मी श्रीरामपूर मार्गे छत्रपती संभाजीनगरला कौटुंबिक कामासाठी निघालो होतो.. गाडी बेलापूरच्या दिशेने जात असताना मी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना ७-८ वेळा फोन केला. त्यांनी माझा एकही कॉल उचलला नाही.

शासनाचे स्पष्ट आदेश आहेत की, गावात पाणीटंचाई किंवा इमर्जन्सी असताना आणि दिंड्या मार्गस्थ होईपर्यंत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये.. तरीही मुख्याधिकारी गावाबाहेर आणि संपर्काबाहेर.

नाईलाजाने मी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना फोन लावला. फोन त्यांच्या पीएंनी उचलला. उत्तर आले, "दादा खूप मागे आहेत. फोन माझ्याकडे आहे. आम्ही पंढरपूरला सायकलवर आलो आहोत." मी म्हटले.. अत्यंत अर्जंट आहे, नगराध्यक्षांना फोन द्या.. किंवा, त्यांना मला कॉल करायला सांगा.. असा निरोप दिला. अर्धा तास झाला तरी परत फोन आला नाही.

मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मी बेलापूरवरून गाडी परत फिरवली.. आणि, थेट राहुरी फॅक्टरी परिसरातील नगर मनमाड महामार्गावर असलेल्या वाणी ओढा येथील हनुमान मंदिरात पोहोचलो.. जिथे दिंड्या थांबल्या होत्या.. तेथे उपस्थित असलेल्या वारकऱ्यांनी पाण्याअभावी नाराजी व्यक्त केली.. त्यांची देवळाली प्रवरा शहराच्या वतीने मी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.

येथील नगरसेवकांना थेट नगरपरिषद अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काम सांगण्याचा अधिकार नाही. हे सर्वश्रुत आहे.. आणि, वरिष्ठच उपलब्ध नसतील तर काय करायचे?.. शेवटी.. आम्ही घटनेचे फेसबुक लाईव्ह केले. त्याची दखल घेऊन राहुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे ताई आणि नगराध्यक्ष मोरे साहेब यांनी अर्ध्या तासात राहुरी नगरपरिषदेचा पाणी टँकर पाठवला. त्यांच्या तत्परतेमुळे शेकडो वारकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे राहुरी नगरपरिषदेने देवळालीची लाज राखली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.. त्याबद्दल राहुरी नगरपरिषदेचे आणि तनपुरे परिवाराचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

पण खरी खंत येथे आहे. की , आजकाल लोकप्रतिनिधींच्या पीए लोकांचे भाव वधारले आहेत. ते भाऊ , दादा आणि साहेबापेक्षाही जास्त "गरम" झाले आहेत.

जनतेची आणि लोकप्रतिनिधींची भेट होऊ नये यासाठी ही पीए मंडळी पद्धतशीरपणे काम करतात.. महादेवाच्या मंदिरातील नंदी प्रमाणे आधी यांचा मानपान ठेवा.. मगच, भेट होईल.. असा अलिखित नियम सध्या सर्वत्र सुरू झाला आहे. शनिवारीही हेच झाले. अत्यंत अर्जंट विषय असतानाही पीएंनी नगराध्यक्षांपर्यंत आमचा संपर्क होऊ दिला नाही. त्यामुळे देवळाली प्रवरा शहराची पाणी टंचाई उघड होऊ शकली.. याबद्दल त्या पीए चे आभार मानले पाहिजेत.. कारण कधी कधी वाईट गोष्टीतूनही काही चांगली निर्मिती होते..

इकडे नागरिक आणि वारकरी पाण्यासाठी तडफडत असताना, तिकडे "गेटकीपर" (पीए) मात्र दादाचा फोन सांभाळून आपला दरारा दाखवत होता. त्यामुळे लोकप्रतिनिधी जनतेचा आहे की पीएचा, हाच जनतेला प्रश्न पडला आहे.

शासनाचे आदेश कागदावर छान दिसतात.. पण अंमलबजावणी शून्य. एकीकडे आम्ही वारकरी परंपरा जपतो., दुसरीकडे त्यांनाच पाण्यासाठी वणवण करायला लावतो. एकीकडे हिंदू धर्माचे पुरस्कर्ते म्हणून आम्ही स्वतःला मिरवतो.. आणि दुसरीकडे मात्र त्याच हिंदू धर्मातील वारकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवतो.. हा कुठला न्याय.. की यांचा धर्म फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित आहे की काय? हे समजायला मार्ग नाही.. निवडणुका आल्या की आमचा धर्म उफाळून येतो.. वारकऱ्यांचे पाण्यापासून झालेले हाल पाहून मात्र कोणाचाही धर्म जागा होत नाही हे विशेष म्हणावे लागेल. असो..,

या घटनेतून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या.
1. संकटाच्या वेळी शेजारच्या राहुरी नगरपरिषदेने दाखवलेली माणुसकी..
2. आणि, आपल्याच नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांचा व पीए संस्कृतीचा बेजबाबदारपणा..

लोकांनी निवडून दिलेले लोक प्रतिनिधी.. आणि, त्यांचे अधिकारी.. हे जनतेचे सेवक आहेत, मालक नाहीत. आणि मधल्या पीएंनी हे लक्षात ठेवावे की तुमचा खरा मालक हा रस्त्यावर उभा असलेला नागरिक आहे.

त्यामुळे.. जर "चहा पेक्षा किटली गरम" होत राहिली.., तर, लोकांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास उडायला वेळ लागणार नाही.
क्रमशः

पुढील भाग ०२ लवकरच..

शब्दांकन..
आप्पासाहेब भिमराज ढूस,
देवळाली प्रवरा ता. राहुरी जि. अहिल्यानगर
मो. ९८२३०३५९३६
#चहा #किटली #लोकप्रतिनिधी Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Deolali Pravara प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य Bacchu Kadu प्रहार जनशक्ती पक्ष India Today प्रहार विद्यार्थी संघटना महाराष्ट्र PMO India

08/07/2026

📌राहुरी फॅक्टरीतील प्रसाद नगरच्या रस्त्यांची पावसाने दुरावस्था;
📌आप्पासाहेब ढूस यांच्या पाठपुराव्यानंतर तातडीने रस्ते दुरुस्तीचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचे आश्वासन.

राहुरी फॅक्टरी - ०८ जुलै २०२६
देवळाली प्रवरा शहरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे राहुरी फॅक्टरीतील प्रसाद नगर, प्रभाग क्रमांक ०७ मधील रस्त्यांची चांगलीच दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले असून, रस्त्यांवर मुरुम टाकून खड्डे तातडीने भरावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू *आप्पासाहेब ढूस* यांनी आज प्रसाद नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे झालेली रस्त्यांची अवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास त्यांनी स्वतः जाणून घेतला.

नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर ढूस यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे *नगराध्यक्ष सत्यजित कदम* आणि *मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील* यांच्याशी तातडीने चर्चा केली.

चर्चेदरम्यान नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत सदर भागाची पुन्हा पाहणी करून रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात येतील, असे आश्वासन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी दिले.

याबत बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले, "पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नगरपरिषदेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानुसार लवकरच या भागातील रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती होईल अशी अपेक्षा आहे."

नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर प्रसाद नगरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, काम लवकर सुरू व्हावे अशी मागणी केली आहे.

02/07/2026

📌 प्रसादनगर मधील स्मारक, घरकुल व क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी.📌आ. बच्चू कडूंच्या पत्रावर तत्काळ अहवाल सादर करण्याचे महसूल ...
01/07/2026

📌 प्रसादनगर मधील स्मारक, घरकुल व क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी.
📌आ. बच्चू कडूंच्या पत्रावर तत्काळ अहवाल सादर करण्याचे महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश.
📌प्रसादनगर मधील बंद दगड खाणीची आठ एकर जागा विकास कामांसाठी लवकरच नगरपरिषदेकडे वर्ग होणार - आप्पासाहेब ढूस

मुंबई, दि. ३०: देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ०७ प्रसादनगर मधील बंद पडलेल्या दगडखाणींची जवळपास आठ एकर जागा विकास कामांसाठी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांच्या पत्राचा संदर्भ देऊन विधान परिषद सदस्य तथा माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे पत्राद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मंगळवार दि. ३० जून रोजी महाराष्ट्र विधानमंडळातील मंत्री महोदयांच्या दालनात आप्पासाहेब ढूस यांनी आ . अक्षय कर्डिले यांचेसह समक्ष भेटून मागणी केली.
आ. बच्चू कडूंच्या पत्रावर तत्काळ अहवाल सादर करण्याचे मंत्री बावनकुळें यांनी महसूल प्रशासनाला आदेश दिले.

प्रसंगी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या पत्रासह राहुरीचे आमदार अक्षय दादा कर्डिले यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, व सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांची महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची भेट घडवून आणली आणि हे काम मार्गी लावण्याची विनंती केली. या विनंतीवरून बावनकुळे साहेबांनी महसूल प्रशासनाला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच या सर्व प्रक्रियेला गती देण्यासाठी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले तसेच आमदार अमित झनक यांचे विधान भवनात विशेष सहकार्य लाभले.

आप्पासाहेब ढूस यांच्या विनंती नुसार आमदार बच्चू कडू यांनी ३० जून २०२६ रोजी महसूल मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नगरसेविका सौ. पल्लवी वैभव ढूस यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, प्रसादनगर भागात महाराष्ट्र शासन बांधकाम विभागाच्या मालकीच्या ग.क्र. ५४४(क्षेत्र ०.३९), ग.क्र.७७१ (क्षेत्र०.६२), ग.क्र.७७२ (क्षेत्र०.६२), ग.क्र.७७३ (क्षेत्र०.५३), ग.क्र.७७४ (क्षेत्र०.४३), ग.क्र.७७५ (क्षेत्र०.१७), ग.क्र.७७६ (क्षेत्र०.४१) अशा लोकवस्तीमध्ये बंद दगडखाणीच्या जवळपास आठ एकर जागा आहेत. लोकवस्तीत असलेल्या या खोल खाणींमध्ये पावसाचे घाण पाणी साचून परिसरातील नागरिकांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढत आहे. तसेच या खाणी लोकवस्तीमध्ये असल्याने शासनाला या खाणी पुन्हा सुरू करणे शक्य नाही.

त्यामुळे या जागा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून मोफत घरकुल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांसारख्या महापुरुषांचे स्मारक, तसेच क्रिडांगण व गार्डन आदी लोकोपयोगी कामांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे सदर जागा देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडे वर्ग कराव्यात, अशी विनंती कडू यांच्या पत्राद्वारे आप्पासाहेब ढूस यांनी महसूल मंत्र्याकडे मागणी केली आहे.
याविषयी आमच्या प्रतिनिधींना माहिती देताना ढूस म्हणाले की, येथील एका दगड खाणीत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून नागरिकांना मोफत घरकुल देण्यासाठी आम्ही सात-आठ वर्षांपासून प्रयत्नशील आहोत.. तथापि, या जागा महाराष्ट्र शासनाच्या असल्याने व त्या नगर परिषदेकडे वर्ग नसल्याने घरकुलांना अडचणी येत होत्या. त्याच पद्धतीने दुसऱ्या दगडखानित महापुरुषांचे भव्य स्मारक उभारणीसाठी जागेचे हस्तांतरण हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाल्याने येथील महाराष्ट्र शासनाच्या सर्वच म्हणजे जवळपास आठ एकर दगड खाणीच्या जागा नगर परिषदेकडे वर्ग करण्याची विनंती आम्ही महसूल मंत्री महोदयांकडे केली. व त्यास मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या येथील घरकुल, स्मारक व क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
आमचे विनंतीस मान देऊन मंत्री महोदयांनी महसूल प्रशासनाला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्या बद्दल महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आ. बच्चू कडू, आ. अक्षय कर्डिले, आ. हेमंत ओगले या सर्वांचे देवळाली प्रवरा शहरवाशीयांच्या वतीने आप्पासाहेब ढूस यांनी प्रसंगी आभार मानले.
Deolali Pravara Municipal Council Appasaheb Dhus Deolali Pravara प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र Bacchu Kadu प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष Vaibhav Dhus

📌 दळे-वरखडे वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाला भरीव निधी देऊ - आ. प्राजक्त दादा तनपुरे राहुरी - दि. २६ जून २०२६देवळाली प्रवरा ...
26/06/2026

📌 दळे-वरखडे वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाला भरीव निधी देऊ - आ. प्राजक्त दादा तनपुरे
राहुरी - दि. २६ जून २०२६
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत प्रभाग क्र. ०७ मध्ये असलेल्या नगर मनमाड महामार्ग ते साई मंदिर मार्गे दळे-वरखडे वस्ती पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी भरीव निधी देऊ असे आश्वासन अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आ. प्राजक्तदादा तनपुरे यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांना व त्यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ०७ (प्रसादनगर) मधून निवडून आलेल्या नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी दळे-वरखडे वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला भरीव अर्थसहाय्य मिळणेसाठी निवेदन दिले. प्रसंगी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, श्रीराम संघटनेचे भारत मुसमाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पल्लवी वैभव ढूस यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी आ. प्राजक्तदादा तनपुरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
सर्वप्रथम.. आपली अहिल्यानगर जिल्ह्यातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन..!
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.०७ मध्ये दळे, वरखडे वस्ती परिसरात मोठी लोकवस्ती असून त्या भागात मोठे साई मंदिर असल्याने भाविकांची मोठी वर्दळ त्या भागामध्ये कायम असते. तसेच त्या भागामध्ये कुंभार समाजाचा मटका आदि बनविण्याचा मोठा व्यवसाय असून दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पावसाळ्यात दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सध्या तेथे अस्तित्वात असलेला कच्चा रस्ता नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे नगर मनमाड महामार्ग ते साई मंदिर मार्गे दळे वरखडे वस्ती पर्यंतचा जवळपास एक किलो मीटरचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.
सबब.. देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ०७ मधील नगर मनमाड महामार्ग ते साई मंदिर मार्गे दळे वरखडे वस्ती पर्यंतचा जवळपास एक किलो मीटरचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता आपले आमदार निधीतून भरघोस निधी मिळावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रसंगी आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी सदर रस्त्याच्या मजबुतीकर कामासाठी भरीव मदत देण्याचे आश्वासन आप्पासाहेब ढूस व शिष्टमंडळाला दिले. त्याबद्दल ढूस यांनी दळे वरखडे वस्तीवरील नागरिकांच्या वतीने आमदार तनपुरे यांचे आभार व्यक्त केले.
Deolali Pravara Justice प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य Deolali Pravara Municipal Council Vaibhav Dhus ゚

24/06/2026

शिका.., संघटित व्हा.., आणि संघर्ष करा..!विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिलेल्या या संदेशाच्या तत्वांवर आमच्य...
21/06/2026

शिका.., संघटित व्हा.., आणि संघर्ष करा..!
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिलेल्या या संदेशाच्या तत्वांवर आमच्या संकल्पनेतील हे भव्य स्मारक आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि आशीर्वादाने लवकरच साकारणार आहे याचा आम्हाला विश्वास वाटतो.
हे स्मारक उभारण्यासाठी भलेही आम्हाला पाच वर्षे लागोत.. त्यासाठी जे सोबत येतील त्यांना संघटित करून आणि जे विरोध करतील त्यांच्या विरोधात संघर्ष करून आम्ही आमची संकल्पना पूर्णत्वास नेऊ.!
जय भिम.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र.!
#स्मारक ゚ #संविधान #भीमार्मी Appasaheb Dhus Bacchu Kadu Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/06/2026

वडिलांबद्दल आस्था असणाऱ्यांनी पत्रकार विलास बडे यांचा हा व्हिडिओ नक्की पाहायला हवा..
#बाप

Address

Deolali Pravara
Devlali Pravra
413716

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I Love Deolali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to I Love Deolali:

Shortcuts

Share