Sach Ki Talaash- RTI DTC Forum

Sach Ki Talaash- RTI DTC Forum "Sach Ki Talaash is a social initiative by DTC Foundation dedicated to creating an aware, informed, and empowered India through RTI awareness.

"सच जानो, अधिकार पाओ!

“तूकाराम मुंढे यांची पुन्हा बदली… दिव्यांग कल्याणातून थेट आपत्ती व्यवस्थापनात!”तूकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करून त्या...
31/03/2026

“तूकाराम मुंढे यांची पुन्हा बदली… दिव्यांग कल्याणातून थेट आपत्ती व्यवस्थापनात!”

तूकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करून त्यांच्यावर एवढा अन्याय का?
किती दिवस हेच सुरू राहणार?

आधी हीवाळी अधिवेशनात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न फसला…
आता दिव्यांगांचे काम वेगाने सुरू असतानाच अशा पद्धतीने त्यांना बाजूला केल्याची भावना निर्माण होते.

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न, बोगस लाभार्थ्यांवर कारवाई आणि खऱ्या गरजूंपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.

याच काळात अनेक दिव्यांग बांधवांनी त्यांना “दिव्यांगांचा देव” अशी ओळख दिली. कारण त्यांनी केवळ प्रशासन चालवले नाही, तर विश्वास निर्माण केला.

पण चांगले काम सुरू असतानाच फक्त 8 महिन्यांत पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली. आता त्यांची नियुक्ती सचिव, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण येथे करण्यात आली आहे.

हा विषय फक्त एका अधिकाऱ्याचा नाही. हा प्रश्न त्या व्यवस्थेचा आहे, जिथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना वारंवार बदल्यांना सामोरे जावे लागते का, असा विचार करायला भाग पाडतो.

पद बदलले तरी काम करण्याची निष्ठा आणि जिद्द बदलत नाही, हे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. अशी अपेक्षा आहे की नवीन जबाबदारीतही तेच प्रामाणिकपण आणि कार्यक्षमता कायम राहील.

समाज म्हणून आपण अशा अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. कारण व्यवस्था बदलण्यासाठी प्रामाणिक लोक टिकणे गरजेचे आहे. Tukaram Mundhe

अजुन किती?लोकमत 30/3
30/03/2026

अजुन किती?
लोकमत 30/3

अजुन किती?मटा. 30/3/26
30/03/2026

अजुन किती?
मटा. 30/3/26

28/03/2026


चंद्रपूर हादरले! प्रेम प्रकरणातून लेकीनेच घेतला पोलीस बापाचा जीव; ३ वर्षांनंतर गुन्ह्याची उकल!चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत...
28/03/2026

चंद्रपूर हादरले! प्रेम प्रकरणातून लेकीनेच घेतला पोलीस बापाचा जीव; ३ वर्षांनंतर गुन्ह्याची उकल!
चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रेमासाठी कोणी कोणत्या थराला जाईल, याचा नेम नसतो. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रपूर मध्ये उघडकीस आलेले हे प्रकरण.

तब्बल ३ वर्षांनंतर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात रामनगर पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जयंत बाल्लावार हे पोलीस विभागात कार्यरत होते. ड्युटीवर असतानाच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, तब्बल ३६ महिन्यांनंतर या गुन्ह्याचा छडा लागला आहे. त्यांचीच मुलगी आर्या बाल्लावार हिने वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्या बाल्लावार हिचे आशिष शेडमाके याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना वडील जयंत बाल्लावार यांचा तीव्र विरोध होता. याच रागातून तिने हे धक्कादायक कृत्य केले.
या कृत्यासाठी आर्या बाल्लावार हिने तिचा मावसभाऊ चैतन्य गेडाम याच्याकडून ५ हजार रुपयांना विष विकत घेतले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने प्रियकर आशिष शेडमाके याच्यासोबत लग्नही केले. पण नियतीचा खेळ वेगळाच होता. लग्नानंतर आर्या बाल्लावार आणि आशिष शेडमाके यांच्यात सतत खटके उडू लागले. आशिष शेडमाके याला त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे पोलीस ट्रेनिंगमधून बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे तो बेरोजगार होता, तर आर्या बाल्लावार सासरी न राहता माहेरीच राहात होती.

याच कौटुंबिक वादातून संतापलेल्या आशिष शेडमाके याने अखेर पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःच्याच पत्नीचे बिंग फोडले. ज्या व्यक्तीसाठी आर्या बाल्लावार हिने स्वतःच्या वडिलांचा जीव घेतला, त्याच व्यक्तीने तिचे पितळ उघडे पाडले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी आर्या बाल्लावार, तिचा पती आशिष शेडमाके, विष पुरवणारा चैतन्य गेडाम आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या हातांनीच असा गुन्हा केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हिंदू, बौद्ध, शीख धर्माव्यतिरिक्त इतर धर्म मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला SC चा सदस्य मानले जाणार नाही.धर्मातर केल्यास अन...
25/03/2026

हिंदू, बौद्ध, शीख धर्माव्यतिरिक्त इतर धर्म मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला SC चा सदस्य मानले जाणार नाही.
धर्मातर केल्यास अनुसूचित जातींचे लाभ संपुष्टात येणार.

सर्वोच्च न्यायालय.

12/03/2026
11/03/2026

हाथ से मैला उठाना गैरकानूनी और अमानवीय है – इसकी रिपोर्ट करने या सहायता के लिए 14473 पर कॉल करें।  #मैला_उठाना_बंद_करें
09/03/2026

हाथ से मैला उठाना गैरकानूनी और अमानवीय है – इसकी रिपोर्ट करने या सहायता के लिए 14473 पर कॉल करें। #मैला_उठाना_बंद_करें

निष्पक्ष तपास ही पोलिसांची कायदेशीर जबाबदारी आहे. यात कसूर केल्यास अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करत ...
01/03/2026

निष्पक्ष तपास ही पोलिसांची कायदेशीर जबाबदारी आहे. यात कसूर केल्यास अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करत हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. कर्तव्यात कसूर व पुराव्यात फेरफार केल्याच्या आरोपांप्रकरणी पीएसआयना खटल्याला सामोरे जावे लागेल, असे न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी स्पष्ट केले.

विजय गाडवे यांचा २६ जून २०१८ रोजी यवतमाळ येथील सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. आवधूतवाडी पोलिसात सुरुवातीला अपघाती मृत्यू (एडी) नोंदविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण गळफास असे नमूद करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

९ जुलै २०१८ रोजी मृताच्या आईने मुलाची पत्नी व सासरच्यांनी हत्या केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टात धाव घेतली. जानेवारी २०२१ मध्ये हायकोर्टाने पोलिसांनी 'संशयितांची बाजू घेतली', पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदविले. मृतदेह रुग्णालयात आणला असतानाही रुग्णालयाला घटनास्थळ दाखविणे, गळफासास वापरलेली दोरी जप्त न करणे अशा विसंगतींकडे लक्ष वेधले. यवतमाळ पोलीस अधीक्षकांना सर्व संशयित व तपास अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, पोलिसांनी एकाच घटनेत एकाच मृत्यूला अकस्मात मृत्यू, हत्या व आत्महत्या असे स्वरूप दिले. हायकोर्टाच्या आदेशानुसार सर्व संशयितांसह पीएसआय ज्ञानेश्वर ढवळे यांनाही आरोपी केले.

हायकोर्टाची निरीक्षणे

पोलिस अधिकारी कायद्याचे पालन करून फौजदारी न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकविण्यास बांधील आहेत. निष्पक्ष तपास कायदेशीर जबाबदारी आहे. तपासातील निष्काळजीपणा केवळ कर्तव्यात कसूर नसून भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा आहे.

हे कायद्याचे उल्लंघन

एफआयआर रद्दसाठी पीएसआय ज्ञानेश्वर ढवळे यांनी आपण केवळ एडी चौकशी केली. न्यायालयाचे विशिष्ट निर्देश नव्हते, खोटी कागदपत्रे बनवली नाहीत. त्यामुळे १६६, १६६- अ व १६७लागत नाहीत, असा युक्तिवाद केला.

न्यायमूर्ती फलके हे फेटाळले. लोकसेवक म्हणून निष्पक्ष तपासाची कायदेशीर जबाबदारी होती. जबाबांवरून मृत्यू सासरच्त्या घरी झाल्याचे स्पष्ट होऊनही घटनास्थळी तपास न करणे व पुरावा ठरणारे साहित्य जप्त न करणे कायद्याचे उल्लंघन आहे, असे कोर्ट म्हणाले.

जनता गुलाम होऊन आपली दलाल व्हावी, असे देशातील सगळ्याच राजकीय पक्षांना वाटते!जनतेला वाटते सगळेच सरकारी खजिना लुटतात, मग आ...
20/02/2026

जनता गुलाम होऊन आपली दलाल व्हावी, असे देशातील सगळ्याच राजकीय पक्षांना वाटते!

जनतेला वाटते सगळेच सरकारी खजिना लुटतात, मग आपणही चिरीमिरीला लुटले तर कुठे बिघडले?

- जागरूक होऊयात

मोफत योजने मुळे राज्य व देश संकटात येईल याचा विचार राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करावा.

एकदा मोफत योजना सुरु झाल्या की त्या बंद करणे शक्य नाही बंद केल्या तर विरोधक रस्त्यावर येतात म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी मोफत देणे बंद करा!

गरजू असेल त्यांना मदत जरुरी आहे पण त्यांचें घरी जाऊन बघावे की या व्यक्तीची स्थिती काय?

🔷 नागपूर महानगर पालिका यांनी नागपूर येथे सुंदर व मजबूत स्टेनलेस स्टील च्या कचरा पेट्या लावल्या होत्या हे फोटो शाहू नगर त...
17/02/2026

🔷 नागपूर महानगर पालिका यांनी नागपूर येथे सुंदर व मजबूत स्टेनलेस स्टील च्या कचरा पेट्या लावल्या होत्या हे फोटो शाहू नगर ते तुकडोजी पुतळा रोड वरील आहे.पण संपूर्ण नागपूर मधील 99%कचरा पेट्या चोरी गेल्या फक्त त्याचे स्टँड दिसत आहे काही दिवसांनी हे स्टँड सुद्धा गायब होतील. प्रशासनाला तक्रार करुण दुर्लक्ष करतात.

नगराला नगर सेवक नव्हते आता नगर सेवक प्राप्त झाले त्यांनी कचरा पेट्या चोरी बाबत NMC प्रशासनाला जाब विचारावा हे चोर कोण? एखादी कचरा पेटी चोरी गेली हे समजू शकते पण संपूर्ण नागपूर मधील कचरा पेट्या चोरी जाणे म्हणजे कुंपणच शेत खाते अशी अवस्था झाली आहेत कित्येक तक्रारी केल्या महानगर पालिका आयुक्त हे सुध्दा लक्ष देत नाही व लाखो रुपयाच्या कचरा पेट्या चोरी जाते पण चौकशी होत नाही.

नविन नगर सेवक यांनी हा ज्वलंत प्रश्न सभागृहात उपस्थित करावा व चोर कोण हे पुढे आनावे सद्या शहरात कचरा पेट्याच नाही तर कचरा कूठे टाकतील? अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मागणी आहेत की कचरा पेट्याचे स्टँड वर तातडीने कचरा पेट्या लावाव्या व त्या दररोज खाली व्हाव्यात तेंव्हा शहर स्वच्छ राहतील.

Address

Pan
Delhi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sach Ki Talaash- RTI DTC Forum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share