31/03/2026
“तूकाराम मुंढे यांची पुन्हा बदली… दिव्यांग कल्याणातून थेट आपत्ती व्यवस्थापनात!”
तूकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करून त्यांच्यावर एवढा अन्याय का?
किती दिवस हेच सुरू राहणार?
आधी हीवाळी अधिवेशनात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न फसला…
आता दिव्यांगांचे काम वेगाने सुरू असतानाच अशा पद्धतीने त्यांना बाजूला केल्याची भावना निर्माण होते.
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न, बोगस लाभार्थ्यांवर कारवाई आणि खऱ्या गरजूंपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.
याच काळात अनेक दिव्यांग बांधवांनी त्यांना “दिव्यांगांचा देव” अशी ओळख दिली. कारण त्यांनी केवळ प्रशासन चालवले नाही, तर विश्वास निर्माण केला.
पण चांगले काम सुरू असतानाच फक्त 8 महिन्यांत पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली. आता त्यांची नियुक्ती सचिव, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण येथे करण्यात आली आहे.
हा विषय फक्त एका अधिकाऱ्याचा नाही. हा प्रश्न त्या व्यवस्थेचा आहे, जिथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना वारंवार बदल्यांना सामोरे जावे लागते का, असा विचार करायला भाग पाडतो.
पद बदलले तरी काम करण्याची निष्ठा आणि जिद्द बदलत नाही, हे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. अशी अपेक्षा आहे की नवीन जबाबदारीतही तेच प्रामाणिकपण आणि कार्यक्षमता कायम राहील.
समाज म्हणून आपण अशा अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. कारण व्यवस्था बदलण्यासाठी प्रामाणिक लोक टिकणे गरजेचे आहे. Tukaram Mundhe