बालाघाटचा बुलंद आवाज

  • Home
  • India
  • Bhir
  • बालाघाटचा बुलंद आवाज

बालाघाटचा बुलंद आवाज Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बालाघाटचा बुलंद आवाज, Non-Governmental Organization (NGO), Beed, Bhir.

📰 📚शैक्षणिक, 🔥राजकीय, सामाजिक🤝 घडामोडी आणि ताज्या बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ.
🚀 अचूक, वेगवान आणि निष्पक्ष घडामोडींसाठी आत्ताच 🔔'Follow' करा!
📍 वडवणी,बीड, महाराष्ट्र.

वडवणी तालुक्यात २७ मे च्या मध्यरात्री चक्रीवादळाचा हाहाकार; पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली! आंबा-केळी,चिंच,जांभूळ तसेच इ...
27/05/2026

वडवणी तालुक्यात २७ मे च्या मध्यरात्री चक्रीवादळाचा हाहाकार; पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली! आंबा-केळी,चिंच,जांभूळ तसेच इतर बागांसह सोलार सिस्टीमचे लाखोंचे नुकसान,तात्काळ मदतीची मागणी.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका आणि परिसरात दि. २७ मे च्या मध्यरात्री अचानक आलेल्या भीषण चक्रीवादळाने प्रचंड थैमान घातले. मध्यरात्रीच्या सुमारास सुटलेल्या या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले असून, यामुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घरांची पडझड; पत्रे हवेत उडाले, झाडे उन्मळून पडल

२७ मे च्या मध्यरात्री नागरिक गाढ झोपेत असताना अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगांच्या गडगडाटासह तीव्र वेगाने चक्रीवादळ धडकले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक घरांवरील छप्परे आणि लोखंडी पत्रे पत्त्यांसारखे हवेत उडून गेले. अंधारामध्येच अनेक ठिकाणी जुनी आणि मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर व घरांवर पडल्याने मोठी घबराट पसरली. वादळामुळे विजेचे खांब कोलमडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला
या मध्यरात्री आलेल्या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका वडवणीतील बळीराजाला बसला आहे. परिसरातील फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे:
आंबा व केळीच्या बागा उद्ध्वस्त: आलेल्या आंब्याच्या बागा भुईसपाट झाल्या असून, केळीच्या झाडांचे कंबरडे मोडले आहे. इतर फळबागांचेही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
सोलार पॅनेल्सचे नुकसान: शासनाच्या व स्वतःच्या पैशातून शेतात बसवलेले महागडे सोलार पॅनेल्स वादळी वाऱ्यामुळे उडून गेले व त्यांचे तुकडे झाले. यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
"२७ मे च्या मध्यरात्री अचानक आलेल्या वादळाने आमचं सगळं काही हिरावून नेलं. बँकेकडून कर्ज काढून आम्ही आंबा आणि केळीची बाग जोपासली होती, ती एका रात्रीत मातीमोल झाली. आता जगायचं कसं, हाच मोठा प्रश्न आहे."
एक नुकसानग्रस्त शेतकरी, वडवणी.
प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप; तात्काळ मदतीची मागणी
रात्री झालेल्या या मोठ्या आपत्तीनंतर सकाळ उजाडताच नुकसानीचे भीषण वास्तव समोर आले. मात्र, अद्याप प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही, असा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. पंचनामे करण्यासाठी अद्याप महसूल किंवा कृषी विभागाचे अधिकारी बांधावर पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
1. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत.
2. कोणतीही दिरंगाई न करता आर्थिक मदत जाहीर करावी.
3. सोलार पंप आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
आता या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मायबाप सरकार आणि स्थानिक प्रशासन वडवणीतील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कधी आणि किती मदत जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चे नुकसान; तात्काळ मदतीची मागणी!
#वडवणी_चक्रीवादळ #बीड #नुकसानभरपाई #बळीराजा #शेतकरी #तात्काळ_पंचनामे ाहीर_करा #कृषी_विभाग #ब्रेकिंगन्यूज

🚨 बीड पोलीस दलात मोठे फेरबदल...तब्बल 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, बीड शहर, शिवाजीनगरसह अनेक पोलीस ...
25/05/2026

🚨 बीड पोलीस दलात मोठे फेरबदल...

तब्बल 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, बीड शहर, शिवाजीनगरसह अनेक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षकांनी प्रशासकीय तसेच विनंती बदली प्रक्रिया अंतिम करत आदेश जारी केले आहेत.

या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्या आणि कामकाजाला वेग येणार असल्याची चर्चा सुरू आहे. #बीड
#बीड_पोलीस
#पोलीस_बदली
#ब्रेकिंगन्यूज
#महाराष्ट्र_पोलीस
#बीडन्यूज
#ताज्याघडामोडी
#मराठी_न्यूज

रुई पिंपळा ग्रामपंचायतीचा डंका! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वडवणी तालुक्यात प्रथम क्रमांक; १५ लाखांचे बक्षीस प...
24/05/2026

रुई पिंपळा ग्रामपंचायतीचा डंका! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वडवणी तालुक्यात प्रथम क्रमांक; १५ लाखांचे बक्षीस पटकावले

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’ मध्ये वडवणी तालुक्यातील रुई पिंपळा ग्रामपंचायतीने घवघवीत यश संपादन केले आहे. या अभियानांतर्गत तालुका स्तरावर सर्वोच्च गुण मिळवून रुई पिंपळा ग्रामपंचायतीने *प्रथम क्रमांक* पटकावला असून, आता या ग्रामपंचायतीची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल ग्रामपंचायतीला *१५ लाख रुपयांचे विशेष बक्षीस* जाहीर झाले आहे.
रुई पिंपळा ग्रामपंचायतीने विविध विकासकामे, पारदर्शक कारभार, स्वच्छता, आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत हा बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘टीमवर्क’ आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचे फलित
या ऐतिहासिक यशानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थ, राज्य सरकार, ग्रामविकास विभाग, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन आणि सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. हे यश म्हणजे गावातील लोकसहभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या उत्कृष्ट ‘टीमवर्क’चे जिवंत उदाहरण असल्याचे सांगत संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे.
तालुका पातळीवर अव्वल ठरल्यानंतर आता रुई पिंपळा ग्रामपंचायत जिल्हा पातळीवरही आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. १५ लाख रुपयांच्या या विशेष बक्षीसामुळे गावातील उर्वरित विकासकामांना मोठी गती मिळणार आहे.*नेते व मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव*
रुई पिंपळा ग्रामपंचायतीच्या या यशामध्ये मार्गदर्शक आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून भाजप नेत्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री योगेश कदम यांच्यासह सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू व इतर मान्यवरांचे विशेष आभार आणि स्नेह व्यक्त करण्यात आला आहे.
गावाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे संपूर्ण वडवणी तालुक्यात रुई पिंपळा ग्रामपंचायतीचे कौतुक होत असून, इतर ग्रामपंचायतींसमोर या गावाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
Sanjay Andhale Mayur S Andhale
#मुख्यमंत्री_समृद्ध_पंचायतराज_अभियान #रुई_पिंपळा_ग्रामपंचायत #ग्रामविकास_विभाग

📢 महत्त्वाची बातमी: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!📝🎓बारावीचे गुणपत्रक (Marksheet) उद्या मिळणार! * बारावीच्या प...
24/05/2026

📢 महत्त्वाची बातमी: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!📝🎓
बारावीचे गुणपत्रक (Marksheet) उद्या मिळणार!
* बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर, आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रकाची (Original Marksheet) प्रतीक्षा संपली आहे.
उद्या, सोमवारी सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गुणपत्रकांचे वाटप केले जाईल.

भविष्यातील पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी (Admission) हे मूळ गुणपत्रक अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उद्या कॉलेजमध्ये जाऊन आपले गुणपत्रक वेळेत गोळा करावे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐👍

#बारावी_निकाल #गुणपत्रक #कॉलेज_अपडेट

 #उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातून शेतीसाठी तात्काळ पाणी सोडा; अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा #शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाक...
24/05/2026

#उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातून शेतीसाठी तात्काळ पाणी सोडा; अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
#शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वडवणी येथे कार्यकारी अभियंता व #तहसीलदारांना निवेदन

उर्ध्व कुंडलिका प्रकल्प सोन्नाखोटा येथून शेती पिकांसाठी तात्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग आणि तहसील कार्यालय वडवणी येथे एक जाहीर निवेदन देण्यात आले. शेती पिकांचे पाण्यासाठी मोठे नुकसान होत असल्याने प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर प्रशासनाने पाणी सोडण्यास उशीर केला, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला.
शिवसेना तालुकाप्रमुख विनायक मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून, पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
"शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासनाने सोन्नाखोटा प्रकल्पातून तात्काळ पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन करेल."
विनायकमुळे (तालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा)

निवेदन देतेवेळी तालुक्याभरातील शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने युवराज मामा शिंदे, अतुल राऊत, माजी सरपंच हारी पवार, सरपंच संजय धपाटे, गुलाबराव राठोड, सुभाष मस्के, अशोक जेधे, सूर्यभान खाडे, कल्याण शेळके, महायुद्ध शेळके, प्रकाश राठोड, भीमराव राठोड, बाबासाहेब मुळे, अंबादास जाधव, दत्ता गवळी, आनंद काळे, बाबुराव झोडगे, नवनाथ डोंगरे, दादासाहेब खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन पाणी सोडण्यासंदर्भात तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.
#शेतकरी_पुत्र
#शेती_पिके
#पाणी_सोडा
#शेतकरी_बचाओ
#पाटबंधारे_विभाग #शिवसेना

मा.श्री. विनायक (बप्पा) मुळे #वेगवानघडमोडी

कर्मवीर एकनाथराव आवाड स्मृतिदिनानिमित्त तेलगाव येथे अभिवादन सोहळा“हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा” – सागरताई इचके यांचे...
24/05/2026

कर्मवीर एकनाथराव आवाड स्मृतिदिनानिमित्त तेलगाव येथे अभिवादन सोहळा

“हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा” – सागरताई इचके यांचे आवाहन

मानवी हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष, आंबेडकरी व बहुजन चळवळीतील लढवय्ये नेतृत्व म्हणून ओळख असलेले कर्मवीर एकनाथराव आवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तेलगाव (ता. धारूर, जि. बीड) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानवी हक्क अभियानाच्या वडवणी महिला तालुकाध्यक्ष सागरताई इचके यांनी केले आहे.
कर्मवीर एकनाथराव आवाड यांच्या विचारातून आणि सामाजिक बांधिलकीतूनच मानवी हक्क अभियान या संघटनेचा उगम झाला. समाजातील वंचित, पीडित आणि बहुजन घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आक्रमक नेतृत्व आणि चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता घडविणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी तसेच बहुजन चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
तेलगाव येथील मानवी हक्क अभियान कार्यालयात होणाऱ्या या अभिवादन कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून गयाबाई एकनाथ आवाड उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब शिरसागर राहणार आहेत. तसेच मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्ली युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मिलिंद आवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मानवी हक्क अभियानाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, एकनाथरावजी आव्हाड यांच्यावर प्रेम करणारे अनुयायी तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कर्मवीर एकनाथराव आवाड यांना अभिवादन करावे, असे आवाहन सागरताई इचके यांनी केले आहे.

#वेगवानघडमोडी

🛑 ब्रेकिंग न्यूज: वडवणीच्या राजकारणात मोठी खळबळ! बाबरी मुंडे यांनी घेतली पंकजाताई मुंडे यांची भेट, 'घरवापसी'च्या चर्चांन...
23/05/2026

🛑 ब्रेकिंग न्यूज: वडवणीच्या राजकारणात मोठी खळबळ! बाबरी मुंडे यांनी घेतली पंकजाताई मुंडे यांची भेट, 'घरवापसी'च्या चर्चांना उधाण!

काही महिन्यांपूर्वीच आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले राजाभाऊ मुंडे यांचे पुत्र बाबरी मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील 'रामटेक' या शासकीय निवासस्थानी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांची भेट घेतली. या धक्कादायक भेटीमुळे वडवणी तालुका आणि बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
​🔹 भेटीचे कारण अस्पष्ट, पण राजकीय अर्थ मोठे!
​काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीत गेलेले बाबरी मुंडे अचानक पंकजाताईंच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नसले, तरी ही केवळ सदिच्छा भेट होती की यामागे काही मोठी राजकीय खलबतं सुरू आहेत, याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
​🔹 'घरवापसी' होणार का? तालुक्यात तर्क-वितर्क!
​बाबरी मुंडे यांनी पंकजाताईंना पुष्पगुच्छ देऊन भेट घेतल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे आगामी काळात बाबरी मुंडे पुन्हा एकदा भाजपमध्ये 'घरवापसी' करणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे. जर ही घरवापसी झाली, तर वडवणीच्या राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळू शकते, यात शंका नाही.
​💬 तुमचं काय मत आहे?
बाबरी मुंडे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करतील का? या भेटीमुळे वडवणीच्या राजकारणावर काय परिणाम होईल? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा!
Babri Munde
#वेगवानघडमोडी
#राजकीय

23/05/2026


*_राज्यातील सर्व शिक्षकांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढणे बाबत._*_यापुढे शिक्षकांचे पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय बिलं ...
23/05/2026

*_राज्यातील सर्व शिक्षकांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढणे बाबत._*
_यापुढे शिक्षकांचे पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय बिलं स्वीकारले जाणार नाही...👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Address

Beed
Bhir
431144

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बालाघाटचा बुलंद आवाज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share