किसान सभा

किसान सभा शेतक-यांची बलाढ्य व ध्येयवादी संघटना

12/06/2026

आज पथरी तालुका किसान सभोचा वतिने प्रचंड मोर्चा घेऊन तहसील कार्याल्यासमोर जीआरच होळि करणात आली.
All India Kisan Sabha

कर्जमाफीच्या अटी व देवस्थान जमीन विधेयकाच्या प्रश्नावर किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलनआक्षेप नोंदविण्यासाठी किसान सभेचे श...
11/06/2026

कर्जमाफीच्या अटी व देवस्थान जमीन विधेयकाच्या प्रश्नावर किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन

आक्षेप नोंदविण्यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ १२ जून रोजी पुण्यात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेणार

११ जून २०२६

गेल्या वर्षी अखिल भारतीय किसान सभा व इतर शेतकरी संघटनांनी हजारो शेतकऱ्यांच्या सहभागातून उभारलेल्या मोठ्या आंदोलनांच्या दबावामुळे भाजप-प्रणीत राज्य सरकारने अखेर या महिन्याच्या सुरुवातीला शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.

मात्र या कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी घालण्यात आल्या असून त्यामुळे लाखो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जातून खरी मुक्तता व्हावी यासाठी या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करत अखिल भारतीय किसान सभेने आज राज्यभर मोठी आंदोलने आयोजित केली.

किसान सभेच्या ऐतिहासिक लाँग मार्च आंदोलनांदरम्यान देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क देण्यासाठी कायदा करण्याचे राज्य सरकारने मान्य केले होते. त्यानुसार अलीकडेच राज्य सरकारने चर्चेसाठी विधेयकाचा मसुदा प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाखाली हे विधेयक आता स्थगित करण्यात आले असून तसा शासन आदेश काढण्यात आला आहे. हा निर्णय अत्यंत निषेधार्ह असून पिढ्यानपिढ्या देवस्थान व इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेला गंभीर अन्याय आहे. आजच्या राज्यव्यापी आंदोलनामधून सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला आणि विधेयक प्रक्रिया तात्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शेतकरीहिताच्या दृष्टीने विधेयकात आवश्यक सुधारणा करून तो तातडीने मंजूर करावा, अशीही किसान सभेने मागणी केली.

वरील दोन्ही ज्वलंत प्रश्नांवर आज ठाणे-पालघर, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वर्धा आदी २१ जिल्ह्यांत आंदोलने करण्यात आली. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शासन आदेशांच्या प्रतींची होळी करण्यात आली व संतप्त निदर्शने करण्यात आली.

कर्जमाफी योजनेनुसार २०१९ मध्ये कर्जमाफी मिळालेल्या आणि आता पुन्हा कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ₹ ५०,००० इतकीच मदत मिळणार आहे. तीही उर्वरित संपूर्ण थकबाकी आधी भरल्यासच मिळणार आहे. अशा प्रकारच्या सुमारे १२.७१ लाख शेतकऱ्यांचा या गटात समावेश होतो. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या २३.७३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. त्यांना केवळ ₹ ५०,००० चे प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद आहे, तीही अलीकडच्या काळात किमान चार वेळा नियमित कर्जफेड केल्याच्या अटीवर. याशिवाय आणखी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत.

राज्य सरकार ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात या अटींमुळे दिलासा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

२०२५ मधील अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीची पुरेशी भरपाई सरकारने दिलेली नाही. आता त्याच शेतकऱ्यांपैकी अनेकांना या जाचक अटींमुळे कर्जमाफीचा संपूर्ण लाभही मिळणार नाही. त्यामुळे सरकारने घातलेल्या अटींचा पुनर्विचार करून त्या लगेच मागे घ्याव्यात. निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते आश्वासन शब्दशः आणि पूर्ण करावे ही किसान सभेची मागणी आहे.

कर्जमाफी योजना केवळ पीककर्जापुरती मर्यादित न ठेवता कृषी अवजारे, सिंचन सुविधा, कुक्कुटपालन, इमू पालन, पॉलीहाऊस शेती तसेच इतर कृषी उद्देशांसाठी घेतलेल्या कर्जांचाही त्यात समावेश करावा. तसेच सोनेतारण कर्जे आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून घेतलेली कर्जेही माफ करावीत, अशी किसान सभेची मागणी आहे.

डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, डॉ. अमोल वाघमारे आणि इतर राज्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील किसान सभेचे शिष्टमंडळ १२ जून रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन आपले आक्षेप सादर करणार आहे. सरकारने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.

डॉ. अशोक ढवळे
जे. पी. गावित
डॉ. अजित नवले
उमेश देशमुख
All India Kisan Sabha Ajit Nawale Umesh Deshmukh J P Gavit जिवा पांडु गावित

04/06/2026

कर्जमाफी शासन आदेशाची अकोल्यात होळी

अकोले, अहिल्यानगर

कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळची कर्जमाफी आज पर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली व खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी किसान सभेने या आदेशाची राज्यभर होळी करण्याची हाक दिली होती.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे यानुसार अध्यादेशाची होळी करण्यात आली. उद्या व परवा सलग दोन दिवस राज्यभर हे होळी आंदोलन सुरू राहणार आहे.

सरकारने कर्जमाफी करताना, 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे. अत्यल्प पगारावर राबणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता 2 लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50 हजारावर बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे.

शेतकऱ्यांच्या या फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून तो राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

अकोले येथे झालेल्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अकोले शहरातील महत्मा फुले चौकात फसव्या कर्जमाफी अध्यादेशाचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी रद्द करा. सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. नियमित कर्जदार शेतकरी, शेड नेट, पॉली हाऊस शेतकरी, कुक्कुट पालन शेतकरी यांच्यासह सर्व पीक व शेती सुधारणा कर्ज माफ करा या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड सदशिव साबळे, गणेश ताजणे, लक्ष्मण घोडे, बाळासाहेब मधे, संगिता साळवे, हेमलता शेळके, दत्ता कोंडार, दिलिप हिंदोळे, आप्पा घोडे, वामन मधे यांनी केले.
#अकोले Ajit Nawale Umesh Deshmukh

04/06/2026

कर्जमाफी शासन आदेशाची किनवट येथे होळी.

शेतकरी विरोधी जाचक अटी, शर्ती माघे घ्या, सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करा.
किसान सभा जिंदाबाद!

फसव्या कर्जमाफीच्या जी आर ची सादोळा व नित्रुड येथे केली होळीशेतकऱ्यांना वेळोवळी सरकारने वेढ्यात काढले आहे आणि आज देखील त...
04/06/2026

फसव्या कर्जमाफीच्या जी आर ची सादोळा व नित्रुड येथे केली होळी

शेतकऱ्यांना वेळोवळी सरकारने वेढ्यात काढले आहे आणि आज देखील ते सातत्याने चालू आहे परंतु अखिल भारतीय किसान सभा ही एकमेव शेतकरी संघटना आहे की ज्या संघटनेने शेतकऱ्यांना कधीही गाफील ठेऊन सरकारला मॅनेज झाली नाही, कारण ही संघटना धोरणात्मक लढाई संपूर्ण देशात लढते.

आपल्या राज्यात सर्व संघटनांनी मिळून आंदोलन केले आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची तारीख ठरवायला शासनाला भाग पाडले. आज ती तारीख आली परंतु या गॅप मध्ये कर्जमुक्तीच्या आंदोलनात मुख्य भूमिका बजावली ते बच्चू कडू हे सरकारमध्ये सामिल झाले आणि सर्व डाव बदलला आणि शेतकऱ्याची सरकारने फसवणूक करायला सुरूवात केली. परंतु आजही किसान सभा रस्त्यावर आहे जी फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या हितासाठीच निर्णय घेईल.

याचाच एक भाग परवा सरकारने कर्जमुक्तीचा जी आर काढला आणि या जी आर मध्ये स्पष्ट सांगितले की या अगोदर ज्या शेतकऱ्यांची 2019 ला कर्जमाफी झाली असेल त्यांना फक्त 50000 रुपयापर्यंतच कर्ज मुक्त केले जाईल. म्हणजे या शेतकऱ्यांचे आज पर्यंत अतिवृष्टीने नुकसान झाले नाही का हा शेतकरी लुटला गेला नाही का असा सवाल आता शेतकरी नेते विचारतात.

परवा निघालेल्या या जी आर चा जाहीर निषेध करत राज्याचे शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी सर्व शेतकऱ्यांना आव्हान केले की या जी आर ची सगळीकडे होळी करा आणि या अहवानाला प्रतिसाद देत सादोळा व नित्रुड येथील शेतकऱ्यांनी सहभागी होऊन फसव्या जी आर चा निषेध करत जी आर ची होळी केली.

04/06/2026

सांगली जिल्ह्यातील धनगाव येथे कर्जमाफी योजनेच्या जीआर ची होळी करण्यात आली.
आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड गुलाब मुलाणी, रमेश पाटील, कृष्णदेव साळुंखे, अशोक साळुंखे, संभाजी यादव, शैलेश साळुंखे, शिवाजी साळुंखे, महादेव यादव यांनी केले.
Umesh Deshmukh

04/06/2026

उद्योगपतींसाठी सरकारने १६ लाख खोटी कर्जमाफ केले पण शेतकऱ्यांसाठी पान पुसण्याचा काम करीत आहे.

04/06/2026

अखिल भारतीय किसान सभा रायगडाने २जून २६ रोजी फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या फसव्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या शासन आदेशाची कामगार भवन बोकडविरा, उरण कार्यालयासमोर ३ जून २०२६ रोजी होळी केली.

04/06/2026

असंघटित कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत महिनाअखेर पर्यंत होणार बैठक

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when किसान सभा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share