Lokayat

Lokayat Self-funded social activists group
Join struggle against injustice, Join Lokayat! Life must be lived to the full, in the best possible way.

Lokayat is actually a thought process that has existed in India since Vedic times. It is a vision of life that rejects fatalism, is uncompromisingly rationalist, realist. All problems are man-made; one should face them, and not run away from them. This is the inspiration that Lokayati thought gives us. We accept this tradition. Hence the name of this forum is Lokayat. The aim of Lokayat is to brin

g together like-minded people, ordinary people who wish to take some initiative, who wish to do their bit for transforming society for the better, and to take up various activities with their co-operation. E-mail : [email protected]
Mailing List : [email protected]
Twitter : https://twitter.com/lokayat
SoundCloud : https://soundcloud.com/lokayat-pune
YouTube : https://www.youtube.com/user/lokayatpune

फोडाफोडीच्या राजकारणातून जनादेशाला वळसा?लोकसभेत बहुमत नसताना विरोधी पक्षांत फूट घालून घटनादुरुस्ती पुढे नेण्याचा प्रयत्न...
19/06/2026

फोडाफोडीच्या राजकारणातून जनादेशाला वळसा?

लोकसभेत बहुमत नसताना विरोधी पक्षांत फूट घालून घटनादुरुस्ती पुढे नेण्याचा प्रयत्न लोकशाहीपेक्षा सत्तागणिताला प्राधान्य देत असल्याची चर्चा वाढत आहे.

https://m.thewire.in/article/politics/defections-distorting-verdicts-nda-still-long-way-off-in-lok-sabha-inching-towards-majority-in-rajya-sabha


आणखी एका NEET विद्यार्थिनीची आत्महत्या!NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजवर 9 विद...
18/06/2026

आणखी एका NEET विद्यार्थिनीची आत्महत्या!

NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजवर 9 विद्यार्थ्यांची आत्महत्या होऊन देखील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला तयार नाहीत.

Source: https://timesofindia.indiatimes.com/education/news/how-many-more-neet-paper-leak-now-takes-life-of-coimbatore-aspirant-toll-rises-to-10/articleshow/131820483.cms

***de

मॅक्सिम गॉर्की यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
18/06/2026

मॅक्सिम गॉर्की यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

न्यायप्रिय राज्यकर्त्या, स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
17/06/2026

न्यायप्रिय राज्यकर्त्या, स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

जो जो जयाचा घेतला गुण | तो तो म्या गुरू केला जाण ||गुरुसी आले अपारपण | जग संपूर्ण गुरू दिसे ||मी ज्या-ज्या गोष्टी किंवा ...
16/06/2026

जो जो जयाचा घेतला गुण | तो तो म्या गुरू केला जाण ||
गुरुसी आले अपारपण | जग संपूर्ण गुरू दिसे ||

मी ज्या-ज्या गोष्टी किंवा व्यक्तींकडून काही चांगले गुण शिकलो, त्यांना मी गुरू समजले. आता माझ्या मनात गुरूचा भाव इतका भरला आहे की, संपूर्ण विश्व मला गुरूच दिसते. प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक व्यक्तीतून मला गुरू दिसतो.या ओळी संत एकनाथांनी गुरुविषयी घेतलेल्या उदार भूमिकेची सुंदर अभिव्यक्ती आहे.

#संतवाणी #एकनाथ #संत #वारकरी #विठ्ठल #प्रबोधन

✨ संत विचार प्रसारक मंडळ आयोजित एक दिवसीय वारकरी सत्संग🚩होय होय वारकरी 🚩🙏🏾प्रमुख उपस्थिती:✨ ह.भ.प. भारत महाराज जाधव✨ ह.भ...
11/06/2026

✨ संत विचार प्रसारक मंडळ आयोजित एक दिवसीय वारकरी सत्संग

🚩होय होय वारकरी 🚩

🙏🏾प्रमुख उपस्थिती:
✨ ह.भ.प. भारत महाराज जाधव
✨ ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर

🗓️ रविवार, 21 जून 2026
🕙 सकाळी 10 ते सायंकाळी 5
📍 ठिकाण: नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल, दांडेकर पुलाजवळ, सिंहगड रोड, पुणे.
गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/xZy5vzwnQ6yAbkGh9

सहयोग मूल्य: रु. 100/-

नोंदणीसाठी खालील गूगल फॉर्म भरणे आणि सहयोग मूल्य ऑनलाईन जमा करणे गरजेचे आहे:
tiny.cc/pune-satsang

संपर्क -
📞 ऋषिकेश: 94235 07864
📞 वर्षा: 80876 37469

संत विचार प्रसारक मंडळ द्वारा आयोजित "होय होय वारकरी" - एक दिवसीय वारकरी सत्संग सहयोग - संविधान जागर अभियान प्रमुख उ...

शहीद राम प्रसाद बिस्मिल यांना विनम्र अभिवादन!
11/06/2026

शहीद राम प्रसाद बिस्मिल यांना विनम्र अभिवादन!

“पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हरिजनांना मोकळं व्हावं, म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं हृदय. महार...
11/06/2026

“पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हरिजनांना मोकळं व्हावं, म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली. पंढरपूरची कळ दाबली, तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल. या रूपानं महाराष्ट्रातील सर्व जीवनांतील अस्पृश्यता नष्ट व्हावी, दुष्ट रूढीची कुलपं गळून पडावीत. मी माझ्या प्राणांचं तेल घालण्यासाठी उभा आहे...” असे उद्गार काढून पंढरपूरच्या मंदिरात हरिजन प्रवेशसाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून लढले ते आपले प्रिय साने गुरुजी.
मंदिर प्रवेशाचा मुद्दा जनसामान्यांत पोहोचावा म्हणून महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यातून गुरुजींनी दौरा केला. रोज ठिकठिकाणी पाच ते सहा जाहीर सभा होत. या सभांना प्रचंड गर्दी होई. हजारो स्त्री-पुरुष गुरुजींचे विचार ऐकत आणि त्यांना पाठिंबा देत. त्यांचा हा महाराष्ट्र दौरा चार महिने चालला. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात गुरुजींनी तब्बल 400 सभा घेतल्या. त्यातून मंदिर प्रवेशाबद्दलची जोरदार जनजागृती झाली. साने गुरुजींच्या सोबत सेनापती बापट, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी केवलानंद सहजानंद भारती, काकासाहेब बर्वे, आचार्य अत्रे या लोकनेत्यांच्या सहभागामुळं आणि संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, कुशाबा महाराज तनपुरे, दादा महाराज सातारकर आदी समाजधुरिणांसह सत्यशोधक सुधारक प्रबोधनाच्या चळवळीनं गुरुजींच्या आंदोलनाला पाठबळ दिलं.
मंदिर प्रवेशाबाबतच्या गुरुजींच्या प्रयत्नांना महाराष्ट्राच्या विविध भागांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हरिजन सेवक संघाच्या दस्तऐवजांनुसार, या सत्याग्रहादरम्यान 200 मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली करण्यात आली. साने गुरुजींच्या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून काही विहिरीदेखील खुल्या करण्यात आल्या. पंढरपूरमधील मंदिर खुलं व्हावं यासाठी हरिजन सेवक संघानं घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर 10 लाख लोकांनी सह्या केल्या. अखेर 1 मे 1947 रोजी साने गुरुजींनी पंढरपूरात प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली.
'त्यावरून कायदा होणारच आहे, मग उपोषण कशाला?' असाही प्रचार विरोधक करीत होते. गुरुजींना त्या वेळचे काँग्रेस श्रेष्ठीही तसा सल्ला देत होते. पण गुरुजींनी त्यांना नम्रपणे सांगितलं होतं, ‘असेंब्लीतल्या कायद्यापेक्षा मला हृदयाचा कायदा श्रेष्ठ वाटतो.’ 10 मे 1947 रोजी बडव्यांसोबत होणाऱ्या वाटघाटीला डोळ्यासमोर ठेवून गुरुजींनी आपलं 10 दिवसांचं उपोषण सोडलं.
मंदिर प्रवेशाच्या संघर्षाच्या दरम्यान ज्यांना हरिजनांचा मंदिर प्रवेश अमान्य होता, अशांनी विठ्ठलाचं तेज एका घागरीत कैद करून 'घागर विठोबा' प्रसिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रकार देखील केला होता! पुढं 30 ऑक्टोबरला कोर्टानं विरोधकांचे अर्ज फेटाळत मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्याच दिवशी पंढरपुरात जल्लोष साजरा करण्यात आला.
ज्या साने गुरुजींच्या अथक परिश्रमांच्या नंतर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले, त्यांचा आज स्मृतिदिन. साने गुरुजींना विनम्र अभिवादन!

09/06/2026

बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokayat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Lokayat:

Share