ग्रुपची स्थापना २००९ साली उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये झाली त्यावेळी ग्रुप नवीन असल्याने फक्त ४-५ विद्यार्थीच होते.
ग्रुप मध्ये २०११ पर्यंत जवळपास ७०-७५ विद्यार्थी सामील झाले होते .
फलटण फ्रेंड्स असोसिएशन हा ग्रुप पहिल्या पासूनच नि:पक्ष होता/आहे आणि राहणार.
आत्तापर्यंत ग्रुप मध्ये गरजू लोक/विद्यार्थी यांना जमेल अशी मदत आम्ही आमच्या परीने करत आलो आहोत.
फलटण मधील विविध शाळांमध्ये म्हणजे शाळा नं.५ (ब
ाहुली शाळा), हनमन्तराव पवार माध्यमिक विद्यालय असेच बर्याच शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके , शालेय उपयोगी साहित्य ग्रुप तर्फे देण्यात आली आहेत.
२०१२ मध्ये फलटण मधून ओंकार मोहिते हा IIT मध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला त्याबद्दल त्याचा सत्कार समारंभा दरम्यान त्याने ९वी -१०वी तील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अशा परीक्षांना कसे सामोरे जावे हे हि सांगितले.
३१ मार्च २०१२ रोजी फलटण मध्ये प्रथमच 'नेहरू नगर विकास प्रतिष्ठान' व 'फलटण फ्रेंड्स असोसिएशन' च्या संयुक्त विद्यमानाने प्रख्यात माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक श्री अविनाश धर्माधिकारी यांचे १० वी / १२ वी नंतर काय? या विषयावर मार्गदर्शन केले.
नोव्हेंबर २०१२ मध्ये स्वयंसिद्धा आयोजित फूड फेस्टिवल मार्फत गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून निधी किंवा त्यांना उपयोगी असे साहित्य लोकांकडून मिळवून ते गरजू विद्यार्थ्यान पर्यंत पोहचवण्यात आले.
सध्या ग्रुप मध्ये १०० हून अधिक विद्यार्थी कार्यरत आहेत.