19/08/2024
महाराष्ट्रातील राजकारणीहो,
गणेशोत्सव महारष्ट्राचा एक सर्वात मोठा सण...
१८९४ मध्ये टिळकांनी समाज एकत्र येण्याच्या उद्देशाने सुरु केलेला गणेशोत्सव आज लहान लहान गल्ल्यांमध्ये विभागला जाऊ लागला आहे. आजपर्यंत आपण गणेश गल्लीचा राजा. चिन्चपोकळीचा राजा असे गणपती पाहत आलो आहोत. त्यांची मनोभावे दर्शन हि घेत आलो आहोत. सांस्कृतिक आणि एकात्मता यांची सांगड आपण पाहत आलो आहोत. पण सध्या हे स्तोम इतकं भयानक झालं आहे कि, प्रत्येक राजकीय पक्षामुळे स्पॉन्सर करण्याची इतकी चढाओढ लागली आहे कि एकाच गल्लीत सुरुवातीला काँग्रेसचा गणपती, मध्ये भाजपचा आणि दुसऱ्या टोकाला शिवसेनेचा गणपती बसू लागले आहेत. एकाच गल्लीत ३-४ गणपती बसवून समाज एकत्रीकरणाच्या असा कोणता प्रयत्न हे आजकालचे राजकारणी करीत आहेत?. स्वतःच्या बॅनरबाजीसाठी भविष्यातील निवडणूका लक्षात घेऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारे राजकारणी याचे कान जनतेने पकडण्याही गरज आहे.
सार्वजनिक गणेशत्सवात होणारे बरेच गैरप्रकार आपल्या सर्वाना माहित नाहीत काय? यातूनवाया जाणारी तरुण पिढी पहिली नाही काय? तरुण मुलांचा वापर करून असे कार्यक्रम सुरु करायाचे. आपल्या नावाचे बॅनरबाजी करायची यापेक्षा यासर्वातून कोणता वेगळा हेतू हि मंडळी साध्य करीत आहेत.? कोणते सामाजिक उपक्रम गणेशोत्सवाच्या निमितताने राबवले जात आहेत. तुम्हाला गणेशत्सवाचं साजराच करायचा असेल तर. गणपतीची स्थापना करण्यावर अधिक भर देण्यापेक्षा स्वच्छता. रक्तदान शिबीर , गरीब मुलांना पुस्तकांचं वाटप करणं , तरुण मुलांना योग्य दिशा देण्यासाठी कार्य्रमाचे आयोजन करणं असे कित्येक सामाजिक हिताचे उपक्रम राबवलेत तर खऱ्या अर्थाने टिळकांचा गणेशोत्सव सुरु झाला असं म्हणता येईल.
तेव्हा हे राजकारणीहो स्वतःच्या सार्थसाठी समाजात विघटन करण्याचं आधी बंद करा. नाहीतर एक दिवस हाच समाज तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही . आणि मग तो गणपतीही तुम्हाला वाचवू शकणार नाही.
धन्यवाद.
सुहास शिर्के.