समतावादी प्रतिष्ठान ची स्थापना डिसेंबर 2018 मध्ये मुंबई इथे झाली. गेल्या 4 वर्षात. अनेक सामाजिक कार्यक्रम प्रतिष्ठान च्या माध्यमातून घेण्यात आलेत .
आदिवासी पाड्यांमध्ये, आरोग्य चिकित्सा शिबीर, अन्नधान्य वाटप, कपडे वाटप चे कार्यक्रम, पूर भागात, सांगली असो की कोकण, अन्नधान्य, पाकिटांचे वाटप. समतावादी प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर राहिली आहे. आरोग्य क्षेत्रात देखील खूप मोठं कार्य समतावादी प्रतिष्ठान च्य
ा माध्यमातून होत असतं.खेड्यापाड्यातून अनेक रुग्ण समतावादी प्रतिष्ठान आरोय विभागा मार्फत, सरकारी दवाखान्यात दाखल करून दिले जातात व रुग्णच्या मोफत उपचारासाठी संघटना सदैव प्रयत्नशील असते. SCAN,, व्हेंटिलेटर,तसेच अल्पदरात औषध उपलध करून देणे, रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत राहणायची व्यवस्था असे कोर काम संघटना करत असते.
पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या, सरकारी दफ्तर इथे अनेक कुटुंबाना समतावादी प्रतिष्ठान ने अडचणीच्या वेळी साथ दिली आहे व न्याय मिळवून दिला आहे. मग ते ऍट्रॉसिटी असो, फसवे बिल्डर असो, लडाई तंटे असो की आर्थिक फसवणूक, समतावादी प्रतिष्ठान सदैव पीडितान सोबत खंबीर पणे उभी राहिली आहे.
क्रीडा क्षेत्रात देखील GAMMA इंडिया ही ही 48 देशात कार्यरत असलेली मिक्स मार्शल आर्टस् ची असोसिएशन असून ज्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व पेट्रेन मा. अभिजित दादा देशमूख आहेत , ज्या मार्फत अनेक युवक युवतींना परदेशात खेळण्यास पाठविले आहे. ज्यांनी अनेक अंतराष्ट्रीय पदके जिंकून देशाचे नाव रोशन केले आहे.