03/12/2025
स्थलांतरित ऊस तोडणी वीटभट्टी मजूर यांच्या मुलांना शाळेत दाखल करणे टिकवणे याकरता उमेद फाउंडेशन मार्फत बालहक्क कार्यशाळा उत्साहात संपन्न
उमेद फौंडेशन गेली 10 वर्ष स्थलांतरित मुलाना शिक्षण प्रवाहात आणायचे सेवाकार्य करत आहे. सध्या मोठया प्रमाणात वीट भट्टी, ऊसतोडणी निमित्ताने मजूर स्थलांतर होऊन परजिल्ह्यातून कोल्हापूर जिह्यात आले आहेत. कोपार्डे ,कुडीत्रे (करवीर) माजनाळ , आसुरलें पोर्ले (पन्हाळा) असे 3 डे केअर सेंटर मार्फत सध्या 3 ते 14 वयोगटातील 75 मुलं उमेद फौंडेशन मार्फत नजीकच्या शाळेत दाखल केले आहेत. व उमेद डे केअर सेंटर चा लाभ घेत आहेत.
या अनुषंगाने स्थलांतरित बालकांच्या शिक्षण प्रवाहात दाखल करणे टिकवणे या हेतूने प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी , सरपंच , शा व्य समिती अध्यक्ष , शिक्षक ,वीटभट्टी मालक , ऊसतोडणी कंत्राटदार, पालक असे एकूण 50 पेक्षा अधिक मान्यवरांच्या उत्साही उपस्थितीत बाल हक्का बाबत असलेले कायदे नियम , विविध शासकीय विभागाचे कर्तव्य , अधिकार त्यांच्या अडचणी व त्यावरील उपाय यावर चर्चा करून कृती आराखडा या कार्यशाळेत तयार करण्यात आला .
विशेष म्हणजे वीट भट्टी मजूर महिला पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मा.श्री प्रकाश आंग्रे शिक्षण विस्तार अधिकारी , मा श्री बी.बी पाटील जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा ,जि.प.कोल्हापूर, श्रीमती मनीषा जाधव , सुक्रांती भागवत मॅडम (पंचायत समिती करवीर) सौ उर्मिला पाटील (सरपंच कुडीत्रे ), श्री तातोबा डांगे साहेब ,(अध्यक्ष वीट उत्पादक संघटना) उमेद फौंडेशन चे प्रकाश गाताडे
तसेच सौ, उर्मिला पाटील (सरपंच ,कुडीत्रे ) मा .शिवाजी पोवार (सरपंच माजनाळ) , श्री ज्योतिराम झेंडे (अध्यक्ष शा.व्या.स.माजनाळ), CHO डॉ स्नेहल पाटील, केंद्रसमनव्यक - महेंद्र स्वामी , आशाताई , अंगणवाडी सेविका , आरोग्य सेविका, शिक्षक यासह पालक डे केअर सेंटर उमेद स्टाफ टीम इत्यादी उपस्थित होते.