11/04/2026
📌 अखेर गीतादेवी बिहार येथील स्वगृही पोहचली.
📌 7 मुलांना जन्म ; 5 मुले मरण पावले.
सविस्तर : 2 वर्षांअदोगर बेघर अवस्थेत कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या 35 वर्षीय गिता महतो हिला तत्कालीन ठाणेदार पंकज दादा वाघोडे, पोलीस स्टेशन कोंढाळी मार्फत साथ फाऊंडेशन द्वारा संचालित स्व.भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल केले होते. बिहार येथील बिना गावातील रहीवासी असलेल्या गीताबाई ला आज तिच्या परिवाराच्या स्वाधीन केले.
गीतादेवी गणेश महत, वय 35 वर्ष, रा. बिना, बिहार
सदर महिलेचे लग्न झालेले असुन तिला 7 मुलं झाले ज्यामधून 5 मुले मृत पावले. आणि त्यामुळे चांगल्या अवस्थेत असलेली गीतादेवी हळूहळू मानसिक झाली. पतीचे दुसऱ्या महिलेशी लग्नबाह्य संबंध असल्याने ती अधिक मानसिक झाली आणि त्याच अवस्थेत ती घरा बाहेर पडली. बिहार मधून पायदळ पायदळ महाराष्ट्र मध्ये आणि त्यातच नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी हद्दीत आल्यानंतर पोलीस स्टेशन मार्फत 7 फेब्रुवारी 2024 रोजी साथ फाऊंडेशन द्वारा संचालित स्व.भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
आश्रम प्रशासनाने सुद्धा गीतादेवी ला परिवाराच्या स्वाधीन करण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नांना यश सुद्धा आले. आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी गीतादेवी स्वगृही पोहचली. तेव्हा परिवारातील लोकांनी गीताला बघून अश्रूचा टाहो फोडला.
खरंच आज मनाला आनंद वाटतो आहे. आश्रम चे नाव जे पुनर्जन्म आहे ते सार्थक झाल्या सारख वाटतं.
या कामात साथ फाऊंडेशन ला जे हितचिंतक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करतात त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व समाजकार्य शक्य होतं आहे.