Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal

Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal ISO 9001: 2015 Certified NGO. 84 projects, 950 villages, 73 slums.Health, Livelihoods, Environment

 (300)वो इन्साँ और होंगे राह में जो टूटते होंगे।हमारे साथ जितने लोग होंगे सब खरे होंगे॥ (शैलेश जैदी) पिंपळगावचे शिवाजी क...
05/06/2026

(300)

वो इन्साँ और होंगे राह में जो टूटते होंगे।
हमारे साथ जितने लोग होंगे सब खरे होंगे॥
(शैलेश जैदी)
पिंपळगावचे शिवाजी काकडे. १४ वर्षाचा काळ मद्यपाशाच्या आहारी गेलेले आयुष्य. आरोग्य, नाती, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी संपत आलेल्या! अनेक प्रयत्नांनतरही व्यसन सुटेना. मग संपर्क आला सावित्रीबाई फुले मंडळाच्या अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्पाशी. उपचार व सातत्यापूर्ण समुपदेशनाने मद्यपाशातून सुटका झाली. व्यसनावर यशस्वी मात करताच जगण्याची नवी दृष्टीही मिळाली. ‘मला मिळालेला आधार आता मला इतरांना द्यायचा आहे’ या भावनेतून ते मानस मित्र (मानसिक आरोग्य स्वयंसेवक) बनून बनले ५ गावांमध्ये समुपदेशन करायला लागले. एवढेच नाही, तर त्यांनी स्वतःचे वेलनेस सेंटरही सुरू केले आहे. आतापर्यंत ५ जणांना व्यसनमुक्त केले व एका व्यक्तीला आत्महत्येपासून वाचवले आहे.
अरूणोदय प्रकल्पाकडे अशा अनेक यशोकथा आहेत.
या प्रकल्पाने गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात मोठे कार्य केले आहे.
- ४,७५८ समुपदेशन सत्रे.
- ४४९ जण 'AA' बैठकांमधून सहभाग
- ५९३ नागरिकांची मानसिक आरोग्य तपासणी
- 'हॅलो जिंदगी' हेल्पलाइनद्वारे २,५९१ कॉल्स हाताळले,
- १२,४३६ लोकांपर्यंत जनजागृती
- १५०'मानस मित्र' (स्वयंसेवक) कार्यरत.
विप्रो केअर्सच्या पाठिंब्यामुळे चालणाऱ्या या प्रकल्पाने व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्याच्या नवी पहाट झाली आहे.

 (299)मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि ।किंवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥(अष्टावक्र गीता)(भावार्थ- म...
30/05/2026

(299)

मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि ।
किंवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥
(अष्टावक्र गीता)

(भावार्थ- माणसाच्या जवळचे ज्ञान महत्वाचे, त्याचे बाह्य रूप अथवा शारीरिक ठेवण नाही!)
सावित्रीबाई फुले मंडळाच्या विहंग विशेष मुलांच्या शिक्षण प्रकल्पातील विद्यार्थ्यांसाठी वर्गात काही मिनिटं शांत बसणं, लोकांशी संवाद साधणं किंवा अक्षरे ओळखणं या गोष्टी देखील कठीण आव्हानं असायच्या. विशेष मुलांचा अभ्यासकर्म त्यामुळेच खूप विचारपूर्वक ठरवलेला असतो आणि तो पूर्ण करताना शिक्षक आणि पालक दोघांनाही खूप परिश्रम घ्यावे लागतात. आज आमच्या विहंग शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थान (NIOS) च्या बोर्डाच्या परीक्षेत जोरदार यश मिळवून शिक्षक आणि पालकांच्या कष्टाचे फळ मिळवून दिले आहे! लेव्हल ‘C’ च्या परीक्षांमध्ये अर्जित थारेवाल, हर्ष शार्दूल, ज्योतिरादित्य पाटील, शंतनू घाणेकर यांनी तर लेव्हल ‘A’ च्या परीक्षेत औदुंबर चव्हाण, शरयू घाटे, अवनीश काहार आणि राजवीर खडकीकर यांनी खूप छान यश मिळवले. सावित्रीबाई फुले मंडळ आणि विहंग शाळेला आमच्या या विद्यार्थी मित्रांचा खूप अभिमान आहे.
ऋषी अष्टावक्रांची कहाणी केवळ पुराणातल्या गोष्टी नाहीत. विहंग शाळेने ऋषी अष्टावक्रांना दिव्यांग शिक्षण विषयात आदर्श रूपाने ठेवले आहे.

 (298)आजची यशोगाथा आमच्या फुलंब्री तालुक्यातील पराशर कृषी उत्पादक कंपनीची!बेभरवशाचा पाऊस आणि दुष्काळाचं संकट सतत असलेल्य...
22/05/2026

(298)

आजची यशोगाथा आमच्या फुलंब्री तालुक्यातील पराशर कृषी उत्पादक कंपनीची!
बेभरवशाचा पाऊस आणि दुष्काळाचं संकट सतत असलेल्या भागातील ७५०+ छोट्या शेतकऱ्यांना एकत्र केलं गेलं. केंद्र सरकारच्या
१०००० शेतकरी उत्पादक संस्था (FPO) योजनेअंतर्गत नाबार्डच्या मार्गदर्शनात ही कंपनी सावित्रीबाई फुले मंडळाने स्थापन करून दिली.
या कंपनीच्या संचालक व भागधारक शेतकऱ्यांनी पारंपारिक मार्गांपेक्षा कृषी उत्पादन- प्रक्रिया- विक्रीचे नवे मार्ग अवलंबिले. त्यामुळे झपाट्याने प्रगती सुरु झाली आहे.
त्यापैकी एक यशस्वी मार्ग म्हणजे शेवग्याच्या पानांची विक्री. १७० शेतकऱ्यांनी कंपनी बरोबर शेवग्याचे Contract Farming सुरु केले. सौर वाळवण यंत्रांचा प्रामुख्याने उपयोग करत शेवग्याची पाने वाळवून त्याची भुकटी पॅकींग करून विक्री केली जाते. आता तर ही पावडर ते निर्यातही करू लागले आहेत.
पाराशर कंपनी केवळ शेवगा पावडरच नाही, तर हळद आणि आद्रकाचेही शुद्ध पावडर, आकर्षक पॅकेजिंगमध्ये स्वतःच्या ब्रँड नावाने विक्री करते. कंपनीचे अध्यक्ष व प्रगतीशील शेतकरी विवेक चव्हाण म्हणतात, “सावित्रीबाई फुले मंडळ व नाबार्ड हे पराशर कृषी उत्पादक कंपनीच्या प्रगतीत सहप्रवासी आहेत”.
सावित्रीबाई फुले मंडळाने नाबार्डच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात एकूण ३२ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत. ७० विविध प्रकारची कृषी उत्पादने या कंपन्या बनवून विक्री करतात.
एकूण १७३६२ छोटे शेतकरी यांत सहभागी असून या कंपन्या दरवर्षी सुमारे २०० कोटींहून अधिक उलाढाल करतात.
यातील ३ कंपन्या संपूर्णपणे महिला सदस्य व संचालक असलेल्या आहेत.

 (297)लहरों से डरकर नौका पार नहीं होती..कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती…"प्रिती साळवे; छत्रपती संभाजीनगरच्या एका उ...
15/05/2026

(297)

लहरों से डरकर नौका पार नहीं होती..
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती…"
प्रिती साळवे; छत्रपती संभाजीनगरच्या एका उपेक्षित वस्तीत राहतात. कमी वयातच लग्न झाल्यानं शिक्षणही पूर्ण करता नाही आलं. मर्यादित उत्पन्नात घर चालवण्याची कसरत करताना मनात मात्र काहीतरी करायची, आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हायची जिद्द बाळगलेली.
त्यांच्या जिद्दीला जोड मिळाली सावित्रीबाई फुले मंडळाच्या ब्यूटीशियन प्रशिक्षणाची. त्यांनी या प्रशिक्षणाचे बेसिक व ॲडव्हान्स्ड असे दोन्ही प्रशिक्षणं पूर्ण केली. त्यानंतर मात्र मागे वळून पाहिले नाही. पडेगांव भागात त्यांनी त्यांचं लक्ष्मी ब्युटी पार्लर सुरु केलं आहे.
आर्थिक स्वयंपूर्णता आणि आत्मविश्वास दोन्ही गाठीशी आलेला असल्यानं कौटुंबिक प्रगती वेगाने सुरु झाली आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभरात विविध केंद्रांवर प्रिती यांच्याप्रमाणे एकूण ६९० महिलांनी ब्यूटिशियन प्रशिक्षण घेतलं आहे व त्याही स्वयंपूर्णतकडे वाटचाल करीत आहेत.
या महत्त्वाच्या प्रकल्पाचे संचालन आम्ही मुंबईच्या वात्सल्य ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनात करत आहोत.

 (296)पुत्रादपि प्रियतरा जननी।(मुलासाठी त्याची आई जगातील सर्वात प्रिय असते आणि आईसाठी तिचं मूल!)दुपारची दीडची वेळ ... नं...
08/05/2026

(296)

पुत्रादपि प्रियतरा जननी।
(मुलासाठी त्याची आई जगातील सर्वात प्रिय असते आणि आईसाठी तिचं मूल!)

दुपारची दीडची वेळ ...
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम कातसखाई पाड्यात एका कुटुंबाची धावपळ उडालेली.
२० वर्षांची एक पहिलटकरीण ताई बाळंतपणाच्या वेदनांनी व्याकुळ होती. डोंगरदऱ्यांचा दुर्गम भाग, हाताशी काही साधन नाही. ‘वेळेवर मदत मिळेल का?’ या प्रश्नाने कुटुंबाच्या डोळ्यांत पाणी आणलेले. अशा वेळी मदतीला धावून आल्या सावित्रीबाई फुले मंडळाच्या याहामोगी माता बाल आरोग्य प्रकल्पाच्या आरोग्य कार्यकर्त्या दोहरीबाई पाडवी. रुग्णवाहिका लगेच उपलब्ध नव्हती. प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी लगेच एका खाजगी वाहनाचा बंदोबस्त केला. तालुक्याच्या सरकारी रुग्णालयात नेले. गर्भाशयातच बाळाने शौच केले होते व ही गंभीर परिस्थिती होती. धोका ओळखून डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवले. तिथे सिझेरियन झाले आणि बाळ व आईचा जीव वाचला.
वेळेवर मदतीचा हात आणि माणुसकीचा स्पर्श तिथे याहा मोगी आरोग्य प्रकल्पाच्या आरोग्य कार्यकर्तीच्या रुपाने तिथे उपलब्ध झाला.
सावित्रीबाई फुले मंडळ आणि अझीम प्रेमजी फाउंडेशन यांच्या वतीने दुर्गम जनजातीय क्षेत्रात (नर्मदेच्या काठावरील १२२ गावे/ पाडे) जोखमीच्या गर्भावस्थेला लवकर ओळखणे व प्रसूतीपूर्व सेवा सुनिश्चित करण्याचं काम हा प्रकल्प करत आहे.

 (295)“घामातून मोती फुलले…श्रमदेव घरी अवतरले..घर प्रसन्नतेने नटले..हा योग जीवनी आला साजिरा..सोडी सोन्याचा पिंजरा.. ”(जगद...
01/05/2026

(295)

“घामातून मोती फुलले…
श्रमदेव घरी अवतरले..
घर प्रसन्नतेने नटले..
हा योग जीवनी आला साजिरा..
सोडी सोन्याचा पिंजरा.. ”
(जगदीश खेबुडकर- चित्रपट ‘आराम हराम आहे’)
४३ डिग्रीचं रणरणतं ऊन. सूर्य जणू आग ओकतोय..
पण सावित्रीबाई फुले मंडळाचे कार्यकर्ते स्वस्थ बसलेले नाहीत. अशा वातावरणातही ते फिल्ड वर उभे आहेत. निश्चयाने.
पाणलोट आणि मृदसंधारणाची कामे पूर्ण करण्याचा कालावधी मार्च ते जून हाच असतो. यावर्षी या काळात गतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने ३० गावांत जलसमृद्धी आणण्यासाठी काम चालू आहे. सिमेंट आणि माती बंधारे, डोंगरउतारांवर समतल चर, शेततळी, नद्या आणि नाले यांच्या पात्रांचे खोलीकरण, गाळ काढून जलस्त्रोत पुनर्जीवित करणे.
अशी कामं जागोजागी वेगाने पूर्ण होत आहेत. प्रत्येक ठिकाणी सावित्रीबाई फुले मंडळाचे अभियंते, फील्ड वर्कर्स, भूजल तज्ञ आणि सर्वेक्षण कार्यकर्ते स्थानिक स्वयंसेवकांसोबत अक्षरश: अहोरात्र झटत आहेत.
शेतकऱ्यांच्या उद्याच्या समृद्धीच्या मोत्यांसाठी, त्यांचं घर प्रसन्नतेने नटावं यासाठी; आज आपल्याला घाम गाळावा लागेल, श्रमदेवाची आराधना करावी लागेल याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधलेली आहे!

01/05/2026
 (294)जेंव्हा चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची थाप पडते…                                         विहंग विशेष मुलांची शा...
24/04/2026

(294)

जेंव्हा चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची थाप पडते…
विहंग विशेष मुलांची शाळा सुरू होऊन १२ वर्षे झाली आहेत. या प्रवासात अनेकाचे सहकार्य लाभले. अनेकांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. पण एखाद्या उच्चपदस्थानी केलेली प्रशंसा विशेष तर असतेच त्याचबरोबर वाढत्या जबाबदारीची जाणीव करून देणारीही ठरते.
गेल्या मंगळवारी, (२१ एप्रिल) सकाळी सामाजिक न्याय विभागातून दूरध्वनी आला- “केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आपल्या प्रवासात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रकल्पांना भेटतात. आज त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रवासात विहंग शाळेला भेट देण्याची शक्यता आहे” आणि पुढच्या तासाभरात मंत्रीमहोदय ना. डॉ. विरेंद्र कुमार जी विहंग शाळेत पोहचले देखील! सोबत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवतजी कराड हेही होते. डॉ. वीरेंद्र कुमारजी यांनी विहंग प्रकल्पाच्या प्रत्येक उपक्रमाचे, त्यातील उपचार व शिक्षण सुविधांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यासाठी भरपूर वेळ काढला. दिव्यांग मुले आणि त्यांचे पालक यांच्याशी आत्मीय संवादही साधला. दिव्यांग मुलांसाठी अशा अत्याधुनिक सुविधा असलेला शैक्षणिक प्रकल्प दुर्मिळ आहे या शब्दांत शाळेचे कौतुक केले. या अचानक ठरलेल्या आणि सुखद धक्का देण्याऱ्या भेटीने विहंग कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच वाढला आहे.

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal:

Share