05/06/2026
(300)
वो इन्साँ और होंगे राह में जो टूटते होंगे।
हमारे साथ जितने लोग होंगे सब खरे होंगे॥
(शैलेश जैदी)
पिंपळगावचे शिवाजी काकडे. १४ वर्षाचा काळ मद्यपाशाच्या आहारी गेलेले आयुष्य. आरोग्य, नाती, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी संपत आलेल्या! अनेक प्रयत्नांनतरही व्यसन सुटेना. मग संपर्क आला सावित्रीबाई फुले मंडळाच्या अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्पाशी. उपचार व सातत्यापूर्ण समुपदेशनाने मद्यपाशातून सुटका झाली. व्यसनावर यशस्वी मात करताच जगण्याची नवी दृष्टीही मिळाली. ‘मला मिळालेला आधार आता मला इतरांना द्यायचा आहे’ या भावनेतून ते मानस मित्र (मानसिक आरोग्य स्वयंसेवक) बनून बनले ५ गावांमध्ये समुपदेशन करायला लागले. एवढेच नाही, तर त्यांनी स्वतःचे वेलनेस सेंटरही सुरू केले आहे. आतापर्यंत ५ जणांना व्यसनमुक्त केले व एका व्यक्तीला आत्महत्येपासून वाचवले आहे.
अरूणोदय प्रकल्पाकडे अशा अनेक यशोकथा आहेत.
या प्रकल्पाने गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात मोठे कार्य केले आहे.
- ४,७५८ समुपदेशन सत्रे.
- ४४९ जण 'AA' बैठकांमधून सहभाग
- ५९३ नागरिकांची मानसिक आरोग्य तपासणी
- 'हॅलो जिंदगी' हेल्पलाइनद्वारे २,५९१ कॉल्स हाताळले,
- १२,४३६ लोकांपर्यंत जनजागृती
- १५०'मानस मित्र' (स्वयंसेवक) कार्यरत.
विप्रो केअर्सच्या पाठिंब्यामुळे चालणाऱ्या या प्रकल्पाने व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्याच्या नवी पहाट झाली आहे.